(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • निसर्गरम्य पहाडी

    डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा "पहाडी" रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. किंबहुना लोकसंगीताशी इतके जवळचे नाते राखणारे जे थोडे फार राग आहेत, त्यात पहाडी राग, फार वरच्या क्रमांकावर आहे. हिरव्या जर्द झाडीतून स्त्रवणाऱ्या आणि त्याला मिळणाऱ्या खळखळणाऱ्या पाण्याच्या नादाशी नाते जुळवणाऱ्या सुरांशी या रागाचे फार जवळचे साहचर्य आहे. मुळात निसर्ग काहीतरी सुचवित असतो आणि अशावेळी जर का आपण निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याची इच्छा दाखवली तर निसर्गच जणू, आपल्याला या रागाशी साहचर्य घडवून आणतो. या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागत असले तरी बरेचवेळा "कोमल धैवत" वापरून, या रागात गंमत आणि वैविध्य निर्माण केले जाते. या रागाचे चलन पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. हा राग मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात अधिक खुलतो. अर्थात, लोकसंगीतात बरेचवेळा स्वरांच्या आकृतीबंधाबाबत जसे स्वातंत्र्य घेतले जाते तसाच प्रकार या रागाबाबत घडतो. याचा परिणाम असा झाला, चित्रपट गाणी किंवा एकूणच सुगम संगीतात, या रागावर आधारित गाणी भरपूर आढळतात. काही नकलाकार यात "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद" वापर करतात आणी या रागाचे सौंदर्य अधिक खुलवून मांडतात.

    इथे आणखी एक मत मांडावेसे वाटते. तसा पहाडी राग "अटकर" बांध्याचा आहे. यमन, मालकंस प्रमाणे याचा विस्तार अफाट पसरलेला नसल्याने, बरेचवेळा हा राग "धून" स्वरूपात ऐकायला मिळतो. याच मुद्द्याला धरून आपण इथे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी सादर केलेली पहाडी ठुमरी केवळ अप्रतिम आहे. पहिल्याच सुरांतून, या रागाचे संपूर्ण दर्शन आणि वातावरण करण्यात, हा वादक यशस्वी होतो.
    भारतीय संगीतातील जी प्राचीन वाद्ये आहेत, त्यात बासरीचा समावेश होतो. मुळातले हे सुषिर वाद्य, भारतीय रागदारी संगीतात स्थिरावले, ते पंडित पन्नालाल घोष यांनी पण त्याचा जागतिक विस्तार केला तो मात्र पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी. पंडितजींची वाद्यावरील पकड इतकी असामान्य आहे की, ऐकताना माणसाला चक्क गुंगी येते!! इथे त्यांनी जी ठुमरी सादर केली आहे, त्यात, ठुमरीचा नखरा तर आहेच पण त्याचबरोबर सूरांतील हळवेपण देखील लगेच दृग्गोचर होते.सुरवातीची जी आलापी आहे, ती बारकाईने ऐकली तर ध्यानात यावे. पुढे जेंव्हा गत सुरु होते तेंव्हा मात्र एका असामान्य गायकाच्या ठुमरीची आठवण येते. अर्थात, त्या ठुमरीच्या अंगाने जरी वादन झाले असले तरी देखील, त्यात स्वत:चा असा खास विचार दिसतो. सुरवातीच्या समेवरील आलापीनंतर, एकदम "कोमल गंधार" जो लागतो, तो विलक्षण आहे.
    आता, मघाशी मी ज्या असामान्य गायकाची आठवण करून दिली, त्या उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांच्या "तोरे तिरछी नजरिया के पार" या ठुमरीचा विचार करायला घेऊ.
    पतियाळा घराण्याचे अध्वर्यू म्हणून या गायकाचे वर्णन करता येईल. आवाजात थोडासा खर्ज पण तरी वरच्या सप्तकात सहज विहार करणारा गळा!! ठुमरी या गायनाला मैफिलीचा दर्जा देण्यात या गायकाचा महत्वाचा वाटा. खरे तर तीनही सप्तकात या गायकाला लीलया गाता येत असे आणि याचा परिणाम, परिणामकारक ठुमरी गायन. जरा बारकाईने ऐकले तर या गायकाने, ग्वाल्हेर, जयपुर गायकी देखील आत्मसात केल्याचे समजून घेता येईल.
    प्रस्तुत ठुमरी गायनात देखील याच वैशिष्ट्यांचा आढळ सापडेल. गळ्याची लवचिकता, हे खास वैशिष्ट्य सांगता येईल. याचा फायदा असा झाला, गायकीत "अनपेक्षितता" नेहमीच कायम राहिली आणि त्यामुळे गाणे अतिशय रंगतदार झाले. आणखी वेगळेपण सांगायचे झाल्यास, आपल्या शास्त्रात "प्रसादगुण" हे खास वैशिष्ट्य मानले आहे आणि उस्तादांच्या गायकीत याचे ओतप्रोत दर्शन घडते तसेच सरगम, बहुतेक गायकांच्या बाबतीत, तानेचा तांत्रिक आविष्कार अशा स्वरुपाची असते परंतु या ठुमरीत सरगम हही इतकी ओघवती आहे की कुठे ताण संपते आणि परत सुरु होते, याचा सत्कृत्त्दर्शनी पत्ता लागत नाही.
    हिंदी चित्रपट गीतांत, खैय्यामने जितका या रागाचा उपयोग करून घेतला आहे, तितका इतर कुणी केल्याचे आठवत नाही. पहाडी रागात ज्या कुठल्या भावनांचा आढळ होईल, त्या सगळ्या भावनांचा, त्याने आपल्या गाण्याच्या "तर्ज" बांधण्यासाठी उपयोग केला आहे. प्रणय, विरह, व्याकुळता, आनंदविभोर अवस्था, या सगळ्या छटा त्यांनी आपल्या चालीत गुंफलेल्या आढळतील."जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे" ही गाणे खास पहाडी रागावरील उदाहरण म्हणून घ्यावे. खरतर हे गाणे म्हणजे अनन्यसाधारण कुवतीची कविता म्हणून देखील आस्वाद घेता येईल. कैफ़े आझमी काय प्रतिभेचा कवी होता, याचे ही कविता, उत्तम निर्देश करता येईल. पहाडी रागात विरहाची अशी भावना देखील दाखवता येते, हे खैय्यामने फार सुंदररीत्या दाखवून दिले आहे.
    गाण्याचे सुरवातीचे शब्दच बघा किती प्रत्ययकारी आहेत.
    "जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे,
    राख के ढेर मे शोला है ना चिंगारी है"
    खरतर सगळी कविता हाच वाचिक अनुभव आहे आणि अशा कवितेला खैय्यामने जो स्वरसाज चढवला आहे, त्याने या कवितेचा आशय अधिक अंतर्मुख होतो. रफीच्या गायकीचा अनोखा आविष्कार आपल्याला ऐकायला मिळतो. गाण्यात कुठेही तालवाद्य नसून, गाण्यात गिटार आणि इतर "धून" वाद्यांनी ताल पुरवलेला आहे त्यामुळे, झाले असे, कवितेवर कुठेही स्वरांचे आक्रमण झाल्याचे दिसत नाही पण तरीही स्वरांनी आपली "जादू" दाखवून दिली आहे. अर्थात, ही किमया सगळी संगीतकार म्हणून खैय्याम यांचीच यांचीच.
    असेच एक गाणे, कविता म्हणून फार अर्थपूर्ण आहे. जावेद अख्तरची ही कविता आहे. खरतर हे गाणे वाचताना, चित्रपटासाठी हे गाणे लिहिले आहे, हे वाटतच नाही. साधारणपणे, गाण्यातली शब्दरचना, ठराविक "मीटर" मध्ये लिहिलेली असतात, ज्यायोगे संगीतकारांना चाल बांधण्यास अवघड होऊ नये.
    "नीला आसमान सो गया.
    आंसूओ में चांद डुबा, रात मुरझाई
    जिंदगी में दुर तक फैली है तनहाई
    जो गुजरे हम पे वो कम है, तुम्हारे गम का मौसम है".
    सिलसिला चित्रपटातील हे गाणे अतिशय श्रवणीय आहे. संगीतकार शिव-हरी या जोडगोळीने फारसे चित्रपट केले नाही पण, तरीही ह्या गाण्यासारखे चिरस्मरणीय गाणे मात्र दखल घेणारे निर्माण केले. खरतर ही कविता(च) आहे, चालीच्या सर्वसाधारण मीटरमध्ये बसू न शकणारी परंतु संगीतकारांनी गाण्याची लय अशी ठेवली आहे की सगळे गाणे ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव झाला आहे. लताबाईंनी या गाण्यात जी आवाजाची "पट्टी" लावली आहे, ती थक्क करणारी आहे आणि त्यामुळे आपण या गाण्यात कधी गुंतून जातो, हे समजत देखील नाही.
    याच रागात अशीच एक चिरस्मरणीय रचना ऐकायला मिळते. मुळात मेहदी हसन यांचे गायन, हाच श्रवणानंद असतो. उर्दू शायरी जरी गेयातापूर्ण असली तरी प्रत्येक शायरीबद्दल हेच म्हणता येणार नाही पण, या गायकाचे खास विशिष्ट्या असे, गाताना, समजा कवितेत असा शब्द आला, तर तिथे गायकी " मुडपून"घेण्याची तयारी दाखवत आणि शब्दांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत असत.
    बहादूर शहा जाफर या अलौकिक शायराच्या हातून लिहिली गेलेली गझल, एक कविता म्हणून देखील अतिशय दर्जेदार आहे.
    "बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो ना थी
    जैसी अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो ना थी."
    मेहदी हसन साहेबांची खासियत अशी आहे, ऐकताना सहज, सोपे वाटणारी गायकी, कधी अवघड वळणाकडे जाते, त्याचा लगेच पत्ता लागत नाही. "बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे" ही रचना पहाडी रागात आहे पण, रागातील अवघड हरकतींना पूर्ण फाटा देऊन,अर्ध्या ताना घेणे, किंवा एखादी हरकत इतकी जीवघेणी घेतात की, ऐकताना आपण स्तिमित होऊन जातो. अत्यंत मुलायम आवाज, साधारणपणे मंद्र सप्तक किंवा शुद्ध स्वरी सप्तकात गायकी ठेवायची आणि लिहिलेल्या शायरीला पूर्ण न्याय द्यायचा, हीच त्यांची नेहमी भूमिका राहिली. पहाडी रागाचे इतके विलोभनीय रूप इतर गाण्यांत फार तुरळक आढळेल.
    मराठीत असेच एक संयत आणि मुग्ध प्रणयाचे चित्रण असलेले गाणे या रागावर बांधले आहे. खरतर आशा भोसले यांनी गायलेल्या सर्वकालीन अप्रतिम मराठी गाण्यातील एक गाणे, अशी या गाण्याची महती सांगता येईल. कवी सूर्यकांत खांडेकर हे नाव तसे फार प्रसिद्ध नाव नाही परंतु त्यांच्या काही रचना, गाणे म्हणून अप्रतिम अशा गणल्या जाव्यात.
    "सहज सख्या एकटाच येई सांजवेळी
    वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली."
    खरतर सगळी कविता म्हणजे अनोख्या प्रणयाचे सुंदर चित्रण आहे आणि अशी शब्दकळा हाती आल्यावर, श्रीनिवास खळ्यांनी त्याला चाल अर्पिण्यासाठी "पहाडी" राग योजावा, हा काही योगायोग नव्हे. खळे साहेबांचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. चाल बांधताना, सुरवातीला रागाच्या प्रमुख स्वरांचा उपयोग करतील पण लगेच रागाला दूर सारून, चालीचे स्वत:चे म्हणून वेगळे अस्तित्व दाखवून देतील आणि हे त्यांच्या बहुतेक सगळ्या रचनांमधून ऐकायला मिळते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे संगीतकाराची कवितेवर असलेली अनन्यसाधारण श्रद्धा. गायकी अंगाची चाल आहे, हे आपल्याला गाणे प्रत्यक्ष गायला घेतल्यावर समजते अन्यथा गाणे ऐकताना साधी, सोपी चाल ऐकत आहोत, हाच भास होत असतो.
    लोकसंगीताचा आधार घेऊन जन्माला आलेला हा "पहाडी" राग म्हणजे क्षणात तुम्हाला तुमचे अस्तित्व विसरायला लावणारा राग आहे आणि असे घडणे, हाच कुठल्याही संगीताचा प्राथमिक उद्देश असतो.
    - अनिल गोविलकर

