(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विंटर स्पेशल अलिबाग

    लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो.

  • पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना

    पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना --

    भारतात - महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.

    नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात

    लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो पाळतात.

    कंबोडीयात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला आहे. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहीरात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीत जाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात.

    कोरीयात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात विशिष्ठ वाणाचा भाताचा पिंड करून वाहातात त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात.

    मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात.

    विएतनाम मध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात.

    चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळात तेथे पाऊस असतो, सुगी असते.

    जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरीम्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यात सोडतात, तिसर्‍या दिवशी तीरो नागाशी – विशेष अन्नपदार्थ करतात.

    इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात.

    जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो.

    रोम मध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे.

    मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात.

    हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे – जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात

    मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात – दिआ द ला मुरतोस – हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.

    अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मे मधला शेवटचा सोमवारमनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी.

    ऑल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

    याशिवायही अनेक देशांमध्ये, लोकसमूहांमध्ये ‘पितरं घालण्याच्या’ पद्धती असू शकतील. बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये पूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत असे दिसते. ते ते स्थानिक लोक त्या त्या कृती त्या त्या दिवसात केल्या नाहीत किंवा त्यांना जमले नाही तर हळहळत असतील, पाप लागले असे म्हणत असतील. जगभर रूढी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या न केल्याबद्दल – पाप – लागायचेच असेल तर सगळ्यांनाच पाप लागणार कारण कोणीच जगातल्या सर्वच्या सर्व रुढी पाळत नाहीत. रुढी कालानुसार बदलतात पण आपल्या जन्माला कारण असणार्‍यांबद्दल कृतज्ञ राहाण्याची भावना मात्र सर्वांच्यात शाबूत दिसते. -

    अधिक माहितीसाठी पहा.

    http://epaper.eprabhat.net/337780/Rupgandh/Rupagandh#page/9/1. श्राद्ध वगैरे कल्पना ब्राह्मणांनी समाजाला लुटायला निर्माण केल्या असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांनी वरील माहिती लक्षात घ्यावी.

  • माझी गोवा टुर

    २६ जानेवारी निमित्ताने माझं मिञांबरोबर गोव्याला जाणं झालं.प्रत्येकाला आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य सोड़ुन बाहेरचं जग बघण्याची ईच्छा असते.बाहेर फिरायला जावं तिथली माणसं, त्यांची संस्क्रती पहावी त्यातुन काहीतरी शिकाव काहीतरी आत्मसात करावं अशी ईच्छा असते.

  • मुंबई ते कल्याण रेल्वेप्रवासाची नांदी

    १८५४ मध्ये मुंबईजवळचा पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा खोदून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला.

    त्यापूर्वी जेमतेम एक वर्षाआधी भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई - ठाणे दरम्यान सुरु झाली. या दिवसाला भारताच्या इतिहासात मोठे महत्त्व आले. मात्र त्यानंतर केवळ एकाच वर्षात ब्रिटिशांनी आणखी एक आविष्कार दाखवून ही रेल्वे थेट कल्याणपर्यंत नेली आणि तीसुद्धा पारसिकचा डोंगर खोदून.. आणि भव्य बोगद्यातून रेल्वेमार्ग टाकून. १ मे १८५४ हा दिवस कल्याण-डोंबिवलीकरांसाठी खरा सोन्याचा ठरला आणि त्यासाठी त्यांनी ब्रिटिशांचे मनोमन आभार मानायला हवेत. का, ते समजण्यासाठी पुढे आणि शेवटपर्यंत वाचा.....

    १८३० मध्ये जगातील पहिली रेल्वे सुरु झाली. त्यानंतर केवळ चौदा वर्षात भारतात रेल्वे आली. इंग्लडमध्ये बनवलेल्या लॉर्ड फॉकलंड इंजिनने भारतातील पहिली रेल्वे खेचली. त्याच्या दिमतीला सिंध, सुलतान आणि साहिब या नावांची तीन इंजिने होती.

