(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भूलेंबिसरे गीत

    गाजलेली हिंदी गाणी आणि त्यामागच्या गोष्टी जाणून घेऊ.

  • शैव-वैष्णव भक्तांत श्रेष्ठ कोण?

    आता आपणच ठरवा शैव आणि वैष्णवात श्रेष्ठ कोण?

  • वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ३

    वास्तुशास्त्र पेंटिंग म्हणजे काय? यावर मागील लेखात आपण माहिती घेतली. या विषयावर कोणाला फारशी माहिती नसेल. कधी फारसा विचारही कोणी केला नसेल. परंतु घर वा वास्तूची अंतर्गत सजावट करताना, भिंतींना सजविण्यासाठी पेंटिंग, एखादा आकर्षक आकार इत्यादींची योजना केलेली असते. आपल्याला वा पाहणाऱ्याला त्यातील फारसे काही समजले नाही तरी त्या अंतर्गत सजावटीच्या वातावरणात थांबल्याने काहीतरी समाधान मिळत असते. याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेक जणांनी... ज्यांना स्वतःचे विचार, स्वतःचं मन आणि स्वतःची स्वप्न असतात अशा साऱ्यांनीच हा अनुभव घेतलेला असतो.

    हे असं कशामुळे घडत असतं याबद्दल अनुभव घेणारा अनभिज्ञ असतो किंवा तो फारसा विचार या मुद्द्यावर करत नाही. जर त्याच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर आपल्या ध्यानी येईल त्या वास्तूच्या अंतर्गत सजावटीमध्ये भिंतीचा रंग फ्रेश आहे. आत लटकवलेली-लावलेली-अडकवलेली पेंटिंग्ज वा निसर्गचित्र वा सिन वा देखावा...... एक असो एकाहून अधिक असो... वातावरण शांत ठेवणारे असतात, आल्हाददायक असतात. खिडक्या-दरवाज्यांचे पडदे असतील तर त्यांचे रंग देखील वातावरणाला पोषक असतात.

    हा सारा प्रकार आणि हे सारं वातावरण केवळ आणि केवळ रंगयोजनांचा अत्यंत अचूकपणे-समर्पकपणे केलेला वापर होय. दवाखान्यांना हॉस्पिटल्सना पिस्ता कलर, फिक्कट हिरवा, पांढरा, ऑफव्हाईट अशाच प्रकारचे रंग दिलेले असतात. कधी आपण पाहिले आहे काय? की एकदम भडक लाल-भगवा, गडद हिरवा इत्यादी डोळ्यांना त्रास होईल अशा रंगांनी तो दवाखाना वा हॉस्पिटल सजविले आहे? असं दिसलंच तर तो डॉक्टर आणि तो दवाखाना वा हॉस्पिटल खरंच किती रुग्ण व्याधीमुक्त करेल याबाबत प्रश्नच राहील... असो.

    आपण पुढील लेख हा कोणत्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग घरात लावावे यावर माहिती मिळवू.

    -शुभम भवतु
    गजानन सिताराम शेपाळ

  • शेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द

    शेवान - एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द.....

    आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले.....म्हणजेच शेवान..... कापणी संपल्याची निशाणी.... कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी...

    मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे... 7. 8 गडी माणसे असायची कापणीला....
    पण गावातील काही बलुतेदार लोकं ...... नाव नाही घेत..... यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून.... आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात ... आजोबा त्यांना द्यायचे... त्यांचा हक्क म्हणून.... आता देणारे पण नाहीत.... अन् घेणारे पण नाहीत....

    मी तेव्हा विचारलेले... आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?

    आजही आठवतय त्यांच उत्तर..

    बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा... भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट.... कवळी..... देतो...

    तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती ... पिकवणार्याला.... अगदी किडमुंगी

    पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना...

    आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो... तेकाच शेवान म्हणतात

    बापूर्झा

    डॉ बापू भोगटे
    9422632456

  • विधीलिखित

    कोणाला कोणच्या प्रसंगातून कोणत्या वेळी जावं लागतं ते विधिलिखित असतं.
    ते टळणार नसतं. त्यांतून किती जीव मनस्तापाने होरपळून निघतात. आपण सिरीयल्स मधून,कथा कादंबर्यातून हे बघतो, वांचतो पण मी प्रत्यक्षात घडलेली घटना इथे सांगत आहे. ( पात्रांची नांव बदलली आहेत)
    वैशाली ताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता, संध्याकाळी बाहेर जेवायचं ठरलं होतं. मोठी मुलगी गांवातच होती, ती पण येणार होती केक घेऊन.
    आंघोळ आटपून त्या पूजेला बसल्या, तितक्यात फोन खणखणला. "आई, वेळ आहे कां ऐकायला" हो हो बोल बेटा.
    वैशाली ताईंना वाटलं, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूजानी त्यांच्या धाकट्या मुलीने फोन केला असावा. "आई" तिचा आवाज थोडा रडवेला वाटला. रात्रीच तिच्याशी गोष्टी झाल्या होत्या, थोडी तुटकच बोलली होती, जेवण झालं कां असं विचारलं तर , "नाही ग इतक्यांत कसंच जेवण? आई तू झोप. मी सकाळी करते फोन" म्हणाली होती.
    "आई, तूं बसून घे" पूजा म्हणाली. बराच वेळ ती बोलणार होती.
    तिने सांगितलं ते वैशाली ताईंना धक्का देणारं होतं. तरी त्यांनी शांततेन एकेक गोष्ट ऐकली. "बरं मी ठेवते, मी कोर्टात जाते आहे. बघते कोणी वकील मिळाला तर. तूं अजिबात काळजी करूं नकोस. मी मॅनेज करीन. बाबांना पण ऊगीच पाठवू नकोस. त्यांच्या तब्येतीची काळजी घे" असं म्हणून तिने फोन कट केला. कशातरी रडवेल्या होत त्यांनी पूजा संपवली आणि तिच्या बाबांना सगळं सांगितलं. ते पण खूप काळजीत पडले.
    पूजाचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. पहिलं नव नवलाईचं वर्ष एकमेकांचे वाढदिवस साजरे करण्यांत, हाॅटेल, आऊटींग मध्ये गेले. नंतर पूजानी तिच्याच कंपनीत पुनः जाॅब मिळवला. सासू सकाळीच डबा घेऊन शाळेत निघून जात होती. नंतरचं सगळं पूजा बघून घेत होती. सगळ्यांसाठी पोळ्या भाजी करून ती आॅफीसला जायची.
    हळूहळू घरांत कुरबूर सुरू झाली. एका माणसाचा खर्च वाढला. तिचे सासरे तिच्या आॅफीसमध्ये जाऊन जाऊन पैसे मागत. वरून म्हणतं, तूला आमच्याकडे सगळं घरचं जेवण मिळतं, राहायला झोपायला जागा मिळते, फळ-दूध सगळं मिळतं तर घरभाड्या सकट तूं सगळे पैसे दे.
    तिनी त्यांना ते द्यायला सूरवात केली. एका महिन्यांत प्रिमियम भरायचे होते म्हणून ती देऊ शकली नाही, तर सासरे आॅफीसमध्ये पोचले. पूजानी संध्याकाळी येतांना काढून
    आणते सांगितलं. तर तिला एटीएम कार्ड मागायला लागले. ती कांही पेइंग गेस्ट नाही, जे ते एक दिवस ऊशीर झाला तर कांगावा करत होते. त्यांचा मुलगा पूजाचा नवरा बॅन्केत मॅनेजर आहे, तो तिचा खर्च चालवूं शकत होता तरी ती भीक नको ........म्हणून पैसे पुरवत होती.
    त्यांना पैसे दिले. घरी पोचल्यावर पूजाच्या कानावर नवर्याचे बोलणे पडले. बाबा, तिला कां मागतां मी देतो आहे न ? घरभाडं, किराणा, प्लाॅटचं लोन सगळं मी करतो न. आईचा पूर्ण पगार वाचतोच आहे. बाबा म्हणत होते तिचा पगार घर बांधायला लागेल.
    खूप रगडा झाला त्यांवरून. सासूनी दोघांना वेगळं राहा सांगितलं. दोघं वेगळे झाले. थोडे दिवस बरे गेले. नंतर पूजाचा नवरा घरी आईकडे जाऊन जेवून यायचा. कधी न सांगता तिथेच राहून जायचा असं सुरू झालं. मग त्यावरून पूजात व तिच्या नवर्यात दोघांमध्ये वाद होऊ लागले. एक दिवस अचानक त्यानी बॅग भरली आणि चेन्नई ला जायचं आहे असं सांगून निघून गेला. सकाळी सकाळी दाराची बेल वाजली, पूजा नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिनी दार उघडलं तर कोर्टाचा माणूस नोटिस घेऊन दारांत ऊभा. तिच्या नवर्यानी घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती. तिच्या ह्रदयाचा थरकांप झाला. एका रात्री भांडणं झालं होतं तेव्हां मला आतां तुझ्या बरोबर राहायचचं नाही असं म्हणाला होताच. पण खरंच असा वागेल वाटलं नव्हतं. कालच बॅग घेऊन चेन्नई ला गेला आणि आज ही नोटिस. पूजाचा थरकांप उडाला. हात पाय कांपायला लागले. तिनी कशीतरी नोटीस घेतली व विचारलं हे काय आहे? घटस्फ़ोटाची नोटिस पाठवली होती त्याने. दार बंद करून बालकनीत आली नोटिस वांचतच होती, तेवढ्यात तिला टोपीखाली चेहरा लपवून तो (तिचा नवरा) सुजित जातांना दिसला. तिने त्याचीच बाईक बाहेर काढली आणि त्याचा पाठलाग करून त्याला गाठलं. खूप सवाल जबाब झाले, तो घरी आलाच नाही. ती सासरच्या घरी गेली तर सासूनी घरांत घेतलंच नाही. उलट कांगावा केला, "मी पोलीसांना बोलावते, सांगते ही मुलगी आम्हांला त्रास द्यायला आली आहे" पूजा परत स्वतःच्या घरी आली.
    कोर्टात त्यांची भेट झाली. शेवटी सहा महिन्यांच्या ऊहापोही नंतर परस्पर संमतिने घटस्फ़ोट घेतला.
    त्यांतही सुजितने mutual divorce साठी मी कांही ही एल्युमिनी देणार नाही असं वकीलांना सांगितलं. आई आणि मुलानी मिळून सगळी योजना आधीच आंखून ठेवली होती.
    सुजितच्या एका मैत्रिणीने तिच्या भावासाठी पूजाला होकार द्यायला लावला, तो पण पूजाला ओळखत होता.
    इतक्या चंगल्या मुलीचे असे हाल झालेले त्यानी पण बघितले होते.
    वैशाली ताईंना आतां खूप छान जांवई मिळाला. पूजा आणि दिपक दोघंही आतां अमेरिकेत आहेत. त्यांना एक गोड मुलगी आहे.
    दिपक गंमतीनी म्हणतो, "सुजितचे आभार मानायला हवे आपण सुजितशी तुझं लग्न झालंच नसतं तर माझी तुझी गांठच पडली नसती, तूं इथे मिरजला कशाला आली असतीस? "
    --प्रतिभा जोगदंड केकरे
  • आनुवंशिक तत्व आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद.

    १२ फेब्रुवारी २०१२ ला चार्ल्स डार्विनची २०३ वी जयंती होती. केवळ २६ वर्षांचे वय असलेला चार्ल्स, ब्रिटिश नौदलाच्या ‘एचएमएस बीगल’ या बोटीवरून, ५ वर्षांच्या काळासाठी, १८३५ साली, जगप्रवासाला निघाला. या काळात, आर्किडपासून व्हेलपर्यंतच्या प्रजातींचा त्याने अभ्यास केला, स्वत:च्या अचाट बुध्दीमत्तेचा वापर करून आणि खूप मेहनत घेऊन नोंदी केल्या. पुढील  २०-२५ वर्षे मनन करून, १८५९ साली ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ हा ग्रंथ, त्याच्या वयाच्या ५० व्या वर्षी लिहीला. या पुस्तकात त्याने, ‘नैसर्गिक निवड’ या तत्वावर आधारलेला उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडला.

  • आनंद माडगूळकर युट्युब चॅनेल

    आनंद माडगूळकर यांच्या युट्युब चॅनेलवर गदिमांच्या अनेक किस्स्यांचा, आठवणींचा धमाल मनोरंजनाचा ठेवा उपलब्ध आहे, त्या विश्वात रमण्यासाठी आनंद माडगूळकरांच्या युट्युब चॅनेलला आताच भेट द्या.

  • बॉम्बस्फोट आणि राजकारण

    १३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

    बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.