  • चला, पोलिओवर मात करू या ! – अमिताभ बच्चन

    पोलिओ मुलांना अपंग तर करतोच पण प्रसंगी त्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. या व्याधीविरुद्ध भारतासह जगभर सुरू असलेल्या लढ्याला यश मिळत आहे. असे असूनही आपल्यासमोरील आव्हान संपलेले नाही. त्यामुळे पोलिओच्या निराकरणासाठी देशवासीयांनी या मोहिमेत खारीचा वाटा उचलायला हवा. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी युनेस्कोचे ‘गुडविल अॅम्बॅसिडर’ म्हणून बोलताना मांडलेल्या विचारांचे संकलन.

  • चिरविजय भारतीय स्थलसेना

    वाचकांना स्थलसेनेची रचना, कार्य आणि उपलब्धींबद्दल सर्वंकष माहिती दिली आहे. स्थलसेने बद्दल ची सर्व माहिती वस्तुत: देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्याचमुळे या विषयात स्वारस्य असणाऱ्या तसेच अजाणतेपणानी इंडियन आर्मी आणि इंडियन आर्मड कोर्सेस यांच्यात गल्लत करणाऱ्या वाचकांना भारतीय स्थलसेनेच्या गौरवशाली इतिहास आणि वर्तमानबद्दल माहिती देण्यात हे पुस्तक सफल झाले आहे.

  • शिव्या अपशब्द वगैरे वगैरे

    एकजण ओळखीचा आहे तो मस्करीत म्हणतो
    सकाळ झाली , सगळे आटोपले की आरशात बघून दोन सणसणीत शिव्या घालतो.

    मग एकदम फ्रेश....?
    मला माहित आहे तो हे फेकत असणार.
    त्याचे हे बोलणे ऐकून मला विचार करण्यास भाग पाडले.

    शिव्यांचे , अपशब्दंचे आपल्या आयुष्यात स्थान काय ? असा प्रश्न मला पडला , तुम्हालाही पडला असेलही. अर्थात १०० टक्के सज्जन माणसे सोडून म्हणतोय मी ?

    नीट पाहिले तर आपल्या कोकणापासून सर्वच ठिकाणी खास शिव्या आहेत, म्हणी आहेत.
    मी जेव्हा आमच्या मराठे सरांचे' असभ्य वाकप्रचार आणि म्हणी हे पुस्तक ' वाचल्यावर खूप काही लक्षात येते.
    प्रत्येक भाषेत शिव्या आहेत, नुसत्या मराठी भाषेत नाहीत. मराठी मध्ये आयला न म्हटलेला
    माणूस नसेल. अर्थात आयला ही शिवी होती का बोली शब्द होता हा संशोधनाचा विषय असेल पण हा शब्द कॉमन केले तो आपल्या दादा कोडके यांनी.

    काही माणसांच्या तोडी सतत शिव्या असतात, सरळसोट बोलणे असते अशी माणसे अगदी सहसा लपवा छपवी करत नाहीत. आहे ते तोंडावर अगदी पुल देशपांडे यांच्या रावसाहेब प्रमाणे.

    शिव्या दिल्याने मनातील स्ट्रेस जातो, मन निर्मळ वगैरे होते असे म्हंटले जाते. दिल्लीत राहत होतो तेव्हा मराठी शिव्या ऐकण्यास मिळत नव्हत्या . परंतु एक दिवशी मी दिल्लीमधील ज्या भागात रहात होतो त्या मध्यवर्ती भागात म्हणजे बाजूच्याच बिल्डिंग मध्ये जबरदस्त भांडण झाले ते भांडण बायकांच्या मध्ये झाले. परंतु त्या त्यांच्या भाषेतून शिव्या पण देत होत्या. खरेच कान तृप्त झाले नवीन शिव्यांची ज्ञानात भर पडली.

    जरा वेगळाच भाषेचा लहेजा कानावर पडला. आता मुंबईत आहे. आपली मराठी भाषा नाही तर सर्वच भाषा सगळ्याच बाबतीत समृध्द आहेत. इग्रजी भाषा जरा त्याबाबतीत कमीच आहे.

    माझा एक फेमस मित्र आहे मी त्याला जेव्हा फोन करतो तेव्हा माझ्या बोलण्यात सरासरी दोन मिनिटांनी शिवी असतेच. कारण पुल छा रावसाहेब माझ्यात पक्का मुरलेला आहे.

    त्याच्याशी बोलताना कधीही शिवी देणारा तो त्याच्या तोडून च्यायला शब्द बाहेर पडला तेव्हा त्याच्या घरात त्यांची नेहमीची कामवाली बाई कर काढत होती. त्याच्या तोडून च्यायला शब्द बाहेर पडल्यावर ती भांबावली. तेव्हा मित्राची बायको म्हणाली त्यांच्या मित्राशी बोलत आहेत.

