(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मी….

    मी – मी करुन कोणी मोठा होत नसतो

    म्हणून वावरतांना, मी पणा टाकायचा असतो …………..

      September 21, 2010


  • सायकल – एक आठवण

    रविवारचा दिवस होता. मुलाची सायकल रिपेअरिंग ला घेऊन गेलो. दुकानामध्ये खूपच गर्दी होती. सर्वच्या सर्व सायकल लहान मुलांच्याच रिपेअरिंगला आलेल्या. मोठी सायकल रिपेअरिंगला दिसलीच नाही. लहान्यांच्याच सायकलींची गर्दी होती. वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता.

      June 5, 2023


  • मोरपीस

    मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस

      August 27, 2013


  • पद्मविभूषण पुरस्कार

    पद्मविभूषण हा भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.

      August 28, 2010


  • कृतज्ञता

    मी आज तुम्हांला चित्रपटातील हिरो व जगावर अधिराज्य करणारा सुपरस्टार, खर्‍या जीवनातही कसा सुपरहिरो आहे ते सांगणार आहे . . .

    अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी 1984 सालची ही गोष्ट . . .

    त्या काळातील नावाजलेले सुपरहिट डायरेक्टर-प्रोड्युसर प्रकाश मेहरा हे सन 1982 ते 1984 च्या दरम्यान प्रचंड आर्थिक नुकसानीत होते . . .

    गाडी, बंगला व इतर संपत्ती सर्व गहाण पडले होते . . .

    राजाचा रंक कसा व कधी होईल हे अनेकांना न समजणारी गोष्ट आहे . . .

    या वाक्याप्रमाणेच प्रकाश मेहरा यांचे झाले होते . . .

    प्रचंड कर्जाच्या ओझ्याने सर्व बाजूने दबाव व मार्केटमधील कमी होत चाललेली पत पाहता प्रकाशजींना जगणे मुश्कील झाले होते . . .

    परंतु प्रकाश मेहरा हार मानणार्‍यांपैकी नव्हते . . .

    एक दिवस त्यांना एक पटकथा समोर आली, त्यांना ती खूप आवडलीही, पण या पटकथेला शोभणारा व योग्य न्याय देणारा हिरो असावा तर फक्त अभिताभ बच्चनच . . .

    असे त्यांना मनोमन वाटले, पण अमिताभ बच्चन तर सुपरस्टार आहे, त्यांच्याकडे अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत आणि आपल्याला त्यांचे मानधन द्यायला जमेल का?
    असे अनेक प्रश्न निर्माण झाले . . .

    या आधी अमिताभ बच्चन यांना बरोबर घेऊन अनेक चित्रपट केलेले होते. प्रकाश मेहरांनी निर्देशित केलेल्या अनेक चित्रपटांमुळेच अमिताभ हे सुपरस्टार झाले होते. प्रकाश मेहरांनी 'जंजिर' या चित्रपटात प्रथम भूमिका दिली होती व तिथून पुढेच अमिताभजींचे सर्व चित्रपट सुपरहिट होत गेले.
    पण या बाबत त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंभाव व अहंकार उफाळून आला नाही.
    उलट अमिताभ हा सुपरस्टार आहे म्हटल्यावर आपला चित्रपट साईन करेल का ? या विचारांनी मनात काहूर उठले होते . . .

    काय करावे ? काय करु नये ? या विचारात आठ दिवस प्रकाश मेहरांचे मन सुन्न झाले होते, पण नंतर विचार केला की आपण एक फोन करुन तर पाहू . . .?

    मनाची तयारी करुन प्रकाशजींनी अमिताभ बच्चन यांना फोन लावला . . .
    फोन PA नी ऊचलला, आणि त्याने बच्चन साहेबांना फिल्म निर्देशक प्रकाश मेहरांचा फोन आहे असे सांगितले . . .

    बच्चन साहेबांनी फोन घेतला व बोलायला सुरुवात केली . . .

