(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बंजारा समाजातील होलिकोत्सव

    प्राचीन काळापासून दर्‍याखोर्‍यात वावरणार्‍या बंजारा समाजाचा इतिहास बंजारा लोकसंस्कृतीमधून दिसून येतो. बंजारा समाजाचा होळी उत्सव म्हणजे ग्राम रंगभूमीवरील टोटल थिअटरचा अविश्कार म्हणावा लागेल.

  • फिर ये सीट मेरी हुई ना?

    मैने खिडकीसे सीटपर रुमाल डाला था, (बसमध्ये प्रवास करतांना भांडणं निर्माण करणारी नेहमीची एक समस्या आणि एक सुंदर प्रवासवर्णन, नक्की वाचा)

  • भाऊबीज

    कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले असे मानले जाते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे.
    तेव्हा बिजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता हा भाऊबिजेच्या सण आहे. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे.
    या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    भाऊबीजे निमित्त
    स्त्रियांचा सण हा जिव्हाळयाचा विषय आहे. मग त्यात भाऊ-बहिणांच्या नात्यात या भाऊबीज या सणांचे महत्त्व किती आहे हे सांगावयास नको. दिवाळी हा सण इतर सणांपेक्षा मोठा मानला जातो, याचे कारण चार दिवस आणि प्रत्येक नात्यांशी जोडणारी रिती-परंपरा मग स्त्रीचा भाऊ, बहीण, पती यांसाठी भाऊबीज, पाडवा यासारखे दिवस राखूनच ठेवले आहेत. भाऊ-बहिणीच्या नात्यावर खूप लिखाण झाले आहे. मग स्त्री आपले दु:ख सांगताना भक्कम पाठीशी उभा राहणारा भाऊ डोळयासमोर ठेवून ओव्या रचते.

    बहिणीला भाऊ एक तरी तो असावा ।
    चोळीचा एक खण, एका रातीचा विसावा

    किंवा

    भाऊ तुझा घोडा आस्मानीचा तारा ।
    बहिणीच्या गावा जाता लागेना ऊन वारा ॥
    शंभर माझं गोतं एक नाही गं कामाचं ।
    भाऊ राजसाचं मला भूषाण रामाचं ॥
    भाऊची वाट पहाते मी कालच्या धरून ।
    शाळा दिवस गं बाई गेल्या सावल्या विरून ॥

    अशा प्रकारे भावाविषयीचे प्रेम स्त्री ओवीमधून व्यक्त करते. मग सख्खा भाऊ जरी नशिबात नसला तरी चुलत भावाला ती सख्ख्या भावापेक्षा वेगळं स्थान देत नाही.

    चुलत भावाला नका म्हणू वंगाळ
    इचार करा जरा एका राशीचं जोंधळ

    अशा प्रकारे प्रत्येक सणाला ती भावाची वाट पाहात असते. श्रावण महिना सुरू होतो आणि सणांची रेलचेल सुरू होते.

    पंचमीच्या सणाला बंधू आल्याती न्यायला ।
    जाऊ काय जी म्हायारी पंचमी खेळाया ॥

    पूर्वी एकत्र कुटुंबव्यवस्था असल्याने कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असे. दळणवळणाची सोय नसे, मग बैलगाडीचा वापर होई. मग बहिणीला सासरी आणण्यासाठी भाऊ निघे, त्यालाच मु-हाळी येणे किंवा मुराळी येणे असे म्हणत. मग त्यालाच मुराळी एखादी व्यक्ती यायची तिला सन्मानाने माहेरी घेऊन जात आणि पुन्हा सासरी पाठविताना तिच्यासोबत गोड पक्वान्न देऊन पाठवणी करीत असत.

    मु-हाळया माझा दादा घोडं बांधवा जाईल ।
    सोय-याला रामराम मग भेटावं बाईला ।
    दस-या दिवाळीचं मूळ येईल नेमाचं ।
    भाऊरायाचं घोडं दारी येईल टेमाचं ॥

    दसरा दिवाळीच्या सणाला हमखास भाऊ येणार याची खात्री बहिणीला असते. म्हणूनच तिला सणांची आस लागते. पूर्वी मुराळी या शब्दाबरोबर ‘मूळ’ हाही शब्द प्रचलित होता. दिवाळी हा सण साजरा करताना गरीब-श्रीमंत असा भेद केला जात नाही. दीप लावून प्रकाशमय होणारा काळ दिवाळीचा सर्वात मोठा सण मानला जातो. बहिणीला अगदी खात्री असते की काहीही झाले तरी दिवाळीला भाऊ आपल्याकडे येणार. मग तिची त्या भावालाही गोडधोड पदार्थ करण्यासाठी धावपळ सुरू होते. भावासाठी सजावट सुद्धा ती करते.

    दिवाळीच्या दिशी झुंबराची गं आरास ।
    न्हाई कुणाची आगत मला बंधुजी परास॥
    दिवाळीच्या दिशी पाट रांगोळ्याची शोभा ।
    बंधुजी पावना माझ्या देव्हा-याम्होरं उभा ॥
    चांदिच्या कंदिलाला सये सोन्याचे गं वात ।
    बंधूला झाली रात कुण्या गावच्या मळयात ॥
    दिवाळीच्या दिशी उटणं गुलालाचं ।
    भाऊ भाऊ राजसांचं गोर अंग मुलायम ॥
    दिवाळीच्या दिशी दारी सजवीन मोर ।
    लाडके माझे बंधू ववाळीन
    गं भास्कर ॥

    अशा रीतीने आतुरतेने वाट पाहणा-या बहिणीकडे भाऊ येतो तेव्हा तिला त्याच्यासाठी काय काय करू असे होते. मग ती भावाला आवडणा-या पक्वान्नासाठी लगबग सुरू करते.

    भाऊबीज केली मी बुंदीच्या गोळ्याची ।
    बांधवाच्या हाती माझ्या धुलंड तोढायची ॥
    भाऊबीजे दिशी ठिवलं दुधाचं आदायान ।
    भाऊरायासाठी केलं पोळीचं जेवायन ॥
    पाची पक्वान्नं ताट वर बासुंदी आणि पुरी ।
    भाऊबीजेच्या फराळाला बोलाविले नरहरी ॥
    गहू पोळीयाला डाळ दळिते भज्याला ।
    जेवण करीते मी माझ्या बंधू राजाला ॥
    भावाला भाऊबीज करीते करंज्याची ।
    बंधुजीच्या हाती नथनी सरजाची ॥

    ज्या बहिणीला भाऊ नाही, पण तिने गुरुभाऊ मानला असेल तर त्यासंबधी सुद्धा ती आपले मन मोकळे करते ती म्हणते,

    सख्ख्या भावा परीस गुरुभावाला माया मोठी ।
    लाडक्या भैनीसाठी चोळी घेऊन येतो भेटी ॥
    सख्ख्या भावापरिस गुरुभाऊ गं आगळा ।
    पाची प्रकाराचं ताट नको जेऊस वेगळा ॥

    वाट पाहूनही भाऊ आला नाही तर ती नाराज होते आणि म्हणते

    दिवाळी सणादेशी बंधू माझा गं आला न्हाई ।
    सांगावा आला बाई जोड ठुशीचा झाला न्हाई ॥

    अशा रितीने बहीण भावाचं आदरातिथ्य करते आणि त्याला औक्षण करताना भाऊ आपल्याला काही नाही तरी साडी-चोळी देऊन आदर करेल अशी इच्छा व्यक्त करते. लग्न करून सासरी गेलेल्या स्त्रीला आपल्या माहेरचा मोठेपणा नेहमीच असतो.

    भाऊबीजे दिवशी भाऊ आले पुण्याहून ।
    आज भाऊबीज ओवाळीते दुणाऊन॥
    राम-लक्ष्मण तुम्ही बसा एका ओळी ।
    दिवाळीची मला द्यावी साडी-चोळी ॥
    भावाची भाऊबीज बाई जरीची पगडी ।
    माझ्यासाठी ओवाळणी चंदेरी आणी साडी ॥
    दिवाळी दस-याची चोळी फाटून झाली चिंधी ।
    नटव्या बंधुजींनी मला ओताला दिली जोडी ॥

    भावाविषयीची आत्मीयता तिच्या ठायी सतत जाणवते. चोळी पातळ हे तर क्षणभंगूर आहे. परंतु संसारात सुद्धा भाऊ पदोपदी बहिणीला मदत करतो. पण तोच भाऊ बहिणीकडे आला नाही तर नाराज होऊन मनातील खंतपण बोलून दाखविते,

    भाऊबीज केली नाही कुणाला कळू दिली ।
    बंधूरायानं मला पोकळी नेसविली ॥
    संपाक रांधते मी पुरणपोळीला तवा ।
    माझा गं बंधूराज नड सांगते जवा तवा ॥

    अशा प्रकारे भाऊ, बहीण, भावजय अशा नात्याविषयीच्या ओव्या खूपच अस्तित्वात आहेत. याशिवाय स्त्रीला आपले अंतर्मन मोकळे करण्यासाठी पांडुरंग, रुक्मिणी, पंढरपूर म्हणजेच पंढरपूर हे माहेर आणि पांडुरंग आणि रुक्मिणी माता-पिता अर्थी अनेक ओव्या रचल्या आहेत. स्त्रीचे सर्व आयुष्यच बहुधा माहेराशी बांधलेले असते. स्वाभाविकच सासर-माहेरच्या माणसांभोवती भिरभिरणारे मनच गीतरूप घेते.

    आईविषयीची कृतज्ञता आणि भावांचे प्रेम अनेक वाटांनी व्यक्त होते. स्त्रीचे पुरुषसापेक्ष अस्तित्व आणि तज्जन्य वेदनेच्या अनंत परी लोकजीवनात आजही विद्यमान आहेत. तथाकथित शिक्षित उच्चस्तरीय समाजाचे मनही वेगळे नाही, यातूनच कवितेचा जन्म झाला असे म्हणता येईल. मनात दाटलेले सुख, दु:ख, खंत एखाद्या कवितेद्वारे ओठावर येणं हे नसर्गिक आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • टेबल मॅनर्स

    फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी

  • मराठी भाषेतील पहिलाच व एकमेव “ग्राहक तक्रार मंच”

    मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी “ग्राहक तक्रार मंच”

  • वेधशाळा

    काही जागा अशा असतात की ज्यांच्याविषयी मनोमन कुतुहल असूनसुध्दा त्या जागांच ऐतिहासिक महत्व किंवा मोल काय आहे, भूतकाळात व वर्तमानात त्यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाची व्याप्ती काय आहे याची जाणीव आपल्याला नसते. त्या जागेमध्ये नक्की काय चालतं व कुठल्या वैशिषट्यांमुळे त्या जागेची किर्ती ही सर्वदुर पसरलेली आहे, यांविषयी आपल्या मनात पुर्णपणे काळोख नसला तरी पुर्ण प्रकाशसुध्दा नसतो. समस्त अलिबागकरांच्या व पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली व अलिबागसारख्या बिंदुभर गावाला केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशामध्ये प्रतिष्ठेचं व सन्मानाचं वलय प्राप्त करून देणारी अशीच एक ऐतिहासिक व प्राचीन जागा म्हणजे अलिबागची चुंबकीय वेधशाळा.

  • चीनचा प्रश्न सहकार्याने सुटू शकेल!

    आशिया खंड सोडल्यास इतर खंडांमधील देश आपापसातील वैर विसरून एकमेकांशी सहकार्याच्या तत्वाने एकत्र मिळून प्रगतीची वाटचाल करत आहेत. परंतू आशिया खंडात हे चित्र दृष्टोत्पत्तीस पडत नाही. इतर खंडातील देशांनी एकमेकांत वैर असण्याचे नुकसान-तोटे भोगलेले आहेत. पण आशिया खंडातील देश या दृष्टीने अजुनही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही. पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ येथे लक्षात घेण्याची खरोखर गरज आहे. स्वार्थ विसरून आणि एकमेकांच्या फायद्याच्या गोष्टींत समसमान रस घेउन एकत्र प्रगती करणे शक्य आहे. आशिया खंडातील अशाच गंभीर प्रश्नांवर कशाप्रकारे यशस्वीपणाने तोडगा काढला जाउ शकतो यावर संदीप वासलेकरांच्या एका दिशेचा शोध या पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे.

  • आम आदमी पार्टी – एक पर्याय

    दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय आणि आता दिल्लीच्या सत्तेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल याबद्दल राजकारणी, समाजकारणी आणि विद्वान मंडळी यांना काय वाटत हा विषय थोडावेळ बाजुला सारून आता समोरच दिसणार्‍या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा यांचा विचार करता महाराष्ट्रतील एका सर्वसामान्य मतदाराच्या नजरेतून या निवडणुकीकडे पाहिले असता सर्वसामान्य मतदाराच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार की मी ही महाराष्ट्रात आम आदमी पार्टी सारख्या पर्यायाच्या शोधात नाही ना की आम आदमी पार्टी हाच माझ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल ?

  • कुठे चाललाय आपला महाराष्ट्र ?

    उद्योगधंद्यात एके काळी अव्वल क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून आता बरेचसे उद्योग-धंदे बाहेर जाताना दिसून येत आहेत. वीज टंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार, कामगारांचे तंटे यासारख्या कारणांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असतानाच नुकत्याच बाहेर आलेल्या एका बातमीने महाराष्ट्राविषयीच्या चिंतेत भर घालण्याचे काम केले आहे. ही बातमी आहे गुन्हे, चोरी आणि लूटमारीची. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या आपल्या अहवालात महाराष्ट्राबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

    चोरी आणि लूटमारीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. २०१२ मध्ये १४ हजार ४५४ कोटी, ४८ लाख, ८० हजार रुपयांची मालमत्ता लंपास करण्यात आली. संपूर्ण देशभरातून २१ हजार ७१ कोटी, ९४ लाखांची मालमत्ता लंपास करण्यात आली. म्हणजेच २/३ वाटा महाराष्ट्राचा होता.

  • “गाण्यातील आनंदी पर्व”

    तिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”..