(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • दिवाळी -वैचारिक क्षणिका

    आधी केली साफ -सफाई

    मग पसरविला कचरा……

  • पुछो ना कैसे मैने रैन बिताई ?

    अचानक आभाळ काळ्याकुट ढगांनी भरून यावं , तस हे गाणे ऐकलं कि होत . मन व्याकुळ होऊन जात . निराशेची धग काय चीज आहे हे जाणून घ्यायचे तर हे गाणे ऐकावे .

  • व्हॅलेन्टाईन डे आणि मराठी मन…

    आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईन डेच महत्व इतरांपेक्षा थोड अधिक असल्याच जाणवत. प्रेमभंग झालेल्यांसाठी, प्रेमात धोका खाल्लेल्यांसाठी, प्रेमावर विश्वासच नसलेल्यांसाठी आणि प्रेमाकडे अधिक डोळ्सपणे अथवा बुध्दीपूर्वक पाहणार्‍यांसाठी या दिवसाच महत्व तितकस नसत. जगभरात व्हॅलेन्टाईन डे सर्वांचा सर्वांवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्ह्णून साजरा केला जातो आणि आपल्या देशात तो प्रेमाचा दिवस कमी आणि प्रेमिकांचा दिवस म्ह्णूनच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ज्याला काही संस्कृती रक्षकांचा विरोध असतो तो त्यांच्या दृष्टीने विचार करता योग्यच म्ह्णावा लागेल. आपल्या देशात प्रेमविवाहांच भविष्य काही ठिक दिसत नाही त्याला सर्वाधिक हा व्हॅलेन्टाईन डेच कारणीभूत असावा की काय अशी शंका ही कधी कधी मनात आल्यावाचून राहात नाही कारण आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तरूणाईला अशा एखाद्या दिवसाची माध्यम म्ह्णून जर गरज भासत असेल तर त्यांच प्रेम किती तकलादू आहे याची सहज कल्पना करता येते.

    व्हॅलेन्टाईन डे जवळ आला की नवोदित साहित्यिकांमधील साहित्य प्रतिभेला अचानक मोहोर येतो असा गैरसमज ही आपल्या देशात पसरलेला दिसतो कारण फेब्रुवारी महिन्याच्या आसपास प्रेम या विषयावरील साहित्याची मागणी अचानक वाढलेली दिसते. या काळात बर्‍याच नवोदित कविंना आणि लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याची संधी लाभत असते. या दिवसात प्रेमकवितांना सुगीचे दिवसच आलेले असतात असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. प्रेम कविता हा कवी आणि वाचकांसाठीही या दिवसात जिव्हाळ्याचा विषय असतो. मराठी कवितांचा विचार करता मराठी प्रेमकवितांना मिळणार्‍या वा ! वा ! समोर इतर सामाजिक विषयावरील कवितांना मिळणारी वा ! वा ! नगन्यच असते. आजच्या मराठी साहित्यात सामाजिक विषयांवरील कवितांच्या तुरळक गारा पडताना दिसतात त्याविरूध्द प्रेम कवितांचा धो-धो पाऊस कोसळ्ताना दिसतो. प्रेम या विषयावर कविता लिहायची म्ह्टली की प्रत्येकात दडलेला कवी अचानक जागा होत. त्याला हे व्हॅलेन्टाईन डे सारखे दिवस प्रोत्साहनच ठरत असतात.