    समोरुन प्रकाश मेहरा :
    "अमिताभजी, माझ्याकडे नवीन व अर्थपूर्ण स्क्रिप्ट तयार आहे आणि मला वाटते की, यातील मुख्य भुमिकेला फक्त तुम्हीच न्याय देवू शकता . . . !"

    अमिताभ बच्चन यांनी काहीही उत्तर न देता फोनचा रिसीव्हर ठेवून दिला . . .

    प्रकाशजी खूप नाराज झाले, त्यांना वाटले की, सुपरस्टार असल्याने बच्चनसाहेब खूप बिझी असणार; अन् आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसणार; म्हणूनच काहीही उत्तर न देता फोन ठेवला असावा . . .?

    या प्रकाराने प्रकाशजींचे डोकं खूप जड झालं होतं, त्यांनी पत्नीला चहा मागितला . . .

    फोनच्या रिसीव्हरकडे एकटक नजर लावून प्रकाशजी चहा घेत होते . . .

    अचानक दारावरच्या बेलचा आवाज खणखणला . . .

    प्रकाशजी स्वत: उठले व जड पावलांनी दार उघडण्यासाठी गेले . . .

    समोर बघतात तर काय?

    दरवाज्यात फिल्मइंडस्ट्रीमधील सुपरस्टार पत्नी जया बच्चन यांच्यासह दांपत्य साक्षात हजर होते . . .

    प्रकाशजींना प्रचंड आनंद झाला . . .

    तोंडातून शब्दही फुटेना . . .

    आभाळ ठेंगणे वाटायला लागले . . .

    साक्षात परमेश्वरच आपल्या दारात उभे असल्याचा भास झाला . . .

    प्रकाशजी व त्यांच्या पत्नीने दोघांचे आदराने स्वागत केले . . .

    पाहुणचाराबरोबर चर्चा चालू झाली . . .

    प्रकाश मेहरा नवीन स्क्रिप्ट सांगू लागले . . .

    तेवढ्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांना थांबविले व म्हणाले की, "प्रकाशजी, तुम्हाला स्क्रिप्ट आवडली म्हटल्यावर मला सांगण्याचा प्रश्नच येत नाही . . .!"

    "आत्ता लगेच अॅग्रीमेंट करुन घ्या व आज पासून तीन महिन्यात आपला चित्रपट रिलिज झाला पाहिजे अशा तयारीला लागा . . .!"

    असे बोलून अमिताभ बच्चन यांनी सध्या चालू असणार्‍या चित्रपटांच्या निर्देशकांना लगेच फोन केले व सांगितले की, "मी तीन महिने आपल्या चित्रपटांचे शुटिंगसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. आपले उर्वरित शुटिंग तीन महिन्यांनंतरच सुरु होईल . . ."

    प्रकाशजींनी वकील बोलावून डाॅक्युमेंटची व्यवस्था केली . . .

    पण अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एक अट घातली . . .

    अमिताभ बच्चन :
    "आपला चित्रपट न थांबता सलग काम करुन चित्रपट तीन महिन्यात पुर्ण करु...!
    पण त्यासाठीचे माझे मानधन मी स्वत: ठरविणार . . .
    तुम्ही द्याल त्यात माझे समाधान होणार नाही . . .

    प्रकाश मेहरा हे आधीच आर्थिक अडचणीत ? त्यात ही वेगळीच अट ? काय करावे काही समजेना ?
    पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खूप गाजणार व सुपरहिटही होणार याची खात्री असल्याने त्यांनी लगेच ही अटसुध्दा मान्य केली . . .

    सर्व डाॅक्युमेंट तयार झाले अन् सहीसाठी अमिताभ बच्चन यांच्यापुढे ठेवले . . .

    अमिताभ बच्चन यांनी अॅग्रीमेंटवर आधी सह्या केल्या व मानधनाच्या जागी स्वत: रक्कम टाकली . . .

    मित्रांनो; ही रक्कम होती फक्त एक रुपया . . .

