(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • चारोळ्या …………!!! (भाग २)

    चारोळ्या …………!!!

    (भाग २)

  • भारतमातेच्या वीरांगना – 18 – भीकाजी कामा

    २२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे.

  • गाण्याच्या कहाण्या – ‘पिया ऐसो जीयामे समाय गयो’

    हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता.

  • करून गेला गाव नाही नाही जळगाव

    चार दिवसापासून भाऊ कदम आणि ओंकार भोजने या जोडीला पाकिटात घेऊन फिरत होतो म्हणजेच नाटकाचे तिकीट घेवून हो....दिवस उजाडला... संध्याकाळी ७ लाच ऑफिस मधून कल्टी मारली....दोन घास खावून पोरा बाळांना घेऊन नाट्यगृहाच्या गेटवर गाडी लावून दाराशी हजर.... गेटवाला भाऊ (भाऊ कदम नव्हे) बोलला...भाऊ नाटक गह्यरे उशिरा सुरू झाले...तुम्ही या फिरीसन...झाले एक तास काय करू सगळे... यू टर्न मारला...आणि भाऊंचे उद्यान (भवरलाल भाऊचें ) गाठले, श्री दत्ताच्या पाया पडून गार्डनच्या फेऱ्या मारल्या....चांगले एक किलो वजन कमी झाले असेल असे वाटायला लागले...आणि चला चला वेळ झाली म्हणून गृहमंत्री आले...परत त्याच जागी आलो तर गर्दीच गर्दी..अजून पहिला शो सुटलेला नव्हता....आणि गेटवाला दादा मध्ये पण घेत नव्हता... पब्लिक डिमांड मुळे अखेर कंपाऊंड मध्ये प्रवेश मिळाला...९.१५ च्या आसपास शो सुटला...पण सेल्फी मुले लोक उशिरा आले बाहेर...असो शेवटी प्रवेश झाला...महा...नग..र (महानगर असे लिहायला त्रास होतो) पालिकेच्या नाट्यगृहात... बाल्कनीत रांगेत ६ तिकिटे आमची....बसलो एकदाचे आणि बोटीत बसण्याचा भारी feel आला...कारण सगळ्या खुर्च्या एक जरी हलला तरी डोलत होत्या....त्यात गृहमंत्री फक्त खोकल्या तरी मस्त अंग थरथरत होते...भारीच...एवढ्यात लाइट गेली ..काळोख पूर्ण..फक्त फेसबुक..व्हॉट्स अप.. रिल्स बघणारी तोंड चमकत होती...मध्येच लाईट यायची ..जायची...स्टेजवर पूर्ण अंधार होता... खुर्च्या वरचे लाईट सुरू...आणि बाकी सगळे बंद...आम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्याने....ओळखले की कूछ तो गरबड है भाऊ...ऐसा लाइट लूक झाक नही करता...१०.१५ झाले.... इव्हेंट वाले दिनेश भाऊ (भाऊ कदम नव्हे)आले...५ मिनटात होईल सुरू प्रयोग.. टाळ्या वाजवून दाद दिली सगळ्यांनी...कारण आपण जळगावकर अती सहनशील...खूपच... हे झाले आजूबाजूचे वातावरण...वाचून तुम्ही नाट्यगृहात पोचल्याचा feel येत असेलच...

    आता माझा जांगळबुत्ता कोणी केला....माझ्या बाजूला ७५ तरीचे बाबाजी आणि एक ६०चे काकाजी येवून बसलेले.... एक कान खूप पकला...टाईमपास करणेका था...मग बाबाजी ने काकाला अख्या मोबाईलची गॅलरीच दाखवली...विमान... हेलिकॉप्टर...बर्फ.. गॉगल..जंगल...काय अन् काय...सगळे फोटो दाखवून ..त्या प्रत्येक जागेची महती सांगितली...मग मध्येच हा असा उशीर पुण्याला झाला असता तर...चालले असते का...पुणेकर वेळेचे पक्के...काका बोल्ले पिक्चर टाकी असती तर लोकांनी अंगावर घेतली असती....खुर्च्या तोडल्या असत्या....ब्ला ब्ला ब्ला...मग अजून टाईमपास कसा तर...खाली ८०० रुपयाचे तिकीट काढलेल्या भाऊला (भाऊ कदम नव्हे) फोन लावला...त्याला पिळला....खूप पिळला...आम्ही तर ३००चे काढले....तुम्ही ८०० चे काढले...३०० गेले तर वाटणार नाही...तुमचे कसे होईल...थंडी वाजतेय का खाली... अडी गह्यर गरम हुई राहलय....मग हा इव्हेंट वाला भाऊ (भाऊ कदम नाही)मह्या घरच्या जोय राहतो....सकाळीच ३०० मांग्याले जान पडीन ... हे झाल की परत पुण्याचा डायलॉग....मग नाटक पाहायला येणारे सगळे सज्जन म्हणून काही बोलत नाहीये म्हणे...अगदी नॉन स्टॉप दोघांचे एक कानात सुरूच....दुसऱ्या कानाला रमा राघव ची सीरियल सुरू मॅडमची....म्हंटले इथे पण हेच..मग करू तरी काय... हे उत्तर...१८ वर्ष झाली लग्नाला ...काय बोलणार ना माणूस...दुसरी पण सीरियल संपली...पाहून....या सगळ्यात एक मावशी मागे तिसऱ्या रांगेत....दर १० मिनिटाला ....साहेब पैसे परत द्या....नाटक होईल की नाही ते सांगा...आताच द्या पैसे....असे कुठे चालते का...८.३० चे नाटक १०.३० झाले तरी नाही सुरू केले....पैसे परत द्या....मावशीचा आवाज माझ्या कानापर्यंत येवून परत जात असेल एवढाच....पण रेगुलर ठरवून मावशी पिंगा घालत होत्या....मेरे पैसे मेरे पैसे....वाटलं आपणच देवून टाकावे हिला ३०० रुपये...निदान टिक टिक तरी बंद होईल ....पोर बाळ पण कंटाळली...मध्येच परत इव्हेंट वाले भाऊ(भाऊ कदम नाही हो)आले आता फक्त २ मिनिट....लागतील ...उठून बाहेर गेलेली ८०० वाली पब्लिक जागेवर आली ....वाटले बाबा..काका..मावशी...मॅडम.... शांत बसतील...लाईट आली...चमकली..आणि मस्त...अंधार झाला....झाले...मावशी जरा सुर लावत... बोल्ल्याच..समजायचे ते समजलो....कारण ऐकण्या शिवाय पर्याय नव्हताच ..माझ्याकडे पण...यात सोबत Dad आलेले....त्यांनी तिकीट मागितली काढलेली....म्हटले पाहत असतील ....तर त्यांनी तिकिटावरचा मोबाईल नंबर डायल केला....पलीकडून कोण बोलले काय माहित..फोन कट झाला ...डोक्याला हात लावण्या वाचून पर्याय नव्हता....१०.४५ झाले ...आणि आवाज आला.... अजून ५ मिनिट द्या.....झाले...बाबाजी बोलले....झोप येतेय आता म्हातारा माणूस मी...मावशी...बोलल्या..नोकरीवरून थकून भागून येतो आम्ही...असे काय करताय..पैसे परत द्या... हुश....डोकं फुटायची वेळ आलेली आता....११ वाजले....स्टेजवर ५/६ डोकी आली...अंधार असल्याने कपडे तेवढे दिसत होते ... पांढऱ्या कुर्त्यात आणि धोतरात माणूस दिसला (भाऊ कदम हेच आपले)आणि शेजारी लाल शर्ट फक्त...( कदाचित ओंकार भोजने हेच).....झाले... लाइट मध्ये प्रॉब्लेम असल्याने....आणि महा नग.... र.पालिकेच्या सौजन्याने generator नसल्याने आजचा प्रयोग होणार नाही अशा केविलवाण्या शब्दात आयोजक सांगून मोकळे झाले...कदम भाऊ सुद्धा हळू आवाजात काही बोलले की....क्षमा करा बिघाड झाल्याने आजचा प्रयोग नाही करू शकत....झाले....३ तास मनोरंजन बाबा ..काका मावशी यांनी केले....

    आता जाता जाता बाबा... हे जर पुणे असते ना भाऊ..नुसत्या शिव्या दिल्या असत्या....असे चाललेच नसते... हे सुरू झाले....त्यात खाली स्तेजजवळ एक काकां आले...मी ५० किलोमीटर वरून आलोय....नाटक पाहायला...सुरू करा... आताच करा....आता काय करतील आयोजक...बिचारे...मुद्दाम थोडी केले त्यांनी....एक जण बोलला मला आताच ऑनलाईन पैसे पाठवा....काय करतील...ते...त्यांनी का गोणी मध्ये पैसे आणले असतील का...परत करायला....कठीण काळ सगळा ...बाबा उठले ...काकांना बोलले...त्याने घरून पैसे पण आणले ना... अडी सकाळ हुई जाईन भो.. नंबर लागत लागत....त्या भाऊ कदम च तोंड बी दिसत नाहीये...त्याच्या तोंडावर बट्रिक चमकवा रे भो.....निदान दिशिन तरी भाऊ..अशी शेवटची आर्त हाक मला ऐकू आली...आणि मी जायला निघालो....ऐकून नाट्यगृहाची गुणवत्ता....लक्षात आली....बाहेर पडताना नाट्यगृहाची कोनशिला छान होती ... आताचे माननीय उप मुख्यमंत्री... तेव्हाचे मुख्यमंत्री याचे नाव सुवर्णा अक्षरात छान चमकत होते.... कोनशिलेची गुणवत्ता छानच अगदी...असो आपल्याला काय...नाटक पाहायचे सोडून बाबा ...काका..मावशी हा तीनपात्री प्रयोग फुकटात ऐकण्याचा योग प्राप्त झाला ...अजून काय हवे ...गाडी काढली सगळे घरी आलो....हळदीच्या दुधाने जखमेवर उतारा केला आणि लिहायला घेतले...