    माझा व्हॅलेन्टाईन डेला विरोध आहे असं मी म्ह्णूच शकणार नाही कारण माझी पहिली कविता एका वर्तमानपत्रात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच प्रकाशित झाली होती, ती का ? कशी ? वगैरे विषयावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळी मी ही प्रेमात पडल्यावर जे कवी होतात त्यांच्यापैकीच एक कवी होतो कदाचित असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुढे माझी कविता प्रेमाची धुंदी उतरल्यावर प्रगल्ब झाली आणि मग माझ्यातील कवी खर्‍या अर्थाने घडत गेला असावा. व्हॅलेन्टाईन डे वर एखादी कविता आणि एखाद लेख लिहण्या पलिकडे माझी मजल कधीच गेली नाही. व्हॅलेन्टाईन डे हा माझा फर आवडीचा विषय असा कधीच नव्हता आणि नाही. सुरूवातीला आपल्या देशात व्हॅलेन्टाईन डे ला होणारा विरोध आता बर्‍यापैकी मावळलेला दिसतोय. कोणत्याही गोष्टीचे होणारे संभाव्य परिणाम त्या गोष्टीच महत्व ठरवत असतात. आता आपला समाज प्रेमाच्या बाबतीत इतका मोकळा होत चाललाय की हळू हळू व्हॅलेन्टाईन डे सारखे दिवस साजरे करण्याचे स्वरूपही बदललेल दिसेल . पूर्वी व्हॅलेन्टाईन डे ला भेट म्ह्णून दिल्या जाणार्‍या गुलाबाची जागा आता हिर्‍याच्या दगिण्यांनी घेतलेली दिसतेय. आता काही वर्षांनी व्हॅलेन्टाईन डे ही आपल्या देशात रक्षाबंधन आणि भाऊबिजेसारखा साजरा केला गेला नाही म्ह्णजे मिळविली. व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने कोसळणारा मराठी प्रेमकवितांचा पाऊस रंग बदलून इंग्रजीत कोसळायला लागला तर ? विचार करूनच माझ्या मराठी मनात धडकी भरतेय...

    -- निलेश बामणे

  • प्लॅस्टिक चलनाने समस्या सुटतील का?

    प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.

  • बाबासाहेब

    बाबासाहेब

  • प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग २

    साउथ आफ्रिकेत मी एकूण १७ वर्षे राहिलो, अनेक लोकांशी ओळखी झाल्या, काही मोडल्या तरीही माझा प्रिटोरियामधील काळ हा सर्वोत्तम,असेच म्हणायला हवे. एकतर राहायला सुंदर घर मिळाले होते, बरेचसे भारतीय (माझ्यासारखे नोकरीसाठी आलेले) आजूबाजूला राहात होते, त्यामुळे गाठीभेटी (जरी नैमित्तिक असल्या तरी!!) होत असत. इथेच, मी पहिल्यांदा सिम्फनी संगीताची मैफिल प्रत्यक्ष ऐकली आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत घरी येउन, बेथोवन,मोझार्ट यांच्या सीडीज रात्रभर ऐकत रात्र काढली!! मराठी माणसे बरीच भेटली, काहींनी निराशा केली, इतकी की, त्यांना परत भेटताना मनात निराशाच ठेऊन भेटलो. त्याचे असे झाले, पहिल्याच भेटीत “माझे मराठी वाईट आहे आणि म्हणून मी हिंदीतच बोलणार” असा अत्याग्रह दिसला!!
    वास्तविक मराठी बोलता येत नव्हते असे नसून, बोलायला “लाज” वाटायची!! फार नाही पण, ३ गृहस्थ असे भेटले. तसे माझे इथे ३ ग्रुप झाले होते. १] खुद्द माझ्या कंपनीत, हेतल, महेंद्र, विजय, कधीमधी भारतातून येणारा रिचर्ड तसेच आमचा सीइओ विजय नाक्रा!! २] मकरंद, बंटी,सुहास, वैभव (हे नंतर भारतात परतले), अशोक आणि राजेश., ३] माझे महाराष्ट्र मंडळ – तिथे राजीव तेरवाडकर, प्रशांत, विनय, आदित्य, कौस्तुभ इत्यादी. मकरंदशी माझी आधीपासूनच ओळख होती आणि त्याने लगेच मला त्याच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. इथला खरा संस्मरणीय काळ म्हणजे,भारताचा २००७ सालचा T20 world cup विजय!!
    मकरंदचा चुलत भाऊ अविनाश, याची मुंबईत चांगली CA Practice चालू आहे आणि त्यात, भारतीय संघाचा त्यावेळचा व्यवस्थापक लालचंद राजपूत, हा अविनाशचा चांगला मित्र, पर्यायाने मकरंदचा!! जेंव्हा, भारताने, साउथ आफ्रिकेवर अविश्वसनीय विजय मिळवला आणि डर्बन इथे सेमी फायनल साठी ऑस्ट्रेलियाशी गाठ पडली, हे नक्की झाल्यावर, मकरंदचा मला फोन आला, त्याला ४ पासेस मिळाले आहेत, तेंव्हा विमानाचे तिकीट काढ. डर्बनला जायचे आहे. शनिवारी Match होती, सुदैवाने बंटी कामानिमित्त डर्बन इथे होता, त्याने लालचंदकडून पासेस मिळवले आणि सकाळच्या फ्लाईटने, मी, मकरंद आणि वैभव डर्बन इथे गेलो. Match संध्याकाळची असल्याने, दुपारी मॉलमध्ये खाऊन घेतले आणि स्टेडीयममध्ये शिरलो!! अक्षरश: तुफान गर्दी!! जिकडे तिकडे भारतीय झेंडे फडकत होते. अर्थात, डर्बन इथे भारतीय वंशाचे लोक लाखोंच्या संख्येने राहतात, त्यामुळे ते सगळे स्टेडीयमवर!! साउथ आफ्रिकेतील Matches मी पूर्वी टीव्हीवरून पाहिलेल्या असल्याने, मनात थोडी उत्सुकता होती.
