लाटांवर लाटा उसळत,
तयार होते भिंत,
अगणित थेंबांच्या रेषा,
अशा, कोसळती अविरत,
थ
सोनसळीप्रकाश त्यावरी त्यांच्यावरी बघा खेळतो,
जलथेंबांचे अखंड नाच,
पाहुनी तो चमचमतो,
खालवर जाऊन पाण्यात,
जादूगार तो किमयाकरे
रंग सोनेरी हिरवे निळे,
जांभळे पांढरे त्यात पसरे,
लाटांची खळबळ ऐकून,
हसे तटस्थ तो किनारा,
चलबिचल"त्यांचीपाहत राही
विस्तीर्ण दूरवर पसरलेला,-!
लाटांचे चढउतार चालू,
एक दुसरीवरी उसळे,
प्रत्येकीचे प्रताप" वेगळे,
सामर्थ्यबघता ते निराळे,
भरती ओहोटी असो वा,
रुद्रतांडव रत्नाकराचे,
लाटांवाचून अस्तित्व" नाही, किती या विशाल सागराचे,!
थेंबाथेंबांचे अस्थिरहोणे,
खालवर वरखाली पुढेमागे,
लाट होऊनी काय दर्शवे,
जगणे आपुले तसेअसावे,!
थेंबाथेंबाने जीवन चाले पुढे,
खाली-- वरती पुढेमागे,
असे असूनही परस्परांशी,
जोडायचे ना प्रेमधागे,--?
असंख्य जलबिंदू दाखवती, जीवनातील भंगुरता
चंचल स्वरूप हे यांचे ,
अन् टोकाचीअस्थिरता,--!
थेंबाना किनारा गाठणे,
कितीअप्राप्यवाटते, कधीतरी या यात्रेला,पण, मुक्तीही दैवीचअसते,--!!
हिमगौरी कर्वे
आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला,
उभा विठ्ठल दारावरती, हेच तो विसरला ।।धृ।।
आईबाप हे दैवत ज्याचे,
रुप पाही त्यांच्यात प्रभूचे ।
सेवा करीत आनंद लूटतां, तल्लीन जो जहला
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।१।।
निद्रेमध्यें असतां दोघे,
मांडी देऊनी आपण जागे ।
कशी मोडू मी झोप तयांची, प्रश्न विचारी भगवंताला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।२।।
वीट देऊनी विठ्ठलासाठीं,
उभे केले त्या जगजेठी ।
आपण गेला घेऊन त्यांना, स्नानाकरीता चंद्रभागेला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।३।।
आठ्ठाविस युगे गेली उलटूनी,
कटीवरती हात ठेवूनी ।
पांडूरंग बघे वाट तयांची, भक्तितच जे विसरती जगाला,
उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
घड्याळ होते भिंतीवरती
टिक टिक करुन चाले
सतत दिसली चाल काट्यांची
एकाच दिशेने हाले
धावत होता एक तुरु तरु
दुजा हळूच धांवे
छोटा जाड्या मंद असून
पळणे ना ठावे
पळत असती पुढे पुढे
समज देती काळ-वेळेचा
किती राहील शिलकीमध्ये
प्रवास आपुला जीवनाचा
जीवन चक्रापरि फिरती
घड्याळ्यामधले सारे काटे
जाणीव करुन देती सतत
आपण कोठे अन् जीवन कोठे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
*चारोळी क्रमांक १*
लेखणीतील शाई
कागद करी काळा
अर्थप्रवाही वाक्य
वाच सगळी बाळा
*चारोळी क्रमांक २*
लेखणीतून झरे
कागदावरी ज्ञान
तिथे अज्ञान सरे
लोका करी सज्ञान
*चारोळी क्रमांक ३*
ज्ञानगंगा वाहते
ही स्त्रवता लेखणी
सरस्वती रमते
साहित्यात देखणी
सौ.माणिक शुरजोशी
केला सुखाचा शोध धनसंपत्ती ठायीं
उशीरा झाला बोध ऐष आरामांत ते नाहीं
एका गोष्टीची उकलन कळली विचारापोटीं
आयुष्य हवे होते वाढवून देह सुखासाठीं
परि लागता ध्यान प्रभूचे चरणावरी
नको मजसी जीवन हीच भावना उरीं
सर्वस्व अर्पा प्रभुला हाच मार्ग सुखाचा
तेव्हांच मिळेल सर्वाला आनंद जीवनाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं
विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी //
चार पुस्तके वाचूनी त्याचे, तर्कज्ञान वाढले
दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले //
नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी
समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी //
आधुनिक होते विचार त्याचे, कलाकार तो होता
पृथ्वीवरील घटणाना परि , योग म्हणत होता //
काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति, देखील ती
नाव प्रभुचे त्या वातावरणी, कुणी न घेती //
प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी, चित्त तयाचे स्वछंदी
रहात होता सुंदर बंगलीं, अतिशय आनंदी //
छंद तयाला फुलझाडांचा, बाग केली छान
विविधतेची झाडे झुडपे, दिसे शोभावान //
दिवसभराचे कष्ट करुनी, फुलवित असे बाग
सुवास सारा दरवळूनी, डोलती तेथे नाग //
पक्षी आणि प्राणी जमवूनी, संग्रहालय दिसले
आवाजांचे सूर निघूनी मग, मधूर ते भासले //
मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग
आनंदाला सिमा पडेल, कशी तेथे मग //
सारे होते नयन मनोहर, त्या वातावरणीं
संबोधित होता त्या वास्तूला "निसर्ग " तो म्हणूनी //
वेड लागुनी तन्मय झाला, सौंदर्याच्या ठायीं
निसर्गातील रस सदैव, शोषित तो राही //
नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा
परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तो तर देत नसतो कांहीं,
घ्यावे लागते खेचूनी ।
शक्ती लावूनी खेचा सारे,
देईल परि ढील सोडूनी ।।
जरी असला दयेचा सागर,
केवळ मागणें मान्य नसे ।
तुटून तुमचे प्रयत्न होता,
ओजळीने तो देत दिसे ।।
व्यर्थ घालवी जीवन कांही,
स्वार्थीपणाच्या मागणी पायी ।
वेडे ठराल तुम्हींच परि,
काळ मात्र कधी थांबत नाही ।।
धडपड करा, लुटून घ्या
सांघिकतेच्या भूमिकेतूनी ।
जाच न होई दुजास त्याचा,
हीच भावना उरी बाळगूनी ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आहे ती लहान
परि किर्ती महान
छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले
आले घेऊन पाटी
अ आ इ ई लिहीण्यासाठी
लिहून वाचून ज्ञानी बनले
देशांत नांव कमविले
शहर चालते, देश चालतो
महान बनले लोकांमुळे
बीजांचे वृक्ष झाले
त्या केवळ शाळेमुळे
कुणी बनला डॉक्टर
काळजी घेई आरोग्याची
कुणी झाला इन्जिनियर
देई बांधून सर्वा घर
शिक्षक झाले कुणी
केले सर्वा शहाणे
ज्ञान मार्ग अनेक
शाळाच त्याचा पाया एक
आईसम प्रेम करतो
आपल्या शाळेवरी
जो कोण घडला
ह्याची उकल शाळाच करी
जन्म देते आई
परी शाळा घडवी जीवन
कधीही न फिटे
ह्या जन्मी त्यांचे ऋण
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आनंद दडला वस्तूमध्यें, सुप्त अशा त्या स्थितीत असे
सहवासाने आकर्षण ते, होऊन बाहेरी येत दिसे....१,
प्रेम वाटते हर वस्तूचे, केवळ त्यातील आनंदाने
बाहेर येता नाते जमते, आपुलकीचे पडून बंधने...२,
तोच लूटावा आनंद सदैव, अंवती भंवती वस्तूतला
दूर न जाता दिसले तुम्हां, आनंदच भोवती जमला...३,
जेव्हा कुणीतरी म्हणती, ईश्वर आहे अणू रेणूत
वस्तूमधील आनंद बघतां हेच तत्त्व ते येई ध्यानात...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
मी सवंगड्यां सोबती राहतो
जीवनी, सुखसागरी डुंबतो
विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना
वैफल्यातही सुखानंदी जगतो
शैशवी, आठव सारे खट्याळ
मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो
मित्र भेटीस, मी आसुसलेला
गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो
जरी हरविले क्षण सारे यौवनी
अंतरी, निज शैशवात जगतो
मित्रांसोबती, नशा यौवनाची
निडर, निवांत तृप्ततेत जगतो
जीवास नाही कुठलीच चिंता
हसुनी, हसवत नित्य जगतो
मी आज उभा, पसरुनीया बाहु
स्वानंदा! मुक्त उधळीत जगतो
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८१.
१४ - ३ - २०२२.
Copyright © 2025 | Marathisrushti