(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ४

    या लेखात आपण आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने साधारणपणे कोणत्या रंग संवादाचे आणि रंग आकार यांचे पेंटिंग आपल्या नजरेसमोर ठेवावे यावर विचार करू.

  • प्रभावी नेतृत्त्व की अपरिहार्यता ?

    सोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. यात त्यांचे मोठेपण सामावल्याचे पक्षातील अनेक नेतेमंडळी सांगतात. पण, त्या मोठ्या सामाजिक कार्यातून किवा राजकीय परंपरेतून पुढे आलेल्या अभ्यासू नेत्या नाहीत. शिवाय आता नेहरू घराण्याची परंपरा सांगण्याशिवाय कोणताही जमेचा मुद्दा उरला नसल्याने काँग्रेसला सोनियाजींच्या आधारावरच मते मागता येणार आहे. त्यामुळे सोनियांची मक्तेदारी निर्माण होत आहे.

  • आठवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

    मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच.

  • डॉक्टरांचा एक ग्रुप

    मोर्निंग वोक नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता .
    लांबून एक इसम लंगडत येताना दिसला .

    एक डॉक्टर म्हणले " याला काय झालं असेल हो ? "

    डॉक्टर १ :left knee arthritis ."

    डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis ".

    डॉक्टर ३ :" काहीतरीच काय !Ankle sprain असणार ."

    डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार ."

    डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय .

    डॉक्टर ६.............काही बोलणार तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला ,

    ..." इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय

  • संगणकीय लेखन – सोयी आणि गैरसोयी

    आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द अशुध्द असं ते जाणीत नाहीत किंवा या बाबतीत त्यांचं फारसं देणंघेणं नसतं.

    त्यामुळं संगणकीय लेखनात काही गैरसोयी झाल्या आहेत त्याबरोबरच काही सोयीही झाल्या आहेत. ‘रवी’ आणि ‘खी’ हे निराळे ओळखता येतात. वानखेडे हे वानरवेडे असं वाचलं जात नाही. पद्धत किंवा शुद्ध या शब्दात, अुच्चारानुसार ‘द’ अर्धा आणि ‘ध’ पूर्ण असायला हवा पण तो तसा टाअीप करायला गेलात तर तो...पद्धत किंवा शुद्ध असाच टाअीप केला जातो. लिहीतांनाही आपण पद्धत आणि शुद्ध असंच लिहीतो. ‘ध’ हलंत (अर्धा) आणि ‘द’ पूर्ण असं टाअीप केलं तर कसं टाअीप केलं जातं ते पहा....पध्दत, शुध्द..

    विश्व या शब्दात ‘श्’ चं रूप बदलून ते अुलट्या ४ सारखं होतं तर ‘व’ अर्धा होतो. काही संगणकात ‘श’ अर्धा होतो (अुलटा ४ होत नाही) आणि ‘व’ पूर्ण राहतो.

    शुध्द कशाला म्हणावं आणि अशुध्द कशाला म्हणावं हेही काही वेळा समजत नाही. ‘होतं’ हे शुध्द तर ‘व्हतं’ हे अशुध्द..पण ‘नहोतं’ हे अशुध्द तर ‘नव्हतं’ हे मात्र शुध्द...हे कसं?

    टाअीप केलेला हा मजकूर, माझ्या संगणकात असलेल्या सॉफ्टवेअरनुसार टाअीप झाला आहे. आता मराठी भाषेची आणि लिपीची शुध्दाशुध्दता, अक्षररूप (फॉन्ट) तज्ज्ञ आणि मराठी सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ यांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. टाअीप केलेल्या मजकूराचा आशय समजला म्हणजे फॉन्ट सॉफ्टवेअर यशस्वी झालं असं मानावं.

    अक्षररूप, फॉन्ट तज्ज्ञांना काही सूचना कराव्याशा वाटतात. मागील लेखांत .... मी सुचविलेले ... शिफारस केलेले स्वर :: अ ची बाराखडी :: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ

    यापैकी अ आ ओ औ या स्वरांना स्वतंत्र कळा आहेत. इ ई उ ऊ ए ऐ या पारंपारिक स्वरांनाही स्वतंत्र कळा आहेत. या ६ कळांना अि अी अु अू अे अै या कळा दिल्या तर इ ई उ ऊ ए ऐ हे स्वर गाळले जातील आणि त्यांच्या जागी अि अी अु अू अे अै हे स्वर सहज टाअीप करता येतील. अॅ ऑ हे स्वर दोन कळा वापरून सहज टाअीप करता येतात. ञ आणि ङ अैवजी दुसर्या कोणत्यातरी अक्षरांना किंवा अक्षरखुणांना या कळा द्याव्यात. ऋ ची स्वतंत्र कळ आहे, ती दुसर्या कोणत्यातरी अक्षराला द्यावी. ॐ ची कळ मात्र हवीच.

  • इंद्रधनुषी रंग नदीचे…

    ललित..
    इंद्रधनुषी रंग नदीचे…
    पावसाळा संपत आला की पक्षपंधरवाड्याची सुरुवात होते.खेड्यापाडयातून पितरांच्या सर्वत्र वावरणा-या भुकेलेल्या आत्म्यांना दरवर्षी पिंडदान करून तृप्त करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.शेवटी ही पिंडे नदीकाठावर कावळ्याच्या प्रतिक्षेत ठेवली जातात किंवा नदीच्या पाण्यात मासे खातील यासाठी अलगद सोडली जातात. त्यानंतर सुरु होते ती घराची स्वच्छता व शुद्धता करणे,घराच्या भिंती मातीच्याच असायच्या त्या मातीनेच सारवून स्वच्छ करायच्या.पावसाळाभर पावसाने धिंगाणा घातलेला असायचा.पावसांचे पाणी भिंतीवरून ओघळून त्या खराब दिसू लागायच्या.त्यांना मायेने सारवल्यावर लख्खं होऊन जायच्या.सारवण्यासाठी पांढरी माती पाण्यात कालवली जायची तिचा एक सुवास संपूर्ण घ्रभर पसरायचा.या घमघमणा-या मातीच्या सुगंधाने घर शुद्ध आणि स्वच्छ होत असे.त्यासाठीच तर पोरंसोरं शाळा बुडवून सारवतांना नाकातोंडावर, हातावर मातीचे थेंब झेलत आईला मदत करु लागायचे.मायेने भिंतीवरुन पोतरं फिरवतांना आईच्या नाका-तोंडावर सगळे मातीचे थेंब उडालेले दिसंत असले तरी श्रमातून तिचा चेहरा उजळलेला असायचा.काम करत आमचेही नाक-तोंड थेंबानी भरुन जाई अशा कामात आम्हा मुलांना खूप मजा वाटायची.आज हे सारे जुने दिवस आठवले की मनाला हलके वाटू लागते. त्यावेळी पाण्यात खेळणे,मातीत हात भरवणे यामधली गंमत आजकाल तासनतास मोबाईलवर गेम खेळत बसणा-यांना कधीच नाही कळणार.ज्यांनी हे दिवस अनुभवले खरंच त्यांचे जीवन लख्खं झाले आहे.
    भिंती सारवतांना मातीचे थेंब उडाल्यामुळे तसेच घरात सतत पाणी गळून कळकट मळकट झालेली मोठमोठी भांडी नदीवर नेऊन घासायलाही खूप मजा यायची.पोरीसोरी या कामात हातभार लावायच्या.नदीच्या खळखळ वाहणा-या पाण्याच्या धारेबरोबर तांब्या-पितळेच्या भांड्यानी अशी काही कात टाकलेली असायची की त्याची चमक दूरवरुनच नजरेत भरायची.
    यालाच दसरा काढणे हा शब्दप्रयोग अजूनही प्रचलित आहे.खरं तर या पाठीमागे धार्मिक-पारंपारिक तत्त्वांपेक्षाही काही शास्त्रीय गोष्टी देखील नक्कीच आहेत.त्यातून मिळणारा आनंद तर आणखी वेगळीच पर्वणी या सगळ्या गोष्टींसाठी नदीच जवळ धावून यायची.कोणीही असो कसाही असो नदीनं कधी भेदभाव नाही केला.वर्षानुवर्षे ती वाहतच आलेली आहे.अजूनही वाहतेच आहे.सर्वांच्या जीवनात इंद्रधनुषी रंग भरतेच आहे.
    पावसाळाभर उन फारसे नसल्यामुळे ओलसर हवेने नरम पडलेल्या कपड्यांना,अंथरूण पांघरूणांना देखील कुबट वास यायचा.पावसाळा थांबला की अशी सर्वांची कपडे धुवायची लगबग सुरु व्हायची की आख्खी नदी बायापोरांनी दूरपर्यंत भरुन जायची.जणू काही नदीपात्राजवळ जत्राच भरलेली असायची.घरातील अंथरुणं-पांघरूणं,गोधड्या-घोंगड्यांसह,गाद्या-उशांच्याखोळा नदीच्या खळाळत्या पाण्यात मांडलेल्या दगडावर अपटू-आपटू धुतल्या जायच्या.घरातल्या पोरांबाळांसह ह्या दिवसात नदीवर भली मोठी गर्दी व्हायची.दोन्हीकडील टोक धरून अंथरूणं, पांघरूणं,गोधडी पाण्यात बुडवून गोल गोल फिरवून पिळायला आम्हाला खूप गंमत वाटायची.घट्टं पिळलेले कपडे नदी जवळच्या वाळूवर,गवतावर वाळत घातले जायचे.रंगीबेरंगी वाळत घातलेले साड्या,लुगडे,गोधडे,चादरी यामुळे नदीच्या भोवताली जणू इंद्रधनुष्याचे रंग पसरायचे. आजही नदी पाहिली की डोळ्यासमोर ते दृश्य उभे राहते की काठावरील वाळूवर वाळत घातलेल्या रंगीबेरंगी कपडयांमुळे नदीचे अवघे रंग इंद्रधनुषी होऊन जायचे.पाहतांना मन हरखून जायचे.आजूबाजूला लव्हाळ्याची हिरवळ पसरलेली असायची. वाहत्या पाण्यासोबत पोरेसोरे खेळायची.नदीचे पाणी तेंव्हा खळखळत असायचे,एवढी घाणही पाण्यात पूर्वी सोडलेली नव्हती.नितळ पाण्यातून तळाला बसलेले शंख, शिपले,वेगवेगळ्या रंगांच्या गारगोट्याही चमकत रहायच्या पाण्याखाली…
    आज मात्र नदी बदलून गेली आहे.नदीचे हे रंग बेरंग होतानां पाहून मनाच्या आनंदणा-या स्मित रेषा पुसट होऊन पांढ-याफट्क होत चालल्या आहेत.पूर्वीचे नदीचे रुप किती मनोहारी असायचे.नदी म्हणजे सौंदर्याची खाण असायची,बालगोपाळांना वात्सल्याने अंगाखांद्यावर मिरवत नेणारे पाणीदार ठाण असायची.प्रत्येकाला तिची जाण असायची नव्हे तीच सर्वांना जीव की प्राण असायची म्हणूनच तर तिच्या मध्ये पूर्वी एवढी घाणही नसायची.लोक नदीमध्ये दिवे पौर्णिमेला नदीची पूजा करुन दिवे सोडायचे.नदीलाच देव मानायचे.अडीपडीला नदीच यायची मदतीला लोकांच्या !
    नदी म्हणजे खरोखर काय असते ! तहानेने व्याकूळ झालेल्या वासराची गाय असते.सुपीक मातीचा घास वाहून आणणारी पिकांची माय असते.मातकट वासाच्या गढूळलेल्या रेंद्यावरची दुधाळ अशी साय असते. कधी संपूर्ण काठ स्वच्छ करणारा उपाय असते.तर कधी पात्रात भरुन संथ होऊन शांतपणे वाहणारा आनंदमयी अभिप्राय असते.
    नदी म्हणजे पसरलेल्या वाळूचा लांबच लांब पट्टा किंवा हिरव्या हिरव्या लव्हाळ्यांनी वेढलेला वट्टा.नदी म्हणजे सरकत्या जिन्यासारखा लांबचलांब वेलबुट्टा किंवा चिंचेला वळसा घालणारा मातीचा कट्टा.नदी म्हणजे तर असतो हिरवाईच्या अंगावर उमटलेला विलक्षण असा चट्टा.थोडा खट्टा थोडा मिठ्ठा !
    नदीच असते जन्म आणि नदीच मृत्यू असते,अख्खे जीवनसुद्धा असते नदीच ! पूर्वी नदीमुळेच तुमच्या आमच्या जीवनाला उतरायला घाट मिळायचे.कधी वाहणारे पाण्याचे पाट मिळायचे,तर कधी नदीला वाहत येणारे फाटे सतराशे साठ येऊन मिळायचे.कुठे रुप नदीचे सपाट असायचे तर कुठे तिचे रुप रौद्र आणि आफाट असायचे.

    डॉ.संतोष सेलूकर,परभणी
    मो.7709515110
    Mail- Santosh.selukar@gmail.com

  • रांगोळी घालताना पाहून – कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

    होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,

    बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;

    तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

    रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

  • माध्यमातील स्त्री

    एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. सतत सजग असावे लागते. कारण या महिला आहेत, यांना काय कळते या पुरुषी मानसिकतेचा त्रास याही क्षेत्रात असतो. थोडक्यात ‘बायकांना काय अक्कल असते?’ या दृष्टीकोनाला या क्षेत्रातही तोंड द्यावे लागते.

  • नोकरीचा अनुभव (नशायात्रा – भाग ४१)

    मला नोकरी लागलीय हे समजल्यावर आई वडिलांना आणि भावाला देखील खूप आनंद झाला होता , आता सगळे सुरळीत होईल अशी आशा पल्लवीत झाली सर्वांची , मी देखील दोन दिवस सर्व मित्रांमध्ये आणि घरात , रुबाबात वावरत होतो , मी त्या वेळी बी .कॉम शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती , अर्थात परीक्षेत मी पास होणार नाही हे मला चांगलेच माहित होते आणि म्हणूनही कदाचित म्हणूनच मी नोकरीबाबत विचार केला असावा , असे आता वाटते आहे .दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या ८ दिवसांच्या प्रशिक्षणाची सर्व तयारी करून मी तयार होतो , कपडे , इतर आवश्यक चीजवस्तू आणि मुख्य म्हणजे माझा सुमारे दोन दिवसांचा ब्राऊन शुगर चा साठा सोबत होताच ...

    आतापर्यंत दोन तीन वेळा टर्की सहन करण्याचा योग आल्याने त्या बाबत थोडीशी भीती कमी झाली होती व जवळ असलेली ब्राऊन शुगर संपल्यावर आपण बाहेरगावी असू त्या वेळी टर्की झाली तरी सहन करू व हे व्यसन कायमचे सुटून जाईल असेही माझ्या मनात होते ( व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनाबद्दल आतून अपराधीपणाची भावना असतेच व व्यसन सुटावे असे त्यालाही वाटत असते पण , सगळे काही आपोआप घडेल असे त्याला वाटत राहते किवा त्या बाबतीत त्याला अति आत्मविश्वास असतो की मी ठरवले की मला व्यसन सोडता येईल आणि म्हणूनच तो उपचारांना नकार देत राहतो ) .

    अकोल्याजवळ मलकापूर येथे आमची उंट बिडीची प्रचार करणारी गाडी जाणार होती आणि मग तिथेच मुक्काम करून ऐक आठवडाभर आसपासच्या गावात दिवसभर प्रचार करणे , तेथील विक्रेत्यांना तयार माल पुरवणे असे काम होते , मी प्रशिक्षणार्थी म्हणून गाडीसोबत जाणार होतो व त्या गाडीचे व्यवस्थापक , गाडीचे नेहमीचे प्रचारक , चालक आणि ऐक मदतनीस असे आम्ही एकूण पाच जण गाडीत होतो , गाडीच्या मागील बाजूस तयार उंट विड्यांची खोकी भरून ठेवलेली होती , गाडीवर वर दोन भोंगे लावलेले होते व गाडीत ऐक इम्प्लीफायर आणि माईक त्या त्या भोंग्यांना जोडलेले होते . आतील प्रचारक जेव्हा गावात शिरे तेव्हा काही बडबडगीते , उंट बिडीची जाहिरात करणारी घोष वाक्ये म्हणत असे व गाडीभोवती लोक गोळा झाले की मग लकी डूॉ घोषित करण्यात येई ...

    म्हणजे गाडीभोवती जमलेल्या लोकांना माहिती सांगितली जाई की प्रत्येकी १ रुपयाला १ बिडी बंडल विकत घ्यावे व ते बंडल फोडून आत ज्या नंबरची चिठ्ठी निघेल ती वस्तू त्याला बक्षिस म्हणून मिळेल , लकी डूॉ साठी खास प्रकारची बिडी बंडल तयार करण्यात आली होती ज्यात १ ते ८ अश्या नंबरच्या चिठ्या टाकलेल्या असत व प्रत्येक नंबर साठी ऐक छोटीशी वस्तू बक्षिस म्हणून मिळत असे यात आठ नंबरला सगळ्यात मोठे बक्षिश म्हणजे प्लास्टिक ची बादली असे ठेवलेले होते तर १ ते सात या नंबर साठी पुठ्याच्या आकर्षक टोप्या , कंगवा , प्लास्टिकची शिट्टी , बॉलपेन ,अश्या किरकोळ वस्तू होत्या गम्मत अशी की या विशेष बनवलेल्या बिडीबंडालामध्ये एकूण आठ नंबर च्या चिठ्या फक्त ५ होत्या , टोप्या , कंगवा , पेन अश्या किरकोळ वस्तूंच्या नंबरच्या चिठ्ठ्या मात्र भरपूर होत्या म्हणजे सर्व आठ दिवसांच्या दौऱ्यात आम्हाला जवळपास २००० विडी बंडल विकायचे होते गाडीभोवती जमलेल्या लोकांना व त्या बदल्यात ५ प्लास्टिक च्या बदल्या आणि इतर किरकोळ बक्षिशे वाटायची होती ...

    या योजनेमागे कल्पना अशी होती की बक्षिसाच्या आशेने लोक बिडी बंडल विकत घेतील त्यांना जर तो ब्रांड आवडला तर बिडीचा खप वाढेल , सुंदर कल्पना होती ही विक्री वाढवण्यासाठी. लोकांच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास असावा ही कल्पना ज्याच्या सुपीक डोक्यातून निघाली होती त्या व्यक्तीचा , लोक एकाद्या वस्तूवर दुसरी वस्तू फुकट किवा भेट म्हणून दिली की खूप खुश होतात मग त्या मूळ वस्तूची त्यांना गरज असो अथवा नसो किवा ती मूळ वस्तू महाग मिळाली तरी त्यांच्या ते लक्षात येत नाही कल्पना होती या योजनेमागे .

    मला प्रशिक्षण देणारे जुने प्रचारक इस्माईलभाई म्हणून ऐक मध्यम वयीन ग्रूहस्थ होते सरळ नाक , गोरेपान, उंच , मोठे स्वच्छ डोळे , आणि हसतमुख असे इस्माईल भाई मला प्रथमदर्शनीच आवडले , ते मितभाषी होते व या गाडीवर सुमारे १० वर्षांपासून ते नोकरी करत होते असे समजले , त्यांनी सर्वात आधी मला गाणी कोणकोणती येतात ते विचारले , मग आवडता गायक कोणता , शिक्षण किती , घरी कोण कोण अशी चौकशी केली व मग म्हणाले ' तुला घर सोडून असे बाहेर राहणे करमेल का ?' या वर मी त्यांना ' नोकरी म्हंटली की हे असे करावेच लागते' असे उत्तर दिल्यावर ते खुश झाले , या गाडीतील लोकांना मला कोणते व्यसन आहे हे मला कळू द्यायचे नव्हते म्हणून मी अगदी सभ्य मुलासारखा वागत होतो त्यांच्याशी . निघताना नाशिक शहरातून गाडी निघून आधी माझ्या घरी आली मला सोबत घेण्यासाठी आणि मग आम्ही मलकापूरच्या दिशेने कुच केले ,

    जेव्हा ती बाहेरून आकर्षक रंग देऊन काढलेले उंटाचे चित्र , वर लावलेले भोंगे , असणारी गाडी आमच्या रेल्वे क्वार्टरच्या दारात आली तेव्हा आसपासच्या मुलांची गर्दी जमली होती , आई वडील त्यावेळी घरीच होते त्यांना तर माझे खूप कौतुक वाटत होते , आईने मला निघताना देवाला नमस्कार करायला सांगितला , मग देवाच्या आणि आई वडिलांच्या पाया पडून मी निघालो .( मी नोकरी करतोय म्हंटल्यावर मला घरून फारशी कटकट न होता पैसे मिळाले होते , माझा सकाळचा डोस मारून झाला होता अर्थात म्हणून मी चांगलाच फ्रेश होतो ) गाडीत बसताना मागे पहिले तर आईचे डोळे भरून आले होते आणि वडील नजरेनेच मला आशीर्वाद देत होते .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

  • व्याघ्र प्रकल्पांच्या बफरझोनमध्ये पर्यटक बंदी आणि समस्यांचे वास्तव सत्य …!

    सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पांच्या केंद्रास्थानाच्या परिसरात (कोअर झोन) पर्यटक बंदी लागू करीत वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे तमाम वन्यजीव प्रेमींना आनंद झाला. पर्यटक बंदीमुळे पर्यटकांची अनौपचारिक देखरेख संपृष्टात आल्याने वनअधिकारी निर्ढावल्यासारखे वागायला लागतील, याचा वारंवार प्रत्यय येतही आहे. बंदी असलेल्या जंगलात वनअधिकारी फिरतात की नाही हे पाहतो कोण ? वाघांच्या शिकारी झाल्यावर त्या इतरांना कळणार नाही, याची काळजी घेण्यात हा विभाग मोठा पटाईत आहे. आणि ते कळल्यास, कश्या प्रकारे नैसर्गिक मृत्यु झाला आहे हे सिद्ध करण्याची किमया हाच विभाग करू शकते. बफर झोन / कोअर झोन हा या वनविभागासाठी कम्फर्टेबल झोन ठरणार आहे.