    वैभवने येतानाच बियरचा टमरेल घेतला होता आणि त्यात, त्या Match मध्ये युवराज आणि धोनी सुसाटले!! बियरला “चव” लाभली, त्याला तोड नाही!! घसा फाटेस्तोवर ओरडून घेतले आणि जेंव्हा फायनलमध्ये, जोहान्सबर्ग इथे भारत/पाकिस्तान भेटणार हे नक्की झाले तेंव्हा मनात जी excitement दाटली, तिला तोड नाही!! वास्तविक, वैभव दुसऱ्या दिवशी, रविवारी भारतात परतणार होता, त्याने तिकीट Cancel केले!! त्याच रात्री,बंटीने डर्बन – जोहान्सबर्ग अशी गाडी हाकली!! भारताचा विजय, पोटात भरपूर बियर, प्रवास कसा झाला, हे वेगळे नकोच!! रविवारी पहाटे ३ वाजता,आम्ही मकरंदच्या घरी पोहोचलो, म्हणजे त्याच्या complex मध्ये!! म्हणजे रात्रभर बंटी एकटाच गाडी चालवत होता!! धन्य आहे!! माझी गाडी तिथेच होती, तशीच गाडी चालवायला घेतली!! भल्या पहाटे, पहिल्यांदाच जोहान्सबर्ग शहर बघत, जवळपास ७० किलोमीटर गाडी चालवून प्रिटोरिया मधील माझ्या घरी आलो, ते फक्त बिछान्यावर पाठ टेकण्यासाठीच!!
    रविवार सगळा झोपून काढला. रात्री मकरंदचा फोन आला, लालचंदबरोबर जेवायला जात आहोत, येतोस का? एकटा राहिल्याचा, हा फायदा!! परत गाडी आता ८० किलोमीटर चालवली आणि त्याच्याबरोबर “पार्टी” (हाच शब्द योग्य!!) करून, परत रात्री १२ वाजेपर्यंत परतलो!! सोमवारी, इथे सुटी होती, एव्हाना, मी डर्बन इथे Match पाहायला गेलो होतो,हि बातमी पसरली होती आणि त्यामुळे “मला पास मिळेल का?” असे फोन आले!! अर्थात, मी काय करणार, माझ्या हातात काहीच नव्हते!! तसा, मी मकरंदला फोनवर विचारले पण तो हताश होता.
    सोमवार दुपार!! मकरंदला गाडी पार्क करायला जागा मिळाली नाही, इतकी तुडुंब गर्दी!! शेवटी, स्टेडीयमपासून १५ मिनिटे लांब गाडी पार्क करावी लागली, मकरंदचा मुलगा,करण आमच्याबरोबर होता. कसेबसे आत शिरलो. स्टेडीयममध्ये खऱ्याअर्थी माणूस शिरायला जागा नव्हती, सगळीकडे, भारत आणि पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, मध्येच तुरळक काही गोरे दिसत होते. Match शेवटपर्यंत रंगतदार झाली आणि अखेर भारत ज्या क्षणी जिंकला, तो क्षण मी मनात कायमचा जपून ठेवला आहे!! मला तर १९८३ ची फार आठवण आली, त्यानंतर डायरेक्ट २००७!! रात्री, आम्ही देखील एका पबमध्ये विजय साजरा केला!! दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील इतर मित्रांना बातमी सांगितली आणि त्यांचे चेहरे विस्फारले, त्याची चव वेगळीच!!
    मागील लेखात महाराष्ट्र मंडळाची “गाथा” सांगितली होती. माझ्या अंदाजाने, अजूनही तशीच परिस्थिती आहे. प्रत्यक्ष बोलताना, “आपले मंडळ” अशी भाषा करायची पण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी पाठ दाखवायची!! मला तर अशा लोकांचा फार रागच यायचा. त्यावर्षी राजीव तेरवाडकरच्या घरी होळीचा कार्यक्रम ठेवला होता, सगळ्यांना दोन महिने आधी कल्पना दिली होती आणि त्यादृष्टीने “होकार” मिळवले होते. राजीवच्या घरी, होळीचे सामान आणले होते, जेवणाचे Contract बाहेरच दिले होते, साधारण ७० ते ८० जण येतील असा अंदाज होता पण अखेर प्रत्यक्षात केवळ ५० व्यक्ती आल्या!! यात, मंडळाची Management धरून!! यथासांग “होळी” पेटवली,भारताप्रमाणे पूजा केली, नंतर “बोंबा” मारल्या, संगीताचा कार्यक्रम झाला ( मी देखील तबल्यावर जवळपास १५ वर्षांनी हात “साफ” केला!!) आणि अर्थात जेवणाचा कार्यक्रम!!
    मला इतर देशांतील मंडळांची अवस्था माहित नाही, म्हणजे अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर मंडळाचे कार्य चालते, तसेच इंग्लंड इथे देखील परंतु साउथ आफ्रिकेत अजूनतरी मंडळाने “बाळसे” धरलेले नाही!!
