(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तीची गगनभरारी

    विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री
    अबला नाही तर दुर्गा असलेली स्त्री
    शरीराने असली नाजूक तरी रोजची कसरत करते ती
    मनाने असली हळवी तरी खंबीर असते ती
    माहेर, सासर जन्मापासून सगळी नाती सांभाळत असते
    स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आयुष्यभर जगत असते
    स्त्री म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याची खाण असते
    चार भिंतीना घरपण देऊन घराचे पावित्र्य राखत असते.
    स्त्रीवर अत्याचार करणे आता थांबवा
    महिला दिनाचे औचित्य वर्षभर राखा
    मुलगी जन्मास आली तर तिला नाकारू नका
    उलटपक्षी महिलांचे सक्षमीकरण करा
    स्त्री शक्तीचे पाऊल आता पुढे पडू दे
    उंच गगनभरारी तिला तिच्या अवकाशात घेऊ दे
    स्त्री पुरुष संसार रथाची दोन चाके
    बरोबरीने चालतील तरच आयुष्य होईल ओके
    आयुष्य होईल ओके ।

    - मिनल आठल्ये

    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

  • आरक्त नयनी ओढ तुझी

    आरक्त नयनी ओढ तुझी
    धुंद बावरी मी आतुर मिलनी,
    ये तू सख्या साद हलकेच माझी
    मोह तुझ्या मिठीचा मधुर मलमली..
    गात्र सैलावली रोमांचित होउनी
    स्पर्श माझा होता मोहक मखमली,
    मुग्ध होशील तू सख्या हलकेच
    ती कातर वेळ धुंद मनोमिलनी..
    कितीक वाट पहावी तुझी
    तुझ्यात आर्त व्याकुळ मी,
    ओठ ओठांना भिडता अलवार
    मधुर चुंबीता तू ओल्या हळव्या देही..
    सोडते लाज मी स्पर्श होता तुझा देही
    तू ओढून घे मिठीत त्या कातर क्षणी,
    मलमली मिठीत माझ्या तू ये बेधुंद मनी
    विरघळून जा सख्या माझ्यात अबोल अंतरी..

    -- स्वाती ठोंबरे.

  • एक आरजू- प्रभुकी खोज

    मनमे एक आरजू थी के प्रभु मिल जायेगा
    दिलकी धडकन कहती के उसे अपनेमेंही पायेगा

    आंख सबतरफ ढूंडती है हर एक कण में
    फिरभी दृष्टी असमर्थ हैं उसे पहचाननेमें

    ध्वनी की लहरे हर तरफ गुंज उठती
    कानोंके सहारे आवाज उसकी ना सुनी जाती

    महक उठती हवा खुशबूदार गंधोंसे
    पहचाने उसे कहां बगीचेके फूलोंसे

    बीती कितनी जींदगीयां उसकी खोज करनेमें
    कमजोर पडती है इंद्रिया उसे जान जानेमें

    आ तू इन्सानका रुप लेकर के तुझको मै देख पाऊं
    या मुझको दिव्य शक्ति देकर के तुझमें मैं समा जाऊं

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • विरह

    पहाटेच धुकं नजरेसमोर पसरलेलें,
    आनंदाचा दवबिंदू अलगद पानावर पहुडलेला,
    अचानक वादळ आलं, अबोल अजानतं,
    होत्याचं- नव्हतं करत, सर्व नष्ट करून गेलं!

    मन कशातच गुंतत नाही,
    आठवण आठवणींची आठवतही नाही,
    काल होता आज आहे उद्या असेलही कदाचित,
    काळासोबत अनमोल ते हास्य खुलणार नाही!

    सहवास होता,सदोदित साथ देणारा,
    संयम होता, माझे बोल झेलणारा,
    जिद्द होती, नितांत प्रेम करण्याची,
    खुपलं नियतीच्या डोळ्यात सारं,
    कधी पूर्ण न होणार कस्तुरी-मृगेचं नातं!

    वाट बघणार मन केव्हाच गेलं निजून,
    शब्दही झाले निःशब्द पुरतं मौन धरून,
    झोपेतलं सुंदर स्वप्न विरहाने गेलं विरून,
    शापित ठरले नशिब अंबा सारखे,
    या जन्मात जन्म घेऊन!

    चिता रचली आपल्या नात्याची,
    फुंकर ओठांची पोहचली नाहीं,
    आटून गेले डोळे, आसवांची ओंजळ भरली नाही,
    पोळणाऱ्या या राखेत, दडलायस का कुठे तू ?
    शोधतेय मी सतत तुला, येशील का पुन्हा तू?

    - श्र्वेता संकपाळ.

    Note- (अंबा - काशी राज्याची जेष्ठ कन्या)

  • मनाची वारी

    पाऊलोपाऊल चालत जाते,
    मनामधली एक वारी,
    ना टाळ, ना मृदुंग हाती,
    तरी भक्तीची गोड तयारी.

    रस्ता नाही धुळीचा येथे,
    ना दिंडींची गर्दी भारी,
    अंतर्मनाच्या शांत वाटेवर,
    अखंड सुरू ईश्वराची वारी.

    सुख-दुःखांचे डोंगर ओलांडत,
    आशा-निराशेच्या पलीकडे सारी,
    प्रत्येक श्वासात नाम गुंजते,
    हीच खरी जीवनवारी.

    अहंकाराचे ओझे टाकून,
    प्रेमाची घेऊन शिदोरी,
    करुणा, श्रद्धा, सत्य सोबती,
    नेते आत्म्याला प्रभूच्या दारी.

    कधी अश्रूंनी पाऊल भिजते,
    कधी आनंदाची फुले फुलती,
    तरी न थांबे हा अंतःप्रवास,
    ओढ लागलेली पंढरीची न्यारी.

