स्वातंत्र्य दिन - पेरू
घडामोडी
१५४० - दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.
१९५० - मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९५६ - मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९६३ - फर्नान्डो बेलॉँडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म
१९२९ - जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.
१९३८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
१९४५ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.
मृत्यू
१८४९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
१९३४ - लुइस टँक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
ऐतिहासिक घडामोडी
२८ जुलै १६८२ : फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून संभाजी कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता. आजच्या दिवशी संभाजी राजांना पत्र पाठवून नुकत्याच झालेल्या पुत्राच्या ( शाहू ) गोष्टीचे अभिनंदन केले.
२८ जुलै १६८२ :
मराठ्यांच्या वकीलामार्फत शंभूराजाला पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा त्याने शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला.
२८ जुलै १६८२ : संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, 'डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते.
८ मार्च हा महिला दिवस भारतात मुंबई येथे १९४३ रोजी पहिल्यांदा साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात …..
टॅक्सी किंवा कार ऐवजी बाईकस्वार पॅसेंजर ची ने आणि त्यांच्या बाईकवरून करतात. प्रत्येक गोजेक बाईकस्वार हेल्मेट आणि गोजेक चा जॅकेट घालून असतो. पॅसेंजर साठी सुद्धा एक हेल्मेट प्रत्येक गोजेक वाल्याकडे असते. जकार्ता मध्ये ट्रॅफिक ही मुंबई पेक्षा भयंकर असते. कार आणि बाईक राईड मध्ये तसं पाहिले पैशांच्या दृष्टीने तर फारसा फरक नसतो. स्वस्त असण्यापेक्षा बाईक स्वार हे कार पेक्षा लवकर पिक अप करतात आणि ट्रॅफिक टाळून, शॉर्ट कट आणि लहान रस्त्यांवरून पटापट इच्छित स्थळी पोचवतात.
हवा, अन्न, पाणी ,वस्त्र निवारा या आजपर्यंतच्या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत. आता यात आणखी एक महत्वाच्या गरजेची भर पडली आहे.किंबहुना याशिवाय दैनंदिन जीवन विस्कळीत होवून जगणे अशक्य होण्यापर्यत मजल गेली आहे. त्या गरजेचे नाव आहे वीज. ही वीज खर्या अर्थाने आज पावर झाली आहे.
काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळही करून झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले. आपले शरीर आणि मन ह्या आपल्या रोजच्या जीवन-व्यवहाराशी इतके एकरूप झालेले असते कि यंत्र चालावे तसे काही लक्षात येण्यापूर्वीच चहा झाला, सकाळची कामे आटोपली आणि आश्रमात जाण्याची वेळ झाली.
इथे मात्र मी थोडी अडखळले. इतर वेळेस पटकन विकेट गेट उघडून पलीकडच्या आश्रमामध्ये गेले असते. पण आज तिकडे जाण्यासाठी पायच उचलत नव्हते. कशीबशी ऑफीसमध्ये पोहचले. कालचा प्रसंग डोळ्यासमोरून जातच नव्हता. तशीच मनाची समजूत घालीत रोजच्या कामाला सुरुवात केली. देवाची पूजा केली आणि आश्रमात सकाळची ‘round’ मारायला निघाले.
ह्या आश्रमात जवळ जवळ ३५ वृद्ध महिला आहेत. प्रत्येक खोलीत दोघी-दोघी रहातात. काही महिला वयाने जरी वृद्ध असल्या तरी शारीरिक रित्या व्यवस्थित आहेत. त्यांना रिकामटेकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या सकाळी सकाळी गार्डन मध्ये पाणी टाक, गार्डनची सफाई देखरेख असली कामे त्या करत असतात. तिघी-चौघीजणी किचन मध्ये स्वयंपाकाला मदत करत असतात दोन वृद्ध महिला तर अश्या आहेत, त्यांना आजारी माणसांची सेवा करायला आवडते. तरुणपणी त्या दोघीजणी नर्स होत्या एकीने लग्न केलेले नाही तर दुसरीला मुलांनी टाकून दिले आहे. एकाच पेशातल्या असल्यामुळे त्या एकाच खोलीत राहतात आणि आजारी वृद्ध महिलांची काळजी घेतात. त्यांची आम्हाला खूप मदत होत असते. असा हा “वृद्धाश्रम” महिलांना सहारा देणारा असला तरी त्यातील वृद्ध महिला देखील आश्रम चालवण्यास सहकार्य देत असतात. नेहमीच खेळीमेळीचे सुंदर वातावरण हे ह्या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.
सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी करणे हे माझे मुख्य काम असते. खास करून रोजच्या रोज चादरी बदलल्या जातात कि नाही आणि इतर स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीवर जातीने नजर फिरवणे जरुरी असते. आणि हे सगळे करत असताना त्या सगळ्यांची थोडीशी विचारपूस हा माझा नित्यनियम आहे. ह्या उतारवयात आपली कोणी विचारपूस करत आहे किंवा कोणी उभे राहून आपल्याबरोबर गप्पागोष्टी करते आहे ह्या विचारानेच त्यांचे मन प्रफुल्लित होत असते. अशीच मधुबेन बरोबर गप्पा मारता मारता समोरच्या ७ नंबरच्या खोलीकडे लक्ष गेले. ही खोली आणि बाजूची ८ नंबर ही आमची मेडिकल रूम आहे. कोणी जास्त आजारी असले तर ह्या खोलात त्यांना हलवले जाते आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. इथे हलवण्याचा हेतू असा असतो की बाकीच्या महिलांना त्रास होऊ नये आणि डॉक्टरांना सुद्धा त्यांच्या सवडीनुसार येणे शक्य होते आणि शांतपणे तपासणी करणे शक्य होते.
ह्या ७ नंबरच्या खोलीत गेले दोन महिने ‘केसरबा’ होत्या. ‘केसारबा’ राजकोटच्या होत्या. खात्यापित्या घरच्या चांगल्या बाई होत्या खरे तर. वय जवळजवळ ऐंशीच्या आसपास होते. पण तब्येतीने धडधाकट होत्या. तीन-चार महिन्यापूर्वी खूप ताप आला होता आणि त्यानंतर हळूहळू त्यांची तब्येत ढासळतच गेली होती.
दोन वर्षापूर्वी त्यांच्या शेजारील दोन-तीन बायका त्यांना इथे घेऊन आल्या होत्या. उंचीने थोड्याशा ठेंगण्या, जाडसर बांधा, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा गोल काचांचा जाडजूड चष्मा, नीटनेटकी नेसलेली साडी, गळ्यात लांब तुळशीची माळ, चेहऱ्यावर अतिशय चिंतेचे भाव आणि खांद्यावर अडकवलेली एक मोठी लांब झोळीवजा पिशवी अशा ह्या; त्या वेळच्या केसरबा आजही मला आठवत आहेत. पायात स्लिपर्स, त्या पण फाटक्या होत्या आणि डोळ्यावरचे संपूर्ण पांढरे केस, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाचे साक्षीदार, त्यांना शोभून दिसत होते.
आमच्या नियमाप्रमाणे मी त्यांना तुम्हाला इथे का यावे लागले असा प्रश्न विचारला होता. साधारणपणे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना बायका हळव्या होतात, रडायला लागतात. कित्येकवेळा तर महिन्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. परंतु ह्यांनी मला थोडक्यात पण स्पष्टपणे सांगितले होते, “एक दिकरो बाहर अमेरिका जतो रह्यो. बिजो एकलोच मने केम साचवे?” (एक मुलगा अमेरिकेला गेला तर दुसऱ्याने एकट्यानेच मला का सांभाळायचे?) आणि हळूच गालातल्या गालात हसल्या होत्या. त्यांच्या त्या चिंतीत चेहऱ्यावरचे हसू; त्या नाईलाजाने इथे आल्या आहेत हे सहज सांगून गेले होते. ज्या आशाळभूत नजरेने त्या माझ्याकडे बघत होत्या, त्या नजरेत इथे जागा मिळते कि नाही हा प्रश्न मी सहज वाचू शकत होते. सगळ्या formalities झाल्यावर त्यांना बारा नंबरच्या खोलीत कुसुमबेन बरोबर जागा दिली होती. ह्या नवीन वातावरणात थोड्याशा बिचकत बिचकतच त्यांनी खोलीत प्रवेश केला होता. खरे तर, बायकांना घरातल्या आठवणी विसरून इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला पण खूप वेळ लागतो. कित्येक वेळा त्यांची मानसिक स्थिती सुद्धा दोलायमान होत असते. परंतु केसरबा बघता-बघता इथल्या वतावरणात खूपच रमून गेल्या होत्या. हे पण कौतुकास्पदच होते.
स्वयंपाकाची तर त्यांना अतिशय आवड होती. त्या स्वयंपाकखोलीत शिरल्या कि दोन्ही स्वयंपाकवाल्या मावश्या तर त्यांच्या assistant होऊन जायच्या. संध्याकाळची खिचडी तर त्यांच्याच हातची खाण्याची आम्हाला सगळ्यांना सवयच लागून गेली होती.
ढोकळा, हांडवा ही तर त्यांची खासियत होती.
साधारणपणे बायका इथे रुळल्या की कधीतरी गप्पा मारताना त्यांची इथे येण्याची कारणे सांगत असतात. सुनांना, मुलांना किंवा ज्यांच्यामुळे त्यांना इथे राहण्याची वेळ आली, त्यांच्याबद्दल चांगले वाईट बोलत असतात. साहजिकच आहे, “वृद्धाश्रम” कितीही चांगला, सुंदर, सर्व सुखसोयींनी उपलब्ध असला तरी तो “घर” तर नसतोच, तो पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलेला एक पर्याय आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला सगळ्यांनी सोडून दिले आहे ह्याची मनात खंत तर असतेच. आयुष्यभर स्वतः च्या कष्टाने, हिमतीने उभ्या राहिलेल्या माणसाला कोणाच्या तरी मदतीवर जगायला कधीही आवडत नसते. शेवटी वृद्धाश्रमात राहून मरणाची वाट बघत उरलेले आयुष्य जगणे ही उतारवयात नाईलाजाने केलेली adjustment असते. आणि संपुर्ण आयुष्यातला मोठा पराभव असतो.
ह्या केसरबाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या कधीही सुना-मुलांसंबंधी वाईट बोलल्या नाहीत. उलट मुलांचे तर भरभरून कौतुकच करत असत. कोणीतरी एकदा त्यांची थट्टा पण केली होती, “इतकी गुणी माणसे तुमच्याकडे असतांना तुम्हाला इथे का यावे लागले?” दोनच शब्दात त्यांनी उत्तर दिले होते, “माझे तकदीर” आणि परत गालातल्या गालात हसल्या होत्या. मार्मिक उत्तर देणे ही पण त्यांच्या वयाला शोभणारी खासियत होती. त्यांच्या अनेकविध गुणांमुळे आमच्या सगळ्यांच्याच त्या खूप लाडक्या झाल्या होत्या.
तीन-चार महिन्यापूर्वी ताप आला होता तेंव्हा तापात मुलांची खूप आठवण काढत होत्या. आम्ही त्यांच्या मुलाला तसे कळवले होते पण मुलाने “वेळ मिळाला की येतो” असे उत्तर तिले होते. दुर्दैवाने त्याला कधीच वेळ मिळाला नाही. आणि त्यांच्या अमेरिकेच्या मुलाने तर थोडे फार पैसे पाठवले आणि “माझ्या आईला चांगल्या डॉक्टरांकरवी चांगले उपचार करा” असा सुंदर सल्ला आम्हाला दिला होता. झाले संपले. हळूहळू त्या तब्येतीने खंगत गेल्या. खंगत जाणाऱ्या तब्येतीबरोबर त्या मुलांची खूप आठवण काढत होत्या. कित्येक वेळा आम्ही त्या मुलांना कळवले. पण दोघांपैकी एकजण सुद्धा आला नाही. राजकोटच्या मुलाने तर फोनवर बोलण्यासाठी सुद्धा नकार दिला. त्याने कारण असे दिले की, “ती मला घरी घेऊन जा असा हट्ट करेल आणि मी ते करू शकणार नाही ह्याची मला भीती वाटते.” त्याच्या त्या उत्तराने आम्ही सगळ्या बायका फारच चिडलो होतो.
शेवटच्या चार दिवस त्या कोमात होत्या. अगदी शेवटी थोड्या वेळासाठी शुद्धीवर आल्या होत्या. बाजूला उभ्या असलेल्या डॉक्टरच्या असिस्टंटलाच आपला मुलगा समजून त्याला हाक मारल्या होत्या आणि त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला होता व पुढच्या एका क्षणात प्राण सोडला होता. आम्ही सगळे अवाक होऊन बघतच राहिलो होतो.
आई गेल्यावर मुलाला फोन केला. राजकोट-गांधीनगर चार तासाचा रस्ता होता. पण मुलाने येण्यासाठी साफ नकार दिला. आम्ही त्याला बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण रडवेल्या आवाजात, “मला लाज वाटते, मी नाही येऊ शकत.” असे सांगून फोन बंद करून टाकला.
खूप विचाराअंती अंत्यविधी उरकून टाकावा असा निर्णय घेतला. प्रत्येक बाई त्या मुलांना दोष देत होती. ‘केसरबा’ स्वर्गवासी झाल्या ह्याचे दुःख तर प्रत्येकाला होतेच पण मुलगा इतका वाईट वागू शकतो हे बघण्याचे दुःख जास्त होते. अनेक सेवाभावी संस्था अंत्यविधीसाठी पुढे आल्या होत्या. पण एका सेवाभावी संस्थेने असा निर्णय घेतला की दोन दिवस त्यांना Cold-room मध्ये ठेवायचे आणि तिच्या मुलाला पकडून घेऊन यायचे आणि त्याच्याच करवी अग्नीदाह द्यायचा. कारण शेवटपर्यंत त्या बाईंचा जीव त्या मुलात अडकलेला होता.
दुसऱ्याच दिवशी त्या संस्थेतील मंडळींनी राजकोटच्या लोकांबरोबर co-ordinate केले व त्या मुलाला समजावून घेऊन आले. त्याच्याबरोबर त्याचा दहा वर्षाचा मुलगा पण होता. आल्यापासून तो अगदी ओक्साबोक्शी रडत होता. त्याच्या प्रत्येक कृतीत त्याला खूपच वाईट वाटले आहे ते जाणवत होते.
आम्ही सगळेच त्याच्यावर खूप चिडलो होतो. ज्याच्या तोंडात जे येईल ते त्याला बोलत होते. त्याने एक नाही की दोन नाही गुपचूप सगळे ऐकून घेतले
अंत्यविधीनंतर आश्रमाच्या काही formalities पूर्ण करण्यासाठी तो आश्रमात आला होता, त्या वेळेस देखील मी त्याला अनेक प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले पण तो नुसताच रडत होता. काहीच बोलत नव्हता. न राहवून कुसुमबेन बोलून गेल्याच, “आता रडायचे नाटक कशाला करतोस”, दुसरी एक बाई म्हणाली, “असली मुले देवाने दिली त्यापेक्षा निपुत्रिक राहिली असती तरी बरे झाले असते”.
मधुबेन तर त्याच्या अंगावर जवळजवळ ओरडल्याच, “ह्या असल्या मुलांना जन्म देण्यापेक्षा बिचारीच्या पोटी एखादी मुलगी जन्माला आली असती तरी बरे झाले असते, निदान मायेने आईला भेटली तरी असती. जीव सोडताना तिच्याजवळ बसली तरी असती.” आणि रडायलाच लागल्या.
आता मात्र इतका वेळ गुपचूप ऐकून घेणाऱ्या त्या मुलाने शांतपणे डोळे पुसले आणि म्हणाला, “मावशी आता पुरे करा, कबूल आहे मी आईला ‘वृद्धाश्रमात’ पाठवण्याचे खूप मोठे पाप केले आहे. पण हे करण्यासाठी मला प्रवृत्त करण्यात कोणाच्या तरी मुलीचाच खूप मोठा वाटा आहे. हे विसरू नका. आणि तुम्हाला इथे राहावे लागते आहे त्याच्यासाठी पण कोणाची तरी मुलगीच जबाबदार असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे”.
केसारबाचाच मुलगा तो, त्यांच्याच सारखे थोडक्या शब्दात त्याने पूर्ण उत्तर दिले होते.
त्याच्या उत्तराने आम्ही क्षणभर स्तब्धच झालो. पण असे जाणवले की प्रत्येक मुलीने थोडा समजूतदारपणा दाखवला तर कोणाच्याच आईला वृद्धाश्रमाचा आसरा घेण्याची वेळ येणार नाही.
त्या रिकाम्या खोलीकडे बघताना सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा समोर उभा राहिला. रात्री पण त्या मुलाचे शब्द कानाच्या पडद्यावर आदळत होते आणि झोप आली नव्हती.
केवढे ‘विदारक सत्य’ तो बोलून गेला होता. खरोखरीच देवाने घडवलेली ही प्रेमळ, कोमल स्त्री इतकी भयंकर निष्ठुर असते का?...........
सौ वैजयंती गुप्ते
(9638393779)
शेवान - एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द.....
आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले.....म्हणजेच शेवान..... कापणी संपल्याची निशाणी.... कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी...
मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे... 7. 8 गडी माणसे असायची कापणीला....
पण गावातील काही बलुतेदार लोकं ...... नाव नाही घेत..... यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून.... आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात ... आजोबा त्यांना द्यायचे... त्यांचा हक्क म्हणून.... आता देणारे पण नाहीत.... अन् घेणारे पण नाहीत....
मी तेव्हा विचारलेले... आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?
आजही आठवतय त्यांच उत्तर..
बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा... भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट.... कवळी..... देतो...
तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती ... पिकवणार्याला.... अगदी किडमुंगी
पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना...
आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो... तेकाच शेवान म्हणतात
बापूर्झा
डॉ बापू भोगटे
9422632456
नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं नव्हतं. माझ्या मृत्यूनंतर अनेकांना 'महापुरुष' होण्याची घाई झाल्यामुळे माझ्या जिवंत विचारांऐवजी माझे निश्चल पुतळे जागोजागी उभारणेच त्यांना जास्त सोईस्कर वाटले. माझ्या विचारांशी असलेल्या तथाकथित बांधिलकीची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी राजकारणाची दुकानं थाटली. अनेक दुकानं म्हणजे जीवघेणी स्पर्धा आलीच व जीवघेणी स्पर्धा म्हणजे एकमेकाचे गळे कापणं हेही ओघाने आलंच!
माझ्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अनेक वर्षांमध्ये इकडे एकदाही फिरकण्याची इच्छा न झालेले एक नेताजी अपरात्री माझ्या दिशेने येताना दिसले आणि त्यांची माझ्यावरील निष्ठा बघून मला अक्षरश: गहिवरून आले. पण ते माझ्याजवळ पोहोचताच ती 'निष्ठा' नसून 'विष्ठा' आहे हे बघून मी हादरून गेलो. माझ्या काही लक्षात येण्याच्या आतच नेताजींनी त्यांच्या हातातील विष्ठेने माझा चेहरा माखून टाकला व क्षणार्धात ते अंधारात दिसेनासे झाले. पहाटे तरतरीत चेहऱ्याने मॉर्निंग वॉकला निघालेले 'तेच' नेताजी माझ्या पुतळ्याची अवस्था बघून प्रचंड संतापले आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव माझ्याभोवती जमला. माझ्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या दुसऱ्या एका नेत्याचे हे दुष्कृत्य आहे अशी बातमी अगदी सुनियोजितपणे पूर्ण शहरात पसरविण्यात आली व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणारी दंगल पद्धतशीरपणे भडकवून मला विष्ठा फासणारे नेताजी अतीव समाधानाने त्यांच्या आलिशान बंगल्याच्या हिरवळीवर महागड्या व्हिस्कीचे घुटके घेत पुढील राजकीय डावपेचांची आखणी करण्यात गर्क झाले!
माझ्या पुतळ्यावरून झालेली पहिलीच दंगल ही परकीयांसाठी एक सुवर्णसंधी ठरली. अनेकांचे नाहक जीव घेणारी व असंख्यांचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त करणारी ती दंगल शांत झाल्यानंतर एक दिवस माझी नजर माझ्या चौथऱ्याकडे गेली तर मध्यरात्री तिथे दोन परदेशी नागरिक गंभीर चर्चा करीत बसले होते. त्यांच्या हातात आपल्या देशातील पुतळ्यांच्या लांबलचक याद्या होत्या. पुतळ्यांच्या नावांसमोर त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचा तपशील लिहिला होता. कोणत्या पुतळ्याला केव्हा मानवीय विष्ठा, शेण किवा डांबर फासायचे, कोणत्या पुतळ्यांच्या गळ्यात चपला व जोड्यांचे हार घालायचे याची योजना तयार करण्यात ते गर्क झाले होते. चर्चेच्या शेवटी एक दुसऱ्याला अत्यानंदाने म्हणाला, ''या पुतळ्यांमुळे आपलं काम किती सोपं झालं. स्वार्थाच्या पोळ्या शेकण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर अत्यंत निर्लज्जपणे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशात मनसोत्त* धुमाकूळ घालण्यास आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहे!''
परकीयांनी आमच्या वागण्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे म्हणूनच अगदी क्षुल्लक कारणावरून ते आमच्या देशात मोठ्या दंगली भडकवू शकतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ न निष्पाप नागरिकांना भडकवणारे स्थानिक नेते हे तर त्यांचे बिनीचे सरदारच! मी अंतर्मुख झालो असतानाच जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा पळणाऱ्यांना बघून आश्चर्यचकित झालो. एका नेत्याचे पोस्टर दुसऱ्या नेत्याने फ ाडल्यामुळे शहरात प्रचंड दंगल उसळली होती. त्या गदारोळात ते दोन परकीय नागरिक अचानक माझ्या दृष्टीस पडले. विलक्षण आनंदाने एक दुसऱ्याला टाळी देत म्हणाला, ''काल पुतळा, तर आज पोस्टर, तर उद्या आणखी काही. या देशात वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार!''
-- श्रीकांत पोहनकर, पुणे
98226 98100
Copyright © 2025 | Marathisrushti