(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • होळी…

    होळी रे होळी ! पुरणाची पोळी ! ही आरोळी हल्ली तितकीशी ऐकायला मिळत नाही म्हणून आपल्या संस्कृतीतील होळीचे महत्व कमी झालेले आहे असे मानण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात खास करून कोकणात होळी या उत्सवाला असाधारण महत्व आहे. होळी हा सण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. होळी हा एकमेव सण आहे जो कोकणातील लोकांच्या उत्साहाचा प्रतीक आहे. कोकणातील लोक पोटापाण्यासाठी मुंबई सारख्या शहराकडे वळली आणि पांढरपेशा जीवन जगू लागले. होळी हा एकमेव सण आहे ज्याने पांढरपेशा लोकांना कोकणाशी जोडून ठेवलेले आहे अगदी मनापासून ! आणि कदाचित पुढची काही वर्षे जोडून ठेऊ शकेल ! असो इतक्यात होळीवरच प्रश्नचिन्ह उभं करण योग्य नाही ! शेकडो वर्षापासून चालत आलेली वारकरी परंपरा खंडीत झाली का ? नाही ना ? कोकणात तशीच कदाचित होळीची परंपरा खंडित होणार नाही. आपल्या राज्यात एक सुशिक्षित विचारी पिढी जन्माला आलेय ती पिढी आपल्या उत्सवातील चांगल्या गोष्टी हेरून ते उत्सव आणि आपली संस्कृती समर्थपणे पुढे नेत आहेत आणि नेत राहतील. होळी हा उत्सव महाराष्ट्रातील काही भागात आणि देशात दोन दिवसाचा अथवा एक दिवसाचाच असतो पण कोकणात होळी दहा दिवस साजरी केली जाते. दहाव्या दिवशी मोठा होम पेटवला जातो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुळवट अर्थात रंगपंचमी साजरी केली जाते. देशभरात साजरी होणारी रंगपंचमी आणि कोकणातील रंगपंचमी यात अंतर आहे. होळीनंतर कोकणात प्रत्येक घरात देवाची पालखी येते जिची पूजा करण्यासाठी लोक अगदी परदेशात असणारे ही काही लोक कोकणात येतात त्यांच्या कोकणातील घरात ! आपल्या घराच्या दारात येणाऱ्या पालकीची पूजा करण्यासाठी ! देशातील प्रत्येक प्रांतात होळी थोडी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जात असेल पण मुंबईत साजरी होणारी होळी महाराष्ट्रात परंपरागत साजऱ्या होणाऱ्या होळीपेक्षा वेगळी असते कारण मुंबईत सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र सण साजरे करतात त्यामुळे मुंबईत सणांना म्हणजे सण साजरे करण्याला एक वेगळं स्वरूप काहीस विद्रुप स्वरूपही प्राप्त झालेले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही ! त्यामुळे होळी या उत्सवाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तो कोकणातच !
    कोकण आणि होळी यांचे कोकणातील मराठी माणसाच्या मनात काय स्थान आहे हे स्पष्ट करणारी एक घटना आठवते ! एका परप्रांतीय माणसाच्या कारखान्यात कोकणातील एक मराठी तरुण नोकरी करत होता , तो तरुण नचुकता होळीला गावी जात असे ! होळीसाठी त्याने मालकाकडे रजा मागितली तर मालक नाही म्हणाला त्यावर तो मालकाला म्हणाला ,रजा नाही दिली तरी मी जाणारच ! त्यावर मालक म्हणाला, नोकरी सोड आणि मग जा ! त्यावर तो तरुण क्षणाचाही विचार न करता म्हणाला , ठीक आहे ! मी नोकरी सोडतो ! त्या मालकाला अजून प्रश्न पडतो साला इस होळी में ऐसा क्या हैं ? त्या मालकाने जर कोकणातील होळी अनुभवली असती तर कदाचित त्याला हा प्रश्न पडला नसता. या अशा अशा घटना घडण्याला कोकणातील लोकांच्या श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा कारणीभूत आहेत. होळी या उत्सवाच्या बाबतीत कोकणातील लोक श्रद्धा- अंधश्रद्धा या पलीकडे गेलेले आहेत . होळीला उपस्थित राहणे ही काहींची परंपरा झालेली आहे. कोकणातील माणूस जगात कोठेही राहात असो कोकणातील होळीच्या होमात एकदा नारळ टाकणे ही त्याचे स्वप्न असते. जेंव्हा कोकणात मनोरंजनाची फारशी साधने नव्हती अर्थात वीजही नव्हती तेव्हा मनोरंजनाचा उत्साहाचा एक स्त्रोत म्हणून कोकणातील लोकांनी होळीकडे पाहिले असावे ! हा आनंद जास्तीत जास्त उपभोगता यावा म्हणून होळी दहा दिवस त्यानंतर देवाची पालखी दरात येण आणि त्या कारणाने मुंबई व बाहेर गेलेले कोकणातील चाकरमनी कोकणात रजेवर यायचे ! आपल्या बायका पोरानंसोबत चार दिवस आनंदाचे उत्साहाने उत्सवाचे घालवायचे ! आता हे चित्र बदललं तरी परंपरा तशीच राहिली कारण आजच्या धावपळीच्या जगण्यात ही लोकांना उत्साह उत्सवातच शोधावा लागतोय दुर्दैवाने !

    आजकाळ मुंबईतही वर्गणी काढून होळ्या पेटवल्या जातात त्यांना नारळ अर्पण केली जातात अगदी उत्साहाने पण त्यात खऱ्या श्रद्धेचा भाग किती असतो हे त्या होळीलाच ठाऊक ! दुसऱ्या दिवशी रंगपंचमी जिला परप्रांतीय होळी म्हणतात त्या दिवशी मुंबईत सारे जाती भेद लिंग भेद विसरून रंगांची उधळण केली जाते. कोकणात मात्र आजही या दिवशी कोरडा गुलाल लावला जातो. हल्ली वृक्षतोड थांबविण्यासाठी अथवा झाडे वाचविण्यासाठी नौसर्गिक इंधनाची बचत करण्यासाठी होळीवर बंदी घालण्याची ओरड केली जाते पण हे फारच अतर्कीय वागणे आहे. कोकणात आजही जंगलाची कमी नाही अगदी घराच्या आजूबाजूला जंगले वाढलेली दिसतात त्यात होळीसाठी सुकी लाकडे वापरली जातात आणि फक्त लाकडेच वापरली जातात असेही नाही गवत पाला - पाचोलाही वापरला जातो आपले पूर्वज फार हुशार होते त्यांच्या साऱ्या गोष्टी आपण अंधश्रद्धेच्या चौकटीत बसवून मोकळे होतो आणि तेथेच आपण चुकतो. गावो गावी होळी दहन झाल्यामुळे हवेत थोडी उब येते वातावरण शुद्ध आणि प्रफुल्लित होते आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते उत्साह वाढतो लोकांच्या मनात काही नवीन करण्याची उमेद जागी होते.

    मुंबईसारख्या शहरात हल्ली होळीचा उत्साह कमी झालेला दिसतो कारण तो उत्सव साजरा करण्याचे स्वरूप आता बदलले आहे नव्हे ते विकृत झालेले आहे. पूर्वी लोक होळीला एकमेकांवर फक्त रंगीत पाणी टाकायचे ! सुके रंग तोंडाला फासायचे आणि होळीच्या शुभेच्छा द्यायचे पण हल्ली पाण्याने भरलेले फुगे पिशव्या मारल्या जातात. चेहऱ्याला ओईल पेंट लावला जातो, होळीच्या नावावर स्त्रियांची छेड काढली जाते, त्यांच्याशी अश्लील वर्तन केले जाते, काही स्त्रियाही अंगप्रदर्शन करतात या निमित्तान हा भाग वेगळा ! काही लोक इतरांवर अशुद्ध पाणी टाकणे अंडी मारणे असले प्रकारही करतात, मनोरंजनाच्या नावावर धांगड धिंगा चालतो थंडाई मनसोक्त पितात आणि मग दिवसभर मनसोक्त झिंगतात काही दारूनेही झिंगतात हे वेगळे सांगणे नाही ! मुंबईतील होळीत फक्त उत्साह दिसतो श्रद्धा कोठेच दिसत नाही जी कोकणात दिसते !

