रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून हिंडतांना इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आठवतो…त्याचबरोबर अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देतांना स्थापत्यकलेचे अद्भूत नमुने न्याहाळता येतात. दापोली परिसरात फिरतांना कोकणचे अस्सल सौंदर्यही डोळ्यास पडते. म्हणूनच पर्यटकांचा या परिसराकडे जास्त ओढा असतो.
डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर येते किंवा जोरदार पाउस पडतो आणि वातावरण पुन्हा सुस्नात होते. हवामान कोरडे असल्याने, पावसाची साधी सर देखील, इथले वातावरण थंड करते.
अरे नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेल्या निर्लज्ज राजकारण्यांनो,
नका उगाच आमच्यासाठी इतकं भांडण्याचं नाटक करू.
आम्ही मंदिराच्या लायनीत उभे होतो तेंव्हा तुम्ही आम्हाला उन्हां-तान्हांत थांबवून देवदर्शनाला जात होतात....
आम्ही जेव्हा मतदानाला रांगेत होतो तेंव्हाही तुम्ही बोटांचा V करून आम्हाला ओलांडून जात होतात...
कधी रेशनच्या लायनीत तुमचे हुजरे तुमचा जयजयकार करत आम्हाला डावलून पुढे जायचे नि आम्ही तसेच तासन् तास तिष्ठत उभे राहायचो लायनीत..
कधी रेल्वे तिकिटासाठी....
कधी बोर्डिंग पास साठी....
कधी बादली भर पाण्यासाठी...
कधी पोरांच्या दाखल्यासाठी...
कधी शेतमालाच्या पैश्यांसाठी...
कधी हक्काच्या वेठबिगारीसाठी..
कधी पेन्शन साठी तर कधी गॅस सिलेंडर साठी...
आम्ही नेहमीच लायनीत होतो बेशरम भ्रष्टाचार्यांनो...
नाईलाजाने उभे होतो...
हतबल होऊन उभे होतो...
दुःखी होऊन उभे होतो...
कष्टात उभे होतो....
पण इतक्या वर्षांत कधीच आम्ही तुम्हाला दिसलोही नाही आणि कधी आमच्या त्रासाचा तुम्हाला कळवळा ही आला नाही.
आज मात्र आम्ही आनंदाने लायनीत उभे आहोत...
आमच्याबरोबर आमचा देशही बदलायला उभा आहे...
तर आता तुम्हाला इतका त्रास का होतोय??
नका आमची काळजी करू इतकी...स्वतःच्या कमरेखालचं एक-एक करत सुटत चाललयं, ते आधी सांभाळा
आम्ही सामान्य कष्टकरी माणसं आहोत. आम्हाला चलनातील बदलाचा कुठलाही त्रास होत नसून, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी आमची काळजी करू नये आणि समजा झालीच काही अडचण तर ती आमच्या पातळीवर सोडवण्यास आम्ही भारतीय बंधु-भगिनी समर्थ आहोत
जय हिंद
खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे .
जन्मभूमी ते कर्मभूमी आणि कर्मभूमी ते पुण्यभूमी करण्याचं सामर्थ्य दाखवायचं, का डाव अर्ध्यावर सोडायचा, हे अर्थातच आपण ठरवायचं आहे..
मला तर नेहमी वाटत आले आहे, जगावे ते पु. ल. कडून व्यक्तिचित्र लिहून घेण्यासाठी व मरावे ते अत्रेंकडून मृत्युलेख लिहून घेण्यासाठी. पु. ल. नी अनेक व्यक्तिचित्र लिहिली. काही खरी, तर काही अर्धकाल्पनिक. पु. ल. संपर्कातल्या लोकांकडे अतिशय डोळसपणे पाहत असत. आणि त्या व्यक्तीला टीपकागदासारखे टिपत असत.
टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर इमारत. ही इमारत “दोरिक” या जुन्या ग्रीक शैलीत बांधली असून तीला ३० पायर्या आहेत.
दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो
डार्विनच्या अुत्क्रांतीवादाने बर्याच धार्मिक संकल्पनांना धक्का दिला. आनुवंशिक तत्वाच्या (जेनेटिक मटेरियल) अुत्क्रांतीमय बदलांमुळे सजीवांच्या प्रजाती निर्माण होतात हे सिध्द झाले. आनुवंशिक तत्वच शरीर धारण करू शकते म्हणजे आनुवंशिक तत्वच सजीवांचा आत्मा असला पहिजे. या तत्वानुसार मी आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मांडला आहे.

Copyright © 2025 | Marathisrushti