काल-परवाच एक बातमी वाचली होती.. अरूणाचल प्रदेशात रामदेवबाबांनी अरूणाचलमध्ये त्यांचं योग शिबीयेभरविले
होते.. योगाभ्यास घेताना मध्ये मध्ये ते वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते… त्यावेळी त्यांनी देशात बोकाळलेला
भ्रष्टाचार आणि कॉंग्रेस याबाबात बोलाण्यास सुरूवात केली.. त्यावेळी तिथे कॉंग्रेसचेच अरूणाचलल मधुन निवडून
आलेले एक सदस्य उपस्थित होते.. ते चिडले.. आणि चक्क रामदेव बाबांना म्हणाले ”यु ब्लडी इंडियनस्” (????)
इंटरनॅशनल शाळेत मराठी शिकवण्याचा अनुभव.. अमराठी मुलांचा मराठी भाषेबद्दल असलेली अढी..
जवळची ब्राऊन शुगर संपल्यावर माझी चीडचीड वाढली होती , मला ब्राऊन शुगर न मिळाल्याने त्रास होतोय हे मित्रांना सांगणे देखील लज्जास्पद वाटत होते , कारण मग त्यांना समजले असते मी ब्राऊन शुगरच्या आहारी गेलोय ते ( एखाद्या व्यसनीला आपण व्यसनी झालोय हे इतरांजवळ कबुल करायला खूप त्रास होतो , त्याचा अहंकार त्याला हे करू देत नाही ) त्यांनी माझ्याशी खोटे बोल्रून माझ्याजवळचा साठा संपवला होता या बद्दल त्यांचा खूप रागही आला होता .
आज आपल्यासमोर दहशतवाद, पाकिस्तान आणि चीनबरोबरील सीमाप्रश्न,चीनचा पाण्याचा प्रश्न, भारतातील बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न, श्रीलंकेतील लिट्टेंचा प्रश्न असे अनेक देशांत असलेले परंतू त्यावर तातडीची भुमिका घ्यायला लावणारे अनेक प्रश्न आहेत.
नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं नव्हतं. माझ्या मृत्यूनंतर अनेकांना 'महापुरुष' होण्याची घाई झाल्यामुळे माझ्या जिवंत विचारांऐवजी माझे निश्चल पुतळे जागोजागी उभारणेच त्यांना जास्त सोईस्कर वाटले. माझ्या विचारांशी असलेल्या तथाकथित बांधिलकीची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी राजकारणाची दुकानं थाटली. अनेक दुकानं म्हणजे जीवघेणी स्पर्धा आलीच व जीवघेणी स्पर्धा म्हणजे एकमेकाचे गळे कापणं हेही ओघाने आलंच!
माझ्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अनेक वर्षांमध्ये इकडे एकदाही फिरकण्याची इच्छा न झालेले एक नेताजी अपरात्री माझ्या दिशेने येताना दिसले आणि त्यांची माझ्यावरील निष्ठा बघून मला अक्षरश: गहिवरून आले. पण ते माझ्याजवळ पोहोचताच ती 'निष्ठा' नसून 'विष्ठा' आहे हे बघून मी हादरून गेलो. माझ्या काही लक्षात येण्याच्या आतच नेताजींनी त्यांच्या हातातील विष्ठेने माझा चेहरा माखून टाकला व क्षणार्धात ते अंधारात दिसेनासे झाले. पहाटे तरतरीत चेहऱ्याने मॉर्निंग वॉकला निघालेले 'तेच' नेताजी माझ्या पुतळ्याची अवस्था बघून प्रचंड संतापले आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव माझ्याभोवती जमला. माझ्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या दुसऱ्या एका नेत्याचे हे दुष्कृत्य आहे अशी बातमी अगदी सुनियोजितपणे पूर्ण शहरात पसरविण्यात आली व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणारी दंगल पद्धतशीरपणे भडकवून मला विष्ठा फासणारे नेताजी अतीव समाधानाने त्यांच्या आलिशान बंगल्याच्या हिरवळीवर महागड्या व्हिस्कीचे घुटके घेत पुढील राजकीय डावपेचांची आखणी करण्यात गर्क झाले!
माझ्या पुतळ्यावरून झालेली पहिलीच दंगल ही परकीयांसाठी एक सुवर्णसंधी ठरली. अनेकांचे नाहक जीव घेणारी व असंख्यांचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त करणारी ती दंगल शांत झाल्यानंतर एक दिवस माझी नजर माझ्या चौथऱ्याकडे गेली तर मध्यरात्री तिथे दोन परदेशी नागरिक गंभीर चर्चा करीत बसले होते. त्यांच्या हातात आपल्या देशातील पुतळ्यांच्या लांबलचक याद्या होत्या. पुतळ्यांच्या नावांसमोर त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचा तपशील लिहिला होता. कोणत्या पुतळ्याला केव्हा मानवीय विष्ठा, शेण किवा डांबर फासायचे, कोणत्या पुतळ्यांच्या गळ्यात चपला व जोड्यांचे हार घालायचे याची योजना तयार करण्यात ते गर्क झाले होते. चर्चेच्या शेवटी एक दुसऱ्याला अत्यानंदाने म्हणाला, ''या पुतळ्यांमुळे आपलं काम किती सोपं झालं. स्वार्थाच्या पोळ्या शेकण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर अत्यंत निर्लज्जपणे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशात मनसोत्त* धुमाकूळ घालण्यास आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहे!''
परकीयांनी आमच्या वागण्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे म्हणूनच अगदी क्षुल्लक कारणावरून ते आमच्या देशात मोठ्या दंगली भडकवू शकतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ न निष्पाप नागरिकांना भडकवणारे स्थानिक नेते हे तर त्यांचे बिनीचे सरदारच! मी अंतर्मुख झालो असतानाच जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा पळणाऱ्यांना बघून आश्चर्यचकित झालो. एका नेत्याचे पोस्टर दुसऱ्या नेत्याने फ ाडल्यामुळे शहरात प्रचंड दंगल उसळली होती. त्या गदारोळात ते दोन परकीय नागरिक अचानक माझ्या दृष्टीस पडले. विलक्षण आनंदाने एक दुसऱ्याला टाळी देत म्हणाला, ''काल पुतळा, तर आज पोस्टर, तर उद्या आणखी काही. या देशात वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार!''
-- श्रीकांत पोहनकर, पुणे
98226 98100
एकदा एक तरुण संन्यासी प्रवास करीत असताना, त्याला असाच एक प्रवासासाठी बाहेर पडलेला संन्यासी भेटतो. दोघे एकमेकांना अभिवादन वगैरे करतात आणि पुढचा प्रवास एकत्र करायचा ठरवतात. दुसऱ्या संन्याशाच्या झोळीमध्ये काहीतरी जड वस्तू असते. तो ती झोळी सतत सांभाळतो आहे असे पहिल्या संन्याशाच्या लक्षात येते. रात्री झोपताना सुद्धा तो ती झोळी दूर ठेवायचा नाही. याचे पहिल्या संन्याशाला राहून राहून आश्चर्य वाटत राहते.
त्यांचा प्रवास चालूच राहतो आणि पहिल्या संन्याशाला जाणवते की याचे जास्त अवधान त्या झोळीवरच आहे. एकदा सायंकाळी दोघे एका विहरीपाशी हातपाय धुवायला थांबतात आणि तीच संधी पाहून पहिला संन्यासी त्याच्या झोळीत काय आहे ते पाहतो. त्यात एक सोन्याने भरलेली लहान पेटी असते. ती पेटी तो तिथेच टाकून देतो आणि एक त्या आकाराची वीट झोळीत ठेवतो.
ते पुढे जायला निघतात, तर दुसरा म्हणतो,"आता संध्याकाळ झाली आहे आणि पुढे जंगल आहे. चोराचिलटांची भीती आहे आपण येथे कुठेतरी मुक्काम करू." त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे आपण संन्यासी! आपल्याला काय फरक पडतो?" फार आग्रह केल्यावर शेवटी दुसरा जंगलातून पुढे जायला तयार होतो. जंगलात रात्री मुक्काम करताना तो झोळी अगदी स्वतःच्या जवळ ठेवून झोपतो. अधुनमधुन चाचपून खात्री करून घेत असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पहिला संन्यासी त्याला, झोळीची इतकी काळजी का वाटते ते विचारतो. त्यावर तो सांगतो की त्यात सोने भरलेले एक पेटी आहे आणि तो ती पेटी जपत आहे. काय जाणो संन्यासी असलो तरी कधीकाळी ते सोने उपयोगाला येईल? त्यावर पहिला संन्यासी म्हणतो,"अरे सोन्याचा मोह आपण का ठेवावा? आणि तसेही तू काल सायंकाळपासून जे वागवतो आहेस, इतक्या काळजीने जे सांभाळतो आहेस, ज्यापायी तू रात्रीची झोप निवांतपणे घेऊ शकला नाहीस, ते सोने नसून एक वीट आहे. पाहा."
वरील कथा मी जेव्हा वाचली तेंव्हा माझ्यावर तिचा फारच परिणाम झाला. मला ती गोष्ट वाचून असे जाणवले की सोने म्हणून इतके दिवस जवळ बाळगलेले असे बरेच काही आपल्याकडे असू शकेल, की जे जपण्यासाठी आपण जीवापाड धडपडतो, खूप मानसिक ऊर्जा त्यापायी व्यस्त करतो, जे वास्तवात सोने नसून बदललेल्या परिस्थितीमध्ये मातीच असू शकेल. आपण थोड्या थोड्या अंतराने आपल्याला तपासून पाहणे, आपले 'पान रिफ्रेश' करणे हेच हितावह आहे. वर्तमानात जगण्याचा जो उपदेश आपल्याला तत्त्वज्ञ देत असतात, त्याकडे जाण्याचा हा एक चांगला उपायच आहे असे मला वाटले.
-- दीपक गायकवाड
अमेरिकेत बेकारी पुन्हा वाढू लागली असून त्यावर मात करण्यासाठी ओबामांना आर्थिक सवलतींची नवी योजना जाहीर करावी लागणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकन काँग्रेसच्या द्वैवार्षिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील आर्थिक परिस्थिती न सुधारल्यास निवडणुका जिकणे डेमॉक्रेटिक पक्षाला कठीण जाणार आहे. या समस्येवर वेळीच योग्य उपाय योजले न गेल्यास दुसर्या मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कुठच्याही मंत्रोच्चाराने परमेश्वर प्राप्ती होणे अगोदर जीवाला ब्रम्हमय होणे जरुरी असते
"माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी".
"कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे.बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्यावरची घडी मोडू देत नाहीत.बायका काय वाटेल ते बोलतात."शी ! कसले हो हे भडक रंग !"
लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो.निष्काम, निरहंकारी चेहरा ! समोरची बाई म्हणत असते, "कसला हा भरजरी पोत !"
हा शांत.
गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ,"अथोक्षजाय नम: । अच्युताय नम: । उपेंद्राय नम: । नरसिंहाय नम: ।" ह्या चालीवर सांगत असतो.
सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?"एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.आपली स्वतःची बायको असूनसुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते.पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात,"नारायण, इचलकरंजी लेमन घे"खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.
- पु. ल. देशपांडे
आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या …..
Copyright © 2025 | Marathisrushti