समोर ये तूं केंव्हा तरी
बघण्याची मज ओढ लागली
फुलूनी गेली बाग कशी ही
बीजे जयांची तूच पेरीली
कल्पकता ही अंगी असूनी
दुरद्दष्टीचा लाभ वसे
अंधारातील दुःखी जनांची
चाहूल तुज झाली असे
शीतल करुनी दुःख तयांचे
जगण्याचा तो मार्ग दाखविला
सोडूनी सारे वाटेवरी
आकस्मित तू निघूनी गेला
आस्तित्वाची चाहूल येते
आज इथे केंव्हातरी
तव आशिर्वादे जगतो सारे
हीच पावती त्याची खरी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला
ठेवूनी ती आठवण, चांगले ठेवा देहाला...१
व्यायाम व आहार, असतां नियमित
सुदृढ ते शरीर, असते मग बनत...२
सुदृढ असता देह, करावे मनाला शांत
टाळत असतां मोह, न येई तो भावनेत...३
षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी
निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी...४
देह आहे मंदीर, गाभारा तो मन
आत्मा तो ईश्वर, आनंद देई आंतून...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
( जुन्या काळीं, अर्जन्सी दर्शविण्यासाठी असें लिहीत –
‘जेवत असलात तर हात धुवायला इकडेच या’.
त्या आधारानें, हें काव्य, जरासें खट्याळ ).
तुम्ही
तातडीनें इकडे या,
अर्जंट या.
जेवत असलात तर
हात धुवायच्या आधी
इकडे या.
अन् मत द्या.
पाणी पीत असलात तर
फुलपात्रं खाली ठेवण्यांआधी
इकडे या.
अन् मत द्या.
आंघोळ करत असलात तर
कपडे बदलण्यांपूर्वी,
ओल्या कपड्यांनीच
इकडे या.
अन् मत द्या.
पण दुसरा ‘अर्जंट कॉल’
आला असला,
आणि तुम्ही
टॉयलेटमध्ये असलात तर,
तर घाई करूं नका,
तुमचा वेळ घ्या,
तिकडेच हात धुवा,
नंतर या.
मात्र, या.
अन् मत द्या.
(आणि तेंही आम्हालाच). १
कारण,
तुमच्या भेटी घेऊन,
अन् तुम्हाला ‘भेटी’ देऊन
आम्ही इनव्हेस्ट केलेलं आहे,
त्याचं ‘रिटर्न’
नको कां आम्हाला मिळायला ? २
आमचा कँडिडेट
निवडणुकीतून ‘रिटर्न’ होऊन
घरीं बसायला नको ;
तर, तो
MLA म्हणून
विधानसभेत
‘रिटर्न’ व्हायला हवा. ३
म्हणून,
जेवत असलात तर
हात धुवायच्या आधी
इकडे या.
अन्, टॉयलेटमध्ये असलात तर
दमानं या,
हात धुवून या.
पण या जरूर. ४
हात धुवा किंवा धुवूं नका,
पण धुतल्या तांदळासारखं वर्तन ठेवा,
या, आम्हांलाच मत द्या,
आणि आम्हांलाच जिंकवा. ५
- - सुभाष स. नाईक
एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली
आणि चलनात यावी सच्चाई...
एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला
आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात...
एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला
आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे....
एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा
आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने...
एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध
आणि सद्भावना रुजावी प्रत्येक मनामनात...
एखाद्या मध्यरात्रीपासून बेकायदेशिर व्हावी धोखेबाजी
आणि आपलेपणा अंकुरावा माणसाच्या अंत:करणात...
एखाद्या मध्यरात्रीपासून नष्ट व्हाव्यात सर्व चिंता
आणि ऊगवावी एक सकाळ सकारात्मक विचारांची...
एखाद्या मध्यरात्रीपासून माणूस बनावा
अगदीच माणसासारखा...
जुन्या वाटा बदलायला त्याने घ्यावा काही दिवसांचा वेळ अधिकृतपणे
पण त्याने बदलावी आपली नियत एखाद्या मध्यरात्रीपासून ....
आणि एकदा त्याच्या नियतीने वाटा बदलल्या की मग
पुन्हा पुन्हा नाही पडणार गरज नोटा बदलण्याची...
हे मात्र घडावेच अगदी एखाद्या मध्यरात्रीपासून....
Forwarded Post
दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची
मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जी जीवनाची....१,
वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरिर कुणाला,
मना मारूनी बसावे लागे, ईश्वरी नाम घेत सर्वाला....२,
निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन
दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,
बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले
दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व ते आज जाणले....४,
जेंव्हां करितो स्वत: करिता, स्वार्थी भाव तो लपला असे
दुजासाठी ते करिता सारे , स्वार्थी भाव ते राहील कसे ?....५,
शेवटचे ते सरते जीवन, प्रभू चरणी ते समर्पण व्हावे
हात जोडूनी विनंती करतो, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी.....
भारतीय ! (१५-०८-२०१८)
नको हो माण, नको हो पैसा,
नको तो वायफळ जातीवाद,
कानी पडावी एकच गोष्ट,
भारतीय असल्याची तीक्ष्ण साद...!!
जो तो उठतो लढत बसतो,
वैयक्तिक वाद कुठेच नसतो,
सोडता ठिणगी राजकारण्यांनी,
हल्लाबोल कसा अंगी सळसळतो?!!
थोडातरी विचार करावा,
समजून उमजून निर्णय घ्यावा,
एकजात उरात आम्ही भारतीय,
अंती भारत मातेचा आदर उरावा.....!!
हे अशोकचक्रा पाहता तुझी शान,
गगनी भिडते अभिमानाने उंच मान,
हाच अहंकार प्यारा रे मजला ,
स्वीकार मानाचा मुजरा रे तुजला...!!
... श्र्वेता संकपाळ.
धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी...१,
बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे...२,
नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे...३,
जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी...४,
प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची....५,
मृत्यूच्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता....६,
जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
निसर्गाचे चाले अविरत हेच खेळणे....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे?
मीही नाही रे पाहिलं
आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे
त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे
कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे
अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण
क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते
हरवतो तो न जाणो किती दिवस.
अगदी अगदी दडून बसतो
अवचित मग कधी कुठेतरी पुन्हा गवसतो कुठे बरं
गाभाऱ्यात मंद मंद समईसोबत दरवळत असतो
जीवाची शिवाशी भेट ठरवत असतो
कधीतरी कणकण होऊन ओंजळीतही उतरतो
पण निर्माता मात्र अजून देखिलाच नाही
चंदन एक अलौकिक परिमळ
नित्य नव्या जाणीवांसह पुन्हा पुन्हा भेटत राहतो
स्पर्शाविना तुझा सुगंध आसमंत भरून उरतो
चंदना एकदा तरी चांदण्यात तू मला कडकडून भेट
रंध्रातून श्वासात उतरून मीच होऊदे चंदनाचे बेट!!
-- वर्षा कदम.
आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा
रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला १
विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी
कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला २
प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस
विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला ३
प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा
भावनेस व्यक्त करी कविता, ती अर्पितो मी तुजला ४
II शुभं भवतू II
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
बागेतील तारका-
Copyright © 2025 | Marathisrushti