(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • शून्य सावलीचा दिवस

    पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

    7 मे - कोल्हापूर, मिरज, सांगली.
    10 मे - सातारा, अक्कलकोट.
    11 मे - वाई, महाबळेश्‍वर.
    12 मे - बार्शी, बारामती.
    13 मे - लातूर.
    14 मे - अलिबाग, दौंड, पुणे.
    15 मे - मुंबई.
    16 मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
    18 मे - पैठण.
    19 मे - जालना.
    20 मे - औरंगाबाद, नाशिक.
    21 मे - मनमाड.
    22 मे - यवतमाळ.
    23 मे - बुलडाणा, मालेगाव.
    24 मे - अकोला.
    25 मे - अमरावती.
    26 मे - भुसावळ, जळगाव, नागपूर.

    आपापल्या शहरात शून्य सावली चा अनुभव जरूर घ्या !

  • रेल्वे स्टेशनवरील लुटमार ! (नशायात्रा – भाग ३३)

    सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता .

  • बायको आणि मैत्रीण

    दोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची 'निमी ' , अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते . 'ये तुम्ही पोर पोर तिकडं पलीकडं खेळा ' म्हणणारी ,हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते . फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी ,मंद गालातल्या गालात हसते . काल पर्यंत 'ये मला सायकल शिकव ना ' म्हणणारी 'चल निमे आपण सायकल खेळू ,मी शिकवतो तुला ' म्हणलं तरी ' नको आई रागावते अन मला काम पण आहे . 'म्हणून येण्याचे टाळते . शाळा सुटल्यावर गरगर दप्तर फिरवून पाठीवर घेत धूम घरा कडे पळणारी 'निमी ' आता मात्र छातीशी वह्या पुस्तकांचा गठ्ठा धरून ह्ळुहुळू डौलदार पावले टाकत चालते . काहीतरी तिच्यात बदलेले असत . पण काय ते लक्षात येत नाही . पहिली पासून आपल्या सोबत रोज शाळेत येणारी , रोज दिसणारी ,भांडणारी , रागावणारी ,रुसणारी , चिडणारी ,चिडवणारी , हीच का ती 'निमी '? ती बदललीय ? कि आपण बदलोय ? का दोघे हि बदललोय ?काही काळाने याची उत्तरे दोघांनाही मिळतात . निसर्गाचा रोल हळुवार उलगडत असतो . नव्याने तिची ओळख होत असते . तिची जवळीक हवीहवीशी वाटते . दोन दिवस 'ती ' नाही दिसलीतर अनामिक हुरहूर लागते , बेचैनी वाढते , आतून पोकळ वाटायला लागत , कधी एकदा तिला पाहतो असे होते . हल्ली तिच्याशी वाद आणि संवाद हि सपंण्याच्या मार्गावर असतो . नजरेची भाषा विकसित झालेली असते . न बोलता एकमेकांना सार काही कळत असत ! हि अवस्था असते' मैत्रिणीची ' 'प्रियसी' होण्याची ! काही मायनर डिटेल्स सोडले तर बहुतेकांची हीच स्टोरी असते .

    हि 'प्रियसी ' फेज शिक्षण -नौकरी पर्यंत चालू रहाते . सोबत सिनेमा , हॉटेलिंग , बागभ्रमंती , भन्नाट बाईक रायडींग , चॅटींग , गप्पा , 'गिफ्ट्स ' ..... बरच काही ! मग विषय निघतो लग्नाचा .
    ' आई विचारत होती आपलं 'हे ' किती दिवस चालणाऱय ? लग्नाचं विचार म्हणाली . '
    ' निमे ,करू ग लग्न . काय घाई आहे ? मला जरा घरी विषय तर काढू दे . तुझ्या घरची सम्मती दिसतेय . पण आमच्या कडे जरा अवघडच आहे . बाबांचा तसा काही प्रॉब्लेम नाही . ते काही आईच्या शब्दा बाहेर नाहीत . (आजकालची पिढी 'बाप'ला गृहीत धरतेय, आईचे संस्कार दुसरे काय ?). पण आमची आई म्हणजे ना एकदम 'महा माया -जगदंबा ' आहे ! तिला 'पटवावे ' लागेल !'
    यात शंका घेण्यासारखं काही नाही . काल पर्यंत 'बबड्याला ' आवडतात म्हणून बेसनाचे लाडू करणारी ,(सिनेमातली असलीतरी -गाजर का हलवा नायतर मुली के पराठे करणारी ), थोडं अंग तापलं तर रात्र रात्र जागणारी , खेळताना थोडं खरचटलं कि ' नीट बघून न खेळायला काय झालं ? रोज मेल ते कोपर ,गुडघे फोडून घेणं !' तोंडाने शिव्या देत हाताने जखमेवर हळद भरणारी , परीक्षेच्या वेळेस रात्री - बेरात्री चहा करून देणारी , न सांगता तहानभूक सांभाळणारी आई -बबड्या निमीशी लग्न करायचं म्हटलंकी एकदम बदलते ! डायरेक्ट पाकिस्तान होते !
    'खबरदार ,त्या नकट्या ,निमीच्या नादी लागशील तर ?' रुद्रावतार
    ' आग ,ती फार चांगली मुलगी आहे . मला ती खूप खूप आवडते . अन तू पण मागे तिच्या आईला 'तुमची निमा गोड दिसतीय हो ' म्हणाली होतीस ना ?'
    'मेल्या, ते मागे आत्ता नाही ! तू जर तिच्याशी लग्न करशील तर ,---------------------------
    --तंगड तोंडींन
    --घराबाहेर काढीन
    --कायमच घर सोडून जाईन
    --विहिरीत /रेल्वे खाली उडी मारून जीव देईन
    --मेरा मरा हुवा मुह देखोगे --(सिनेमातली )---
    --खानदान कि इज्जत मिट्टी मे ----(फारच जुन्या सिनेमातली ) महा रुद्रावतार !
    या पैकी एक ,किंवा अनेक ,किंवा सगळ्या धमक्या देते .
    लेकराच्या आनंदात आनंद मानणारी माउली लेकराच्या प्रेमविवाहाला का विरोध करते कोणास ठाऊक?

    या स्थितीत दोन फाटे फुटतात . एक पोट्याच्या हट्टा पुढे हतबल होऊन लग्नास परवानगी देणे . (या कॅट्यगिरीत आम्ही म्हणजे आमच्या सौ . येतात . ) किंवा खंबीर पणे विरोध कायम ठेऊन ,इमोशनल ब्लॅकमेल करून ,त्यांच्या प्रेमात खोडा घालणे व आपल्याला हवी तशी चार चौघीत उठून दिसणारी (टांगळी ), नाकी-डोळी (चष्मा सोडून )नीटस ,देव धर्म पाळणारी ( महालक्षीम्याच्या सोवळ्यातलत्या स्वयंपाकाची सोय ), वडील धाऱ्यांचा (म्हणजे फक्त सासूचा )मान ठेवणारी ,काळी सावळी ( डोमकाळी )
    'सून ' पाहून पोराला बायको म्हणून देणे . (या कॅटॅगिरीत अस्मादिकांच्या मातोश्री येतात .येथे मला जरा सांगायचे आहे . खरे तर मला आईच्या विरोधात जाऊन लग्न करायचे नव्हते . तिच्या नाराजीवर मला माझा प्रेमाचा ताजमहाल उभारायचा नव्हता . शिक्षकांपेक्षा सिनेमांचेच आमच्यावर संस्कार ज्यास्त ! हा हि त्यातलाच एक ! ' तुम अगर मेरी नही हो सक्ती ,त त तो किस और की भी नही !' असे म्हणत प्रियसीला ओरबाडणे ,मारणे -दोन्ही अर्थानी - थोबाडावर ऍसिड फेकणे असले संस्कार आमच्या सिनेमांनी केले नाहीत .! आपल्या सुखा पेक्षा इतरांच्या सो कॉलेड दुःखाचीच आम्हाला ज्यास्त काळजी ! जरा ज्यास्तच विषयांतर झालेले असो .)

    आईची निवड योग्य निघते . 'सून ' म्हणून 'ती ' आईच्या सर्व अपेक्षा पूर्ण करते . कधी दुरोत्तर नाही , भांडण नाही (अर्थात आईशी ), ' काही दिवस चंदू भावजी कडे जाऊन या ,तेव्हडाच तुम्हाला (आणि आम्हाला पण ) बदल होईल , त्यांना पण तुमची सेवा करण्याची संधी मिळेल !' असलं कुचकाड सजेशन नाही , जेवण खाण ,औषध पाणी , सण वार , सोवळं ओवळं ,पुरण वरण ,सवाष्ण ब्राम्हण , सब कुछ एकदम जिथल्या तिथं !

    'आई ' म्हणून तर ती अमीर खान पेक्षा परफेक्शनिस्ट ! मुलांच्या शाळा ,अभ्यास , परीक्षा ,क्लास , सगळं सांभाळत असते . ( मुलांबरोबर माझ्या आईला हिने दुधाचा कप देताना ,आईच्या डोळ्यात एकदा मी पाणी पाहिलं होत ! खोटं कशाला बोलू!).

    आणि ' बायको ' म्हणून विचारलं तर ? लाखात एक ! अशी बायको होणे नाही ! देवांनी असले 'मॉडेल ' बहुदा बंद केल्याचा संशय याव इतकी 'ती ' युनिक असते ! 'बायको ' मग ती कोणत्याही चॅनलची असो -मैत्रीण कम प्रियसी ,वा डायरेक्ट -अंतरपाट धरल्यावर ती जशी विरुद्ध बाजूला असते , तशी अंतरपाट जाऊन लग्न लागले तरी, ती आपला स्टॅन्ड सोडत नाही ! आयुष्य भर नवऱ्याच्या विरोधातच ! काहीही कारण असो वा काहीही कारण नसो ! नवरा समजा रोज गुळगुळीत दाढी करणार असेलतर ' 'काय मेल ,चिकणी दाढी घोटता ! जरा विजू भावजी कडे पहा ! बारीक दाढी ठेवत जा , जरा तरी मॅनली दिसलं !' आपण नवऱ्याच्या पुरुषत्वाचे लक्तर काढतोय हे त्या 'भार्ये'ला काळात हि नाही . जर नवरा जीन -टी शर्ट घालत असेल तर ' काय मेले कळकट कपडे घालता , पोलक्या सारख्या टी शर्टातुन टच टच ढेरी दिसतीय , तसेच घालून फिरता ! तुमच्या पेक्षा तो बाबू धोबीतरी बरा रहातो ! इतके कसे हो बावळट !'
    'चल आज बाहेर जेवायला जाऊ ' म्हणलं कि हिचे उत्तर तयार ' काही नको . सकाळच्या पोळ्या उरल्यात,
    वाया जातीत ! ' इतपत ठीक पण त्याला जोडून 'पैसा काय झाडाला लागलाय , रोज रोज हॉटेलबाजी करायला ? पैल्यापासून उधळा स्वभाव .!' हि अनावश्यक पुस्ती येतेच . बरे घरीच जेऊ म्हणलंतर ' काही हौस नाही ,मौज नाही ! एखाद दिवस डोसा खावा म्हन्लतर यांच्या पोटात पाय शिरतात ! माझंच मेलीच नशीब फुटकं ! ' ( या टप्प्यावर अश्रू पात सम्भवतो ). मला वाटते हि उदाहरणे सॅम्पल साठी पुरेशी आहेत .

    आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्याशी नातं बदलत असत . लग्ना नंतर ती बायको होते . पहिल्या मुलानंतर आई होते . हे मातृत्व खूप विशाल असत . ते सहसा आटत नाही . (आता विषय निघाला म्हणून आणि तुम्ही आपले आहेत म्हणून सांगतो , कोठे बोलू नका . आमच्या लग्नाला छातीस वर्षे झालीत ,आता आमचं नातं विचारलं तर ती माझी 'आई ' अन मी तिचा 'बाप ' असं काहीस आहे . !). बरेचदा ती 'बाप 'पण होते . ! 'दादा गिरी ' नेहमीचीच !, नवऱ्याला कोणी नाव ठेवलं कि हि बया जाम आक्रमक होते . (त्याला नावे ठेवण्याची मोनापली फक्त हिचीच असते !). आणि 'वकील ' (कि व -kill !) होते , तीच जज पण असते , वेळ प्रसंगी डॉक्टर , नर्स ,होते ! शिवाय नवऱ्याच्या वागण्याच्या , बोलण्याचे आणि पगाराचे ऑडिट तीच करते ! हे सर खरं असलं तरी ती नवऱ्याला हवी तशी ' मैत्रीण ' मात्र ती कधीच होत नाही ! पण का ?
    हाच प्रश्न मी आमच्या शाम्याला विचारला .
    ' का आहे तशीच बायकोला मैत्रीण करून घे !' शाम्याचं सोल्युशन
    'अरे पण -- '
    ' का ? लहान पणी घट्ट वेण्याची बावळट निमी मैत्रीण म्हणून चालली ना ? मग आता काय झालं ? सुरश्या मैत्रिणीचं 'असणं ' महत्वाचं असत 'दिसणं' नाही '
    'तरी ... '
    ' मला तू स्पष्ट वहिनी कडून काय अपेक्षा आहेत सांग . '
    'काय शाम्या , तशी ती चांगलीच आहे , पण तीन थोडस स्वतःत बदल केला तर ती the बेस्ट होईल . तश्या या केवळ माझ्याच नाहीतर बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतील . उदाहरणार्थ तिने स्वतः च्या प्रकृतीची काळजी घ्यावी , थोडं वजन कमी करावं , चौफेर नसले तरी काही तरी सकस वाचन करावं , एखादा छंद जोपासावा , अनावश्यक बोलणे टाळावे , माझंच खरं हा अट्टाहास टाळावा , इतरांचं (म्हणजे माझं )मत हि जाणून घ्यावं , बदलत्या जमान्याबरोबर बदलावं , चांगले कपडे घालावेत . '
    ' झालं ? एकंदर तुम्हा नवऱ्यांना ' फुलपाखरा 'सारखी बायको मैत्रीण म्हणून पाहिजे .?'
    'काहीस तसेच '
    ' सुरश्या उद्या सकाळी दाढीच्या नव्हे तर ड्रेससिंग टेबलच्या आरश्या पुढे उभा रहा आणि स्वतः कडे पहा ! वहिनीला बदलायच्या भानगडीत पडू नकोस ! स्वतःस बदल ! 'फुलपाखरं ' फुला भोवती पिंगा घालतात , सुरणाच्या गाड्यावर नाही ! '
    मला शाम्याने दाखवलेल्या 'आरश्याची ' भीती वाटतेय ! तिला हवा तसा मी झालो नाही तर ती मला हवी तशी कशी होईल ? मैत्रिणीची ,प्रियसी आणि प्रियसीची बायको करणं सोपं असत . पण बायकोची पुन्हा मैत्रीण करणं कठीण असत .



    ----सु र कुलकर्णी , आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच , Bye .

  • आधी कळस मग पाया रे !

    सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे.

  • किल्ले सुधागड

    जय महाराष्ट्र

  • इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा

    भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे.आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमां इतकेच महत्व प्राप्त झालेले आहे. म्ह्णूनच तर येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी फेसबुकचा मतदारांपर्यत पोहचण्यासाठी माध्यम म्ह्णून वापर करायला सुरूवातही केली आहे. फक्त मरठी साहित्याच्या दृष्टीने फेसबुकडे पाहिले असता असे लक्षात येते की पूवी फेसबुकवर व्यक्त होण्यासाठी मराठी साहित्यिक इंग्रजीचा वापर करायचे, नंतर ते मराठी इंग्रजीतून लिहू लागले आणि आता मराठी साहित्यिक पूर्णपणे मराठीतून व्यक्त होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सुरूवातीला फेसबुकवर मराठी साहित्य म्ह्णून मराठी कविता आणि विनोद मोठ्या प्रमाणात वाचायला मिळायचे. पण आज सर्वच प्रकारातील मराठी साहित्य फेसबुकवर अगदी मोफत वाचायला मिळ्ते ज्यात कविता, विनोद, कथा, लेख, कादंबरी, जवळ-पास सर्व विषयांना वाहिलेली ई-बुक स्वरूपातील पुस्तके काही नव्याने सुरू झालेली साप्ताहिके आणि मासिके यांचा त्यात समावेश होतो.

    कधी –कधी फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य नक्की कोणाच्या मालकीच आहे या बाबत बर्याचदा संभ्रम निर्माण होतो कारण काही लोक इतरांच्या साहित्याखाली लिह्लेली त्या साहित्यीकांची नावे खोडून साहित्य ‘शेअर’ करतात. हे खरं म्ह्णजे थांबायला हवं. बर्याचदा आपल्याच कविता आपल्याच इतर कोणाच्या तरी नावाने वाचायला मिळतात तेंव्ह आश्चर्याचा धक्काच बसतो खास करून प्रेम कविता. त्यामुळे बर्याचदा नामवंत कवी आपल्या नव्याने लिहलेल्या कविता फेसबुकवर प्रकाशित करीत नाहीत. हा ! पण हे खर आहे की नवोदित लेखक आणि कवी यांच्यासाठी फेसबुक हे एक अमर्याद व्यासपीठ आहे. फेसबुक मूळे आज मराठी साहित्य क्षेत्राला अनेक नवोदित कवी आणि लेखकही लाभत आहेत्. मराठी साहित्याच्या दृष्टीने हे हिताचेच म्ह्णावे लागेल. फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य उत्तम असले तरी त्याला फेसबुकच्या मर्यादांचा सामना करावा लागतोच त्यामुळे फेसबुकवर उपलब्ध असणारे उत्तम साहित्य इतर माध्यमातूनही लोकांपर्यत पोहचायला हवे तसे ते पोहचताना दिसत नाही. ते साहित्य ही आपल्या पर्यत पोहचाव अशी अपेक्षा सर्वसामान्य वाचकांची असणारच. फेसबुक आता पूर्वीसारखे फक्त गपा-टप्पांचे माध्यम उललेले नसून त्याला एका मंचाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आता फेसबुकवर सुरू असलेले रेणुका आर्ट खुले ई साहित्य संमेलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद मराठी साहित्य क्षेत्रात असणारे फेसबुकचे महत्व अधोरेखीतच करीत आहे...

    -- निलेश बामणे

  • एक अविश्वसनिय कलाकृती : मोढेरा सुर्यमंदिर

    आपल्या देशात एवढया सुंदर कलाकृती आहेत/होत्या ना की त्या जगातील सात आश्चर्य आहेत ना सुद्धा मागे सोडतील ,पण तरीही आपल्याला पाहायचं काय असतं ताज महाल ,असं नाही की ताजमहाल सुंदर नाही ,पण डोळे उघडून बघा ,ताजमहाल पेक्ष्या कितीतरी सुंदर वास्तू/मंदिरे भारतात आहेत ,डोलदार पणे दिमाखात अजुनही आपले गतवैभव सांभाळत उभे आहे,विचार करा ,हे परकीय आक्रमणकर्ते ,इंग्रज जर भारतात नसते आले तर आपले किती तरी मंदिरं आता पण दिमाखात उभे असते ,असो ....
    तर भारतात खुप सुर्यमंदिरंआहेत पण त्यातल्या त्यात मुख्य दोन सुर्यमंदिर आहेत ,एक उडीसा मधलं कोणार्क चं सुर्यमंदिर आणि दुसरं गुजरात मधील मोढेरा चं सुर्यमंदिर ....
    अहमदाबाद पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या मेहसाना जिल्ह्यातील मोढेरा मधे हे सुर्यमंदिर १०२२-१०६३ च्या दरम्यान सोळंकी राजा भीमदेव पहिला ह्यांनी बांधलं ,सोळंकी घराणे हे सूर्य उपासक होते आणि म्हणुनच भीमदेव पहिला ह्याने हे मंदिर भगवान सुर्याला समर्पित केलं ,(मंदिर कुणी बांधलं ह्या मध्ये मतांतरे आहेत ,गूगल किंवा इतर माहिती स्त्रोत मध्ये आणि मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखात तफावत आहे ,वरील माहिती ही मंदिर परिसरात असलेल्या शिलालेखावरून घेतली आहे....)
    मंदिर परिसरात शिरताच आपल्याला दिसतं ते सुंदर हिरवेगार गार्डन ,मंदिर परिसर विविध झाडांनी वेढलेला आहे ,गार्डन संपवून आपल्या नजरेत भरतं ते अतिसुंदर असं मंदिर आणी त्याच्यासमोर असलेल भव्य रामकुंड , मंदिर मुख्यतः तीन भागात व्यापलेल आहे, प्रवेश करताच दिसते ते रामकुंड हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर सभामंडप आणि शेवटी गूढमंडप अथवा गर्भगृह. सभामंडपामध्ये अतिशय सुरेख असे कोरीव खांब आहेत. गर्भगृहात प्रदक्षिणेसाठी चिंचोळा मार्ग आहे.
    असं म्हणतात की हे मंदिर अश्या प्रकारे बनवलं गेलं होतं की २१ जून ला सूर्याचे पहिले किरण नृत्यमंडपातून आत येऊन त्या काळी गर्भगृहात असलेल्या सुर्यदेवाच्या सोन्याच्या मूर्तीच्या मुकुटावर असलेल्या हिऱ्यावर पडत असे आणी ते किरण त्या हिऱ्यावरून परावर्तीत होऊन पूर्ण गर्भगृह उजळुन निघत असे,किती नयनरम्य दृश्य असेल ते ,आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो....
    सूर्य जिथे दुपारी बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून(वर्षातील सर्वात मोठा दिवस ) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो....आणी ह्याच वृत्तावर हे मंदिर उभारलेलं आहे ,तेही त्या काळी कुठलेही आधुनीक तंत्रज्ञान नसतांना....
    हे मंदिर मारू गुर्जर स्थापत्य शैली मध्ये बनवलं गेलं आहे ,मंदिराच्या समोरच्या भागात सुर्यकुंड किंवा राम कुंड आहे ,स्थापत्य कलेचा एक अदभुत अविष्कार म्हणजे हे सुर्यकुंड ,ह्या कुंडात १०८ छोटे छोटे मंदिरं आहेत आणी कुंडात जायला पायऱ्या आहेत ,हे कुंड आणी त्या त्या पायऱ्या एवढया कोणबद्ध आहेत की सुमारे बाराशे वर्षांपूर्वी अशी कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली असेल की सर्व पायऱ्या एकदम एकसारख्याच ,राम कुंड किंवा सूर्य कुंड बनवतांना पण खुप विचार केला गेला ,कुंडात १०८ मंदिरं आहेत ते सर्व १२ राशी आणी ९ नक्षत्र (१२*०९) ला ध्यानात घेतलं आहे ....
    भीमदेवांनी कुंड बनवतांना एक विचार केला की सर्व लोकांना तिर्थ यात्रा करणे शक्य नाही म्हणून कुंडातच सर्व मंदिरं बनवले ,आणी कुंड बनवतांना ह्या कुंडात ७ समुद्राचं पाणी ,विविध पवित्र नद्यांचे पाणी टाकण्यात आले ,आणी असं म्हणतात की तेंव्हा पासून त्या कुंडाचं पाणी कधीच आटत नाही.....
    सूर्य कुंडानंतर येतो नृत्य मंडप ह्या नृत्य मंडपात ५२ खांब आहेत जे वर्षातील ५२आठवड्यांना दर्शवतात ,ह्या खांबांवर अतीशय बारीक कोरीवकाम ,नक्षीकाम केलेलं आढळतं, ह्या खांबांची रचना अश्या प्रकारे केलेली आहे की वरतुन खाली बघितलं तर हे खांब गोलाकार दिसतात आणि खालुन वर बघीतल्यास हेच खांब अष्टकोणी दिसतात ....
    खांबांवर रामायण ,महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहे ,आणी नृत्यमंडपाच्या छतावर देखील असेच महत्वपूर्ण प्रसंग कोरलेले आहेत छताची रचना देखील खूप वेगळी आणी कलात्मक पध्दतीने केलेली आहे,मंदिरातील दगड ,खांब हे लॉक पद्धतीने एकमेकांत घट्ट बसवलेले आहेत ,आणी ते एवढे वर्ष होऊन सुध्दा उत्तम आहे ...
    नंतर येतो गर्भगृह ,त्या काळी गर्भगृहात सुर्यदेवांची सोन्याची मूर्ती होती जी आक्रमनकर्त्यांनी लुटून नेली ,मंदिराची नासाधुस केली आणी त्याच्यामुळे आता खंडित झालेल्या ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे,गर्भगृहात आधी जेथे मूर्ती होती तिथे आता दरवाजा बसवुन ते बंद केल्या गेलं आहे ....
    मंदिराच्या गर्भगृहात सूर्य,इंद्र ,विष्णु आणि इतर देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत ,त्या काळात कुठल्याही आधुनिक साहित्या शिवाय एवढी सुंदर आणी बारीक कलाकुसर तेही दगडावर ,विश्वास करायला पण खूप कठीण जातं, बाहेरच्या बाजूलापण पूर्ण बाजुंनी सुर्यदेवांच्या बारा प्रतिमा कोरलेल्या आहेत ज्या वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे आणी सोबतच दहा दिशांच्या बाजुला दहा दिशांचे दिगपाल देखील कोरलेले आहेत ,प्रत्येक दिगपालांसोबत त्यांचे वाहन देखील भिंतींवर कोरलेले आहे ,भिंतीवर सुर्यदेवांची रथारूढ प्रतिमा देखील कोरलेली आहे त्या रथाला ७ अश्व जोडलेले आहेत जे सात वारांचे प्रतीक आहे ,पूर्ण गर्भगृहाभोवती ३६४ हत्ती आणी एक सिंह कोरलेला आहे हे हत्ती आणी सिंह वर्षातील ३६५ दिवसांचे प्रतीक आहे ,मंदिराच्या भिंतीवर इतरही काही देव देवतांच्या महत्वपूर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत ,ह्या सर्व मूर्त्यांच्या सर्वात वरच्या बाजूला विणाधारी सरस्वती मातेची मूर्ती कोरलेली आहे ,ज्याचा अर्थ होतो की आम्ही शिक्षणाला सर्वांत वरचं स्थान देतो ....
    मंदिरावर मुख्यतः धर्म ,अर्थ ,काम ,आणी मोक्ष ह्या विषयानुसार प्रतीमा कोरलेल्या आहेत.
    मंदिरावर त्या काळचे सामाजिक जीवन देखील कोरलेलं आहे ,एका ठिकाणी नृत्य करणाऱ्या स्त्रिया कोरलेल्या आहेत ,त्या एवढया सारख्या कोरलेल्या आहेत की असं वाटतं की त्या एका लयीत नृत्य करत आहे ,आणी त्याच बाजुला पुरुष नृत्य करतांना दाखवले आहे ,ज्यात एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसोबत मॅच होत नाही,म्हणजे पुरुष ऑर्गनाईज्ड नसतात हे सुचवलेलं आहे.....
    हे एवढं सुंदर मंदिर सर्वांत पहिले मोहम्मद गझनी ने लुटलं , नंतर मंदिर परत बनवण्यात आले ,त्या नंतर मंदिर परत धर्मांध मुर्ख खिलजी ने लुटले ,आणी ह्या वेळी त्याने फक्त लुटच नाही केली तर मंदिराची भरपूर लुट केली आणी आपल्या वैभवाला गालबोट लावलं ,त्यानंतर ब्रिटिश आणि इतरही लोकांनी हे मंदिर लुटलं ,एवढी लुटा लूट होऊन देखील मंदिर अजून दिमाखात उभं आहे ....
    #मंदिर परिसरात एक छोटंसं संग्रहालय देखील आहे ,त्यात विविध काळात सापडलेल्या मुर्त्या आहेत ...
    #जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल ,तर मोढेरा नक्कीच तुम्हाला आवडेल .
    कसे जाल :मंदिर अहमदाबाद पासून खूप जवळ आहे (अंदाजे १००किमी) मेहासाना पासून मोढेरा साठी सिटी बसेस सुरू असतात, तुम्ही मेहसाना मधुन खाजगी रिक्षा करून देखील जाऊ शकता, पण बस चा पर्याय योग्य आहे ....
    मंदिर पूर्ण हफ्ता उघडे असते आणी संध्याकाळी ६:०० पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश दिला जातो.…..
    संध्याकाळी मंदिरावर लेसर शो दाखवतात ज्यात मंदिराचा इतिहास आणी इतर माहिती दाखवल्या जाते ,तो लेझर शो एवढा जबरदस्त असतो की तुम्ही आपोआपच म्हणाल की ये लेझर शो नहि देखा तो कुछ नही देखा....
    उत्तरायण काळात इथे गुजरात सरकार तर्फे सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन असते ....
    प्रो टिप:शक्यतो मंदिर बघायला सकाळी सूर्योदय जेंव्हा होतो तेंव्हा जा किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर जा,सुर्यमंदिराची खरी महती सूर्योदयाच्या वेळीच कळते .....
    #अमिताभ बच्चन उगाच नाही म्हणत खुशबू गुजरात की आणी कुछ दिन तो गुजारिये गुजरात मे ...
    -–नितीन काकड
  • एका मनाचे हे भाग

    एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।
    विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,

    छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।
    अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,

    मनाचे स्वभाव, सारखेच असती ।
    फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,

    अगणीत मनें, कोठे नसे फरक ।
    अनेक बनली, जनक तिचा एक....४,

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • चंद्रावरचं पाऊल…

    नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!

    तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंद्रावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंद्राचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...

    तर...

    ...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.

    नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :

    'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'

    तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..

    'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'

    -- विनोद सुर्वे

  • वाढदिवस

    वाढदिवस

    आज रिमझिम पावसातून

    छात्रीविना चालत आलो

    … सारं आभाळ झेलत

    हे शरीर पेलत

    घरी आल्यावर खूप एकटं एकटं वाटलं

    स्वतःलाच कुशीत घ्यावं वाटलं