(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • विश्वविजयी संन्यासी

    त्या व्याख्यानाच्या दिवशी स्वामीजी व्यासपीठावर आले आणि त्यांनी आत्मविश्वासपूर्ण बोललेल्या माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका या पहिल्याच वाक्याने संपूर्ण सभागृहातील लोकांना भारावून टाकले.

  • ज्योतिषविषयक टिप्स – भाग २

    ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्‍या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा....


    सप्तम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत सप्तम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - पोवळे धारण करणे.
    २ - खोटे बोलु नका.
    ३ - नोकरांना खुश ठेवा.
    ४ - गणपतीची उपासना करा.

    अष्टम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत अष्टम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - गणपतीची उपासना करणे.
    २ - मसुरडाळ मंदिरात दान करणे.
    ३ - विधवा स्त्री ला मदत करणे.व तिचा आशिर्वाद घेणे.
    ४ - चांदीची अंगठी बोटात घालणे.

    नवम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत नवंम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवणे.
    २ - मंगळवारी मारुतीला शेंदुर लावणे.
    ३ - काळभैरवाची उपासना करणे.
    ४ - विधवा स्त्रिला मदत करणे.

    दशम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत दशम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - सोने विकु नये
    २ - अपंग व्यक्तीला मदत करावी.
    ३ - घरात दुध उतु जाऊन देवु नये.
    ४ - निपुत्रीकाची सेवा करा

    अकराव्या स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत अकराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय

    १ - पांढरा कुत्रा घरात पाळा.
    २ - गणपतिची उपासना करा.
    ३ - वडिलोपार्जीत इस्टेट विकु नये.
    ४ - रुग्णांना मदत करा.

    बाराव्या स्थानातील मंगळ. - ज्यांच्या पत्रिकेत बाराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - सकाळी उठल्यावर मध खाणे.
    २ - पक्षांना धान्य घालणे
    ३ - १५ दिवस सलग सव्वाई गुळ पाण्यात प्रवाहित करणे.

    सौ. निलीमा प्रधान

  • वणवा खरच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही

    यावर प्रतिक्रिया अवश्य द्या आणि त्याच बरोबर पर्यायी शब्द भांडार कसे वाढेल या करता ठोस यंत्रणा उभी करावी लागेल.तरच मराठीला भविष्य आहे.

    धर्म ही अफूची गोळी आहे हे सत्य मानलं तर मालिका या अधिक प्रभावी अफूच्या गोळ्या म्हणाव्या लागतील.

  • प्रदूषण (९)- कैन्सर ट्रेन

    शेतात टाकले
    विषाक्त रसायने
    तिकीट कैंसर ट्रेनचे
    एडवान्स काढले.

    टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात. बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडा येथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.

  • वोह सुबह कभी (जल्दी) तो आयेगी!

    कोरोनामुळे जशी जगाची घडी विस्कटली, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाचीही अवस्था आहे. त्यामुळे जशी नवी आर्थिक घडी बसवावी लागेल, तशीच नवी व सुधारित राजकीय व्यवस्थाही उभी करावी लागेल. आशा इतकीच बाळगूया की, 2024 पर्यंत सकाळ नक्कीच उगवेल. येणाऱया नव्या प्रकाशाची कोवळी व आश्वासक किरणे या अस्थैर्याचा नायनाट करून नवे शाश्वत जग आपल्याला दाखवेल!

  • टिकवाल तर टिकेल

    डिसेंबर महिन्यात शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जसे जमेल तसे हा दिवस साजरा केला जातो. खर तर जमेल तसे नाही तर जमवूनच आणतात. कुणी सिनेमा. कुणी नाटक. कुणी सहलीला. कुणी कुठे कुणी कुठे रमतात. तर काही ठिकाणी सोसायटीचे सगळेच घरातील एकत्र येऊन नाच गाणी खेळ गप्पा आणि नंतर जेवण किंवा अल्पोपाहार.

  • अमृततुल्य मैत्री

    पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर्‍्या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला.

  • भूलेंबिसरे गीत

    आज गावत मन मेरो झूम के या गाण्याबद्दल मी काय लिहू ? पं डी वी पलुस्कर आणि उस्ताद आमिर खाँ - दिग्गज गायक. हे गाणं म्हणजे बैजू आणि तानसेन ह्यांच्यातील जुगलबंदी!!! आणि ही जुगलबंदी बैजूने जिंकलेली दाखवायची.

    या चित्रपटात संगीत नौशादसाहेबांचं आणि गाणं मोहम्मद रफ़ी आणि उस्ताद आमिर खाँ यांच्याकडून गाऊन घ्यायचं निश्चित झालं. बैजूनं तानसेनवर मात केलेली दाखवणे म्हणजे रफ़ीसाहेबांनी खाँसाहेबांवर मात केलेली दाखवणे हे रफ़ीसाहेबांना मान्य नव्हते. त्याला कारण म्हणजे खाँसाहेबांबद्द्ल मोहम्मद रफ़ी यांना असलेला आदर, आणि म्हणून त्यांनी हे गाणं गाण्यास नकार दिला. एखाद्याबद्द्ल आदर असणे म्हणजे काय याचं अप्रतिम उदाहरण!!

    याच आदराचा मान ठेवत खाँसाहेबांनी पं पलुस्करांचं नाव सुचवलं, त्यांच्याकडून या गाण्यात हार पत्करण्यात खाँसाहेबांना आनंदच वाटला आणि ह्यातून श्वास रोखून धरणारी जुगलबंदी रसिकांसमोर आली.

    गाणे : आज गावत मन मेरो झूम के
    चित्रपट : बैजू बावरा
    संगीतकार : नौशाद अली
    गीतकार : शकील बदायुनी
    गायक : पं डी वी पलुस्कर, उस्ताद आमिर खाँ

    आज गावत मन मेरो
    झूम के तोरी तान भगवान
    आज गावत मन मेरो ...

    हार गया तो जीवन जावे
    जीता गायक दुनिया पावे
    रखियो अब मोरी शान रे
    आज गावत मन मेरो ...

    प्रेम के कारण प्रेमी गावे
    तानों से बादल पिघरावे
    जगत में रहे मान रे
    आज गावत मन मेरो ...

    सात सुरों के मधुर मिलन में
    जादू आज जगा दें
    बैजू के संगीत विधाता
    जल में आग लगा दें
    जल में आग लगा दें
    आ~
    आज गावत मन मेरो ...

    संग्राहक आणि संकलक:- प्रफुल्ल गायकवाड

  • “जोखीम”

    आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता.

  • भाषा आणि आपण

    एका तरूणीला दुसर्‍या एका तरूणीशी संवाद साधयचा होता. तिने मागचा पुढचा विचार न करता तिला प्रश्न केला ‘आर यू मराठी ऑर हिंदी ? ती मराठी अस उत्तर देताचा हिने तिच्याशी चक्क मराठी बोलायला सुरूवात केली.