कसय....
आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना.....
लगेचच बरळतील.,,
"आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही....
नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता....."
आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना...
मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात......
"चालतय हो..... दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच...
आपण घाई केल्यास देश पुढे जाणार आहे का?"..
असतात अशीही लोक.....
घ्या सांभाळुन ......
विवेक जोशी...
“मामाचं गाव” “आजोळ” अशी नावं रिसॉर्टला दिली म्हणजे एक विशिष्ट, टिपीकल ग्राहकवर्ग हुकमी आकर्षित होतोच होतो...कोकण किंवा विदर्भ-खानदेशातील गावं सोडून जमाना झालेली, मुंबई-पुण्यात सेटल झालेली, वीकऐंडला हाफपॅन्ट घालून फिरणारी मंडळी...आपल्या मुलांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्या अनुभवाच्या जवळपास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, तुटलेल्या नात्यांचे धागे जोडण्यासाठी धडपडणारी अशी ही निरागस मंडळी असतात...अशा रिसॉर्टवर जाण्यासाठी हजारो रुपये भरुन बुकींग करतात...
तिथे गेल्यावर शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसतात, धाप लागली तरी विहीरीचं पाणी शेंदतात...श्वास वरखाली झाला तरी “तुला सांगतो अश्विनी, आमच्या लहानपणी माणगावला मामाकडे गेलो की मी दहा दहा बादल्या पाणी काढायचो विहीरीतून” असं सांगत असतो. चि.अश्विनी मात्र How to fetch water from well? चा व्हिडीओ युट्यूबवर शोधत असते.
सकाळी मऊभात-तूप-मेतकुट खाताना त्याला त्याची अलिबागची इंदूमावशी आठवत असते. तिच्या हातच्या मऊभात मेतकुटाची चव तो इथे शोधण्याचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघतो..ब्रेकफास्टला पास्ता नसल्याने किंचित नाराज झालेलं त्याचं पोरगं, बापाला बरं वाटावं म्हणून मनाविरुध्द मऊभात गिळत असतं.
इको-टुरिझमच्या अद्ययावत गोठ्यातल्या देशी गायी बघून त्याला बाबूकाकांचा जुना गोठा आठवतो, गायीच्या मानेची पोवळी खाजवत तो पोरांना बाबूकाकांची “यमुना” गाय त्याकाळी पाच शेर दूध कशी द्यायची हे आठवून सांगतो. पोरं शेणामुताच्या वासाने गुदमरत उसने हास्य आणून माना डोलवत असतात.
दुपारी कॉटेजमधे चटई टाकून तो पडतो आणि शहरात आयुष्य घालवलेल्या बायकोला जुन्या आठवणी सांगत बसतो. ती जांभया देत ऐकत बसते..
इथला सूर्यास्त त्याला चौल रेवदंड्याची आठवण करुन देतो. नानाकाकांनी अशाच एका सूर्यास्ताच्या वेळी “समुद्राला रत्नाकर का म्हणतात?”ती त्याला ऐकवलेली गोष्ट मुलांना चौथ्यांदा सांगतो....
सकाळी निघताना याचा पाय तसा निघत नसतो आणि मुलं बॅगा भरत असतात. त्याच्या नकळत त्याच्या बायकोला…“ममा नेक्स्ट टाईम अॅटलिस्ट मेघालय किंवा उटी तरी बघ हं...प्लीज” असं मुलीने बजावलेलं असतं.
“कसं वाटलं मामाचं गाव?” या त्याच्या प्रश्नावर मुलं अबोलपणे मान डोलावतात...तो खुशीत येउन गाडी रिसॉर्टबाहेर काढून मार्गस्थ होतो... कारण, खरंतर मुलांपेक्षा त्यालाच गरज असते आजोळची, मामाच्या गावाची...त्याच्या मुलांना मामाचं गाव म्हणजे त्याचा हिरानंदानी मधला फ्लॅट इतकंच माहिती असतं. त्यांच्या अनुभवविश्वाच्या टप्प्यात तेच असतं... पण यालाच खरी गरज असते जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...काळाच्या ओघात तुटलेले सांधे कृत्रिम वंगण घालून जोडता येतायत का ते बघण्याची...भुतकाळात गेलेलं मन साधारण कोपरखैरणे आलं की वर्तमानात येतं..उद्याचं प्रेझेंटेशन डोळ्यासमोर नाचू लागतं. HR चे ईमेल्स, परवाची VP सोबतची मिटींग...आणि एक निरागस मुल पुन्हा डांबरटपणाचा बुरखा घेऊ लागतं...
लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो.
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फुट खोल आहे.
लोकशाहीत कोणतीही सरकार निरंकुश असूच शकत नाही.लोकशाहीत जनता सर्व शक्तिमान असून सत्ताधारी जनतेचे नोकर आहेत. जो विनावेतन व आपल्या घरावर तुळसीपत्र ठेवून जनसेवा करत असेल, त्यालाच जनतेचा नेता म्हणता येऊ शकते ! अन्यथा सर्व नोकर आहेत. संसदेला विशेषाधिकार असले तरी जनतेपेक्षा जास्त नाहीत, हे कसे विसरता येईल ? सत्तेच्या नशेत काहीही वक्तव्य करणे कायदेशीर आहे काय ? सत्ताधाऱ्यांनी जेव्हा-जेव्हा निरंकुश बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले, हा इतिहास सांगण्याची गरज नाही.
शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच!
सर्व भारतीय उत्सवात नवरात्री हा महत्वाचा आहे . नव ( नऊ ) रात्री हा उत्सव साजरा केला जातो . खरे तर नवरात्र वर्षातुन पाच वेळा येते पण फक्त दोनच महत्वाचे मानले जाते १) वसंत नवरात्र २) शरद नवरात्र .
युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका,विमाने, बॉम्बस्,गडगडाट, परीसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे वगैरे डोळ्या समोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलटरी बॅन्ड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपीत करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरूण सामिल झाला होता. इराक मधल्या बगदाद शहरात रायबहादूर चुन्नीलाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या या तरूणाने बालपणाचा पाच वर्षांचा काळ बगदादमध्येच घालवला होता. १९३२ मध्ये रायबहादूर चुन्नीलाल मुंबईत आले व नंतर सिनेमा व्यवसायतील एक मोठे प्रस्थ बनले. बॉम्बे टॉकीज व फिल्मीस्तान या त्याकाळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मितीच्या संस्थेत भागीदार झाले. तो तरूण सैन्यात दाखल झाला खरा पण त्या वातावरणात त्याचे मन रमेना. बंदुकीच्या गोळ्या वा मशिनगन्सचे आवाज त्यांच्या कानावर जेव्हा पडत तेव्हा त्याच्या मनात खोल कुठेतरी सतारीच्या तारा झंकारत….अलवार स्वरांचे सूर खुणावत…शेवटी १९४६ मध्ये त्या तरूणाने सैन्यातील नोकरीला बाय बाय केले आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काही तरी करावे म्हणून मुंबईला आला.
सुदैवाने येथे त्यानां ऑल इंडिया रेडिओत नोकरी मिळाली आणि येथूनच मदनमोहन कोहली या तरूणाचा संगीतकार मदनमोहन असा प्रवास सुरू झाला. ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांची गाठ पडली संगीतातील दोन महान दिग्गजांशी. पहिले शहनाई नवाज उस्ताद बिस्मिला खान व दुसरे उस्ताद फैय्याज खान यांच्याशी. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील या रेडिओ स्टेशनवर कामाला होते. स्वत: मदन मोहन यांनी रूढर्थाने संगीताचे असे शिक्षण घेतले नव्हते मात्र या नोकरीच्या वास्तव्यात त्यांना या दोन दिग्गजाकडून संगीतातले मर्म आत्मसात केले. मदनमोहन यानां चित्रपटात संधी मिळाली ती मास्टर गुलाम हैदर या संगीतकारामुळे. मात्र संगीत दिग्दर्शनाची नाही तर गाणे गायनाची. ‘शाहीन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी चक्क लताजी बरोबर ही दोन गाणी गायली. पूढे १९५० मध्ये मात्र संगीत दिग्दर्शनची पहिली संधी आंखे या चित्रपटाद्वारे मिळाली. मात्र पाच सहा वर्षे संघर्षातच गेली.
१९५६ मध्ये आला एव्हीएम या दक्षिणेतल्या प्रसिद्ध बॅनरचा किशोर व अशोक कुमार अभिनीत ‘भाई भाई’ हा चित्रपट. यातील जवळपास सर्वच ११ गाणी खूप गाजली आणि मदनमोहन यांना यशाची पहिली चव चाखता आली. “कदर जाने ना…” “ए दिल मुझे बता दे”….”थंडी थंडी हवा”…ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर सहज येतात. बेगम अख्तर हा मदनमोहन यांचा विक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये त्यांच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व हृदयात पोहचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदनमोहन यानां देतात ते योग्यच आहे.
त्यानां क्रिकेटचेही अफाट वेड होते. आताचे ब्रेबॉन स्टेडियमच्या जागी पूर्वी एक मोकळे मैदान होते जिथे तासन तास मदनमोहन क्रिकेट खेळत असत. बेगम अख्तरचे सूर, सैन्यातील कठोर शिस्त आणि क्रिकेटचं वेड हे तिन्ही गुण त्याना संगीत देतानां खूप उपयोगी पडले. एस.डी.बर्मन व सी.रामचंद्र यांच्याकडे त्यांनी सुरूवातले सहाय्यक म्हणून काम केले पण त्यांच्या संगीतावर मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही. अतिशय मोजक्या वाद्यमेळासह ते आपले गाणे तयार करत. सतार, तबला ढोलकी, सॅक्सोफोन यांचा अप्रतिम वापर त्याच्या संगीतात बघायला मिळतो. त्यामूळे गायकांच्या गाण्याचे आवाजाचे सर्व तपशील त्यांच्या गाण्यात आढळून येते. ‘अनपढ’ चित्रपटाचे ‘आप के नजरोमे समझा प्यार के काबील मुझे’ या एका गाण्याच्या मोबदल्यात संगीतकार नौशाद आपला गाण्याचा सर्व खजिना लुटायला तयार होते. ‘हकीकत’या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील रफीचे ‘कर चले हम फिदा जानोतन साथीयों…..’ हे गाणे म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला दिलेली मानवंदनाच आहे. तर याच चित्रपटातील ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा’…….हे गाणे म्हणजे भारतीय जवानांच्या हृदयाच्या छेडलेल्या ताराच आहेत. ‘नैनिहाल’ मधील ‘मेरी आवाज सुनो’ हे रफीचे गाणे पंडीत नेहरूनां अर्पण केलेले गाणे होते….उस्ताद रईस खान यांच्या सतारीचा वापर अनेक गाण्यात त्यांनी इतका अप्रतिम केला आहे की स्वत: लता दीदी ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातील सतारीचे सूर ऐकून हळव्या झाल्या होत्या. ‘वो चूप रहे तो’(जहाँ आरा)….’रस्मे उल्फतमे’(दिल की राहे)…..’नैनो मे बदरा छाये’(मेरा साया)….या गाण्यातील सतारीचे सूर आजही अंग मोहरून टाकतात.
राजा मेंहदी अली खान, राजेन्द्र कृष्ण आणि कैफी आजमी या तिन गीतकारां सोबत त्यांचे खूप सुंदर असे टयुनिंग होते. यांच्या सोबत केलेली सर्वच गाणी खूप गाजली. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील काही चित्रपट वगळता सर्वच खूप ब्लॉक बस्टर असे नव्हते. मात्र त्या चित्रपटातील गाणी खूप गाजली. लोक चित्रपट विसरले पण गाणी नाही विसरले. जवळपास १०० चित्रपटानां संगीत दिलेल्या मदनमोहन यानां पुरसकार मात्र कमीच मिळाले. १९७० मधील आलेल्या “दस्तक” चित्रपटातील “बयाँ ना धरो या गाण्याने” मात्र त्यानां राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आप की नजरो ने समझा’…(अनपढ) आणि ‘लग जा गले की’…(वह कौन थी?) या दोन गाण्यानां फिल्म फेअर नॉमिनेशन मिळाले पण पुरस्कार नाही मिळाला. अनेकदा अनेकानां नाही मिळत पुरस्कार पण त्यामुळे त्यांच्या स्थानाला काहीच धक्का पोहचत नाही. ….आजच्या काळातही जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी अत्यंत तन्मयतेने “लग जा गले की आज ये”….. गाऊ लागते तेव्हा तिला हेही माहित नसते की ज्या संगीत दिग्दर्शकाचे ती गाणे गात आहे त्याकाळात तिच्या वडीलांचाही जन्म झाला नसेल. काही संगीतकार, साहित्यीक वा विचारवंत हे कालातीत असतात. खरं तर ५१ वर्षे हे काही असं एक्झीट घेण्याचं वय नाही. मदनमोहन खूप लवकर हे जग सोडून गेले.. त्यांच्या मृत्यू नंतर अनेक गझला, नज्म, कविता, शायरी यानां अनाथ् झाल्या सारखं वाटलं असेल.
-दासू भगत (२५ जून २०१७)
संतूर वाद्यापासून प्रेरणा घेत आणि त्याला आपलंसं म्हणत ठाण्याच्या गौरव देशमुखनी या क्षेत्रात काहीतरी आगळे-वेगळे संगीत निर्मिती करण्याचे पाऊल उचलले ते पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून प्रेरणा घेत….
Copyright © 2025 | Marathisrushti