आडबाई आडवणी
गिझरचं पाणी काढवणी
विजेने केला पोबारा
माझी चुकली नऊ बारा
आज मन आनंदले,
सुखाच्याही पा--र गेले,
भंवसागरी तरणे खासे,
आता सोपे वाटले,--!!!
दुनियादारी निभावणे,
असते किती कठीण,
तरीही तावून-सुलाखणे,
सहजी कसे जमले,--!!!
मनमोर थुई थुई नाचे,
पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!
खंबीर,धीरगंभीर राहणे,
तटस्थभूमिका निभावावी,
येऊ देत वारे--वादळे,
मात्र एक झुंज द्यावी,--!
तुझ्यापेक्षा मी सरस,
म्हणत त्यांन भिडावे,
संकटांचे सतत घोर,
जिवामुळी लावू न घ्यावे
एक दत्तगुरु पाठीराखे,
राहावे निर्धास्त लेकराने, गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
आपुले दुःख सांगावे,--!!!
ते असतां मागे,
त्यांची जाणीव ठेवावी,
एक त्यांचे स्मरण,
सारी दुनिया विसरावी,--!!!
आनंदाच्याही डोही बुडावे,
ओलेत्याने राहावे कोरडे,
पाणी जाताना नाकी तोंडी,
दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!
हिमगौरी कर्वे.©
अंतर वाढलं,
कोणी पावलं मागे घेतली म्हणून नाही,
तर कोणी थांबलंच नाही म्हणून.
शब्द होते,
पण ते पोचायच्या आधीच
त्यांचा अर्थ हरवून बसला.
म्हणून संवाद मेलेला नाही,
पण तो ओळखीचा राहिला नाही.
अनोळखी सहज जवळचे झाले,
कारण त्यांच्याशी अपेक्षा नव्हत्या.
आणि ओळखीचे दुरावले,
कारण अपेक्षाच खूप होत्या.
एकेकाळी नाव पुरेसं होतं,
आता स्पष्टीकरणही अपुरं वाटतं.
आपण भेटतो, बोलतो, हसतो…
पण कुठेतरी
एकमेकांना ओळखणंच विसरलो आहोत.
हे अंतर
नात्याच्या शेवटी नाही,
ते नात्यातच
हळूच रुजत गेलंय.
आणि म्हणूनच कदाचित
आज आपण एकमेकांसमोर उभे असलो,
तरी मनात कुठेतरी जाणवतं
आपण आता
एकमेकांसाठी
अनोळखी झालो आहोत.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
विसरू कसे , क्षण मी सारे
खारेपणा हा अंगी असतां,
कोण खाईल केवळ मीठ,
परि पदार्थाला चव येई,
मिसळत असता तेच नीट ।।१।।
जीवन सारे खडतर ते,
भासते मिठासम मजला,
केवळ जीवन बघता तुम्हीं,
पेलणें अवघड सर्वाला ।।२।।
तेच जीवन सुसह्य होई,
‘आनंदात’ जेंव्हां मिसळते,
हर घडीच्या प्रसंगामध्ये,
समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
विश्वामध्ये वावरतां भोंवती विश्व पसारा
रमतो गमतो खेळतो जीवन घालवी सारा,
संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित
प्रत्येक ती निर्माण करी आपलेच विश्व त्यांत
जीव निर्जीव विखूरल्या वस्तू अनेक
आगळ्या त्या परि ठरे एकाचीच घटक,
विश्वामध्येच विश्व असते राहून बघे विश्वांत
समरस होता त्याच विश्वाशी प्रभूमय सारे होत
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’
इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’
इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन
पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं
नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली .
- सुभाष स. नाईक
चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण
दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून....१,
फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी
पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२,
चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम
खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३,
वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती
तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हादरून गेलो मनात पूरता, ऐकून त्याची करूण कहानी
केवळ एका दु:खी जीवाने, हृदय दाटूनी आणीले पाणी
असंख्य सारे जगांत येथे, प्रत्येकाचे दु:ख निराळे
सहन करिल का भार येवढा, ऐकूनी घेता कुणी सगळे
सर्व दुखांचा पडता डोंगर, काळीज त्याचे जाईल फाटूनी
कसाही असो निर्दयी कठोर, आघात होता जाईल पिळवटूनी
मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां देवा
सर्वजणाची दु:खे झेलण्या, वज्र देह हा धारीला असवा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सृष्टीचे हे ऋतुचक्र, अविरत अविश्रांत युगानुयुगे चालले
Copyright © 2025 | Marathisrushti