    ?होय, फक्त एक रुपयाच . . . !

    अजब आहे ना ?
    ?यालाच तर कृतज्ञता म्हणतात . . .

    ज्या माणसांमुळे आपण सुपरस्टार झालो, तो माणूस आज अडचणीत आहे आणि त्यांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपली मदत होते म्हटल्यावर निस्वार्थपणे लगेचच पुढे होऊन समोरच्याला सावरण्यासाठी खूप मोठे मन व वाघाचे काळीज लागते . . .

    प्रकाशजींनी अॅग्रीमेंट वरील रक्कम पाहिली व त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले . . .

    प्रकाशजींनी उभे राहून बच्चन साहेबांना मिठी मारली व एकदाचा बांध फुटला . . .

    साक्षात माणसातला माणूसकी जपणारा भगवंत आज त्यांना सावरायला त्यांच्या घरी, त्यांच्या जवळ हजर होता . . .

    मित्रांनो, येथे दोन्ही मातब्बर श्रेष्ठ म्हणावे लागतील . . .

    कारण प्रकाश मेहरांनी जर पूर्वी चांगले काम केले नसते तर हा दिवस उजाडलाच नसता . . .

    बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे 18 मे 1984 रोजी संपूर्ण देशभर सर्व चित्रपटगृहांमध्ये हा अनोखा व अायुष्याला कलाटणी देणारा चित्रपट रिलीज झाला आणि सुपर-डुपर हिट ठरला . . .

    ?हा अनोखा चित्रपट होता ____शराबी

    हाच तो चित्रपट ज्याने प्रकाश मेहरांच्या आयुष्याला नव कलाटनी देवून पुन्हा सोन्याचे दिवस आणले . . .

    मला माहिती आहे की, मी थोडक्यात वाचलेली वा ऐकलेली ही कथा माझ्या शब्दशैलीत लिहिल्यामुळे एखाद्याला आवडेल किंवा नाही पण आवडणार . . .

    पण मला मात्र कृतज्ञता या शब्दाच्या अर्थासाठी अगदी समर्पक वाटली म्हणून अवर्जून लिहिण्याचे धाडस केले आहे . . .

    आयुष्यात आपणही असेच वागलो तर आपल्याही आयुष्याचे सोनं होईल असे मला मनोमन वाटते . . .

    ?नाहीतरी या जन्मात दुसरे आहेच काय ?

    आपल्यामुळे जर एखाद्याचा संसार पुन्हा उभा राहत असेल तर यापेक्षा आपल्या आयुष्यातील पुण्याचे काम दुसरे असूच शकत नाही . . .

    म्हणून आपल्या बरोबर असणारांचा नेहमी आदर करा... त्यांना विश्वासाने जिंका, व त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव पावलो-पावली ठेवा . .

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

      November 9, 2016


  • ८ सप्टेंबर

    भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.
    पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 8, 2016


  • राहिलंच…..

    आयुष्य जगतांना खूप काही "राहिलंच" ही खंत आयुष्यभर राहाते. अगदी लहानपणापासून काहीतरी राहून गेलेलं असतं. कुणाचं गोट्या खेळायचं राहिलेलं असतं तर कुणाचं गिल्ली दांडू खेळायचं, कुणाचं शाळेला दांडी मारायचं राहिलेलं असतं तर कुणाचं वादविवाद स्पर्धेत भाग घेण्याचं.
    शाळा सोडून कॉलेज ला गेल्यावर सुद्धा काहीतरी राहिलेलं असतं. कुणाचं कॉलेज कट्ट्यावर बसायचं राहिलेलं असतं तर कुणाचं प्रेमात पडायचं राहिलेलं असतं. कॉलेज बुडवून सिनेमा पाहायचं राहिलेलं असतं किंवा सायकल वर बसायचं देखील राहिलेलं असतं.
    हे सगळं "राहिलेलं" राहिलेलं असतं ते कधी दडपणामुळे तर कधी परिस्थिती मुळे. पण जेव्हा मोठेपणी राहून जातं ते मात्र सर्वस्वी स्वतः मुळेच राहिलेलं असतं. याचे खापर फोडायला जेंव्हा वय, परिस्थिती, दडपण कामी येत नाही तेंव्हा मात्र नाईलाजाने स्वतः वर घेणं भाग पडतं ! इथे दुबळ्या मदतीला येतात ते वेळ, Ego, स्टेटस, वय किंवा जवाबदारी.
    आपण आपल्या कार मध्ये बसून कुठल्याश्या ग्रामीण भागात जातो, तिथे कुणाकडे तरी जाण्या साठी रस्ता नसतो मग कार मधून उतरून पायी जात असतो, रस्त्यात मुलं गिल्लीदांडू खेळत असतात, आपल्याला आठवण होते आबक-दुबक-तिबक ची ! खेळावं वाटतं पुन्हा स्टेटस परवानगी देत नाही. मग राहून जातं....
    आपण अधिकारी आहोत, आपल्याकडे काम घेऊन किंवा हाताखाली काम करणारा शाळेतला मित्र असतो, त्याला जवळ घेऊन गप्पा मारायच्या असतात पण आडवा येतो Ego. आपली बदली होते, बदलीच्या ठिकाणी जॉईन होतो आणि लक्षात येतं, गप्पा मारायचं राहिलंच......
    रस्त्याने जातांना एखाद्या लग्नाची वरात जात असते, आपल्या तरुणपणीच गाणं वाजत असतं, गाडीतून उतरून त्या 'बेगानी शादी'त 'दिवना' होऊन नाचावं वाटतं पण आडवं येतं ते वय ! गाडी पुढे आणि वरात मागे जाते तेंव्हा लक्षात येतं, नाचायचं राहिलंच......
    मोठे होतो, कामं वाढतात, वेळ पुरत नाही काहीच करण्यासाठी, मग उरकून घ्यायचं असतं सगळं, याच गडबडीत कधी तरी नकळत प्रेमात पडतो. सुरुवातीला बरं वाटतं ते आल्हाददायक. हळू हळू हे आल्हाददायक आल्हाद'दाहक' कधी होतं हे समजतच नाही. प्रेमाची दाहकता ब्रेकअप पर्यन्त पोचते. वेळेअभावी संभाव्य ब्रेकअप टाळू शकत (कधी कधी इच्छित शुद्ध) नाहीत. घाईघाईने ब्रेकअप चा मुहूर्त ठरतो. वेळ आणि तारीख निश्चित होते. वेळेत पोचतो. तक्रारींची आणि आरोपांची देवाणघेवाण होते. ठरल्या प्रमाणे ब्रेकअप with कॉफी. होतो सुद्धा. घड्याळ पाहून निघू का? विचारतो......
    आणि टॅक्सीत बसल्यावर लक्षात येतं, सालं, एकदा मिठी मारून पोटभर रडायचं "राहिलंच...."

    तर हे "राहिलंच" कधीच राहू देऊ नका. काही राहिलेल्याला पुन्हा संधी मिळते पण काही "राहिलेलं" पूर्ण आयुष्यात कधीच परत येत नाही. ते राहिलेलं राहूनच जातं, कायमचं...

    तळ टीप :- तीन वर्षांपूर्वी माझे नाना(वडील) गेले. त्यांचा देहदानाचा संकल्प मलाच पूर्ण करायचा होता, मेडिकल कॉलेज 80km दूर. मृत्यू नंतर 6 तासांच्या आत मला त्यांना 'घेऊन' पोचायचं होतं म्हणून जेमतेम दिडतासच घरात ठेवून निघालो होतो. जवाबदारी होती न ती माझी, आणि माईची सुद्धा जवाबदारी माझीच !
    पर्यायाने, नानांच्या छातीवर पडून ओस्काबोक्शी रडायचं, राहिलंच....

    विनोद डावरे, परभणी

    ##सहजच सुचलं- 83

      October 31, 2018


  • साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!

    दैनिक लोकसत्ताच्या रविवार २९ ऑगस्ट २०१० च्या अंकात श्री अरुण जाखडे यांनी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मत मांडले आहे.

      September 3, 2010


  • ब्लँकआउट ( बेवड्याची डायरी – भाग २४ वा )

    काही जण तर या ‘ ब्लँकआउटच्या ‘ अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात..

      April 26, 2020


  • वाचावेसे वाटले म्हणून – भाग 2

    १९८० सालचा , कदाचित या शतकातील सर्वोत्तम , अजरामर असा , विम्बल्डनचा अंतिम फेरीचा सामना.
    बियाँर्न बोर्ग विरुद्ध जॉन मॅकॅन्रो.
    शायर अदम म्हणतो,
    दो मस्तियों के दौरे मे आया हुआ है दिल,
    लबपर किसी का नाम है, हाथों में जाम है ।

    कुरळे केस डोळ्यावर येऊ नयेत म्हणून कपाळावर रुंद बँड लावलेल्या, देखण्या तरण्याबांड जॉनने , बोर्ग व त्याचे चाहते स्थिरस्थावर होण्याआधीच पहिला सेट २०/२२ मिनिटांत ६-१ असा खिशात घातलेला.पण जबरदस्त पुनरागमन करत बोर्गने दुसरा सेट तीव्र संघर्षानंतर ७-५ असा जिंकला. तर अनुभवाच्या आणि संयमाच्या बळावर तिसरा सेटही ६-३ असा त्यामानाने सहज जिंकला. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत हार मानेल तर तो जॉन कसला. त्याने कडवा प्रतिकार करत , 'attack is the best defense' या उक्तीनुसार चौथा सेट ६-६ अशा स्कोअरवर आणून ठेवला. आणि आमची खरी गोची पुढेच झाली. लॉन टेनिस हा श्रीमंती खेळ , त्या खेळाचे नायकनायिका आणि त्या खेळाचे नियम हे सारेच आमच्यासाठी नविन होते. त्याबाबतीत आम्ही अजूनही शिशुवर्गात होतो. तो सेट टायब्रेकरवर गेला आणि आमचा गडबडगुंडा उडाला. एकाने एक(च) सर्व्हिस का केली ? मग दोघेही दोनदोन सर्व्हिस का करु लागले ?...सगळाच आनंद. टायब्रेकचा स्कोअर ६-६ काय , १२-१२ काय , काहीच समजेना. आणि एकदम स्कोअर १८-१६ होऊन जॉनने तो सेट ७-६ असा जिंकल्याची घोषणा झाली. पाचव्या आणि अंतिम सेटमधे पुन्हा ६-६ अशी बरोबरी झाल्यावर मात्र टायब्रेकरचा अवलंब केला गेला नाही आणि जॉनची सर्व्हिस भेदून ( व स्वतःची सर्व्हिस राखून ) बोर्गने तो सेट ८-६ असा व सामना १-६ ,७-५ ,६-३ ,६-७( १६-१८) आणि ८-६ असा जिंकला. भारतीय वेळेनुसार सामना संपायला उत्तररात्र झाली. सामन्याच्या न कळलेल्या गुणपद्धतीबद्दल चर्चा करतच आम्ही झोपी गेलो. आणि अगदी सकाळच्याच मटामधे करमरकरांनी आमच्या सर्व शंकांचे सुबोध भाषेत निरसन केले. टायब्रेकर म्हणजे काय ? दोन्ही खेळाडूंनी करावयाच्या सहासहा सर्व्हिसेस.त्यात सात गुण मिळविणाऱ्या खेळाडूस तो सेट ७-६ असा बहाल करण्याचा नियम व तसे न झाल्यास ( म्हणजे त्यातही ६-६ अशी बरोबरी झाल्यास ) दोन गुणांचा फरक पडेपर्यंत प्रत्येक खेळाडूने दोनदोन सर्व्हिस करीत रहाण्याची तरतूद ( जसे या सामन्यात जॉनने टायब्रेक १८-१६ फरकाने जिंकला.) यावर विविकनी छान प्रकाश टाकला होता.

    त्याचप्रमाणे , परंपरांचा जिव्हाळ्याने आदर करणाऱ्या व त्या कसोशीने पाळणाऱ्या विम्बल्डनच्या नियमानुसार पाचवा व अंतिम सेट हा टायब्रेकरवर खेळला जात नाही व तो पारंपारिक पद्धतीनेच खेळावा ( व जिंकावा ) लागतो , यावर विम्बल्डनच्या थोरवीची इतर ग्रँडस्लॅम स्पर्धांशी तुलना करुन सुरेख भाष्य केले होते.

    महाराष्ट्र टाइम्सच्या व्यवस्थापनाच्या ( किंवा कदाचित संपादक गोविंदराव तळवळकरांच्या ) बुचकळ्यात टाकणाऱ्या आडमुठ्या धोरणामुळे , करमरकरांना कधीच भारतीय संघाबरोबर परदेश दौरा करण्याची संधी मिळाली नाही.
    शायर म्हणतो,
    आप गैरों की बात करते हो , हमने अपने आजमाये है,
    आप काटों की बात करते हो ,
    हमने जख्म खाये है फुलोंसे ।

    पण त्याची खंत न बाळगता त्यांनी मटाच्या ऑफिसात बसूनच त्या दौऱ्यांवर " दुरवरुन दृष्टीक्षेप " टाकले.१९८१ मधिल भारताच्या ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड जोडदौऱ्यातील कसोटी सामन्यांच्या प्रत्येक दिवसाच्या खेळाचा परामर्श घेणारे त्यांचे "दुरवरुन दृष्टीक्षेप" हे सदर मला लख्ख स्मरते.मटा व्यवस्थापनाने (कदाचित) प्रायश्चित्ताच्या भावनेतून असेल, पण हे सदर परंपरेनुसार (खेळाला वाहिलेल्या) शेवटच्या पानाऐवजी चक्क पहिल्या पानावर डावीकडे छापायला सुरुवात केली.
    मी तुम्हाला रॉबर्ट प्रियांका वाड्राची शपथ घेऊन सांगतो की थेट मैदानातून सामना कव्हर करणारे समालोचक किंवा पत्रकारांपेक्षाही त्यांनी दुरवरुन टाकलेला दृष्टीक्षेप बहिरी ससाण्यापेक्षाही जास्त वेधक आणि भेदक असे.फक्त एकच उदाहरण देतो.वेलींग्टनला झालेल्या पहिल्या कसोटीत,रवी शास्त्रीने पदार्पणातच, न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात,चार चेंडूत तळाचे तीन फलंदाज बाद केले. तेव्हा रेडिओवरच्या भाबड्या समालोचकाने,आपल्या बाजूलाच बसलेल्या स्कोअररला, मायक्रोफोनवर,संपूर्ण भारताला ऐकू जाईल इतक्या 'हळू' आवाजात विचारले...' अरे बाबा... ती हॅट्रीक होती का ? ' यावर बोचरी मल्लिनाथी करताना विविक लिहीतात की..."डोळे बंद करुन सामना बघण्यासारखीच आता आपल्याला कान बंद करुन समालोचन ऐकायची सवय करायला हवी." तुम्ही सामना दोनशे फुटांवरुन बघा किंवा हजारो मैलांवरुन , पण बघणाऱ्याकडे टिपकागदाप्रमाणे मैदानावरची प्रत्येक लहानसहान घटना टिपून घेणारी सापेक्षी नजर हवी, याची जाणीव संबंधीतांना करुन देणारीच ही टोकदार कोपरखळी होती.

    संदीप सामंत
    ९८२०५२४५१०
    १/०४/२०२०

      December 10, 2024