पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
7 मे - कोल्हापूर, मिरज, सांगली.
10 मे - सातारा, अक्कलकोट.
11 मे - वाई, महाबळेश्वर.
12 मे - बार्शी, बारामती.
13 मे - लातूर.
14 मे - अलिबाग, दौंड, पुणे.
15 मे - मुंबई.
16 मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
18 मे - पैठण.
19 मे - जालना.
20 मे - औरंगाबाद, नाशिक.
21 मे - मनमाड.
22 मे - यवतमाळ.
23 मे - बुलडाणा, मालेगाव.
24 मे - अकोला.
25 मे - अमरावती.
26 मे - भुसावळ, जळगाव, नागपूर.
आपापल्या शहरात शून्य सावली चा अनुभव जरूर घ्या !
सोडावॉटर च्या बाटल्यांचा वर्षाव झाल्यावर जमावाची जी पळापळ झाली ती गमतीशीर होती , वाट फुटेल तसे सगळे सैरावैरा पळत होते , तितक्यात समोरून पोलिसांचे गाडी आली तसे अजूनच गोंधळ झाला , आम्ही देखील पळत दुर्गा गार्डन गाठले , व तेथे अंधारात लपून बसलो , आम्हाला स्वतचेच खूप हसू देखील येत होते , इतक्या तावातावाने निघालेला जमाव केवळ १५ ते २० सोडावॉटरच्या बाटल्यांनी पांगवला होता .
दोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची 'निमी ' , अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते . 'ये तुम्ही पोर पोर तिकडं पलीकडं खेळा ' म्हणणारी ,हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते . फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी ,मंद गालातल्या गालात हसते . काल पर्यंत 'ये मला सायकल शिकव ना ' म्हणणारी 'चल निमे आपण सायकल खेळू ,मी शिकवतो तुला ' म्हणलं तरी ' नको आई रागावते अन मला काम पण आहे . 'म्हणून येण्याचे टाळते . शाळा सुटल्यावर गरगर दप्तर फिरवून पाठीवर घेत धूम घरा कडे पळणारी 'निमी ' आता मात्र छातीशी वह्या पुस्तकांचा गठ्ठा धरून ह्ळुहुळू डौलदार पावले टाकत चालते . काहीतरी तिच्यात बदलेले असत . पण काय ते लक्षात येत नाही . पहिली पासून आपल्या सोबत रोज शाळेत येणारी , रोज दिसणारी ,भांडणारी , रागावणारी ,रुसणारी , चिडणारी ,चिडवणारी , हीच का ती 'निमी '? ती बदललीय ? कि आपण बदलोय ? का दोघे हि बदललोय ?काही काळाने याची उत्तरे दोघांनाही मिळतात . निसर्गाचा रोल हळुवार उलगडत असतो . नव्याने तिची ओळख होत असते . तिची जवळीक हवीहवीशी वाटते . दोन दिवस 'ती ' नाही दिसलीतर अनामिक हुरहूर लागते , बेचैनी वाढते , आतून पोकळ वाटायला लागत , कधी एकदा तिला पाहतो असे होते . हल्ली तिच्याशी वाद आणि संवाद हि सपंण्याच्या मार्गावर असतो . नजरेची भाषा विकसित झालेली असते . न बोलता एकमेकांना सार काही कळत असत ! हि अवस्था असते' मैत्रिणीची ' 'प्रियसी' होण्याची ! काही मायनर डिटेल्स सोडले तर बहुतेकांची हीच स्टोरी असते .
हि 'प्रियसी ' फेज शिक्षण -नौकरी पर्यंत चालू रहाते . सोबत सिनेमा , हॉटेलिंग , बागभ्रमंती , भन्नाट बाईक रायडींग , चॅटींग , गप्पा , 'गिफ्ट्स ' ..... बरच काही ! मग विषय निघतो लग्नाचा .
' आई विचारत होती आपलं 'हे ' किती दिवस चालणाऱय ? लग्नाचं विचार म्हणाली . '
' निमे ,करू ग लग्न . काय घाई आहे ? मला जरा घरी विषय तर काढू दे . तुझ्या घरची सम्मती दिसतेय . पण आमच्या कडे जरा अवघडच आहे . बाबांचा तसा काही प्रॉब्लेम नाही . ते काही आईच्या शब्दा बाहेर नाहीत . (आजकालची पिढी 'बाप'ला गृहीत धरतेय, आईचे संस्कार दुसरे काय ?). पण आमची आई म्हणजे ना एकदम 'महा माया -जगदंबा ' आहे ! तिला 'पटवावे ' लागेल !'
यात शंका घेण्यासारखं काही नाही . काल पर्यंत 'बबड्याला ' आवडतात म्हणून बेसनाचे लाडू करणारी ,(सिनेमातली असलीतरी -गाजर का हलवा नायतर मुली के पराठे करणारी ), थोडं अंग तापलं तर रात्र रात्र जागणारी , खेळताना थोडं खरचटलं कि ' नीट बघून न खेळायला काय झालं ? रोज मेल ते कोपर ,गुडघे फोडून घेणं !' तोंडाने शिव्या देत हाताने जखमेवर हळद भरणारी , परीक्षेच्या वेळेस रात्री - बेरात्री चहा करून देणारी , न सांगता तहानभूक सांभाळणारी आई -बबड्या निमीशी लग्न करायचं म्हटलंकी एकदम बदलते ! डायरेक्ट पाकिस्तान होते !
'खबरदार ,त्या नकट्या ,निमीच्या नादी लागशील तर ?' रुद्रावतार
' आग ,ती फार चांगली मुलगी आहे . मला ती खूप खूप आवडते . अन तू पण मागे तिच्या आईला 'तुमची निमा गोड दिसतीय हो ' म्हणाली होतीस ना ?'
'मेल्या, ते मागे आत्ता नाही ! तू जर तिच्याशी लग्न करशील तर ,---------------------------
--तंगड तोंडींन
--घराबाहेर काढीन
--कायमच घर सोडून जाईन
--विहिरीत /रेल्वे खाली उडी मारून जीव देईन
--मेरा मरा हुवा मुह देखोगे --(सिनेमातली )---
--खानदान कि इज्जत मिट्टी मे ----(फारच जुन्या सिनेमातली ) महा रुद्रावतार !
या पैकी एक ,किंवा अनेक ,किंवा सगळ्या धमक्या देते .
लेकराच्या आनंदात आनंद मानणारी माउली लेकराच्या प्रेमविवाहाला का विरोध करते कोणास ठाऊक?
या स्थितीत दोन फाटे फुटतात . एक पोट्याच्या हट्टा पुढे हतबल होऊन लग्नास परवानगी देणे . (या कॅट्यगिरीत आम्ही म्हणजे आमच्या सौ . येतात . ) किंवा खंबीर पणे विरोध कायम ठेऊन ,इमोशनल ब्लॅकमेल करून ,त्यांच्या प्रेमात खोडा घालणे व आपल्याला हवी तशी चार चौघीत उठून दिसणारी (टांगळी ), नाकी-डोळी (चष्मा सोडून )नीटस ,देव धर्म पाळणारी ( महालक्षीम्याच्या सोवळ्यातलत्या स्वयंपाकाची सोय ), वडील धाऱ्यांचा (म्हणजे फक्त सासूचा )मान ठेवणारी ,काळी सावळी ( डोमकाळी )
'सून ' पाहून पोराला बायको म्हणून देणे . (या कॅटॅगिरीत अस्मादिकांच्या मातोश्री येतात .येथे मला जरा सांगायचे आहे . खरे तर मला आईच्या विरोधात जाऊन लग्न करायचे नव्हते . तिच्या नाराजीवर मला माझा प्रेमाचा ताजमहाल उभारायचा नव्हता . शिक्षकांपेक्षा सिनेमांचेच आमच्यावर संस्कार ज्यास्त ! हा हि त्यातलाच एक ! ' तुम अगर मेरी नही हो सक्ती ,त त तो किस और की भी नही !' असे म्हणत प्रियसीला ओरबाडणे ,मारणे -दोन्ही अर्थानी - थोबाडावर ऍसिड फेकणे असले संस्कार आमच्या सिनेमांनी केले नाहीत .! आपल्या सुखा पेक्षा इतरांच्या सो कॉलेड दुःखाचीच आम्हाला ज्यास्त काळजी ! जरा ज्यास्तच विषयांतर झालेले असो .)
आईची निवड योग्य निघते . 'सून ' म्हणून 'ती ' आईच्या सर्व अपेक्षा पूर्ण करते . कधी दुरोत्तर नाही , भांडण नाही (अर्थात आईशी ), ' काही दिवस चंदू भावजी कडे जाऊन या ,तेव्हडाच तुम्हाला (आणि आम्हाला पण ) बदल होईल , त्यांना पण तुमची सेवा करण्याची संधी मिळेल !' असलं कुचकाड सजेशन नाही , जेवण खाण ,औषध पाणी , सण वार , सोवळं ओवळं ,पुरण वरण ,सवाष्ण ब्राम्हण , सब कुछ एकदम जिथल्या तिथं !
'आई ' म्हणून तर ती अमीर खान पेक्षा परफेक्शनिस्ट ! मुलांच्या शाळा ,अभ्यास , परीक्षा ,क्लास , सगळं सांभाळत असते . ( मुलांबरोबर माझ्या आईला हिने दुधाचा कप देताना ,आईच्या डोळ्यात एकदा मी पाणी पाहिलं होत ! खोटं कशाला बोलू!).
आणि ' बायको ' म्हणून विचारलं तर ? लाखात एक ! अशी बायको होणे नाही ! देवांनी असले 'मॉडेल ' बहुदा बंद केल्याचा संशय याव इतकी 'ती ' युनिक असते ! 'बायको ' मग ती कोणत्याही चॅनलची असो -मैत्रीण कम प्रियसी ,वा डायरेक्ट -अंतरपाट धरल्यावर ती जशी विरुद्ध बाजूला असते , तशी अंतरपाट जाऊन लग्न लागले तरी, ती आपला स्टॅन्ड सोडत नाही ! आयुष्य भर नवऱ्याच्या विरोधातच ! काहीही कारण असो वा काहीही कारण नसो ! नवरा समजा रोज गुळगुळीत दाढी करणार असेलतर ' 'काय मेल ,चिकणी दाढी घोटता ! जरा विजू भावजी कडे पहा ! बारीक दाढी ठेवत जा , जरा तरी मॅनली दिसलं !' आपण नवऱ्याच्या पुरुषत्वाचे लक्तर काढतोय हे त्या 'भार्ये'ला काळात हि नाही . जर नवरा जीन -टी शर्ट घालत असेल तर ' काय मेले कळकट कपडे घालता , पोलक्या सारख्या टी शर्टातुन टच टच ढेरी दिसतीय , तसेच घालून फिरता ! तुमच्या पेक्षा तो बाबू धोबीतरी बरा रहातो ! इतके कसे हो बावळट !'
'चल आज बाहेर जेवायला जाऊ ' म्हणलं कि हिचे उत्तर तयार ' काही नको . सकाळच्या पोळ्या उरल्यात,
वाया जातीत ! ' इतपत ठीक पण त्याला जोडून 'पैसा काय झाडाला लागलाय , रोज रोज हॉटेलबाजी करायला ? पैल्यापासून उधळा स्वभाव .!' हि अनावश्यक पुस्ती येतेच . बरे घरीच जेऊ म्हणलंतर ' काही हौस नाही ,मौज नाही ! एखाद दिवस डोसा खावा म्हन्लतर यांच्या पोटात पाय शिरतात ! माझंच मेलीच नशीब फुटकं ! ' ( या टप्प्यावर अश्रू पात सम्भवतो ). मला वाटते हि उदाहरणे सॅम्पल साठी पुरेशी आहेत .
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्याशी नातं बदलत असत . लग्ना नंतर ती बायको होते . पहिल्या मुलानंतर आई होते . हे मातृत्व खूप विशाल असत . ते सहसा आटत नाही . (आता विषय निघाला म्हणून आणि तुम्ही आपले आहेत म्हणून सांगतो , कोठे बोलू नका . आमच्या लग्नाला छातीस वर्षे झालीत ,आता आमचं नातं विचारलं तर ती माझी 'आई ' अन मी तिचा 'बाप ' असं काहीस आहे . !). बरेचदा ती 'बाप 'पण होते . ! 'दादा गिरी ' नेहमीचीच !, नवऱ्याला कोणी नाव ठेवलं कि हि बया जाम आक्रमक होते . (त्याला नावे ठेवण्याची मोनापली फक्त हिचीच असते !). आणि 'वकील ' (कि व -kill !) होते , तीच जज पण असते , वेळ प्रसंगी डॉक्टर , नर्स ,होते ! शिवाय नवऱ्याच्या वागण्याच्या , बोलण्याचे आणि पगाराचे ऑडिट तीच करते ! हे सर खरं असलं तरी ती नवऱ्याला हवी तशी ' मैत्रीण ' मात्र ती कधीच होत नाही ! पण का ?
हाच प्रश्न मी आमच्या शाम्याला विचारला .
' का आहे तशीच बायकोला मैत्रीण करून घे !' शाम्याचं सोल्युशन
'अरे पण -- '
' का ? लहान पणी घट्ट वेण्याची बावळट निमी मैत्रीण म्हणून चालली ना ? मग आता काय झालं ? सुरश्या मैत्रिणीचं 'असणं ' महत्वाचं असत 'दिसणं' नाही '
'तरी ... '
' मला तू स्पष्ट वहिनी कडून काय अपेक्षा आहेत सांग . '
'काय शाम्या , तशी ती चांगलीच आहे , पण तीन थोडस स्वतःत बदल केला तर ती the बेस्ट होईल . तश्या या केवळ माझ्याच नाहीतर बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतील . उदाहरणार्थ तिने स्वतः च्या प्रकृतीची काळजी घ्यावी , थोडं वजन कमी करावं , चौफेर नसले तरी काही तरी सकस वाचन करावं , एखादा छंद जोपासावा , अनावश्यक बोलणे टाळावे , माझंच खरं हा अट्टाहास टाळावा , इतरांचं (म्हणजे माझं )मत हि जाणून घ्यावं , बदलत्या जमान्याबरोबर बदलावं , चांगले कपडे घालावेत . '
' झालं ? एकंदर तुम्हा नवऱ्यांना ' फुलपाखरा 'सारखी बायको मैत्रीण म्हणून पाहिजे .?'
'काहीस तसेच '
' सुरश्या उद्या सकाळी दाढीच्या नव्हे तर ड्रेससिंग टेबलच्या आरश्या पुढे उभा रहा आणि स्वतः कडे पहा ! वहिनीला बदलायच्या भानगडीत पडू नकोस ! स्वतःस बदल ! 'फुलपाखरं ' फुला भोवती पिंगा घालतात , सुरणाच्या गाड्यावर नाही ! '
मला शाम्याने दाखवलेल्या 'आरश्याची ' भीती वाटतेय ! तिला हवा तसा मी झालो नाही तर ती मला हवी तशी कशी होईल ? मैत्रिणीची ,प्रियसी आणि प्रियसीची बायको करणं सोपं असत . पण बायकोची पुन्हा मैत्रीण करणं कठीण असत .
----सु र कुलकर्णी , आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच , Bye .
सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे.
जय महाराष्ट्र
भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे.आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमां इतकेच महत्व प्राप्त झालेले आहे. म्ह्णूनच तर येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी फेसबुकचा मतदारांपर्यत पोहचण्यासाठी माध्यम म्ह्णून वापर करायला सुरूवातही केली आहे. फक्त मरठी साहित्याच्या दृष्टीने फेसबुकडे पाहिले असता असे लक्षात येते की पूवी फेसबुकवर व्यक्त होण्यासाठी मराठी साहित्यिक इंग्रजीचा वापर करायचे, नंतर ते मराठी इंग्रजीतून लिहू लागले आणि आता मराठी साहित्यिक पूर्णपणे मराठीतून व्यक्त होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सुरूवातीला फेसबुकवर मराठी साहित्य म्ह्णून मराठी कविता आणि विनोद मोठ्या प्रमाणात वाचायला मिळायचे. पण आज सर्वच प्रकारातील मराठी साहित्य फेसबुकवर अगदी मोफत वाचायला मिळ्ते ज्यात कविता, विनोद, कथा, लेख, कादंबरी, जवळ-पास सर्व विषयांना वाहिलेली ई-बुक स्वरूपातील पुस्तके काही नव्याने सुरू झालेली साप्ताहिके आणि मासिके यांचा त्यात समावेश होतो.
कधी –कधी फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य नक्की कोणाच्या मालकीच आहे या बाबत बर्याचदा संभ्रम निर्माण होतो कारण काही लोक इतरांच्या साहित्याखाली लिह्लेली त्या साहित्यीकांची नावे खोडून साहित्य ‘शेअर’ करतात. हे खरं म्ह्णजे थांबायला हवं. बर्याचदा आपल्याच कविता आपल्याच इतर कोणाच्या तरी नावाने वाचायला मिळतात तेंव्ह आश्चर्याचा धक्काच बसतो खास करून प्रेम कविता. त्यामुळे बर्याचदा नामवंत कवी आपल्या नव्याने लिहलेल्या कविता फेसबुकवर प्रकाशित करीत नाहीत. हा ! पण हे खर आहे की नवोदित लेखक आणि कवी यांच्यासाठी फेसबुक हे एक अमर्याद व्यासपीठ आहे. फेसबुक मूळे आज मराठी साहित्य क्षेत्राला अनेक नवोदित कवी आणि लेखकही लाभत आहेत्. मराठी साहित्याच्या दृष्टीने हे हिताचेच म्ह्णावे लागेल. फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य उत्तम असले तरी त्याला फेसबुकच्या मर्यादांचा सामना करावा लागतोच त्यामुळे फेसबुकवर उपलब्ध असणारे उत्तम साहित्य इतर माध्यमातूनही लोकांपर्यत पोहचायला हवे तसे ते पोहचताना दिसत नाही. ते साहित्य ही आपल्या पर्यत पोहचाव अशी अपेक्षा सर्वसामान्य वाचकांची असणारच. फेसबुक आता पूर्वीसारखे फक्त गपा-टप्पांचे माध्यम उललेले नसून त्याला एका मंचाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आता फेसबुकवर सुरू असलेले रेणुका आर्ट खुले ई साहित्य संमेलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद मराठी साहित्य क्षेत्रात असणारे फेसबुकचे महत्व अधोरेखीतच करीत आहे...
-- निलेश बामणे
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।
विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे स्वभाव, सारखेच असती ।
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत मनें, कोठे नसे फरक ।
अनेक बनली, जनक तिचा एक....४,
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!
तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंद्रावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंद्राचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...
तर...
...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.
नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :
'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'
तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..
'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'
-- विनोद सुर्वे
वाढदिवस
आज रिमझिम पावसातून
छात्रीविना चालत आलो
… सारं आभाळ झेलत
हे शरीर पेलत
घरी आल्यावर खूप एकटं एकटं वाटलं
स्वतःलाच कुशीत घ्यावं वाटलं
Copyright © 2025 | Marathisrushti