    मला पण आनंद झाला आपण त्याच्या तोडून शिवी बाहेर काढली म्हणून. अर्थात मनात देत असणार बहुतेक, असो. शिव्या देण्याने, खाण्याने मन मोकळे होते म्हणतात , काही स्ट्रेस रहात नाही.

    पण त्या शिव्या निर्विष असणे आवश्यक, त्यात एक सहजता हवी की कुणालाही राग येत काम नये इतक्या निर्मळ आणि ' सात्विक ' हव्यात ?
    बरोबर ना....
    तुमचे काय मत आहे ...

    -सतीश चाफेकर

  • मोबाईलच्या अती वापरामुळे मी मनास केलेला उपदेश……

    ध्यास बोध ( श्लोक )
    *******
    मना फेसबुकने असे काय केले
    तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले
    मना त्वा चि रे मित्र ही वाढविले
    तया तोंड देणे आता प्राप्त झाले ।।१।।

    मना नेट रात्रीस खेळु नको रे
    सुखी घोर निद्रेस टाळु नको रे
    नको रे मना रात्रिला जास्त जागु
    नको तु असा स्वैर होवोनि वागु ।।२।।

    घरातील संवाद ही बंद झाला
    अरे रात्रिचा एक वाजोनि गेला
    मना आज या आवरी मोह जाला
    करी बंद आराम दे तर्जनीला ।।३।।

    मना कोणता ग्रूप काढु नको रे
    हाताने असे विघ्न ओढु नको रे
    तिथे अॅडमिनला बहु त्रास देती
    बळे त्रासवोनी तया नागवीती ।।४।।

    कुणी फेक अकाउंट ही काढीती रे
    झणी एक दुस-यास ते नाडीती रे
    अशा मिथ्य फोटोस भाळु नको रे
    फुले स्वप्निचि त्यास माळु नको रे ।।५।।

    मना यातुनि चांगले तेच घेई
    अति मिथ्य ते सर्व सोडोनि देई
    मना सत्य मित्रास ध्यानी धरावे
    अशा पोस्ट वाचूनि लाईक करावे ।।६।।

    जरी नेट ला खर्च काही न केला
    अमर्याद डेटा जिओ चा मिळाला
    आता कुठवरी संधी मिळणार पाही
    फुकटचे महागात पडते कधीही ।।७।।

    मना सर्व हा नश्वराचा पसारा
    नको गर्व त्याचा नको त्यास थारा
    अरे नेट गेल्यावरी मार्ग नाही
    उगी पांढरे चक्र फिरते सदा ही ।।८।।

  • भावना

    आयुष्यात येवून ज्यांनी केल आमच भल (चांगल)।।त्यांच्यावरच जाताना टाकली आम्ही फूल ।।

    फूल टाकताना डोळ्यातून येत होत पाणी ।।तेव्हाच कानावर पडत होती अभंगाची वाणी ।।

    अभंगाची वाणी ऐकताना हाथ जोडोनी पडत होतो ।।पाया तेव्हाच मला दिसत होती माझ्या गुरुची छाया।।

    कवी :- सचिन राजाराम जाधव

    मोबाईल नंबर:-8459493123

  • कुपोषणावर प्रभावी ‘अमरावती मिक्स’

    बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्‍यामार्फत तयार करण्यात येतो. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

  • भारतीय चंद्रयान मोहिमेचे मुख्य डी. के. सिवन

    २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवान यांच्या हाती देण्यात आली आहे. त्या आधी म्हणजेच २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात. इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते.

  • नवं जीवन-धर्म

    प्रसिद्ध वैद्यानिक अल्बर्ट आइन्स्टाईन च्या पत्नीस वाटे कि आपल्या पतीला गणित येत नाही व तसेंच दिशे बद्दलचे ज्ञान अगदीच नाही असा समज होता. जेव्हा आइन्स्टाईन बाजार हाट व खरेदी करण्यास जात असत तेव्हा त्यांची पत्नी संपूर्ण खरेदीचा हिशेब करून व त्यांना समजावून सांगे आणि लिस्ट प्रमाणेच आणण्याची ताकीद पण देई इतकेच नाही तर त्यांच्या हातावर घराचा संपूर्ण पत्ता व दिशा बाण काढून न विसरण्याची ताकीद देत असे कारण तिच्या समजुती प्रमाणे ते विसराळू होतें आणि कदाचित घरचा रस्ता विसरतील म्हणून ही योजना करीत असे.

  • संवेदनशीलतेतही ‘प्रवीण’

    प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो.