(User Level: User is not logged in.)

इ-पुस्तके-ललित-वैचारिक

ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गमती देशोदेशीच्या

    गमती देशोदेशीच्या

    जगातील सर्वात उंचावरून म्हणजे १६००० फूटांवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास’. तिबेट हा देश तसा भेट देण्यासाठी अवघड असल्याने खूपच वेगळे काहीतरी वाचल्याचा अनुभव येईल. नाझकाच्या अगम्य रेषा शाळेत शिकलेल्या भूगोलाची आठवण करून देतील. तर ‘इजिप्तमधले पिरॅमिडस व नाईलच प्रवास’, ‘उरोसची तरंगती बेटे’, ‘जपानचा साकुरा’, ‘स्वित्झर्लंडचे झरमॅट’, ‘दक्षिण आफ्रिकेतील ‘माबुला लॉज’ची वर्णने तिथे जाण्याची इच्छा मनात निर्माण करतील. दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशातील बागा बघायला जाण्याचा नक्कीच मोह पाडतील व तिथे गेल्यावर ‘कशासाठी पोटासाठी’ मध्ये वर्णन केलेल्या कॉर्निशला भेट देण्याची आठवण नक्कीच येईल. ‘तांबोपाटा’ मधील व ‘वाईटामो केव्हज’ मधील वर्णन आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देईल. चिनी लोकांची मुखवटा बदलण्याची कला खूपच वेगळी वाटण्याजोगी आहे. हा प्रवास कसा सुरू झाला, त्यातली ‘अडथळ्यांची शर्यत’ कशी संपली याचे वर्णन वाचून प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रवासाची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही. सिंगापूरला गेल्यावर पहिले काही दिवस कसे गेले, तिथे रुळायला काय काय करावे लागले हेही ‘सिंगापूरच्या आठवणी’ वाचल्यावर काहीजणांना त्यांच्या बदल्यांमुळे आलेले अनुभव आठवायला लावतील.

    या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा

  • चैतन्य

    चैतन्य

    श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावरुनच लक्षात येते.

    त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.

  • वाचणारा लिहीतो

  • अनघा – दिवाळी अंक 2018

    अनघा – दिवाळी अंक 2018

  • मैत्र

    मैत्र

    प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी, अनेक व्यथा, व्याधी असतात. त्यासकट आनंदी कसे रहायचे, स्वतःशी मैत्र कसे जोडायचे आणि परस्परांशी संवाद साधून या मैत्राला विश्वरुप कसे द्यायचे याच्या ५२ कथा या संग्रहात आहेत.

    नीला सत्यनारायण यांचे हे २६ वे पुस्तक. प्रशासकीय सेवेत त्या जेवढ्या रमल्या तेवढ्याच साहित्याच्या प्रत्येक प्रांतात त्यांनी रसिकतेने पाऊल ठेवले. त्यांची पुस्तके विविध विषयांवरची असून कवितेपासून सुरुवात होऊन कथा, कादंबरी, ललित लेखन सर्व विषयांत त्यांनी लिखाण केले आहे. साहित्यकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

  • इन्स्पेक्टर सावंत…. क्राईम ब्रॅंच बोलतोय

    इन्स्पेक्टर सावंत…. क्राईम ब्रॅंच बोलतोय

  • हिमशिखरांच्या सहवासात

    हिमशिखरांच्या सहवासात

    प्रकाश लेले एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद आहे. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत.

  • एकलव्या

    एकलव्या

  • बाबासाहेबांची पत्रकारिता

    बाबासाहेबांची पत्रकारिता

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.

    या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.

  • गेटवे

    गेटवे

    पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्‍या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह  त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला.