एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री रहात होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव, या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुंताड्यात फसली बी.पी., शुगर यांनी शरीरात मांडले ठाण आणि आनंद, खुशी, हसू यांची उडाली धूळधाण.
तशातच एके दिवशी तिच्या लेकीनं दिला स्मार्टफोन भेट आणि what's app मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट काहि दिवसांतच रिपोर्ट येऊ लागले नॉर्मल. चिकटून बसलेले बी.पी. शुगर वागू लागले फॉर्मल.
ती आनंदली,what's app व्रताची यशवार्ता आल्यागेल्याला सांगू लागली.
तिची एक सखी निर्मळ मनाची ! ती म्हणाली, मला पण सांग ना ग, हे व्रत ! उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही.
स्त्री म्हणाली, बघ, रोज सकाळी उठताक्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. GM, GNचा वेळोवेळी जप करावा.
यथासमय देवाच्या देव्हार्यात डोकवावे, मन मोकळे करावे.
एका ग्रुपने what's app ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या ग्रुपला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे.
रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये. सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. शुगर कमी होऊन रडक्या मना येऊ लागले बळ.
तुम्हीही व्रत हे धरावे,कामकाज काळवेळ सांभाळूनी त्रिकाळ what's app ला पुजावे.
जसा हा देव त्या दोघी सखींना पावला, तसा तुम्हासही पावो. व्रत सर्व बंधुभगिनींनी करावे. साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ....मन लाऊन वाचणाऱ्याला एक लाभ,फॉरवर्ड करणाऱ्याला अनेक लाभ.!!
बोलता बोलता सहज मी
दिवाळीचा विषय काढला
एकदम माझ्या मित्राचा
चेहरा पांढरा पडला
तो म्हणाला दिवाळी आली की
हल्ली धड धड होतं
जुनं सारं वैभव आठवून
रडकुंडीला येतं
चार दिवसाच्या सुट्टीत आता
कसं होईल माझं
एवढ्या मोठ्या वेळेचं
उचलेल का ओझं ?
मी म्हटलं अरे वेड्या
असं काय म्हणतोस
सलग सुट्टी मिळून सुद्धा
का बरं कण्हतोस ?
काय सांगू मित्रा आम्ही
चौघ बहीण भाऊ
कुणीच कुणाला बोलत नाही
मी कुठे जाऊ ?
आता कुणी कुणाकडे
जात येत नाही
आम्हालाही दोन दिवस
कुणीच बोलावीत नाही
चार दिवस कसे जातील
मलाच प्रश्न पडतो
लहानपणीचे फोटो पाहून
मी एकटाच रडतो
पूर्वीच्या काळी नातेवाईक
बरेच गरीब होते
तरीही ते एकमेकाकडे
जात येत होते
कुणाकडे गेल्या नंतर
आतून स्वागत व्हायचं
सारं काम साऱ्यानी
मिळून मिसळून करायचं
सुबत्ता फार नव्हती
पण वृत्ती चांगली होती
गरिबी असून सुद्धा
खूप मजा होती
मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
एखादाच शेंगदाणा भेटायचा
त्याप्रसंगी आनंद मात्र
आभाळा एवढा असायचा
लाल,हिरव्या रंगाचे
वासाचे तेल असायचे
अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
बुडाला जाऊन बसायचे
उत्साह आणि आनंद मात्र
काठोकाठ असायचा
सख्खे असो चुलत असो
वाडा गच्च दिसायचा
चपला नव्हत्या बूट नव्हते
नव्हते कपडे धड
तरीही जगण्याची
मोठी धडपड
सारे झालेत श्रीमंत
पण वाडे गेले पडून
नाते गोते प्रेम माया
विमानात गेले उडून
घरा घरात दिसतो आता
सुबत्तेचा पूर
तरी आहे मना मनात
चुली सारखा धूर
पाहुण्यांचे येणे जाणे
आता संपून गेले
दसरा आणि दिवाळीतले
आनंदी क्षण गेले
श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
मोठे सण असतात
फ्लॅट आणि बंगल्या मधे
दोन चार माणसं दिसतात
प्रवासाची सुटकेस आता
अडगळीला पडली
त्या दिवशी माझ्याजवळ
धाय मोकलून रडली
हँडल तुटलं होतं तरी
सुतळी बांधली होती
लहानपणी तुमची मला
खूप सोबत होती
सुटकेस म्हणली सर मला
पाहुण्याकडे नेत जा
कमीत कमी दिवाळीत तरी
माझा वापर करीत जा
सुटकेसचं बोलणं ऐकूण
माझं ही काळीज तुटलं
म्हणलं बाई माणसाचं
आता नशीब फुटलं
म्हणून म्हणतो बाबांनो
अहंकार सोडा
बहीण भाऊ काका काकू
पुन्हा नाती जोडा
' संदुक ' आणि ' वळकटीचे '
स्मरण आपण करू
दिवाळीला जाण्यासाठी
पुन्हा सुटकेस भरु
थालिपिठ – एक खास मराठी पदार्थ
सकाळी ७.३० ला नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरून ‘ पंचवटी ‘ एक्प्रेस मध्ये बसलो , माझा रेल्वे स्टेशन वर नेहमी वावर असल्याने सगळे फेरीवाले ओळखीचे होतेच माझ्या …बटाटावडा , चिवडा , द्राक्षे , कोल्ड्रिंक्स , खीरा काकडी असे पदार्थ रेल्वे डब्यात तसेच , स्टेशन वर विकणारे हे मित्र कलंदर असत त्यांच्या बरोबर राहून मी चालत्या गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाणे .. वेगात असणारी गाडी गाडीसोबत धावत जाऊन पकडणे ..सोडणे …असे प्रकार शिकलो होत . त्यांच्याशी गप्पा मारत बटाटेवडे वगैरे खात गाडीत छान टाईम पास केला ,
स्पर्धा परीक्षा
औरंगाबादपासून अवघ्या २२ कि.मी.वर वेरूळ हे गाव असून तेथे लक्षविनायकाचे मंदिर आहे.
पांडुरंगशास्त्री आठवलेंनी अवघ्या समाजाला माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म नव्याने दाखवून दिला. त्यांचे सहजसुंदर तत्त्वज्ञान अवघ्या जगात प्रसिद्धी पावले. रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन पुरस्कार, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. आज समाजातील सौहार्द संपत असताना आणि जातकारण वाढत असताना पांडुरंगशास्त्रींच्या तत्त्वज्ञानाचा नव्याने जागर होण्याची गरज आहे. 25 ऑक्टोबर रोजी येणार्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागवलेली आठवण.
काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..
माझे काका 90 वर्षांचे आहेत. (1976 साल). सलूनमध्ये जाअून केस कापून घेणं ही अलीकडची पध्दत. पूर्वी न्हावी घरी यायचा आणि ज्यांचे केस वाढले असतील त्यांची हजामत करून द्यायचा. अशाच अेका प्रसंगी घडलेली गंमत काका सांगतात.
त्यावेळी कुटुंब मोठं असायाचं. लहान मुलं, मोठी माणसंही बरीच असयची. शिवाय चाळीतल्या किंवा वाड्यातल्या बिर्हाडातील बरीच मंडळी असायची त्यामुळे न्हाव्याला अेका ठिकाणी बरीच कमाअी होत असे.
अेकदा अेका रविवारी, काका त्यांच्या मित्राकडे गेले होते. मित्राचे केस कापून घेणं चाललं होतं. काकांचे केसही वाढले होते.
ते म्हणाले .. चला मीही येथेच माझे केस कापून घेतो.
मित्र म्हणाला … घ्या ना. पण आधी शेजारच्या माअींचे केस कापायचे आहेत. त्यांचं झालं की तुम्ही बसा.
केस कापून घ्यायला माअी येत आहेत हे अैकून काकांना आश्चर्य वाटलं. त्याकाळी विधवांचं केशवपन केलं जाअी. पण ते अेखाद्या आड बाजूच्या खोलीत. माअी ही विधवा बाअी, सर्वांसमोर केस कापून घेणार हे अैकून काका चाटच पडले.
मध्यंतरी अेक गृहस्थ आले आणि केस कापून घेअू लागले. तो पर्यंत काका वर्तमानपत्र वाचीत बसले. थोडा वेळ गेला. काकांचे मित्र आघोळ करून आले. त्या गृहस्थाचे केसही कापून झाले होते.
मित्र म्हणाला … वामनाचार्य, आता तुम्ही बसा.
पण त्या माअींचं व्हायचं आहे ना ? काकांची शंका.
अहो हेच माअी. आमचे नवे शेजारी.
-- गजानन वामनाचार्य
अमृत : अेप्रिल १९७६
सूर्याचा अंत!
Copyright © 2025 | Marathisrushti