(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • आरोप…

    वर्तमान राजकीय-सामाजिक परिस्थिती ही फारच विदारक व केविलवाणी आहे, तरी ती परिस्थिती कमीत कमी शब्दात मांडण्याचा/व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • आमची कोस्टारिकाची सफ़र-

    जवळ जवळ तीन-चार महिने आधी ठरविलेली कोस्टारिकाच्या सफ़रची तारीख जस जशी जवळ आली तस तशी आमची उत्सुकता वाढतच होती. तो देश कसा असेल, माणसं कशी असतील, हवामान आपल्याला मानवेल की नाही, आणि मूख्य म्हणजे टूर मध्ये असलेले ईतर लोक कसे असतील

  • एकत्र कुटुंब

    जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.

  • लग्न आणि विघ्न गूढ

    आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.

  • संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा

    सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रामुख्याने वार्षिक सर्वसाधारण, विशेष सर्वसाधारण आणि अधिमंडळ यांची मासिक सभा. सर्वसाधारणपणे नावातून आपण अंदाज घेऊ शकतो को, वार्षिक (वर्षातून एकदा), अधिमंडळ सभा मासिक (महिन्यातून एकदा) परंतु विशेष सर्वसाधारण सभा कधी, कोण, कशाप्रकारे आणि कशासाठी बोलावण्यात येते? याबाबतची माहिती सदर लेखातून आपणास मिळणार आहे.

  • सावरकर नावाची दहशत !!!

    सावरकर... त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा !

    दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता.
    इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलिया मधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.

    ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले "तुम्ही श्री *** ना ?"
    त्या अधिकाऱ्याने सांगितले "हो". "पण मी आपणास ओळखले नाही!"

    त्या प्राचार्याने सांगितले "तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये ".

    क्षणार्धात ओळख पटली.

    प्राचार्यांनी विचारले "ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहीले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्याच्यात दीडशे गुणांचा फरक होता आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते . बरोबर ?"

    ते अधिकारी उत्तरले "हो."

    "कारण माहीत आहे?", प्राचार्यांनी विचारले.

    "नाही" ते अधिकारी उत्तरले.

    "जाणून घ्यायचंय ?" प्राचार्य.

    "हो", अधिकारी.

    "सांगतो...", प्राचार्य.

    त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे!

    ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते "रत्नागिरी" ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .
    त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता.

    सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.

    "आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला". ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षार्थी असल्याने मला सर्व माहीत आहे.

    सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.

    मित्रांनो, आपला शत्रू आपली खरी परीक्षा करतो असे म्हटले जाते ते उगाच नाही.

    जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.

    हा प्राचार्य होता रँग्लर रघुनाथराव परांजपे आणि हा विद्यार्थी होता श्री वेलणकर! संस्कृत भाषेचे तज्ञ! आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते श्रीराम भिकाजी वेलणकर!!

  • काय म्हणावं या बायकांना

    आता बोला… काय म्हणावं या बायकांना

  • वाहातं रहा…

    वाहातं रहा आता ऐकूया ऑडिओ स्वरुपात...

    लेखक - नितीन साळुंखे

    आवाज - माधुरी लोणकर

  • हम दो… हमारा कोई नही

    कारकिर्दीबद्दलच्या महत्त्वाकांक्षेमुळे बरेचदा स्त्रिया कौटुंबिक सुखाशी तडजोड करतात. गर्भावस्था आणि बाळंतपण यासाठी आता मोठ्या शहरांमधील उच्चपदस्थ महिलांकडे वेळ राहिलेला नाही. त्यामुळे आजकाल बरीच जोडपी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतात. नवी जबाबदारी अंगावर घेऊन कारकिर्दीशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. जोडीदाराबरोबर स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो.

  • महाराष्ट्र दिन १ में २०११

    हे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.