देशात महिला किती सुरक्षित आहेत याची जाणीव दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर सर्व स्त्रियांना झाली. कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रात्री-अपरात्री नोकरीवरून घरी यायचे असेल तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचे? घाबरून घरी बसणे म्हणजे पळपुटे लक्षण समजण्यात येईल आणि गुन्हेगारांच्या गुन्ह्यात वाढ होईल आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल. त्यावर ठाण्यात चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून इलेट्रोनिक ग्यॅझेट तयार करण्यात यश आले आहे. तो उपक्रम चालवणारे पुरषोत्तम पाचपांडे यांना रोबोटिक चप्पल तयार करण्याची कल्पना सुचली.
सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.
दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.
विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.
विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.
(-- `महान्यूज' मधील दिलीप मोहिते, विटा यांच्या लेखावर आधारित. )
आजच्या लेखात तुम्हाला तुमची संस्था योग्य त्या प्रकारे काम करत आहे का ? नसल्यास याबाबत तुम्ही हक्काने व्यवस्थापन सदस्यांना प्रश्न विचारू शकता.
सोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. यात त्यांचे मोठेपण सामावल्याचे पक्षातील अनेक नेतेमंडळी सांगतात. पण, त्या मोठ्या सामाजिक कार्यातून किवा राजकीय परंपरेतून पुढे आलेल्या अभ्यासू नेत्या नाहीत. शिवाय आता नेहरू घराण्याची परंपरा सांगण्याशिवाय कोणताही जमेचा मुद्दा उरला नसल्याने काँग्रेसला सोनियाजींच्या आधारावरच मते मागता येणार आहे. त्यामुळे सोनियांची मक्तेदारी निर्माण होत आहे.
सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता
दैनंदिनीच्या
जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते.
तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण
होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी
खूणा पडतात.
जवळ जवळ तीन-चार महिने आधी ठरविलेली कोस्टारिकाच्या सफ़रची तारीख जस जशी जवळ आली तस तशी आमची उत्सुकता वाढतच होती. तो देश कसा असेल, माणसं कशी असतील, हवामान आपल्याला मानवेल की नाही, आणि मूख्य म्हणजे टूर मध्ये असलेले ईतर लोक कसे असतील
दिवाळी अंकासाठी मी गेली 12 वर्षे सतत लिखाण करतोय पण मोजकच. 2002 सालच्या माझं कोकण दिवाळी अंकात माझी ‘माऊली’ ही तिसरी कथा प्रकाशित झाली. त्यापुर्वी नवाकाळ मध्ये माझ्या दोन कथा प्रकाशित झाल्या होत्या. माझ कोकण दिवाळी अंकासाठी आई या विषयावर साहित्य मागविण्यात आले होते त्यामुळे आईला केंद्रस्थानी ठेवून मी ही प्रेम कथा लिह्ली होती.
भालजी पेंढारकरांसारख्या नररत्नाच्या पोटी जन्माला आल्यानंतर ‘रारंगढंग’कार प्रभाकर पेंढारकर यांना स्वत:ची कारकीर्द घडवताना नेहमीच एक गडद सावली सांभाळावी लागणार होती. त्यांनी ती लिलया जपत स्वत:चा ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे स्वत:ची वेगळी वाट चोखाळणार्या एका व्यासंगी कादंबरीकाराला मराठी साहित्यविश्व अंतरल्याची हळहळ सतत जाणवत राहील. त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा.
Copyright © 2025 | Marathisrushti