  • घरात कायमची दहशत ! (नशायात्रा – भाग ३९)

    पोलीस स्टेशन मधून जो थेट पळत सुटलो ते एकदम आधी रेल्वे स्टेशनवर गेलो , तेथे आधी एका नळावर घाणीने बरबटलेले पाय धुतले , आता टर्की खूप जास्त जाणवत होती , कसेही करून मला ब्राऊन शुगर हवी होती , मी तेथून नेहमीं जेथे ब्राऊन शुगर विकत घेत असे त्या हाजो आपा च्या अड्यावर गोसावी वाडीत गेलो ( हीचे मूळ नाव हाजरा होते , पण आम्ही सर्व गर्दुल्ले तिला हाजो आपा म्हणत असू , या बाईचा नवरा पेशाने पहेलवान होता ,एका खुनाच्या आरोपात जेल मध्ये शिक्षा भोगत होता तो, आणि आपा उदरनिर्वाहासाठी आधी गांजा आणि मग ब्राऊन शुगर विकण्याचे काम करीत होती ) मी हाजो आपा चे नेहमीचे आणि रोख व्यवहार करणारे गिऱ्हाईक होतो , त्यामूळे ती मला रात्री बेरात्री केव्हाही ब्राऊन शुगर देण्यास मनाई करत नसे , आज पहिलीच वेळ होती की मी तिच्याकडे उधार मागायला जाणार होतो ..

    सायंकाळी साधारण ७ वाजले होते , मी तिच्या घराच्या खिडकीतून हक मारली तशी पटकन तिने हात बाहेर काढून कितना ? असे विचारले या वर मी म्हणालो ' आपा , आज पैसे नाही है , ५ पुडी दे दो , काल पैसे मिल जायेंगे , तिने हात परत आत घेतला , मग खिडकीचा पडदा सरकवून माझ्या कडे पाहत म्हणाली ' ऐसा उधार नाही मिलेगा ' मला खरे तर मनातून ती आपल्याला नक्की उधार देईल अशी खात्री होती , कारण ऐरवी देखील ती इतर गर्दुल्ल्या लोकांपेक्षा माझ्याशी अधिक सौम्य बोले ..

    एकदा तर तिने मला काय शिकतोस ? कोणत्या कॉलेजला वगैरे चौकशी केली होती माझी... पणएकंदरीत तिने मला त्या दिवशी मात्र सरळ रोख पैसे सांगतील असे सांगून माझा भ्रम निरास केला होता , मी लगेच पवित्र बदलला एकदम मी तिला काल ब्लेड ने गळ्यावर केलेली जखम दाखवून म्हणालो ' ये देखो आपा , कल मैने ये क्या किया है , आज मुझे माल नाही मिलेगा तो मै मर जाउंगा , अभी पोलीस स्टेशनसे भागकर सिधा यहापर आया हू ' ही मात्रामात्र लगेच लागू पडली , गळ्याची जखम तशी कोणीही घाबरावे अशी मोठी होती त्यातल्या त्यात एखादी ' स्त्री ' तर नकीच घाबरली असती हाजो आपा परिस्थितीमुळे जरी अश्या व्यवसायात असली तरी सर्व प्रथम ती आधी ऐक ' स्त्री' होती ' हाय अल्लाह , असे ओरडून ती एकदम खिडकीत मागे सरकली मग , अविश्वासाने माझ्याकडे पाहत म्हणाली ' आज दे दुंगी , लेकिन दोबारा यहा आना नही ,और य नशा छोड दो अभी तुम " मी हो ला हो केले मग तिने पाच पुड्या हातात दिल्या , तसा मी वेगाने तेथून सटकलो .

    मग लपत छपत रेल्वे क्वार्टर्स कडे आलो , घरात काय चाललेय हे मला पहायचे होते , पोलीस आपला शोध घेत आहेत का ही भीती होतीच , आमच्या घराच्या मागील बाजूस अंगण होते आणि त्याभोवती साधारण पणे ८ फुट उंच भिंतीचे कुंपण , मी त्या भिंतीवर चढून तिच्यावरून चालत घराच्या गच्चीवर पोचलो , तेथे आमच्या मधल्या आणि पुढच्या खोलीचे व्हेंटिलेटर होते छोटेसे , त्यातून जरी खालचे काही दिसत नसले तरी आव्हाज स्पष्ट ऐकू येत असत , कान देऊन मी आतले संभाषण ऐकत होतो , आत भाऊ आणि वडिलांचे बोलणे सुरु होते ' असा कसा निघून गेला तो तेथून , ते पोलीस काय करत होते ? असे वडील म्हणत होते , तर भाऊ म्हणत होता ' ते म्हणतात की तुमच्या घरातीलच कोणीतरी येऊन त्याला घेऊन गेलेय म्हणून " सगळा प्रकार माझ्या लक्षात आला , मला तीनचार दिवस असाच तेथे पोलीस स्टेशन मध्ये कोठडीत न डांबता ऑफिस मध्ये बसवून ठेवायचे ठरले होते , व त्यानुसार भाऊ माझा रात्रीचा डबा , आणि अंथरूण घेऊन तेथे गेला तेव्हा त्याला तेथील पोलिसांनी तो आमच्या हातून पळाला असे न सांगता , घरातीलच कोणीतरी येऊन मला घेऊन गेले असे सांगून भावाची बोळवण केली होती , भाऊ घाबरलेला होता , कारण त्याला हे अपेक्षित नव्हते , त्याला आता मी पुढे काय पवित्रा घेईन याची भीती होती , पोलीस ही त्याची शेवटची आशा होती पण मी ती धुळीस मिळवली होती व आता मी बदला म्हणून त्याला मारीन की काय अशी भीती त्याच्या मनात होती . , मी तो संवाद एकूण जरा निर्धास्त झालो , म्हणजे आता पोलीस आपल्याला शोधणार नाहीत हे पक्के होते ( कदाचित केस न करता असे डांबून ठेवणे , पोलिसांसाठी देखील कटकटीचे काम असावे ) मी गच्चीवरच आधी ब्राऊन शुगर ओढली तीन पुड्या उद्यासाठी ठेवल्या आणि मग गच्चीवरून खाली अंगणात उतरलो , अंगणात खूप फुलझाडे होती , जाई , जुई , मोगरा , अबोली , गुलाब वगैरे , आईला बागेची खूप आवड असल्याने छान बाग होती आमची , मी तेथील कोपऱ्यातील जाई च्या वेलामागे लपून बसलो

    बाहेर तेथेच ऐक पाण्याचा हौद होता व आई नेहमी पाणी घेण्यासाठी तेथे येई ती बाहेर आली की आधी आईला भेटायचे मग घरात जायचे असे मी ठरवले होते , बराच वेळ झाला तरी अंगणात आई आली नाही , मात्र बहिण जेव्हा अंगणात पाणी घेण्यासाठी आली तेव्हा मी तिला ' ताई ' अशी हाक मारली आणि ती जी एकदम ' सुहास पळ , हा आलाय इथे 'असे मोठ्याने ओरडली त्या बरोबर घरात एकदम हलकल्लोळ मजला , एकदम मोठ्याने ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज आले , ताई पण आत घरात पळून गेली , मला नेमके काय झाले ते समजेना , म्हणून तसाच जाईच्या वेलामागे उभा राहिलो अंधारात जरा वेळाने चार पाच लोकांचे बोलण्याचे आवाज आले , आमच्या आजूबाजूला राहणारे तीनचार लोक टॉर्च घेऊन अंगणात आले आणि सगळीकडे प्रकाशाचा झोत टाकू लागले , शेवटी माझ्यावर प्रकाश पडला , मला पाहून ते म्हणाले , हा तर तुषार आहे . साप वगैरे काही नाही , आणि मी त्यांच्या सोबत आत गेलो तर आई खाली बेशुध्द झाल्यासारखी पडली होती , बहिण आणि तिची मुले रडत उभी होती , भाऊ बहुतेक माझ्या भीतीने घराबाहेर पळाला होता . मग नंतर सर्व प्रकार लक्षात आला की ' तुषार आला ' असे ताई ओरडल्यावर भाऊ बाहेर पळाला आणि भीतीने आईला एकदम मूर्च्छा आली ती खाली पडली ते पाहून सगळे रडू लागले आणि घरातील आरडा ओरडा एकूण बाहेरचे लोक आत आले तेव्हा बहिणीने जेव्हा अंगणाकडे बोट दाखवले तेव्हा त्यांना वाटले अंधारात काहीतरी साप वगैरे पहिला असणार बहिणीने आणि त्यामूळे ते साप मारायला अंगणात आले होते .मला पाहून ते निर्धास्त झाले आर्थात त्यांना हे कळालेच की घरचे लोक सापापेक्षा जास्त तुषारला घाबरतात ॥

    ( बाकी पुढील भागात)

    -- तुषार पांडुरंग नातू

  • भारतमातेच्या वीरांगना – 5 : झलकारी बाई

    आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता.