(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संस्कारांच्या भिंती

    कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही.

  • मुक्ततेनंतरही खडतर लढा सुरू

    म्यानमारमधील लोकशाही लढ्याच्या नेत्या आँगसान स्यू की यांची बंदीवासातून मुक्तता झाली असली तरी त्यांचा जुलमी राजवटीविरुध्दचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे. किंबहुना बांगलादेशासारखे विराट आंदोलन उभे करुन तो यशस्वी करावा लागणार आहे. या लढ्याला बळ प्राप्त होण्यासाठी म्यानमारवर जागतिक लोकशक्तीचे दडपणही आणावे लागेल. या कामी भारताने पुढाकार घ्यावा अशी अनेकांची इच्छा आहे.

  • महाकवि कालिदास कृत रघुवंश

    मूळ संस्कृतात, श्री महाकवि कालीदास रचित रघुवंश च्या ऋचा मराठीत अनुवाद्, कै नागोराव बासरकर ह्यानी ५० वर्षा पूर्वी केलेले आहेत. ह्या ऋचा संग्रहीत करून आपल्यासाठी रोज देत जाईन. कृपया आपला अभीप्राय जरुर नोदवावा.

    —–माधव नागोराव बासरकर .

    रघुवंश सर्ग ३ ( वृत – – वंशस्थ )

    तदा पतीच्या आभिलाष पुरणा /

    साखिचीया लोचन मुख्य तोषाणा /

    ृइक्ष्वाकुच्या संतती आदिकारणा /

    सुदक्षीणा दावित गर्भलक्षणा // १ //

  • बाबूंचे अच्छे दिन आले

    बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट. असे हे बाबूंचे अच्छे दिन सुरु झाले आहेत

  • ज्ञानेश्वरी का वाचावी?

    मी का जगतोय? माझा जन्मच का झाला? काय आहे माझ्या जीवनाचे प्रयोजन? जन्माला आलो, मोठा झालो, आता? माझे हे शरीर मी का जागवतोय? या सा-या प्रयत्नांचे, ताण-तणावांचे फायदे काय? का शिणतोय मी व्यर्थ? या सर्व प्रश्नाची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेस्व्हारी समाजम उअम्जुअन वाचल्याने हे जग सुखाणे भरून जाईल. यासाठी ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी.

  • आझाद सेना .. गुप्त क्रांतिकारी संघटना ! ( नशायात्रा – भाग १६ )

    एकीकडे आम्ही गांजा आणि चरस ओढत होतो तरी नेहमी नशा करताना आमच्या चर्चा मात्र देशहिताच्या व्हायच्या व भ्रष्टाचार , काळाबाजार , जातीयवाद असे विषय आमच्या चर्चेत असत . आमच्या या ‘ गंजडी ‘ समूहात सर्व जातीधर्माची मुले होती आणि आमचा वयाने मोठा असणारा मित्र विलास हा जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत असे तेव्हा तो नेहमी आम्हाला चार चांगल्या गोष्टी सांगत असे

  • भ्रष्टाचार-शिष्टाचार

    गेली तीन वर्षे भातीय राजकारण आर्थिक भ्रष्टाचार या राक्षसामुळे अक्षरशः ढवळून निघालेले आहे. इतिहासाचा मागोवा घेत असताना असे आढळून येते की देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलेल्या पं. जवाहरलाल नेहरु १५ ते १६ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्षरुपाने एकही आर्थिक घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला नाही. आरोप झाला नाही.

  • माह्या गुरजीची गाडी

    फेसबुकवरुन आलेली ही अस्सल कथा भावनाविवश करणारी...... फारच सुंदर वाटली म्हणून शेअर केलेय. अवश्य वाचा....


    तो एक नवयुवक.... डीएड झालेला... गुरुजीची नोकरी लागली... पण दूरच्या जिल्ह्यात.... एका पारधी समाजाच्या तांड्यावर.... जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी... पण तोही अस्सल गुरुजी.... नव्या पिढीचा.... नव्या विचारांचा... अर्थात तुमच्या-माझ्या सारखा.... ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच गेला. दिवसभर एकही पोरगं शाळेकडं फिरकलं नाही.... पण त्याने हार मानली नाही. तो रोज पालावर जायचा. पोरांच्या आई-बापांना पोरांना शाळेत पाठवायला सांगायचा. हळूहळू त्या अडाणी लोकांना पटायला लागलं आणि वेगवेगळ्या वयाची कधीही शाळेत न गेलेली ती रानफुलं शाळा नावाच्या तुरुंगात येवून बसू लागली.... रानावनात लीलया फिरणारी ती मुलं शाळेत मात्र अवघडल्यासारखी बसत... पण आपला मित्रही काही कमी नव्हता. त्याने अशी काही जादू केली कि त्या पोरांना गुरुजी आवडू लागला.... अन् रानात, काट्याकुट्यात ससा, तितर सहज पकडणारे हात ग म भ न गिरवायला लागले.

    नोकरी मिळाल्यावर आपल्या मित्राने त्याची ड्रीम बाईक घेतली. रोज सकाळी तो स्वतः आंघोळ करण्यापूर्वी गाडीला साफ-सुफ करायचा... मगच शाळेची तयारी. नव्या कोऱ्या बाईक वरून शाळेच्या ठिकाणी जावून-येवून करण्य्यात तो रोज थ्रिल अनुभवायचा. ती गाडी त्याची जिवाभावाची मैत्रीणच बनून गेली होती जणू... एक साधा ओरखडा किंवा थोडीशी धूळही गाडीवर पाहून अस्वस्थ व्हायचा तो.... रोज शाळेच्या समोर एका झाडाखाली गाडी लावून शाळा सुरु व्हायची....

    आनंददायी शिक्षण पद्धती वापरल्यामुळं गुरुजीवर मुलांना रागवायची पाळीच कधी येत नव्हती. पोरं रोज गुरुजीची गाडी यायची वाट बघत शाळेजवळ येवून थांबत आणि गाडी गेल्यावरच घरी जात....

    पण............भर झोपेत मोठा आवाज झाल्यावर दचकून झोप मोडावी अन् सुंदर स्वप्न सहज भंग पावावं तसं झालं त्या दिवशी.... रोजच्याप्रमाणे तो गाडीजवळ गेला आणि त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना... गाडीच्या टाकीवर कुणीतरी टोकदार दगडांनी काहीतरी कोरलं होतं. त्याच्या आवडत्या गाडीच्या टाकीवर ओढलेले ओरखडे पाहून तो प्रचंड संतापला. पोरं समोरचं उभी होती. कधीही न सुटलेला त्याचा तोल गेला. तो त्या पोरांना अद्वा-तद्वा बोलू लागला. त्याच्यातील सदसद्विवेकबुद्धी पार हरवून गेली. फक्त राग आणि राग.... पोरं घाबरून गेली. त्यांनी आपल्या गुरुजींना कधीही एवढं रागवलेलं पाहिलं नव्हतं. नेहमी प्रेम करणारा त्यांचा गुरुजी.... पण आज मात्र प्रचंड संतापून त्यांना शिव्या-शाप देत होता आणि एकच विचारात होता.... सांगा कुणी गाडी खराब केली? माझ्या गाडीवर ओरखडे कुणी ओढले?

    पण या रागाच्या प्रसंगी कोण पुढं येणार... . सगळी पोरं भयचकित होऊन एकमेकाच्या तोंडाकडं बघत होती....

    इतक्यात एक चिमुरडी पुढं आली आणि होणाऱ्या परिणामांची काळजी न करता म्हणाली, ‘ गुरजी, मी लिव्हलं तुझ्या गाडीवर..."

    तो खूप चिडला आणि विचारू लागला का पण....? शेवटी ती बोलू लागली "काल गावातून अशीच एक गाडी चोरीला गेली. मला वाटलं, गुरजीची गाडी कुणी चोरून नेली तर...? . म्हणून मी गाडीवर लिव्हलं..... इतका वेळ फक्त स्वार्थी अविचारी रागाने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता.... पण त्या पोरीचे शब्द ऐकले अन् एकदम भानावर आला तो.... तेव्हा कुठं बारकाईनं पाहिलं गाडीकडं त्यानं... गुरुजींनी शिकवलेल्या बाळबोध अक्षरात त्या चिमुरडीनं गाडीच्या टाकीवर कोरलं होतं....

    "माह्या गुरजीची गाडी "

    टचकन पाणीच आलं त्याच्या डोळ्यात.... इतका वेळ आरोपी सापडला कि त्याला शिक्षा करायला शिव-शिवणाऱ्या हातात त्याने ते चिमुकले हात घेतले आणि त्यांच्यावर ओठ टेकवले............

    अश्रूंना वाट मोकळी करून देण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यापुढे..... मुलं बिचारी गोंधळून गेली... गुरुजी अचानक का रडतायेत... हेच कळंत नव्हतं त्यांना..... पण गुरुजींना मात्र सर्वकाही कळलं होतं.... शब्दांच्या पलिकडलं....

    त्यानंतर गुरुजींनी गाडीवरचे ओरखडे तसेच ठेवले... आजही आपला तो मित्र मोठ्या दिमाखात तीच गाडी वापरतोय... अन् तशीच वापरतोय.. तो जेव्हा गाडीवर बसतो.... त्याची छाती गर्वाने फुगलेली असते....

    कुणी विचारलंच तर तो अभिमानाने सांगतो कि, हा मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आहे.....!!!

    कथा आवडली तर नक्की सांगा

  • सेंद्रिय शेती आणि फायदे

    कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !

  • सुखडा झाला साफ…….

    पहले आप, पहले आप म्हणणारे,

    आता म्हणू लागले, बाप रे बाप,

    मोदींची जादू चालली,

    सुखडा झाला साफ…….

    …..