वसंत जेथे तेथे सुमने
सुमनांपरी ही दोन मने
दोन मनांतुन प्रीत दरवळे
रंग एक परि गंध वेगळे
दोन मनांतुन प्रीत दरवळे
बकुळफुलांचे घुंगुर बांधून
प्रीत सुगंधा करिते नर्तन
नादमधूर या झंकारातून
भाव मनीचा तुला मिळे
शुभ्र धवल मोगरीची
पुष्पमाळ गुंफिते
चैत्र पौर्णिमेची सख्या
प्रीत वाट पाहते
क्षणाक्षणाची आस तुझी
लाख युगे मोजिते
अंतरीच्या मूर्तीला मी
भावफुले वाहते
वसंत जेथे तेथे सुमने
सुमनांपरी ही दोन मने
दोन मनांतुन प्रीत दरवळे
पी. सावळाराम
बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं
लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १
चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे
फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २
वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले
भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३
मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला
स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४
दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे
व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५
प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे
रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६
राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते
अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७
दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला
शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८
तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी
आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९
वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली
दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०
फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता
डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११
आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते
आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण
त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही
उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण
साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार
देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना
उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना
सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान
प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई
तीच प्रभूसी अर्पण होई
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@gmail.com
बघ ना सखे, कसं आभाळ गच्च दाटलंय
मनात तुझ्या आठवणींचं काहूर माजलंय...
चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
अंगी झोंबे हा गार गार वारा
मोहरून तुझ्या आठवणीने, येई देही गोड शहारा
उबदार घट्ट मिठीत घेऊन, मला बिलगशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
सखे सुरू झालाय, आता वीजांचा कडकडाट
हिरवी होईल धरती अन् ओली चिंब पायवाट...
थोडी सावरत अन् बावरत, हात माझा हाती घेशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
धुंद कुंद ओल्या क्षणी, येऊ दे आता प्रेमाला बहर...
तप्त धरणीच्या मिलनासाठी “तो”ही करेल कहर
त्याच्यासारखीच मिलनाची ओढ, तुला देखील लागेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
निसर्गाच्या अमृतधारांनी, मन न्हाऊन निघतंय
आठवणींच्या हिंदोळ्यावर, उगाच झुलत राहतंय
पुरे झाल्या आठवणी, आता सामोरी तू येशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
ऊन-पावसाच्या लपंडावात, बघ इंद्रधनुही साकारले
सप्तरंगांच्या या खेळात, झाले तुझेही मन बावरे
बावऱ्या तुझ्या या मनात, प्रेमाची पालवी फुटेल ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
बरसू दे त्याला मनासारखं, आपण मात्र एकांत शोधूया
आडोशाला उभे राहून, एकमेकांच्या मिठीत विसावूया
गोऱ्या गालावरून थेंब ओघळताच, लाजून हसशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
तसा आत खोलवर पाऊस, माझ्या रोजच बरसतो आहे
डोळ्यांतील आसवांसवे, नित्य ओघळतो आहे
उधाणलेल्या माझ्या मनाचा, किनारा तू होशील ना?
सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?
©श्री. अल्केश प्रमोद जाधव®
अलिबाग, रायगड
आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलते साल नवं नवं
राजसा प्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।।धृ।।
नव्या सालातील नवी सांज ,नटून बसले हो मी।।
अजून सजणा नाही आले,घायाळ हरणी हो मी।।
उगाच कावं उशीर केला,मनास या होती घावं।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।१।।
साज सरली रात्र झाली, भेटीलागी मी आतुरली।।
विरहणीची व्यथा न्यारी,
अजून तुम्हा ना कळली ।।
उर धडधडे काया थरथरे, नका टाकू डावं
।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।२।।
रात्र सरली पहाट झाली,एकलीच मी झुरली।।
जडावलेल्या पापणीला,
ओढ तुमचीच लागली।।
नको छळणे प्रीतीत रमणे,नाही तुम्हा का ठावं।।
राजसाप्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।। ३।।
हुरहुर माझ्या मनी दाटली,प्रियतम हा कुठं
।।
प्रीतीत कुणाच्या अडकला का,प्रश्न मनी या उठं।।
माझ्या प्रीतीचा नजराणा,कमी पडला का हो रावं।।
राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।४।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नको नको ते जीवन जगणे,
हिशोब ज्याचा राही उणे,
काय मिळवीले येऊन जगती,
खंत याची सदा वाटणे ।।१।।
ज्वाला बनुन विझूनी जाणे,
ऊर्जा वाटीत सर्वांना,
मंद मंद ते जळत राही,
धुरांडे ते काही देईना ।।२।।
लखलखाट तो करीते वीज,
क्षणीक राही नभांगी,
मिन मिननारा दिवा अंगणी,
अल्प प्रकाशी बाह्यांगी ।।३।।
किती काळ अन् कसे जगला,
हिशोब याचा कुणी करेना,
कष्ट त्याग तो बघती सारे,
काय दिले तुम्ही इतरजना ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
इमारतीचा झाला आहे आता खंडहर,
अनेक खिडक्यात आहेत दोन जीर्ण,
एकमेका पाहत, म्हणत एक दुसरीला,
आहे का कोणी आपली काळजी घ्यायला?
काळ चालला आहे वेगात,
न थांबता, न संपता,
बिचाऱ्या पाहत होत्या वाट
आपल्या ‘कांती’ बदलाची !
ओसरला त्यांचा आनंद क्षणात,
आले होते कोणी इमारत पाडण्या,
काही होत्या सुपात काही जात्यात,
बघोनिया दूर, भयंकर प्रश्नचिन्हांत !
संपला होता त्यांचा निवास,
करोनिया मन घट्ट,
सारोनिया दूर विचार,
फिरून नाविण्याचा पुनर्विचार !
जगदीश पटवर्धन
ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं
बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।
चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे
दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।
संवाद होता आत्म्याशी
विचारा सारे आतून कांहीं ।।३।।
आंतल्या आवाजांत सत्याचा भाव
भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।
नियमीत ध्यान साधना करती
इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।
ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत
राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत ।।६।।
प्रश्न सोडवी ध्यान शक्तीने
आत्म्याची मदत घेई युक्तीने ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
पूजित होतो प्रभूसी,ध्यान एकाग्र करुनी
भाव भक्तिने तल्लीन,होत असे भजनी ।।१।।
काव्यस्फूर्ति देऊनी,कवि बनविले मजला
शब्दांची फुले गुंफवूनी,कवितेचा हार बनवविला ।।२।।
सुंदर सुचली कविता,आनंदी झाले मन
ध्यास मज लागता,गेलो त्यांतच रमून ।।३।।
पुजेमधले लक्ष्य ढळले,काव्याच्या मागे जावूनी
भजनांतील चित्त वेधले,तपोभंग तो होऊनी ।।४।।
मधाचे बोट चाटवूनी,मोहात ओढले मजला
दूर सारुनी अमृत घट,परिक्षा घेता झाला ।।५।।
अडथळे येऊनी तप साधनेत,कस लावतो सत्वाची
हीच आहे प्रभूची रीत,परिक्षा घेई भक्ताची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti