ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.


श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावरुनच लक्षात येते.
त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.

‘डॉक्टर जिवंत तर समाजही जिवंत’…. या ध्येय वाक्याने प्रेरित डॉ. कुमार ननावरे यांनी तेहतीस वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा व व्यथा ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकातून जनतेपुढे प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.
त्यांनी केलेले कामकाजाचे व घटनांचे चित्रण खरोखरच विलक्षण व हृदयाचा ठाव घेणारे आहे. समाजाचे आरोग्य सुधारावे, सामान्य गोरगरीब जनतेची सेवा माफक दरात व्हावी हीच त्यांची धडपड !
आजच्या काळात धाडसाने असे अनुभव कथन करणारे डॉक्टर विरळेच. त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी राहणे व शासनाने, आरोग्य खात्याने किंवा संबंधितांनी त्यांच्याविषयी गैरसमज वा आकस न करावा ही अपेक्षा.




रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.

डॉ. अनिल कुलकर्णी यांचा शिक्षण क्षेत्रासंबंधी लेखांचा हा संग्रह अतिशय वाचनीय आणि उद्बोधक आहे.


‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ‘हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
महाराष्ट्राच्या घराघरात साजरे होणारे सण, विविध व्रतवैकल्ये आणि महाराष्ट्राची विविधरंगी संस्कृती यांची ओळख करुन देणारे हे पुस्तक…


अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.

Copyright © 2025 | Marathisrushti