    होळीचा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी जो होळीला नैवद्य म्हणून दाखविला जातो ही पुरणपोळी दूर परदेशातही प्रसिद्ध आहे म्हणे ! महाराष्ट्रात ज्या स्त्रीला पुरणपोळी उत्तम तयार करता येते त्या स्त्रीला सुगरण समजले जाते, पुरणपोळी बनविणे हे इतके किचकट काम असते. कोकणात होळीला दहा दिवस अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ज्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असतो, गावातील अनेक हौशी कलाकार आपली कला लोकांसमोर सादर करतात ज्या कलाकारांमधून काही व्यावसायिक कलाकारही जन्माला येतात बहुदा ! हल्ली कोकणातही मनोरंजनाची बरीच माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हे आता हळूहळू कमी होत चालले आहे पण होळीचा उत्साह आजही कायम आहे . होळी हा उत्सव निदान कोकणात तरी बंद होणे अशक्य आहे कारण या उत्सवाशी लोकांची श्रद्धा जोडली गेलेली आहे . आजही कोकणात होळीला नारळ टाकून नवस बोलले जातात , पूर्ण झाल्यास ते फेडले जातात नाही पूर्ण झाले तर पुन्हा माफी मागून केले जातात, पण होळीवर कोणाचा राग नसतो , संतुष्ट कोकणातील माणूस देवभोळेपणात देशात नंबर एकवर असेल कदाचित ! कोकणातील होळीचा श्रद्धा - अंधश्रद्धा हा भाग सोडला तर कोकणातील होळी खरंच उत्साहवर्धक आणि लोकांना तिच्याकडे आकर्षित करण्यासारखी आणि गुंतवून ठेवण्यासारखीच असते हे सत्य नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येकाने एकदातरी कोकणातील होळी अनुभवायला हवी ! मग त्यांना कळेल होळी म्हणजे नुसता धांगड धिंगा नसतो फक्त रंगांची उधळण नसते तर उत्साहाचा झरा आहे ज्या झाऱ्यातील पाणी लोक होळीला पितात आणि पुढे वर्षभर उत्साही राहतात...

    लेखक - निलेश दत्ताराम बामणे
    202, ओमकार टॉवर, जलधारा ( एस आर ए ), बी -विंग, गणेश मंदिर समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई - ६५.
    मो. ८१६९२८२०५८

  • ये पब्लिक है, सब जानती है!

    साहेब, आपल्या देशात कायदा कानून नावाची चीज अजिबात अस्तित्वात नाही. खरा कायदा इराकमध्ये आहे. इराणमध्ये आहे. आणि आबुधाबीमध्ये आहे. तिथे आज गुन्हा केला की उद्या लगेच शिक्षा होते. ती शिक्षाही इतकी भयानक असते की, तो गुन्हेगार तर सोडाच पण त्याचे शेजारी-पाजारी, गाववाले, शहरवाले, तिथे राहणार्या सात पिढ्या फक्त शिक्षा ऐकून चळाचळा कापतात.

  • खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)

    साहित्य : अर्धा किलो जाड मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या , १००ग्राम मोहरीची डाळ , एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा मिरची …..

  • नारळ….. खोबरं

    खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक ... अविभाज्यच... पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो... खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या...

    तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या... एक नदिकाठची.. मळ्यातली...

    दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली....

    यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार...

    आता या प्रत्तेक तऱ्हेच्या माडाच्या झाडाचे खोबरे वेगळ्या चविचे... वेगऴ्या टेक्सचर चे.. त्यात ताजे नारळ, कोटार, कुत्रेकोटार., वांझ... हे प्रकार आगळेच.

    साधारण माश्याच सार, पिठी, पालेभाजी,गुळचून यासाठी मळ्यातला नारऴ वापरला जातो. तर मटण, भाजणीच्या आमटीसाठी भरडी नारळ... करंजीच्या साठ्यासाठी खास घुडघूडी...

    त्यात कढीसाठी काही स्पेशल माडाचे नारळ ... आणि तो बदलला तर कढीची चव बदलते... मग जेवणावर एखादी मालवणी शिवी हमखास....
    आता शहाळं कुठल्या माडाचं खायचं त्याचही खास तंत्र.. प्रत्तेक झाडाची चव वेगळी... त्यात तांबड्या माडाची स्पेशल...पण मालक समोर असेल तर तोच सांगणार..आता सिंगापुरी माड झालेत पण शाहाळ्यासाठी ते मस्तच. कुठल्यापेंडीची किती शाहाळी काढायची... नारळ सुद्धा झाडाखालून मालक सांगेल तेच काढायचे.... एक सुंदर तंत्र... शास्त्र. पिढीजात चालत आलेले... त्याच्यात म्हाल पेंड.... आणि धारेची पेंड... हे खासच....

    आवयेल... खास मालवणी तेल तांबडया माडाच्या खोबऱ्याच्या रसापासुन तयार केलेले. घरगुती.... पण त्याची क्रूती पण विस्म्रूतीत गेलीय....
    तेलासाठी घुडघुडी बारीक करून उन्हात वाळवत घातल्यावर अचुक पुर्ण सुकलेले पण मऊ गोड आणि खाण्यास योग्य अशी कातळी जो ऊचलतो .. तो मात्र खरा दर्दी....

    आणि ज्याच्या घरात 2. 4 लिटर खराब खोबर्याचं तेल निघतो तो खरा बागायतदार...

    यातही... फक्त नारऴाचा आकार त्यातलं पाणी, रंग.आणि किशी बघून आतल्या खोबर्याविषयी अचुक सांगणारे ज्योतिषी ही याच कुऴातले....

    तर असं हे खोबरं पुराण विस्तारभयास्तव आटोपते घेतोय...

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे....

  • ज्योतिषविषयक टिप्स – भाग २

    ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्‍या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा....


    सप्तम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत सप्तम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - पोवळे धारण करणे.
    २ - खोटे बोलु नका.
    ३ - नोकरांना खुश ठेवा.
    ४ - गणपतीची उपासना करा.

    अष्टम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रीकेत अष्टम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - गणपतीची उपासना करणे.
    २ - मसुरडाळ मंदिरात दान करणे.
    ३ - विधवा स्त्री ला मदत करणे.व तिचा आशिर्वाद घेणे.
    ४ - चांदीची अंगठी बोटात घालणे.

    नवम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत नवंम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवणे.
    २ - मंगळवारी मारुतीला शेंदुर लावणे.
    ३ - काळभैरवाची उपासना करणे.
    ४ - विधवा स्त्रिला मदत करणे.

    दशम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत दशम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - सोने विकु नये
    २ - अपंग व्यक्तीला मदत करावी.
    ३ - घरात दुध उतु जाऊन देवु नये.
    ४ - निपुत्रीकाची सेवा करा

    अकराव्या स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत अकराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय

    १ - पांढरा कुत्रा घरात पाळा.
    २ - गणपतिची उपासना करा.
    ३ - वडिलोपार्जीत इस्टेट विकु नये.
    ४ - रुग्णांना मदत करा.

    बाराव्या स्थानातील मंगळ. - ज्यांच्या पत्रिकेत बाराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.

    १ - सकाळी उठल्यावर मध खाणे.
    २ - पक्षांना धान्य घालणे
    ३ - १५ दिवस सलग सव्वाई गुळ पाण्यात प्रवाहित करणे.

    सौ. निलीमा प्रधान

  • रि-युनियन

    कोण म्हणतं एकदा वेळ निघुन गेली की परत येत नाही...
    'ती सध्या काय करते ' हा सिनेमा पाहिला आणि या विषयावर थोडा विचार करावासा वाटला.
    'ती सध्या काय करते' यावरून बरेच विनोद झाले, अतिशयोक्ती झाली. यातला विनोदाचा भाग सोडला तर हा विषय मनाच्या खुप जवळचा वाटला. यातल्या अन्याचा बायकोची (उर्मिला कानेटकर) भुमिका मनाला स्पर्श करून गेली.
    सध्या आपण पहातोय की, रि-युनियन हा विषय निघाला की पत्नी पती कडे किंवा पती पत्नी कडे संशयाच्या नजरेने पाहतात. पण खरं सांगू ? लग्नाची २०-२५ वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवल्यावरही आपण आपल्या जोडीदारावर विश्वास ठेऊ शकत नसलो तर आपण काय सहजीवन जगलो ? लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हेच खरं.. नाहीतर तुमचा जोडीदार शाळा-काँलेज मधे असतानाच सैराट झाला असता, नाही का ? पण तो संयमी आहे, विचारी आहे म्हणून आज तुमच्या जोडीला आहे. आज २५ वर्षांच्या संसारा नंतर ब्रम्हदेवही आले तरी तुमची गाठ सोडू शकणार नाही असा विश्वास हवा..
    एकदा सरलेले बालपण/तारूण्य पुन्हा मिळत नाही, या विचारावर रि-युनियन या संकल्पनेने मात केली आहे. ज्याने कोणी ही संकल्पना शोधून काढली, त्याला सलाम
    शाळा काँलेज मधिल मित्र मैत्रिणींना भेटा, त्यांचाशी गप्पा मारा, सरलेले बालपण- तारूण्य तुम्हाला परत मिळेल, नक्कीच ! आयुष्यात राहून गेलेली सगळी मजा उपभोगण्यासाठी पुन्हा एकदा मिळालेली ही सुवर्णसंधी आहे.
    खुप फिरा, मजा करा ! ४०-४५ हे वय असं आहे की, अजुनही तुम्ही भ्रमंती करू शकता. एकदा का साठी आली, की पुन्हा हळहळ वाटेल, आलेली संधी गमावल्याची. आणि करा की प्रपोज राहून गेलेलं ! काय हरकत आहे ?
    मनावर नियंत्रण असलं की सगगळच सुंदर असतं/अम्रुत असतं. आपली द्रुष्टी स्वच्छ असली की सगळच स्वच्छ दिसतं. म्हणूनच कोणतीही अतिशयोक्ती टाळून मजा घ्या जीवनाची.
    आणि मनावर नियंत्रण होतं म्हणून विधीलिखित जोडीदारा बरोबर तुम्ही संसाराची पंचविशी गाठू शकलात. चुकणारा माणूस कुठेही चुकतो, त्याला रि-युनियनच निमित्त लागत नाही.
    तुमच्यातले काही सुप्त कलागुण संसाराच्या धकाधकीत दबून गेलेले असतात, पण तुमचे मित्र ते बरोबर जाणतात. ते सादर करण्याची, त्याचा आनंद घेण्याची संधी म्हणजे रि-युनियन.
    मन एक पाखरू आहे, त्याला स्वच्छंद उडू द्या , बागडू द्या. संशयाच्या, लोकलज्जेच्या कुपीत त्याला बंदिस्त करू नका. गुदमरून मरेल ते ! आणि शिल्लक राहील ते फक्त शरीर..
    तुमच्या कुटुंबा समवेत गेट टुगेदर करा. न जाणो तुमची मुलं तुमच्या मैत्रीचा वारसा पुढे चालवतील.
    आपल्यातले काही मित्र मैत्रिणी इतर कारणांनी दुःखी असतील, त्यांना तुमच्यात सामाऊन घ्या.., तुमची सोबत त्यांचे विश्व बदलू शकते.
    हे जग सोडताना कोणतीही इच्छा मागे ठेऊ नका कारण मनुष्य जन्म एकदा मिळतो आणि आयुष्य सुंदर आहे.
    मित्रांची कदर करा आणि उरलेल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करा व सर्व मधूर आठवणी सोबत घेउनच जगाचा निरोप घ्या.
    अरे! आज मला माझ्यातला लेखक गवसला.., अर्थात क्रेडीट गोज टू रि-युनियन पटलं तर आपापल्या ग्रुप मधे नक्की अँक्टीव व्हा...

  • नॅनो तंत्रज्ञान हे विकासाचे तंत्रज्ञान

    भारतातील विशेषत: ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. या एका गोष्टीचे विविधांगी दुष्परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहेत. यामुळे एकूणच तिथल्या स्थानिक नागरिकाचे जीवनमानही खालावले आहे. पण या समस्येवर तंत्रज्ञान हा क्रांतीकारी उपाय ठरू शकतो.

  • माझा मित्र सतीश भिडे

    अखंड भारताच्या घोषणांनी मसुरी, नैनितालची थंडी गायब. देशातील अब्दुल -नारायण – डिसुझा हाच भारताचा मालक असून, खरा धर्म हा केवळ राष्ट्रधर्म आहे असे कळकळीचे आवाहन वीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे ह्यांनी नुकतेच मसुरी, नैनिताल येथे केले.

  • कोजागरी – कोण जागे आहे?

    पोर्णिमा’ ही समस्त जगातील प्रतिभावंतांची आदिम प्रेरणा झाली आहे. त्या एकमेवाद्वीतीय चंद्राच्या शीतल प्रकाशबिंदूंनी जणू प्रतिभेच्या कमळाला फुलण्याची अंतःप्रेरणा मिळते. ते शतदलकमल मग फुलून येतं मनस्वीपणे, चंद्रासारखंच!

  • भोंडला (फेरीवाल्यांचा) (६)