    याचे मुख्य कारण, लोकांची मनोवृत्ती!! एकतर बहुतेक सगळे प्रथमच भारतातून, इथे आलेले. साउथ आफ्रिका म्हणजे, युरोपचा छोटा अविष्कार!! म्हणजे, हवामान, Infrastructure, राहणीमान अशा गाष्टींचे फार अप्रूप वाटते!! काहींच्या ते “डोक्यात” जाते!! त्यामुळे, आपण भारतीय आहोत आणि आपणदेखील कधीतरी का होईना, भारतात जाणार आहोत, हे विसरून “ताठ्यात” वागायला लागतात!! मराठी बोलणे देखील नाकारणे,हा त्याच वृत्तीचा भाग. इथे मला गुजराती लोकांचा हेवा वाटतो. डर्बन इथे trading business अधिक करून, गुजराती आणि मुसलमान लोकांच्या हातात आहे, जे केवळ भारतीय वंशाचे आहेत, म्हणजे त्यांची चौथी किंवा पाचवी पिढी इथे रहात आहे, भारताशी तसा काहीही संबंध उरलेला नाही!! तरीही या नहुतेक गुजराती लोकांच्या घरात तसेच वातावरण असते, म्हणजे बहुसंख्य गुजराती शाकाहारी, घरात तशीच देवपूजा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, गुजराती बोलायला लागले तर पत्ता लागणार नाही, की ही व्यक्ती इथल्या चौथ्या पिढीची आहे म्हणून!! इतके अस्खलित गुजराती बोलतात आणि मुख्य म्हणजे त्यांची मुले देखील तेच “वळण” गिरवतात!!
    याउलट माझ्यासारखे नोकरीनिमित्ताने आलेले भारतीय!! ३,४ महिन्यात “साउथ आफ्रिकन” संस्कृती आवाक्यात घेतात. यांच्या मुलांचे मात्र कधीकधी हाल होतात. एकतर ही माणसे, त्यांच्या भारतातील कंपनीतर्फे आलेली असतात, त्यामुळे जोपर्यंत Contract आहे, तोपर्यंत नोकरी!! मुले तशी इथे लगेच settle होतात, पण परत जायची वेळ येते, तेंव्हा प्रश्न उद्भवतो!! इथल्यासारखे राहणीमान, भारतात शक्यच नसते आणि मग मनाची कुचंबणा होते, अगदी माझ्याबाबतीत देखील सुरवातीला हा बदल स्वीकारणे फार अवघड गेले, जरी मी इथे एकटाच राहात होतो, दरवर्षी कमीतकमी महिनाभर सुटीवर येत होतो तरीही!!
    इथे Sandton नावाचा भाग आहे, जोहान्सबर्ग मधील अति अलिशान भाग!! इथेच श्रीमंतीची रेलचेल दिसते आणि त्याचेच प्रतिबिंब इथल्या मॉल्समध्ये दिसते. अर्थात, सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चाललेला आहे, इतका की रस्त्यावरून संध्याकाळचे पायी चालणे दुरापास्त झाले आहे. असो, इथल्या भारतीय लोकांनी मात्र माझ्यासारख्या एकट्या राहणाऱ्या माणसाचे आयुष्य मात्र सुखाचे केले, हे मान्यच करायला हवे.मी, सेंच्युरीयन भागात राहात होतो, तिथे माझ्या complex समोर, एक आयरिश पब होता/आहे, तिथे संध्याकाळी बियरचा एक “पिंट” घेऊन बसले म्हणजे अगदी मुंबईतील इराण्याच्या हॉटेलप्रमाणे तासंतास बसत येते, विशेषत: सोमवार ते गुरुवार, संध्याकाळी फारशी वर्दळ नसते, तेंव्हा तिथे बसून शांतपणे “समाधी” लावणे, हा सुंदर अनुभव होता. माझ्या कितीतरी संध्याकाळ या पबमध्ये गेल्या आहेत, इतक्या की पुढेपुढे, तिथला वेटर (पुरुष/स्त्री, जे कुणी तिथे असेल ते!!) मी आलो, कि लगेच “पिंट” घेऊनच यायचे!! जून/जुलै मधील गारठलेल्या संध्याकाळी बियर पिणे, हा अनुभव शब्दात मांडणे अवघड आहे!! अखेर मी देखील नोकरदार माणूस, कंपनी जशी चालेल,त्याप्रमाणात तिथला रहिवास!! कधीतरी स्वप्नाची अखेर ही ठरलेलीच!!
    - अनिल गोविलकर

  • त्रिशुंड गणपती

    त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर

    पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी,माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे.

  • टीआरपीसाठी सर्वकाही

    क' च्या कथानकातली 'तुलसीभाभी' तुम्हाला आठवते का? आतासारखी चॅनेल्सची गर्दी तेव्हा नव्हती. त्यामुळे 'तुलसीभाभीने' घराघरात घर केलं होतं. त्यातला हँडसम हिरो 'मिहीर'अॅक्सिडेंटमध्ये गेला हे प्रेक्षकांना अजिबात रुचले नाही. सगळीकडे एकच चर्चा. अगदी लोकलच्या लेडीज डब्यातला तो जिव्हाळ्याचा प्रश्न झाला होता. आता सिरीअल न पाहण्याचा निर्णय कित्येकांनी घेतला आणि त्याला पुन्हा अवतरावे लागले. कसा काय ते तुम्हाला आठवत असेलच. आणि हे फक्त सिनेमा आणि सिरीअल मध्ये शक्य आहे हे मी सांगण्याची गरज नाही. नुकतीच पूर्णविराम घेतलेली मालिका, 'एका सुनेच्या पाच सासूबाई की सासूबाया? आणि त्यांच्यावर एक आई आज्जी फ्री! वाढता वाढता वाढे... जसे हनुमानाचे शेपूट. सोशल मिडियावर चेष्टेचा विषय ठरली आणि ज्या प्रेक्षकांनी स्वागत केले होते त्यांनीच 'आता पुरे करा'चा नारा दिला. तरीही काहीही हं श्री हा लाडिकपणा टीआरपी वाढवित राहिला. सध्या सुरू असलेला खंडोबाचा गोंधळ बिचाऱ्या प्रेक्षकांचा किती गोंधळ उडवतोय, पहाताय ना? देवांचा देव अशा श्रध्दास्थानी असलेल्या महादेवाचं पर्सनल लाईफ भोळ्या भाबड्या प्रेक्षकांना विचारात पाडतेय. धर्मसंकटात सापडलेल्या देवांची अवस्था सर्वसामान्यांसारखीच होतेय. हा, या सगळ्यामुळे फक्त दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे लोकांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि दुसरा मालिकेचा टीआरपी! तसेच जेजुरीला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी श्रध्देपेक्षा मालिकाच धावून आली हेही एक सत्य आहे.

    सम्राट अशोकाचा जीवनपट उलगडून दाखवणारी मालिका पाहताय ना, कौटुंबिक यादवीमध्ये गुरफटून कशी टीआरपी वाढवतेय ती! सध्या ती दूर्वा, ती जान्हवी, ती आदिती, ती स्वानंदी, ती म्हाळसा आणि ती बानू या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन आमचे प्रेक्षक जगतात. त्यांच्या फॅशन्स मॉलमधून घरी येतात, तर त्यातले हेवेदावे, कटकारस्थाने जेवणासोबत चघळली जातात. खरंच अपार प्रेम करतात प्रेक्षक या मालिकांवर! सगळ्या धकाधकीतून वेळ काढून टीव्ही समोर बसतात. काही कारणाने शक्य झाले नाही तर 'उद्या सकाळी बघू' असे म्हणत मनाला समजावतात. घरी असलेली मंडळी तर दुपारी सुध्दा कालचा भाग रिपीट टेलिकास्ट म्हणून आनंद घेतात. काहीजण तर भराभर कामे आटोपून टिव्ही समोर ठाण मांडतात ते सगळ्या मालिका संपेपर्यंत जागा सोडत नाहीत. मग स्वत:च्या झोपेचे बारा वाजले तरी पर्वा नसते. काल काय झाले याच्या लोकलच्या लेडीज डब्यात रंगीत चर्चा तर ऑफिसच्या लंच टाईमला चविष्ट चर्चा चालतात. म्हणजेच गप्पांचा प्राईम सब्जेक्ट म्हणजे डेलीसोप!

    असो, परंतु या अशा भाबड्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या या मालिकांचा तटस्थपणे विचार केला तर 'हसावं की रडावं' हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. अगदी प्राईम टाईममध्ये घराघरात पाहता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या मालिका पहाता, मुबलक जाहिराती, मागील भागात, पुढील भागात असे म्हणत कूर्मगतीने चाललेले कथानक केवळ पंधरा ते वीस मिनिटांचा अर्धा तास करीत असते. आता संपेल असे वाटत असतानाच 'कहानी में ट्विस्ट' म्हणत उपकथानकाचा जन्म होतो. तुम्हा-आम्हा सर्वांना कळून चुकते, 'आमटीत पाणी घालून वाढविली आहे आणि पांचट लागू नये म्हणून वरून तिखट मीठ!' पण आश्चर्य हे की मूळची चव संपली हे कळूनसुध्दा सवयीचे गुलाम झालेले आम्ही प्रेक्षक तसेच चिकटून राहतो.

    कधी कॉमेडीची बुलेट ट्रेन, चला हवा येऊ द्या म्हणते तसेच फू बाई फू म्हणत हास्यसम्राट हसवणूक करतात की फसवणूक कोण जाणे? ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आणि कलाकृतींची चेष्टा आणि पाणउतारा म्हणजे विनोद, असे समीकरण तयार होतेय की काय अशी भीती वाटते. दर्जेदार विनोद लोकांना समजत नाहीत असा गोड गैरसमज तर नाही ना यांचा? खरंच राहून वाटतं आज पु.ल. किंवा अत्रे असते तर यांचे कान धरून म्हणाले असते, अरे काय हे? कुठे नेऊन ठेवलाय विनोद आमचा!'

    डिटेक्टिव मालिकांचं तर विचारूच नका. वर्षानुवर्षे एकाच डायलॉगवर चालतात, 'कुछ तो गडबड है, दया दरवाजा तोड दे.' आँखे उघडून अस्मिता गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करते खरी, परंतु प्रेक्षकांची आँखे उघडतात की गुन्हेगारीची नवनविन तंत्र गरजूंना मिळतात हा खरा प्रश्न आहे.

    भूतप्रेत, बुवाबाजी, तांत्रिक-मांत्रिक हे खेळसुद्धा रात्री किंवा दिवसा चालत असतात. अंधश्रध्दा निर्मूलन कि अंधश्रध्दा प्रसारण? सिगारेट पॅकवरच्या लेबलप्रमाणे 'धुम्रपान हानिकारक आहे' एवढे म्हणून विक्री सुरू. 'देशी दारूचे दुकान, परवाना क्रमांक ...... ' म्हणत राजरोस विक्री सुरू. यासारखेच नाही का ते?

    पूर्वी फक्त दूरदर्शनच्या काळातल्या 'हमलोग, सर्कस, मालगुडी डेज, तेनाली रामा' अशा अनेक मालिका आजही आठवतात. त्यांनी समाजाला सुसंस्कार दिले आणि अनेक चांगले कलाकारही चित्रपट दृष्टीला दिले. आतासुद्धा काही मालिका चांगले विषय मांडतात, मनोरंजन बरोबरच समाज शिक्षणही देतात. मात्र त्यांची संख्या नगण्य आहे हे दुर्दैव! बाकी बहुसंख्य मालिका केवळ आणि केवळ टिआरपीकडे लक्ष ठेवून मागणी तसा पुरवठा करताना दिसतात.

    कधी कधी मनात विचार येतो, आपण प्रेक्षक आपला महत्त्वाचा वेळ आणि पैसा खर्च करून अलगद त्या गुंत्यात गुंतत जातो. त्यांचा टिआरपी वाढतो आणि आमचा केवळ टाईमपास होतो. बुद्धीला टाळे लावून डोळे आणि कानांचे मनोरंजन हाच मनोरंजनाचा अर्थ लावला जातो का ? पाहताना विचारही करायला हवाच ना? म्हणूनच म्हणावेसे वाटते, माणसाचा तिसरा डोळाही उघडा असायलाच हवा. आणि टीआरपी च्या हवेत तरंगणाऱ्या 'कांहीही....' ला 'काही ही चालणार नाही' हे सांगायला हवे.

    ("ठाणे वैभव" च्या सौजन्याने)

    -- नूतन बांदेकर

  • लोभस गणेशाचे मूळ रूप

    बुद्धीची देवता असलेल्या गणपतीला पूजेमध्ये अग्रक्रम दिला जातो. तो सुखकर्ता, दु:खहर्ता आणि विघ्नविनाशक आहे. सुखकर्ता म्हणजे रचनाकार, दु:खहर्ता म्हणजे सुव्यवस्थाकार आणि विघ्नविनाशक म्हणजे प्रणाली निर्माण करणारा. गणपतीचा हा मूळ अर्थच आज विस्मृतीत गेला आहे. त्यामुळे कुठेही आराखडा, सुव्यवस्था आणि प्रणाली दिसत नाही आणि आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते.

  • सरकार आणि त्यांचे अधिकारीच खरे गांधीवादी…

    खरा गांधीवाद सरकारलाच समजलाय का ?