    दुपारी साडेतीन वाजता ही गाडी मुंबईतील ५०० प्रतिष्ठीत नागरिकांसह पहिल्या प्रवासाला निघाली. तोफांची सलामी, बॅंडपथक हे तर तयार होतेच. बोरीबंदर ते ठाणे असा प्रवास ५७ मिनीटात झाला. ठाण्याला उपस्थितांना मेजवानी दिल्यानंतर ठाणे बोरिबंदर प्रवास ४० मिनीटे करण्यात आला आणि १८ मे १८५३ (सोमवार) पासून आगगाडी आम जनतेच्या प्रवासासाठी सुरु झाली.

    यानंतरच्या काळातही लोहमार्ग ठाण्याच्या पुढे टाकण्याचे काम सुरु होते. मुंबईजवळच्या पारसिकच्या डोंगरातून बोगदा खोदून त्यातून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला. या मंडळीत स्त्रियादेखील होत्या. या वाफेच्या इंजिनाला प्रथम वर्गाचे सात व दुसर्‍या वर्गाचा एक डबा जोडण्यात आलेला होता. गाडीला खानपानाचाही एक डबा जोडण्यात आला होता. सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी बोरीबंदर स्थानकावरुन सुटलेली ही गाडी १ तास १० मिनीटांचा प्रवास करुन सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचली. कल्याण स्टेशनपर्यंत ही गाडी नेण्यात आली नाही तर स्टेशनच्या आधी खाडीकिनार्‍यालगत गाडी थांबवण्यात आली. येथेच सैनिकी बॅन्डपथकाने बॅन्डची सलामी दिली. मेजवानी देखील येथेच देण्यात आली. कल्याणपर्यंत रेल्वे धावली या आनंदाप्रित्यर्थ फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. तीन तासाच्या मनोरंजनानंतर जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परतीच्या प्रवासाला निघालेली गाडी रात्री अकरा वाजता बोरीबंदरला परत पोहोचली.

    त्यावेळी डोंबिवली, कळवा, मुंब्रा ही स्टेशने नव्हती. हाच लोहमार्ग मग पुढे पुण्यापर्यंत वाढवण्यात आला. पुढे कल्याण हे या मार्गावरील जंक्शन स्थानक बनले. रेल्वेस्थानक, कार्यालय आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्यासाठी लागणारा दगड या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे या उभारणीचा खर्च आणि वेळ वाचणार होता. मात्र, त्याच वेळी तत्कालीन कल्याण पालिकेने रेल्वेला पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. त्या वेळी कल्याणला काळा तलावातून पाणीपुरवठा होत होता. पाणी मिळणार नाही म्हटल्यावर रेल्वेची पंचाईत झाली. त्यामुळे ग्रेट इंडियन पेनन्सुला कंपनीने अंबरनाथला जंक्शन करण्याचा विचार सुरू केला. परंतु अंबरनाथ परिसरात बांधकामासाठीचा दगड उपलब्ध नव्हता. अखेर अंबरनाथजवळील काकोळे तलावावर धरण बांधून तेथून पाणी कल्याण स्थानकापर्यंत आणण्यात आले. पुढे कल्याण हे जंक्शन बनले. भारताच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या बहुतांश गाडय़ा कल्याण स्थानकातून जातात. रात्रंदिवस प्रवाशांची प्रचंड गर्दी कल्याण स्थानकावर असते.

    आता दुर्दैवाचा भाग बघा. १६० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भविष्याचा विचार करुन ज्या काही सुविधा आणि सुखसोयी आपल्यासाठी निर्माण केल्या त्यांचा लाभ आपण अजूनही घेत आहोत. पारसिकच्या त्याच बोगद्यातून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. ठाण्याच्या खाडीवरचा तोच जुना पुल अजूनही रेल्वेसाठी वापरला जातोय.

    मात्र आपल्याच लोकांनी बांधलेले एक्स्पेस-वे, मुंब्रा बायपास, कल्याण-शीळ रस्ता यासारखे रस्ते खड्डेमुक्त होण्याऐवजी दर पावसाळ्यात खड्डेयुक्त होत आहेत. ठाणे कल्याण दरम्यान अजूनही थेट रेल्वेमार्गाला समांतर रस्ता होत नाही. १६० वर्षांपूर्वी ब्रिटिशांना पारसिकचा बोगदा खणण्यासाठी जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्यापेक्षा कितीतरी पटींनी श्रेष्ठ तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. मग १०-१५ किलोमिटरचा एक रस्ता आम्हाला बनवता येत नाही की त्यात हितसंबंध गुंतलेले आहेत? वरळी सी-लिंक सारखा मोठा पूल जर ४-५ वर्षात बनू शकतो तर मग ठाणे कल्याण रेल्वेला समांतर रस्ता का होत नाही?

    निदान या रेल्वेसाठीतरी खरोखरच कल्याण-डोंबिवलीकरांनी ब्रिटिशांचे आभार मानले पाहिजेत. पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा बांधून रेल्वे सुरु झाली नसती तर कदाचित स्वतंत्र भारतात अजूनही हे काम कोणत्या कॉन्ट्रक्टरला द्यायचं, कोणाचे किती टक्के, टोल किती घ्यायचा यातच गुरफटून राहिलं असतं !

    -- निनाद प्रधान

  • प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)

    एका पुस्तकात ‘प्लँचेट’ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते… हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण .

  • रात्र वैऱ्याची आहे! सावध असा ! दक्ष असा !!

    युद्ध फक्त सैनिक लढत नाहीत तर देशाच्या नागरिकांनाही संयमाचे आणि विवेकाचे युद्ध लढावे लागत असते. त्यामुळे विद्यमान नाजूक परिस्थितीत भारतीय नागरिकांनी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे. समाजमाध्यमवर व्यक्त होतांना संयम आणि विवेकाचं भान प्रत्येकाने ठेवायला हवे. देशांतर्गत शांतता बाधित होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. समोरून वार करणाऱ्याची छाती चिरता येते. मात्र, पाठीत वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. तेव्हा, जन हो सावध असा ! दक्ष असा !!रात्र वैऱ्याची आहे !!!

  • घरचा वैद्य (तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी)

    तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी करायचे उपाय

  • तांदळाच्या पिठाचे थालिपीठ

    नेहमीचेच खाद्यपदार्थ अनेकदा कंटाळा आणतात. काहीतरी नवीन हवे असते. असेच नवीन हवे असणा-यांसाठी हा खास मेनू. एकदा अवश्य करून पहा

  • उगाच काहीतरी – २७

    आज सकाळची अतिशय ट्राफिकची वेळ. सिग्नल वर एक कार थांबलेली. श्रीमान ड्रायव्हिंग सिटवर आणि शेजारच्या सिटवर श्रीमती लिपस्टिक लावायला सुरवात करतात. तितक्यात सिग्नल हिरवा होतो आणि कार हळुवारपणे पुढे निघते आणि तेवढ्यात..
    डाव्या बाजूचा रिक्षावाला अचानकपणे कारच्या समोरून उजव्या बाजूला वळतो. कारला करकचून ब्रेक लागतो आणि कार झटका देऊन तिथेच थांबते.
    श्रीमान विंडो खाली करून रिक्षावाल्याच्या दिशेने ' अरे मा... '
    तोवर रिक्षा सुसाट वेगाने पसार.
    या भूतलावरील झालेल्या कुठल्याही घटनेची जाणिव नसणाऱ्या आणि आपल्याच धुंदीत असलेल्या श्रीमतीजी अतिशय खूंखारपणे श्रीमानजींकडे पाहताहेत. त्यांची लिपस्टिक ओठांच्या अर्ध्यातुन गालामार्गे पार कानापर्यंत पोहोचलेली...... आणि हे सांगायलाच नको की श्रीमानजींचा Monday panic त्याक्षणीच सुरू झाला...
    -- अमोल पाटील
  • वाढदिवस आणि जन्मोत्सव

    लहानपणा पासूनच प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं एक कौतुक आणि नावीन्य असत तो दिवस म्हणजे फक्त आपल्या साठी साजरा केला जाणार याची अपूर्वाई असते . आमच्या लहानपणी ती असायची पण अगदी साध्या सरळ पद्धतीने म्हणजे ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी बाबा आम्ही आबा म्हणतो ते पेढे घेऊन यायचे ते आणले कि संध्याकाळचं देवाची दिवाबत्ती व्हायची मग स्तोत्र जप झाला कि बाबा देवाजवळ पेढे ठेवून पहिला पेढा ज्याचा वाढदिवस त्याला भरवायचे .