ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.
August 28, 2025


सुप्रसिद्ध गायक श्री अनिरुद्ध जोशी यांच्या सांगीतिक प्रवासाच्या १००० व्या प्रयोगाच्या टप्प्यापर्यंतची कहाणी
August 28, 2025


सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
August 31, 2025

या पुस्तकातील प्रत्येक कथेत सतत मानवी मन डोकावताना दिसेल. कधी तिचे तर कधी त्याचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो किंवा ती येते किवा येत असते. तेव्हा मानवी मन काय आणि कसा विचार करते हे खरे तर शब्दात मांडता येत नाही, तेच मी प्रत्येक वेळी कमीतकमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील कथा अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचल्या आहेत, त्यातील काही एकत्र या पुस्तकात देत आहे.
आणखी एक…. हे वाचल्यानंतर अनेकांचा…. म्हणजे स्त्री पुरुषाचा पहिला प्रश्न असतो तो, तुम्ही इतके आमच्या मनातले कसे ओळखता, तुमची अफेअर्स किती झाली आणि जी एफ किती.
मी काहीच उत्तर देत नाही ….
कशाला द्यायचे..
August 23, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.
या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.
August 23, 2025

August 20, 2025

August 23, 2025


August 28, 2025

संस्कृत साहित्याचे नाव घेतले की महाकवी कालिदास, भास, भवभूती, बाणभट्ट अशी विविध नावे समोर येतात. क्वचित प्रसंगी त्यांच्या ग्रंथाची नावे देखील वाचनात असतात. मात्र या ग्रंथात नेमके काय वर्णन केले आहे ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचत नाही.
या उपक्रमात अशा विविध ग्रंथांचा परिचय करून देण्याची लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीच्या विद्यार्थ्यांची आणि आयोजकांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद आहे. या निमित्ताने त्या ग्रंथांची निदान तोंड ओळख सगळ्यांना होईल. पुढे जाऊन ते मूळ ग्रंथ पाहण्याची इच्छा वाचकांमध्ये निर्माण होईल हे नक्की.
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी चा वैशिष्टयपूर्ण उपक्रम.
August 28, 2025
अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.
August 28, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti