आजच्या लेखात तुम्हाला तुमची संस्था योग्य त्या प्रकारे काम करत आहे का ? नसल्यास याबाबत तुम्ही हक्काने व्यवस्थापन सदस्यांना प्रश्न विचारू शकता.
२)प्रत्येकाला परमेश्वराने जन्म देताना आपआपला तळहात नि तेवढाच पसा दिला आहे.ज्याच्या त्याच्या ओंजळीत मावेल इतकंच पाणी त्याला पिता येतं.हव्यासापोटी कुणी कितीही ओरबाडून घागरभर पाणी पदरात पडून घेतलं,तरी पसाभर सोडून बाकी सारं वाहून जातं.अखेर जाताना तेवढा पसाभरही काही न्यायचा परवाना नाही .........या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर आपल्याला आपलं नाव का बरं कोरता येऊ नये-----सतत काहीतरी मागणं मागत राहायचं हा माणसाचा स्वभाव त्याला कोठे घेऊन जाणार आहे कोणास ठाऊक....राजा मिडासाचे वशंज म्हणून अघोषित वारसाहक्कानं आपण सारे त्याचा वारसा चालवीत आलो आहोत....आपली गरज कुठे संपते नि हाव कुठे सुरु होते याची दखल घेणं आपणाला संयुक्तिक कधीच वाटत नाही....कारण आपण आपल्या डोळ्यावर माणुसकीच्या कफनाचे कापड ओढून कधीचे झोपेचे सोंग घेतलेले आहे...इथला विसावा काही पळाचा आहे हे माहित असूनही आपण आपल्या नावाच्या फरश्या दिसेल त्या मंदिरात लाऊन अमरत्व प्राप्तीचे ढोंग करीत असतो...त्या ढोंगास बळेच फसून नि हसून आपल्या अंगावर दानशूरपणाची शाल चढवून कोण कसा विश्वस्त म्हणून कसले कर्तव्य पार पाडत राहतो हे एका बालाजीलाच माहित....ज्या समाजात दोन रुपयाच्या लॉटरी तिकिटात झटपट लखोपती बनण्याचे स्वप्न - शासकीय आशीर्वाद घेऊन – खुले आम बाजारात वाटले जाते...त्या समाजात कठोर परिश्रम – नि उचित सबुरी या आळणी प्रसादाला कुणी भुकेला गरजू भिकारी देखील हाक देत नाही...सगळीकडे अवसरवाद बोकाळल्याने सगळ्या नेक शब्दांच्या व्याख्या पार बदलून गेलेल्या आहेत...सगळीकडे वावरताना कुणावर विश्वास ठेवावा नि कुणाच्या हाकेला ओ द्यावी याचा निर्णय न घेता आल्यामुळे काही वेळा सुक्याबरोबर ओलेही जाळले जाते...नि क़्वचित आपल्या हातून नकळत माणुसकीच्या गळ्याला नखही लावले जाते...इथल्या साऱ्या वस्तू माणसांनं माणसाच्या वापरासाठी निर्मिल्या आहेत...हे विसरून आपण त्या वस्तूंना जपण्याच्या (कि ज्यांच्यामुळे आपली छबी चार चौघात उठून दिसते..) नादात आपल्याच माणसांना वापरुन जातो ...प्रसंगी असे निर्णय त्या संमोहित अवस्थेत घेतो कि परत कितीही चुकीचे वाटले तरी ते निर्णय नि त्यांचा झालेला परिणाम आपल्याला नाही उलटून टाकता येत ...तेव्हा पुढच्या प्रवासास निघण्याची आपली सदैव तयारी असली पाहिजे नि तो प्रवास सुखरूप होऊन इच्छीत स्थळी मुक्कामास पोहोचण्यासाठी प्रवासात आपण आपल्या जवळ कमीत कमी ओझं बाळगलं पाहिजे .....१८.०४.२०१३
सरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ‘ ‘ तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ?’ या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..हात थोडे थरथरत होते तरीही नेटाने लिहीत गेलो .. या पूर्वी मी शाळेत आणि इतरही ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हंटल्या होत्या व त्या सगळ्यांन मध्ये देवाला काही ना काही मागितलेले असायचे व बहुधा धन .धान्य समृद्धी ..पुत्र ..सुख अश्या गोष्टी त्यात असत .या प्रार्थनेत मात्र देवाकडे फक्त सहनशक्ती ..धैर्य ..आणि समजूतदारपणा मागितला होता हे जरा विशेष होते
नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं
श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे ।
तत्वऽज्ञाते विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥७॥
आपल्या ठिकाणी उपासनेशी संबंधित कोणतीही पात्रता नाही अशा स्वरूपात पूज्यपाद आचार्यश्री आपल्या अज्ञानाचे भगवंताच्या चरणाशी प्रदर्शन करीत आहेत.
वेगवेगळ्या शास्त्र ग्रंथात उपासनेचे नियम सांगितलेले असतात त्यांना श्रुती प्रतिपादित म्हणजे श्रौत तर स्मृती प्रतिपादित म्हणजे स्मार्त कर्म असे म्हणतात.
आचार्य श्री प्रथम चरणात म्हणतात,
नो शक्यं स्मार्तकर्म प्रतिपदगहनप्रत्यवायाकुलाख्यं - एखाद्या घरंदाज अर्थात परंपरेने युक्त असणाऱ्या पंडितालाच कळावे अशा प्रत्येक पदाच्या कठीण अर्थांनी भरलेल्या स्मार्त कर्माची मला शक्यता नाही. मला त्यांचा अर्थ कळत नाही.
श्रौते वार्ता कथं मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गानुसारे - मग पंडितांच्या वंशपरंपरेत ब्रह्म मार्गानुसार केल्या जाणाऱ्या श्रौत कर्माची तर गोष्टच कुठे? तो तर आणखीन पलीकडचा मार्ग. आणखीनच कठीण.
तत्वऽज्ञाते विचारैः श्रवणमननयोः किं निदिध्यासितव्यं - खूप विचारपूर्वक अर्थात प्रयत्नपूर्वक जरी मी श्रवण मनन केले तरी मला त्या ग्रंथातील तत्त्व अज्ञातच राहते. मग श्रवण मननच शक्य नाही तर पुढील निदिध्यासन कसे जमणार? ते तर असंभव आहे.
श्रवण,मनन आणि निधिध्यासन अशी तीन स्तरीय रचना असते. श्रवण या शब्दाचा अर्थ श्रीगुरुंनी, ग्रंथांनी सांगितलेले यथायोग्य स्वरूपात ऐकणे. मनन शब्दाचा अर्थ आहे त्यावर शांतपणे विचार करून तो विचार सर्वार्थाने अंगीकारणे. तरी निधिध्यासन शब्दाचा अर्थ त्या विचारानुसार आचरण करणे. जर श्रवण मननच नीट झाले नाही तर आचरण होणारच कसे? अशी स्वतःची अगतिकता आचार्य येथे सादर करीत आहेत. वास्तविक ती आपली अवस्था आहे. आपल्याला ती सांगता सुद्धा येत नाही त्यामुळे आपल्या वतीने आचार्य सांगत आहेत.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या शास्त्र अज्ञानरूपी अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. प्रत्येक जण एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आहे. मग एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मागे राहील तर ती तरुणाई कसली ! तरुण पिढीची अनेक नवी नाती याच नव्या सोशल कट्टयांवर खुलतात. हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचं ‘नेटवर्किंग ’ करण्यात जास्त रमलेली दिसते. पण या तरुणांना नाती खरंच किती कळतात हा प्रश्नच आहे.
आजकालच्या तरुणाईचा कुटुंबीयांवर असतो तेवढाच विश्वास फेसबुक, व्हॉट्सअॅप फ्रेंड असणा-या मित्रावर किंवा मैत्रिणीवर असतो, तोही अगदी सहजासहजी बसलेला असतो. त्यांची बहुतेक नाती, मग ते मित्र-मैत्रिणीचं असेल किंवा प्रेमातलं, ही सोशल मीडिया पुरस्कृत असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्यक्ष भेटीला वेळ मिळत नसेल तरीही सोशल कट्टयावर फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्लिकेशन्समुळे ही ऑनलाईन नाती घट्ट केली जातात. त्यांची खबरबात घेतली जाते.
नेहमीच न भेटणा-या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्याचं वचन दिलं जातं. पण वेळेअभावी प्रत्येक वेळेला ‘पुन्हा कधीतरी भेटू’चं आश्वासन देऊन नवीन योजना आखल्या जातात. ओढ वाढत जाते. अशा प्रकारे अनेकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येतं. सगळ्यांशी कनेक्ट राहता येतं. सकाळी गुड मॉर्निगच्या आणि रात्रीच्या गुड नाईटच्या संदेशाशिवाय तरुणाईचा दिवस उजडतही नाही आणि मावळतही नाही.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, व्हायबर इत्यादी हे सध्या ‘कनेक्ट’ राहण्यासाठीचे युवा पिढीचे आघाडीचे साथीदार. त्यांच्यामुळे मित्र-मैत्रिणींचा सतत संपर्कात राहता येतं, शिवाय ग्रुप असेल तर सर्व बित्तंबातम्या इतरांना पोहोचवता येतात. कॉलेजमधल्या प्रेमीयुगुलांसाठी तर हे एक वरदानच आहे.
पण आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाची ही चांगली बाजू किती चांगल्या प्रकारे वापरता येते? ऑनलाईन मैत्रीतले फायदे-तोटे हे सर्वच तरुण-तरुणींना कळतात असं नाही.
सोशल कट्टयामुळे नात्यांमधला गोडवा टिकवताही येतो हे कळणं कधीकधी कठीण व्हावं असेही प्रसंग पाहायला मिळतात. काल एका मैत्रिणीचा फोन आला. ती रडक्या स्वरातच म्हणाली, ‘कामाच्या गडबडीमुळे दिवसभर ऑनलाईन नाही राहता आलं. याचा वेगळाच अर्थ माझ्या मित्राने काढला, त्याला साधी चौकशीही करावीशी वाटली नाही. त्याने सरळ फोन करून सांगितलं की आता तुझा नि माझा काहीच संबंध नाही. तुला माझ्यासाठी वेळ देता येत नाही तर नात्यामध्ये राहायचं तरी कशाला?’
आजकालचं जग जसं प्रत्येक गोष्टीत ऑनलाईन होत जातंय, तसंच नातं टिकवण्यासाठीही ऑनलाईन व्हावं लागेल की काय हा प्रश्न पडतो? हे असं का घडतं तर, प्रत्यक्ष माणसापेक्षा सोशल मीडियावर किंवा तांत्रिक माध्यमांवर जास्त विश्वास ठेवल्यामुळेच. कोणाशीही संपर्क ठेवायचा तर तरुणांची पहिली पसंती असते ती या सोशल कट्टयालाच. मात्र त्यावर अति विसंबून राहू नये हे कळण्याची समज या वयात नसते.
तंत्रज्ञानाचे फायदे असतात तसे तोटेही असतात. यातूनच निर्माण होतात समज-गैरसमज. आता पाहा ना..व्हॉट्सअॅपचंच उदाहरण घेऊ. तिथे तर दर आठवडयाला काही ना काही बदल घडत असतात. नियम बदलत असतात. त्यामुळे आपले मेसेजेस कोण वाचतंय, कोणापर्यंत पोहोचलेत, अशी सर्व माहिती मिळत असते.
सध्या व्हॉट्सअॅपवर मेसेज रिडिंगची निळ्या रंगाची टिक येते याचा अर्थ असा की आपण मेसेज वाचला हे समोरच्याला कळतं. यामुळे झालंय काय तर, आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचलाय हे तर कळतंच; पण तिथून त्वरित कोणताच रिप्लाय नाही आला की समोरच्याच्या मनात आपल्याविषयी आदरच नाही, प्रेमच नाही असा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. यातून अनेक वादविवाद, भांडणे होतात आणि परिणामी नातं कायमचं तुटतं. समोरच्याला समजून घेणं, प्रत्येकाला स्वत:ची स्पेस देणं हेही मैत्रीइतकंच महत्त्वाचं असतं हे तरुण वयाच्या जोशात कळत नाही.
मैत्रीचं नातं कसं टिकवता येईल? त्यासाठी काय करावं? काय नेमकं करू नये? यासंबंधीचेही अनेक संदेश फिरत असतात, परंतु या संदेशांचा वापर फक्त वाचण्यापुरता आणि संदेश दुसरीकडे (फॉरवर्ड)करण्यापलीकडे केलाच जात नाही. नेहमीच्या आयुष्यातही त्या संदेशाप्रमाणे वागता आलं तर नातं डिसकनेक्ट होणारच नाही ना! अणि नातं कनेक्टेड राहावं यासाठी सतत ऑनलाईन राहण्याचीही गरज भासणार नाही.
बी. एससी.च्या शेवटच्या वर्षात अभ्यास करणारा अतुल म्हणतो की, ‘मैत्री काय किंवा कोणतंही नातं काय? एकमेकांविषयी विश्वास असणं महत्त्वाचं असतं. पूर्वीच्या काळी तर साधा फोनही नव्हता. तेव्हा मैत्री टिकत नव्हती का? त्यावेळेस कुठे कोण सारखे ऑनलाईन कनेक्टेड असायचे? मनापासून एखाद्याची आठवण येऊन भेटणं हेच महत्त्वाचं होतं.’
अतुलचं हे म्हणणं १०० टक्के खरं आहे. बी. सी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली पूजा म्हणते, ‘एकमेकांविषयी खडान् खडा माहिती ठेवायच्या नादात आपण समोरच्याचं स्वत:चं असं काहीतरी वेगळं आयुष्य असू शकेल हे विसरुन जातो. तिच्या किंवा त्याच्याशी सतत कनेक्ट राहताना त्यांचंही काहीतरी स्वतंत्र जगणं असतं हे विसरून कसं चालेल?’ आजकालच्या तरुण-तरुणींसाठी नात्यांचा चेहरा हा सोशल कट्टयापुरताच मर्यादित असतो. सतत कनेक्टेड राहण्याच्या नादात तरुण पिढीला नात्यांचा खरा चेहरा कळणं शक्य होत नाही.
ग्रुपमधल्या एकीने फेसबुकवर तिच्या एका लहानपणीच्या मित्राचा फोटो लाईक केला म्हणून तिच्या प्रियकराने तिला तिचं फेसबुक प्रोफाईलच बंद करायला भाग पाडलं. आता याच्यातून काय निष्पन्न झालं? गमतीची गोष्ट ही की त्यांची ओळखही याच फेसबुकमुळे झालेली. नात्यांमध्ये विश्वास असला की ते जास्त काळ टिकतं, त्यासाठी प्रोफाईल बंद करायची गरज नसते.
व्हॉट्सअॅपचा लास्ट सिन स्टेट्स बघून प्रेम ठरवणारी आजची तरुण पिढी किती तकलादू नातं बनवण्याचा प्रयत्न करतेय! एकमेकांशी कनेक्ट राहायच्या नादात समोरच्यालाही काहीतरी स्वतंत्र अस्तित्व असतं, जीवन असतं हे पार विसरून जातो. कुठे आहेस? काय करतेस/करतोस? कोणासोबत आहेस? असे फालतू, खासगीपणावर आक्रमण करणारे प्रश्न सर्रास विचारले जातात. तेव्हा विचार येतो हे नातं म्हणजे प्रेमाचे बंध आहेत की बंधनं? अविश्वासाच्या फे-यात एकमेकांना जीव घुसमटून जाईपर्यंत गुंतवायचं की विश्वासानं केलेल्या प्रेमाचा लगाम सैल सोडायचा हे आपलं आपण ठरवायचं. पूर्वीच्या काळी कितीही लांब असले तरी नात्यांमध्ये रुसवे-फुगवे असायचे; पण अविश्वास नसायचा.
‘रोज आठवण न यावी असे होत नाही..रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही. मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात.. आणि तुला याची खात्री आहे याला मैत्री म्हणतात.’, हा एक सुंदर संदेश व्हॉट्सअॅपवर सध्या प्रचंड फिरतोय. फक्त वाचण्यापुरता आणि पुढे पाठवण्यापुरता (फॉरवर्ड) याचा वापर करण्यापेक्षा ते समजून घेतलं पाहिजे. तरच आयुष्याची खरी गंमत कळेल. तरुणाईसाठी आजकाल नाती या सोशल नेटवर्किंग साईटवरच जास्त खुलतात आणि अतिरेक झाला की समोरच्याला ब्लॉक करून ती संपतातही.
लास्ट सीन काय किंवा रिडिंग टिक काय, या गोष्टी एकमेकांविषयी असलेलं प्रेम, आपुलकी सिद्ध करू शकत नाही. संभाषण होणं गरजेचं असतं. ते भेटून जास्त उत्तम प्रकारे होतं. सततच्या आभासी संपर्कामुळे समोरच्याविषयीची ओढ कमी होते. म्हणूनच एक दिवस सोशल नेटवर्किंग साईटसाठी उपवास धारण करा.
आवडणा-या नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींची आपसुकच आठवण येईल. या ऑफलाईन स्टेटसमुळे संपर्क काही काळ तुटेल; पण मनातून निर्माण झालेली भावना मैत्रीचं नातं घट्ट करेल. मैत्रीच्या नात्यातली आपुलकी आणि जिव्हाळ्याचा खरा अर्थ तेव्हा कळेल. ‘शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण.. सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण.. काढशील आठवण जेव्हा माझी अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.’ ही ओळ नात्यांमधील जिव्हाळ्याचं ख-या अर्थानं वर्णन करते.
-- स्नेहा कोलते
प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू……..
लालबागचा राजा मंडळाच्या अब्जावधी रुपयांच्या कथित
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश
नवसाला पावतो’ अशी खोटी माहिती
देऊन केली लाखो भाविकांची फसवणूक
*राज्यपालांच्या निर्देशानंतर लालबागचा राजा मंडळाची अखेर चौकशी सुरू
*धर्मादाय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे विधी खात्याचे निर्देश
*दानपेट्या व सुवर्णालंकार ताब्यात घेण्याची केली मागणी
*साळवी यांची ‘ईडी’मार्फतही चौकशीची मागणी
कर्नाळा : उन्मेष गुजराथी
twitter.com/unmeshgujarathi
नामांकित प्रसारमाध्यमांशी ‘अर्थपूर्ण संबंध जोपासून’ नवसाला पावणारा लालबागचा राजा, अशी वारंवार चक्क खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन लाखो भाविकांना गंडा घालणार्या मंडळाची त्वरीत चौकशी करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.
मंडळाचे तब्बल सलग 16 वर्षे मानद सचिवपद सुधीर साळवीकडे आहे. त्यांच्याकडे अलिशान गाड्या, फ्लॅट्स, फॉर्म हाऊसेस, रोकड रक्कम अशा जवळपास अब्जावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आहे. याची त्वरीत चौकशी करण्याची मागणीही ‘इडी’कडे करण्यात आली आहे.
मंडळाचा कथित भ्रष्ट कारभार वेंगुर्लेकरांनी उघडकीस आणला. त्यांच्या तक्रारीची दखल राज्यपालांनी घेतली व त्याचे पत्र 31 ऑगस्ट 2015 रोजी विधी व न्याय विभागाकडे पाठवले होते. त्यानंतर या खात्याने धर्मादाय आयुक्तांना चौकशी अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तब्बल एक वर्षांनी ‘देर आये पर दुरुस्त आये’ या उक्तीप्रमाणे आयुक्तांनी अखेर वेंगुर्लेकरांचा जबाब 29 ऑगस्ट 2016 रोजी नोंदवून घेतला. त्यानंतर मंडळाच्या चौकशीसंबंधीची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली.
सुधीर साळवी व त्रांच्रा कार्रकारणीतील सर्वांनी अब्जावधी रुपरांची मारा जमविली असून, त्यांची पदावरून त्वरीत हकालपट्टी करण्रात रावी अशी रोखठोख मागणी वेंगुर्लेकरांनी केली आहे.
राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी वेंगुर्लेकरांचा 29 ऑगस्ट 2016 रोजी जबाब नोंदवून घेतला. त्यातही वेंगुर्लेकरांनी त्यांच्या मूळ तक्रारीतील 19 मुद्यांचा सामावेश केला. हा जबाब शपथपत्रावर घेण्यात आला. त्यात त्यांनी सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवातही आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या दानपेट्या आणि अर्पण करण्यात येणारे सुवर्णालंकार ताब्यात घ्यावे, अशीही मागणी केली आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी आता मंडळाची चौकशी या 19 मुद्यांच्या आधारे सुरू केली आहे.
काळे धन मिळवण्यासाठी मंडळाने केला घुबडाचा वापर
* यंदाच्या वर्षी मंडळाने गणपतीच्या मूर्तीमागे घुबडाची प्रतिकृती साकारली आहे. घुबड अपशकुनी असल्याने मंडळाच्या पदाधिकार्यांना आता गणेशभक्तांच्या प्रचंड जनक्षोला सामोरे जावे लागत आहे. तरीही मंडळाच्या पदाधिकार्यांनी या लोकभावनेला काडीची किंमत दिली नाही. मंडळाच्या पदाधिकार्यांनी घुबड अपशकुनी असते हा गैरसमज असून ते लक्ष्मीचे वाहन आहे, असा अजब युक्तीवाद केला आहे.
* धर्मशास्त्रातील अधिकारी व्यक्तींनी मात्र हा दावा खोडला आहे. मुळामध्ये मंडळाच्या पदाधिकार्यांनी हा खोडसाळपणा केला आहे, असेच त्यांचे मत आहे. श्रीगणेश ही शुद्ध सात्विक आणि बुद्धीची देवता आहे. त्याचे वाहन मूषक आहे. जर मंडळाच्या पदाधिकार्यांचा घुबड लक्ष्मीचे वाहन असल्याचा दावा असेल, तर हे वाहन श्रीगणेशाच्या मूर्तीमागे असणेच चुकीचे आहे. मुळात लक्ष्मी ही चंचल आणि माया समजली जाते. तिचा संबंध श्रीगणेशाशी लावणे हा देवतेचा अवमान आहेच, त्याचबरोबर त्या मूर्तीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्या चुकीच्या लहरींनी लाखो गणेशभक्तांचे नुकसानच होणार आहे.
* घुबडाच्या प्रतिकृती विचित्र आणि भयावह आहे, हे शेंबडे पोरही सांगते. स्पंदनशास्त्रानुसार अयोग्य स्पंदनांमुळे वातावरणातील सात्विकता लोप पावते. मंडळाला सजावटीसाठी अन्य पर्यायही उपयोगात आणता आले असते, मात्र मंडळाने हा विचित्र पर्याय निवडला आहे.
* तांत्रिक विद्येमध्ये घुबडाला महत्त्व आहे. अघोरी विद्येच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडला जातो, त्यासाठी घुबडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशाच प्रकारे काळेधन मिळवण्यासाठी मंडळाने घुबडाचा वापर केला असावा, असा आरोप वेंगुर्लेकर यांनी केला आहे.
गणेशभक्तांच्या पैशाची अशी होतेय उधळपट्टी!
* मंडळाकडून रोषणाई व मंडपासाठी निविदा काढल्या जातात. त्या निविदा खोट्या असतात; कारण एकाच ठेकेदाराला हे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले जाते.
* मंडळ महापालिकेकडून 25 टक्के परवानगी घेते व 100 टक्के बांधकाम करते. रस्त्यावर
येण्या-जाण्यासाठी मंडपाचा अडथळा येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहे, मात्र हे मंडप सर्रास न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करते. शासन याकडे दुर्लक्ष करते, एकाच मंडळाचे एवढे लाड का पुरवले जातात?
* रुग्ण सहाय्यनिधीतून मंडळाच्या पदाधिकार्यांना व रहिवाशांना 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते, मात्र जे गणेशभक्त मंडळाच्या दानपेट्या भरतात, त्यांना मात्र 5 ते 25 हजार रुपये दिले जातात, याचीही चौकशी शासनाने करावी.
* मंडळाचे महाराष्ट्र बँक, महानगर को-ऑप. बँक, एचडीएफसी या तीन बँकेत खाते आहे. या सर्व बँकांमधील मंडळाच्या मागील 10 वर्षांचा लेखाजोखा तपासावा, त्याची चौकशी करावी.
* मंडळाची स्थानिक रहिवाशांची मिळून 34 हजार रुपये वर्गणी जमते; मात्र बक्षीस समारंभात रहिवाशांसाठी 40 लाख ते 50 लाख रुपये खर्च केला जातो, याचीही चौकशी करावी.
* मंडळाच्या विरोधात जो आवाज उठवतो, त्याच्याविरोधात मानहानी, अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जातो. त्यासाठी वकिलांची फौज उभी केली जाते. त्याकरता जनतेचे लाखो रुपये उधळले जातात. त्याची धर्मादाय कार्यालयाकडून परवानगी घेतली जात नाही.
‘त्या’ 19 मुद्यांवर धर्मादाय आयुक्त करणार मंडळाची चौकशी
* लालबागचा राजा मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात यावा.
* सुधीर साळवी गेली 16 वर्षे मानद सचिव या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.
* सर्व खर्च करण्याचे (1 ते 50 कोटी खर्च) अधिकार साळवी यांना कोणत्या प्रशासनाने दिले?
* लालबागचा राजा मंडळामध्ये ज्यांनी पद भुषविले आहे. या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या दागदागिन्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच संपत्तीची चौकशी करण्यात यावी.
* लालबागचा राजा गणेशोत्सवादरम्यान स्थानिक रहिवाशांना ओळखपत्र दिले जाते. यापूर्वी पाकीटमार, साखळी चोर, मोबाईल चोर पोलिसांनी पकडले. यावर काळाचौकी पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंद केला नाही. मंडळाच्या ओळखपत्राचा दुरुपयोग अतिरेकीदेखील करू शकतात. याबाबत मंडळाचे सचिव यांना योग्य त्या सूचना देऊन त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घ्यावा.
* मंडळाची सन 2011 मध्ये विसर्जन संपल्यानंतर दानपेटी चोरीला गेली होती. त्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. तसेच स्थानिक पोलीसांनी त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. दानपेटी चोरीला गेल्यासंदर्भात मंडळाचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासावेत. तसेच या खालील संशयित लोकांची चौकशी करावी.
* अशोक पवार (बी विंग, लालबाग राजा सोसायटी)
* संजय धुमक (जी विंग, लालबाग राजा सोसायटी)
* सुगत पेडेंलकर (एफ विंग, लालबाग राजा सोसायटी)
* राजेंद्र हळदणकर (58 टेनामेंट, पेरू कंपाऊंड)
* लालबागचा राजा मंडळाकडून घेण्यात येणार्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती शपथपत्र किंवा करारनामावर घेतल्या जात नाही, याची चौकशी करावी.
* मंडळाकडून दिला जाणारा रुग्ण सहाय्यनिधी याचे लेखी रेकॉर्ड ठेवलेले नाही. या निधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत कसून चौकशी करावी, तसेच स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती योजनेमध्येही अशाच प्रकारचा कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत देखील मंडळाचीे चौकशी करावी.
* मंडळाकडून करण्यात येणारी अरेरावी व दादागिरी यास आळा घालावा. याबाबत मंडळाकडून शपथपत्र घ्यावे.
* लालबागच्या राजास जे भाविक सोन्या चांदीचे अलंकार दान करतात त्याचे वजन व संख्या याची माहिती जाहीर करावी.
* मंडळाकडून किती खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात व त्यावर किती खर्च केला जातो, याची माहिती घेण्यात यावी. तसेच खासगी सुरक्षारक्षकांचे नाव, पत्ते, संपर्क क्रमांक अशी माहिती स्थानिक पोलिसांकडे मंडळाने दिली पाहिजे.
* मंडळाकडून देण्यात येणार्या ओळखपत्रांची यादी गांभीर्याने पोलीस ठाण्याकडे असावी.
* लोकसत्ता गेट, मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. तेथे मंडळाचे कार्यकर्ते पैसे घेऊन भाविकांना दर्शनासाठी गैरमार्गाने सोडतात. असा प्रकार घडू नये, म्हणून या ठिकाणी योग्य ते अधिकारी व अंमलदार नेमून गैरप्रकारे दर्शन होणार नाही. याची दक्षता घ्यावी. या गेटच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मंडळाचे ओळखपत्र लावून अतिरेकी प्रवेश मिळवून घातपात घडवू शकतात, असा प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी.
मंडळाकडूनच धोका
लालबागचा राजा मंडळाकडून आपल्या जिवाला धोका आहे; म्हणून वेंगुर्लेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस कमिशनर यांच्याकडे संरक्षण पुरवण्याची मागणी केली. त्यावर काळाचौकी पोलीसांनी 27 ऑगस्ट रोजी वेंगुर्लेकरांना बोलावून घेतले. तेथे पोलीस निरीक्षकांनी ‘तुम्ही मंडळाच्या विरोधात तक्रारी करणे बंद करा, अन्यथा तुम्हाला कलम 151 (3) नुसार अटक करू’, अशी थेट धमकीच दिली. पोलिसांचे हे कृत्य लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे, याविरोधात त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
फंडे मार्केटींगचे
* कधी ‘राजा’चे ‘मुखदर्शन’, ‘पायाचे दर्शन’, तर कधी ‘पहिले दर्शन’ अशा विविध मार्केटिंगच्या युक्त्या मंडळाने वापरल्या. या युक्त्यांच्या प्रसिद्धीसाठी मिडीयातील मंडळींना भरमसाठ पैसे देण्यात आले. ‘लालबागचा राजा नवसाला पावतो’ अशी चक्क खोटी माहिती मंडळाच्या पदाधिकार्यांनी मिडियाला दिली. त्यासाठी रिपोर्टरपासून ते थेट संपादक-मालकांनाही मॅनेज करण्यात आले. हे सर्व मॅनेज करताना थेट ‘पेड न्यूज’चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला, असा आरोप वेंगुर्लेकर यांनी केला आहे. त्याचा योग्य हिशोब अद्यापही देण्यात आलेला नाही.
* ‘लालबागचा राजा’ ‘नवसाला कसा पावतो’ अशा चक्क खोट्या केस स्टडीज तयार करून त्या सोशल मिडीया, प्रसारमाध्यमांतून दाखवण्यात आल्या. ‘जेवढी मंडळाची प्रसिद्धी अधिक; तेवढा ‘गल्ला’ अधिक’, हे मार्केटिंगचे साधे सोपे सूत्र येथे वापरण्यात आले. अर्थात यासाठी प्रसारमाध्यमांना लाखो रुपयांचे पॅकेजेस देण्यात आली.
* आजमितीस मुंबापुरीत 11 हजार 856 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असताना, केवळ लालबागच्या राजालाच प्रतिष्ठीत मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रथम पानावरच का पसंती दिली जाते, यामागे प्रचंड ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.
* मराठी, हिंदीतील नामांकीत चॅनेल्सवर ‘राजा’चे लाईव्ह दर्शन दाखवले आहे व त्यावर ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ अशी चक्क खोटी जाहिरात बातमीस्वरूपात दाखवण्यात येते. यासाठी या चॅनेल्सना लाखो रुपये देण्यात येतात. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ विकला गेल्याचेही यावरून दिसून येते.
* मिडीयाला मोठ्या प्रमाणात पॅकेज दिल्यामुळे दर्शनाच्या नावाखाली राजकीय पुढारी व सेलेब्रिटीही येत असतात. सेलेब्रिटी असतात म्हणून मिडीयाही येतो. हे सर्व दृष्टचक्र थांबायला हवे.
* मंडळातील अब्जावधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी रान उठवणार्या समाजसेवक महेश वेंगुर्लेकर व पत्रकार उन्मेष गुजराथी यांच्यावर 10 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्यात आला. हा दावा ठोकण्यासाठी मोठ्या वकिलांची फौज तैनात करण्यात आली. या वकिलांना द्यावी लागणारी भरमसाठ रक्कम ही भाविकांच्या खिशातूनच घेण्यात आली. या गलेलठ्ठ पैशाची वकिलांवर उधळण करण्याकरता धर्मादाय आयुक्तांची परवानगीही घेण्यात आली नाही, असे आरटीआयच्या कागदपत्रांतून उघडकीस आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप इनकर यांनी दिली. याबाबत प्रतिक्रियेसाठी मंडळाचे सचिव साळवी यांना संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल न उचलणे पसंत केले.
पदाधिकार्यांनी दिल्या होत्या धमक्या
* प्रसारमाध्यमांना ‘पेड न्यूज’ देऊन मंडळाचे मोठ्या प्रमाणावर मार्केटींग करणार्या मंडळाच्या पदाधिकार्यांचे भ्रष्ट कारनामे ज्येष्ठ समाजसेवक महेश वेंगुर्लेकर यांनी उघडकीस आणले. इतकेच नव्हे, तर मंडळाचे पदाधिकारी व मग्रूर कार्यकर्ते यांच्या कारनाम्यांची माहितीही आरटीआयमधून वेंगुर्लेकर यांनी उघडकीस आणली. त्यामुळे धास्तावलेल्या पदाधिकार्यांनी त्यांंना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या, तशा तक्रारीही त्यांनी पोलिसांकडे केल्या आहेत.
अधिक माहितीसाठी:
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/946049492121059/?type=3&theater
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/943738805685461/?type=3&theater
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/953252414734100/?type=3&theater
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/photos/a.401490189910328.88584.392179184174762/956548571071151/?type=3&theater
Unmesh Gujarathi
Mobile-09322 755 098
www.unmeshgujarathi.com
twitter.com/unmeshgujarathi
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/
सदया देशभर गाजत असनार्या अनेक घटनांमुळे युवकांना एक आवाहन
Copyright © 2025 | Marathisrushti