३ मार्च १९७२ हा दिवस.... बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली.

एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटातील 'देखा ना हाय रे सोचा ना हाय रे' हे गाणं.
१९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्यासाठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, महमूद, अनवर आली, नासीर हुसेन, शत्रुघ्न सिन्हा, केष्टो मुकर्जी, ललिता पवार, मनोरमा, मुकरी, सुंदर, किशोर कुमार या सारखे कलाकार होते. या सर्वानी चित्रपटात जो धुमाकुळ घातला आहे तो अप्रतिम, केष्टो यांचे नशेत गाड़ी लोटने, ललिता पवार यांचे अंगात आलेली बाई लाजबाब.
या चित्रपटातील गाणी ..."देखा ना हाये रे सोचा ना हय रे रख दी निशाने पे जान ल ल ल लला .. कदमो पे तेरे निकले मेरा दम.....है बस यही अरमान ...." किशोर कुमार यांची अप्रतिम गाणी ....एव्हरग्रीन फ्रेश .. ' किशोर कुमार व लताजी यांची दोंन गाणी ..."तुम मेरी ज़िंदगी मे कुच इस तराह से आये ..." 'दिल तेरा है मे भी तेरी हु सनम ..तेरे सर की कसम हो सनम, गीतकर राजेन्द्र कृष्ण, संगीत राहुल देव बर्मन यांची सर्व गाणी लोकप्रिय. आजही हा सिनेमा बघावा ....एकदम ताजे तवाने झाल्या सारखे वाटते.
मेहमूद यांनी, त्यांच्या अभिनय कौशल्याने शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, पंचम आणि किशोर कुमार यांनी सुपर हिट केलेला "ऑल टाइम ग्रेट" " बॉम्बे टू गोवा"
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला
भैरव राग, हा भारतीय संगीतातील अति प्राचीन रागांपैकी एक राग मानला जातो. पुढे, रागांचे वर्गीकरण करताना, “भैरव” नावाचा “थाट” निर्माण केला आणि त्याच्या आजूबाजूचे राग त्यात सामावून घेतले. खऱ्या अर्थाने “संपूर्ण-संपूर्ण” जातीचा राग आहे आणि यात, “निषाद”,”धैवत” हे दोन स्वर कोमल लागतात तर बाकीचे पाचही स्वर शुद्ध स्वरूपात, या रागात वावरत असतात. वादी स्वर “धैवत” तर संवादी स्वर “रिषभ” आहे.
उन्हाळयाची चाहूल लागताच पुणे -मुंबई सारख्या शहरवासियांची मने थंड हवेच्या ठिकाणांचा वेध घेतात. रोजच्या धकाधकीच्या व कोंदट वातावरणातून चार घटका सुखाच्या कराव्या असा विचार त्यांच्या मनात डोकावतो.परंतु सर्वच पर्यटन स्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात.
नाटकाचा विषय बोल्ड असला तरीही त्यात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशा प्रकारे नाटकाची हवा निर्माण करण्यात आली. जणू लैंगिक विषयावरचे एक गंभीर उद्देशपूर्ण नाटक. त्यामुळे हे नाटक मी आवर्जून बघितले. तुम्ही गालातल्या गालात हसत अर्थातच म्हणू शकता की गृहस्थ आबंटशौकीन आहे आणि हिट अॅन्ड हॉट नाटक बघण्यासाठी त्याने हा बहाणा शोधलेला आहे.
आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद..! गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो.
स्पर्श तुझा
” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना
कुठलीही सुंदर गोष्ट हृदयात साठवून तिचा अनुभव घेण्यासाठी ऐकण्याच्या शक्तीची खुप गरज असते. नुसतं पावसात भिजणं, आणि त्या पावसाचा आणि कडाडणार्या विजांचा आवाज शांतपणे ऐकत भिजणं यात खूप फरक असतो. आईची पाठीवर प्रेमाची थाप पडली तर आपल्याला बरं वाटतच, परंतु जोडीला तिचे प्रेमाने ओथंबलेले शब्द कानांवर पडले तर आपला आनंद अजून द्विगुणीत होतो.
Copyright © 2025 | Marathisrushti