प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.
सध्या कांद्याने सरकारसकट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत त्यात कॉमनमॅनचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सणासुदीच्या तोंडावर कॉमनमॅनचे हाल तर बघायलाच नकोत…!
वर्डकपच्या निमित्तानं…
मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस
नागपूरला शेतकरी संघटनेचे अधिवेशन होते. देशभरातून शेतकरी उपस्थित राहणार होते. चळवळीत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. समूह जमला होता. नागपूरला जायचे होते. तयारी झालेली. कार्यकर्ते तयार होते. किसान कर्जमुक्ती होणार होती. उत्साही वातावरण होते. गावभर चर्चा. कर्जमाफी होणारच. गर्दी वाढत होती. छातीवर बिल्ले लावलेले. औरंगाबाद-मनमाडहून रेल्वेने बसायचे आणि नागपूरला उतरायचे. असे नियोजन. प्रवास सुरू. रेल्वे खचाखच भरलेली. पंजाबमधील शेतकरी जास्त प्रमाणात आलेले. घोषणांनी परिसर दणाणलेला. अधिवेशनाची चर्चा. नागपूरच्या रेल्वे स्टेशनला उतरलो, तेव्हा रात्रीचे बारा वाजलेले. भूक लागलेली. हॉटेल बंद झालेले. सोबत आणलेल्या दशम्या संपलेल्या. इकडे तिकडे शोध घेतला. नवीन जागा. पर्याय काहीच नाही. त्याचवेळी जवळूनच केळी विक्रेता गाडा घेऊन निघालेला. डोक्यावर पिवळा दिवा. पिवळ्या प्रकाशात केळी पिवळीधमक दिसली. बरी वाटली. गाडीवळ गेलो. दोन डझन घेतली. पैसे दिले. केळीवाला निघून गेला. आम्ही पिवळ्या उजेडात ती खाणार होतो. सगळी केळी कच्ची निघाली. तशीच सोलली. दोन- तीन केळी खाल्ली. पोटासाठी कशीबशी. मध्यरात्र उलटली. पोट दुखायला लागले. काही केल्या थांबेना. दवाखाना कुठेच दिसेना. रात्रभर फिरत होतो. ओरडत, कण्हत रात्र काढली. मरणाच्या दारातून परत येण्याचा क्षण तो. अधिवेशन पार पडले. घोषणा दिल्या. परत आलो. पण पोटाच्या वेदनांची आठवण घेऊन. आता कुठेही केळीचा गाडा दिसला की केळी घेतो. पिकलेली आहे काय ते पाहूनच. खात्री करूनच.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
मो.9421442995
(पुण्यनगरी)
चंदा रणदिवे एकांकिका व नाटके ज्या काळात बसवत होते, तेव्हा नायिका म्हणून भूमिका करण्यास मुली मिळणे कठीण होते. परंतु चंदा यांना ही अडचण कधीच आली नाही. कारण त्यांचे चोख व निखळ चारित्र्य! त्यांच्याविषयी सर्वांना गाढ विश्वास होता. चंदा दिवेकर, मीना प्रधान, मंगल फणसे, शालिनी राजे, सुनंदा कर्णिक, लता सावंत, उषा गुप्ते. अशा असंख्य हिरॉईन्स चंदा यांच्या नाटकातून घडल्या.
त्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा.
काही वर्षांपूर्वी स्कूटर, मोटर सायकली यांची रस्त्यावर भरमार होण्याआधी,सायकल ही एक चैन असायची..मैत्रिणींना सायकल चालवताना पाहून आपल्याला कधी चालवता येईल याचे ध्यास लागत. सर्वात आधी मी सोलापूरला असताना मुलींना सायकल चालवताना पाहिलं होतं , माझी मैत्रीण पुष्पा राठी आणि तिची मोठी बहिण सुशीला यांची दिवसांची वाटणी झालेली होती.. तीन तीन दिवसांची..तेव्हां मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत होते.
प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू….
आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले.
Copyright © 2025 | Marathisrushti