(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • आनो ही! (तो दिवस!)

    ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली! हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं.. कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल..

  • धाडसत्राने काय साधले ?

    शासनाच्या जवळपास सर्व खात्यातील भ्रष्टाचाराचे नमुने अधुनमधून चर्चेत येतात. त्यातही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभाराबाबत प्रचंड तक्रारी असतात. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडसी कारवाई करत परिवहन खात्याच्या विविध कार्यालयांवर धाडी घातल्या. या धाडसत्राने नेमके काय साधले हे समजणे कठीण असले तरी त्यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन खाते पुन्हा चर्चेत आले हे मात्र नक्की.

  • मनुष्यबळ खात्याची दिवाळखोरी

    मनुष्यबळ विकास खात्याने विश्वनाथन आनंदला डॉक्टरेट देण्याच्या प्रक्रियेत नागरिकत्त्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. स्पेनमध्ये राहत असल्याने तो भारतीय नागरिक नसल्याचा जावईशोध या खात्याने लावला. केंद्रिय मंत्री कपिल सिब्बल यांनी आनंदची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला असला तरी एकूणच खेळाडू आणि क्रीडासंस्कृती याबाबत आपल्याकडे केवढी मोठी उदासिनता आहे, हे नव्याने पहायला मिळाले.

  • आत्म गुरू

    बागेतील तारका-

  • औचित्य जागतिक दृष्टीदान दिनाचे !

    मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.

  • विचार करा – फटाके फोडणे

    वाचा व विचार करा...

    फटाक्यातील विषारी वायूमुळे, धुरामुळे दमा , खोकला , डोकेदुखी , त्वचारोग , ब्लडप्रेशर तर कधी कँन्सरही होऊ शकतो .

    फटाक्यांच्या आवाजाची पातळी '80' डेसिबल पेक्षा जास्त वाढली तर माणसाला ञास होतो . बहुतेक फटाक्यांच्या आवाजाची पातळी 100 डेसिबल पेक्षा जास्त असते .

    बॉम सारख्या फटाक्यांचा आवाज लहान मुलांच्या उरात धडकी तर वृद्धांची व आजारी व्यक्तिंची झोप उडवतो.

    त्यामुळे चिडचिडेपणा , मानसिक ताण-तणाव व बहीरेपणा येण्याची शक्यता वाढते .

    अनेक फटाका फँक्टरीत लहान मुलं काम करतात. उदा. तामिळनाडू मधील शिवकाशी येथे जवळ-जवळ 1लाख (100000) लहान मुलं रोज 12 (बारा ) तास फटाका फँक्टरीत काम करतात .

    सल्फर , कार्बन , फॉस्फरस इत्यादी विषारी वायुच्या वातावरणात काम करुन त्यांना काय मिळते ...?

    तर ...

    a) अत्यंत तुटपुंजा पगार , आणि ...
    b) बोनस म्हणून दमा , त्वचारोग , कर्करोग इत्यादी सारखे आजार आयुष्यभरासाठी.

    फटाके फोडणे ही संस्कृती आपल्याकडे चीन या देशातून आली आहे .

    -- शोभा सुभेदार

  • मेघ बरसला

    मेघ बरसला
    विरही अश्रूंचा
    खारा खारा.

    मेघ बरसला
    प्रथम आषाढी
    प्रिय वार्तेचा.

    मेघ बरसला
    माळात रानात
    काळा काळा.

    मेघ बरसला
    भिजली धरणी
    हिरवी हिरवी.

    -- विवेक पटाईत

  • काळानुसार बदललेले ठाणे

    मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात.

    माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ दादरमध्ये. मात्र त्यानंतर संपूर्ण बालपणापासून मी ठाण्यातच वाढलो. अजुनही पक्का ठाणेकर आहे. मात्र मी Born and Brought Up in Thane असं म्हणू शकत नाही, पण ठाणं तर माझ्या रक्तातच भिनलंय. अजूनही साठ आणि सत्तरच्या दशकातल्या ठाण्याच्या आठवणी ताज्या असल्यासारख्या डोळ्यासमोर आहेत.

    मी माझे गाव ठाणेच मानतो. ठाण्यावर माझे विलक्षण प्रेम आहे, हे ठाण्याबाहेर मी अगदी चार दिवसांसाठी गेलो तरी मला जाणवतं. बाहेरगावाहून आल्यावर ठाणे स्टेशनात पाऊल टाकताच मला अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं.

    माझं बालपण ठाण्याच्या आंबेडकर रोडजवळच्या मनोरपाडा भागात गेलं. पहिली शाळा दिघेबाईंची शिशु-ज्ञान मंदिर. त्यावेळी मित्रमंडळी सगळी मनोरपाडा आणि उथळसर भागातली. चवथीनंतर मो. ह विद्यालयात शिक्षण झालं. आमच्या दहावीच्या एसएससी बॅचची आम्ही मित्रमंडळी अजुनही चार-सहा महिन्यातून एकदा भेटतोच.

    खरंतर हा विषय निघायला कारण एवढंच की गेले काही दिवस ठाण्यात एक मोठं स्थित्यंतर होताना दिसतंय. आमच्या ठाण्यातल्या जुन्या स्टेशन रोडचा चेहरामोहराच बदलून टाकला जातोय. सगळी अतिक्रमणं तोडून टाकत हा रस्ता मोठा केला जातोय. अर्थात हा बदल आवश्यकच आहे. जुन्या स्टेशन रोडवरुन अक्षरश: चालायला जागा मिळत नव्हती. हा रस्ता गर्दीत गुदमरुन जात होता. दोन-तीन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावरुन एक फेरफटका मारला आणि लक्षात आलं की या रस्त्यावरच्या काही पाऊलखूणा आता लुप्त व्हायच्या मार्गावर आहेत. काही वर्षापूर्वी टी.चंद्रशेखर या धडाडीच्या महापालिका आयुक्तांनी ठाण्याचा चेहरामोहरा बदलून टाकला होता, त्यांची आठवण आली.

    मनात विचार आला की हे बदलत असलेलं ठाणं निदान आपण जेवढं जुन्या स्वरुपात बघितलंय तेवढं तरी लिहून ठेवावं. जुन्या आठवणींना उजाळा देताना कधीतरी ही पानं वाचली जातील. मराठीसृष्टीच्या “नोस्टाल्जिया” या भागात अशाच जुन्या आठवणींचा खजिना भरुन ठेवलाय. त्यात या ठाण्याच्या जुन्या आठवणींची भर घालावी.

    एक लक्षात आलं की या सगळ्याच गोष्टी काही एकाच लेखात लिहिणं शक्य नाही त्यामुळे मग एक लेखमाला लिहावी असा विचार केला. आत्तातरी पंधराएक विषय डोक्यात आहेत. यामध्ये ठाण्याचे टांगे, आता हरवलेली आईस फॅक्टरी, कल्पना केंद्र, मोहवी मधली नाटकं आणि रांगोळिची प्रदर्शनं, बी.जे. हायस्कूल या आणि अशाच बर्‍याच ठिकाणांच्या आठवणी येणार आहेत.

    आपल्याही आठवणीतल्या ठाण्यातल्या जागा, वास्तू वगैरेंची महिती लिहायची असेल तर नि:संकोचपणे पाठवा, तुमच्या नाव, पत्ता आणि फोटोसहित.

    तेव्हा पुढच्या भागात बघूया बदललेल्या ठाण्याच्या आठवणी.

    -- निनाद अरविंद प्रधान

  • वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमासाठी देशभरात एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी)

    शहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.

  • बाळासाहेबांचं स्मारक झालेच पाहिजे !

    बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.