    शेवट नसतो या प्रवासाला,
    ना थांबे कधी ही स्वारी,
    ईश्वर भेटतो अंतःकरणी,
    जेव्हा पूर्ण होते मनाची वारी.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • अंतर्मनातील आवाज

    ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं
    बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।

    चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे
    दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।

    संवाद होता आत्म्याशी
    विचारा सारे आतून कांहीं ।।३।।

    आंतल्या आवाजांत सत्याचा भाव
    भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।

    नियमीत ध्यान साधना करती
    इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।

    ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत
    राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत ।।६।।

    प्रश्न सोडवी ध्यान शक्तीने
    आत्म्याची मदत घेई युक्तीने ।।७।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • नामस्मरणाचे कोडे

    मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,
    कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?
    कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।

    श्वास चालतो रात्रदिनीं,
    लक्ष्य न घेई खेचूनी,
    ऊर्जा मिळते देहातूनी,
    परि मनास बंधन नसावे....१, कोडे हे उकलून घ्यावे

    एकचि कार्य एके क्षणी,
    एकाग्रता येई दिसूनी,
    अवसर मिळे मग कोठूनी,
    त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२, कोडे हे उकलून घ्यावे,

    संसाराचे ‘जू’ मानेवर,
    ओढण्यासांगे ईश्वर,
    मार्ग सारे असता खडतर,
    कसे त्यास वळवावे पाहावे......३, कोडे हे उकलून घ्यावे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • सहज तू म्हणालास विसरुन तू सार जा

    सहज तू म्हणालास
    विसरुन तू सार जा,
    बहर होता तो एक
    मनातून मिटून सगळं टाक..
    सहज सार विसर म्हणलं
    तरी विसरता येत नाही,
    मनाच्या तारा छेडल्या तू
    आता आठवणी मिटत नाही..
    बहर तर सगळ्यांचा असतो
    पान,फुलं,अगदी निसर्गही बहरतो,
    स्त्री मनावर फुंकर मारता मात्र
    कहर तो जरा मन कल्लोळ होतो..
    सहज सोप्प तुला वाटतं तरी
    स्त्री असते मुळात हळवी,
    गुंतून जाते ती अबोल जेव्हा
    तेव्हा न दिसते तिला कुठली भीती..
    अंतर मन मग ओल बावरं
    त्यात प्रत्येक स्त्री मोहरते,
    पुरुष म्हणतो विसर सार तू
    तेव्हा स्त्री त्याला कळलेली नसते..
    गुंतल्या जातात मुग्ध भावना
    एका वळणावर स्त्री पुरुष येता,
    आकर्षण हे दोघांत युगानयुगे असते
    न चालतात मग इथे कुठल्या मात्रा..
    सगळं काही विसरलं तरी
    अस्तित्व पुसलं जातं नाही,
    तू पुरुष अन मी स्त्री फरक
    हाच तो मिटला जातं नाही..
    आड वाटेवर वाटा अचानक
    वाकड्या साऱ्या एकदा होतात,
    स्त्री आणि पुरुषाला एकत्र आणून
    वाटा मात्र वेड्यावाकड्या होतात..
    नसतं इतकं सोप्प मग स्त्रीला
    गुंतलेल्या भावनेतून बाहेर येणं,
    पडझड तिच्या मनाची होते
    काहूर तिच्या अतरंगी अलगद वेढतं..
    समजल्या नाही स्त्री भावना
    तरी अबोध हळवी ती होते,
    व्याकुळ होतात काही आठवणी
    त्यात अंतरंगी तिचीच होळी पेटते..
    मन नसेल तो माणूस नसतो
    भावना नसेल तर तो भाव नसतो,
    स्त्री नसेल तर ती जाणीव नसते
    पुरुषाला स्त्रीची सल कळतं नसते..
    सोडवता येतं नसेल तर
    गुंताच कुठला सोडू नये,
    आणि मन मोहरलं कुणात
    तर भाव व्याकुळ होऊ नये..
    पुरुष जेव्हा स्त्री जन्म घेईल
    तेव्हा कळतील साऱ्या स्त्री भावना,
    न विसरते स्त्री मग काही भावना
    निसर्गतः असतात कोमल तिच्या जाणिवा..
    देवाने बनविले स्त्री आणि पुरुष
    मोहरतात दोघांच्या नाजूक भावना,
    परी स्त्री तुटते तडाख्यात त्या वाऱ्याच्या
    पुरुष राहतो किनाऱ्यावर आल्हाद जरासा..
    नकळत स्त्री गुंतून जरा जाते
    पुरुषात अलवार वेल्हाळ होते,
    माहीत असते समोर वादळ आहे
    तरी आल्हाद स्वतःला झोकून देते..
    भावनांचा मोहक खेळ हा मग
    प्रत्येकजण एकदातरी खेळतो,
    कुणी गंधित अत्तरात गंधाळतं
    तर कुणाच्या भावनांचा दगड होतो..
    -- स्वाती ठोंबरे.
  • मिष्किल तारे

    चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे

    लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे....१

    कधी जाती ते चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी

    खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी....२

    एक एक ते जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं

    संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगी....३

    हसतो कुणीतरी मिश्कील तारा, डोळे मिटतो दुजा बिचारा

    स्थिर राहूनी लपतां लपतां, खेळांचा तो वाढवी पसारा....४

    निशा राणीची मुले ही सारी, खेळत राहती रात्री बिचारी

    उशास बघूनी हसतां हसतां, निघूनी जाती आपल्या घरी....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • तू लपलास गुणांत

    कृष्ण कमळ –