    नाटकाचे नाव करून गेला गाव होते ...आणि मला ...करून गेला जळगाव सुचले.... सूचना - राजकीय भक्तांनी या पोस्टशी स्वतचा दूर दूर पर्यंत संबंध जोडू नये....फक्त तेवढे जरा नाट्यगृहाचे काम चांगले करून द्या....आम्ही आमचे ६ तिकिटांचे पैसे १८०० रुपये परत घेऊच.....चूक भूल माफ असावी.

    आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेखक धीरज महाजन ह्यांनी लिहिलेला हा लेख

  • आस्तित्व

    जगण्या-मरण्याच्या पोकळीमध्ये जे दोन-चार क्षण आपल्या वाटयाला येतात त्याला आपण आयुष्य असं म्हणत असतो. पण कधी-कधी या आयुष्याची निरर्थकता स्पष्टपणे जाणवायला लागते. ‘We are thrown into the world’ या हायडेगरच्या वाक्याची सार्थकता जाणवायला लागते. कशासाठी खेळायचा हा खेळ? कशासाठी जगायचं? आई-वडिलांसाठी? बायकोसाठी? मुलांसाठी? देशासाठी? समाजासाठी? पण आई-वडिलांनी तरी का जगावं? मुलाने तरी का जगावे? देश तरी का असावा? समाज तरी का असावा? सगळेच नसले तर कुणाला काहीच फरक पडण्याचे कारण नाही. कारण फरक पडण्यासाठी कुणी असणारच नाही.

    पण असं असलं, तरी ‘मी नसावं’ असं कधीच मला वाटत नाही. येनकेन प्रकारे ‘मी’ माझं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण एकटा ‘मी’ असून भागत नाही. या अवाढव्य पसरलेल्या पृथ्वीवर ‘मी’ एकटा काय करणार? माझ्या सारखचं कुणीतरी माझ्या सोबतीला असायला हवं, नाहीतर ‘मी’ एकटा पडेन. एकट्या ‘मी’ला संपून जाण्याची खूप मोठी भीती असते. पण दुसऱ्या कुणाचे तरी असणं एवढच ‘मी’च्या जगण्यासाठी पर्याप्त नसतं. त्या ‘दुसऱ्या’शी ‘मी’ चे भावनिक नाते असायला हवे. तसे नसेल तर दुसऱ्याच्या असण्याचा ‘मी’ला काहीच लाभ नाही. त्याचा एकटेपणा आणि असुरक्षितता जाणार नाही. म्हणून ‘मी’चं इतरांशी भावनिकरित्या जोडलेलं असणं महत्वाचं असतं. त्या शिवाय ‘मी’ला आनंदानं जगता येणे शक्य नाही. आनंदानं जगण्यासाठी ‘मी’नं कुणावर तरी जीवापाड प्रेम करणं गरजेचं असतं. दुसरं कुणीतरी ‘मी’ वर जीवापाड प्रेम करत असेल तर मग ‘मी’च आयुष्य आनंदाचा उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही.

    no man is an island. आपण सगळे एकमेकांना पूरक आहोत. एकमेकांच्या खांदयावर उभे राहून आपण उत्क्रांतीचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मुक्ती असली तरी ती सामुहिक आहे. एकट्या ‘मी’ला इथे मुक्ती नाही.

    -- संदीप घडमोडे यांचा फेसबुकवरील लेख

  • बलसागर भारत होवो

    ‘भारताला स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे मिळाले, गांधीजींमुळे नव्हे,‘ असे उथळ विधान जनसंघटनेच्या एका नेत्याकडून अपेक्षित नव्हते. सुदर्शनजी पुढे असेही म्हणतात की, ‘इंग्रज देश सोडून गेले, कारण त्यांचा सैन्यदलावरील विश्वास उडाला होता. आणि एवढा मोठा देश आपल्या ताब्यात ठेवणे त्यांना अशक्य वाटले.‘ शेवटचे विधान मात्र सत्य आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्य याच्यामुळे वा त्याच्यामुळे मिळाले, असे त्याचे सरळसोट उत्तर नाही व तसे ते नसणार, हे सांगावे लागेल असे कधी वाटले नव्हते. परंतु सुदर्शनजींनीच असे म्हटल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबी लक्षात आणून देणे भाग आहे.

  • प्रेमाची उधारी

    उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही.

  • भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी

    गांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली.

  • मनाचा धाक

    नुकतीच एका ऑफिसमध्ये गेले होते. एरवी दुसऱ्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये जाताना नेहमी जाणवायचं, जिन्यातले कोपरे लोकांनी पान खाऊन थुंकून घाण करून टाकलेत.

  • मोदी आणि सेन !

    अमर्त्य सेन साहेब, आम्ही तुम्हाला मोठे अर्थतज्ज्ञ आहात असे समजत होतो. कदाचित असालही आपण फार मोठे अर्थतज्ज्ञ. पण आपण उगाचच भलत्या विषयात – ज्यामध्ये आपला काही अधिकार आहे असे दिसत नाही – हात घातलाय. आता हा हात निखार्‍यात घातलाय की शेणात हे आपल्यालाच माहित. कदाचित भाजून निघेल किंवा माखून निघेल.