(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हसावेसे वाटले म्हणून

    तुम्ही शेवटचे मनमुराद,खळखळून ,मोठ्याने कधी हसलाय ?गेल्या आठवड्यात ? गेल्या महिन्यात ? आठवतंय ?
    मी काल रात्रीच हसलो. निमित्त होते “शहेनशहा ” सिनेमाचे. सवयीने चॅनल सर्फिंग करता करता अचानक, जगदीप मिनाक्षी शेषाद्रीच्या मसाज पार्लरमध्ये गेल्याचा प्रसंग सुरु असल्याचे माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी माझ्या बोटांना सांगितले आणि ते बेटे पुढे सर्फिंग करायचंच विसरले.

      November 22, 2024


  • जिवनसाथी

    खरं तर नावातंच खुप काही आहे. अखंड़ जिवनभर जो आपल्याला साथ देईल किंवा देवु शकतो अशी व्यक्ती म्हणजे जिवनसाथी.

      February 5, 2011


  • माणूस, मरण आणि मसणवटा..

    प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे. जो जन्मतो तो एक दिवस मरतो. माणसाचेही तसेच आहे.तोही मरण पावतो. एकदा शरीरातून प्राण निघून गेला की शरीर निजिर्व होते. मग आप्तस्वकीय दु:ख व्यक्त करतात. रडतात. आक्रोश करतात. त्या व्यक्तीच्या कर्मावर , वयावर या दु:खाची तीव्रता अवलंबून असते. जी व्यक्ती आपल्या जवळ वावरलेली असते.तिचा लळा लागलेला असणे. तिच्या कर्तत्वामुळे अनेकांचे भले झालेले असणे यामुळे त्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दु:ख होणो साहजिकच समजू शकतो. पण अशा काही व्यक्ती असतात की त्या आयुष्यभर दुसर्‍याला त्रासच देत आल्या त्याविषयी समाज फारसा हळहळ व्यक्त करत नाही.काहीही असले तरी मृतदेहाची विल्हेवाट लावावीच लागते. धर्मानुसार ती विल्हेवाट वेगवेगळया पध्दतीने लावली जाते. मृतदेह कुणी पुरत असेल, कुणी जाळत असेल तर पाण्याबरोबर वाहून लावत असेल वगैरे.

    भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी तत्वांचा त्यात समावेश आहे . कारण एवढेच की पासष्ट वर्षानंतरही ग्रामसमूहातील समता स्थापन होऊ शकलेली नाही. शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. जगण्याच्या सोयीसुविधा बदलत आहेत. असे झाले असला तरी समता रूजली का? हा महत्वाचा प्रश्न आहे . सांगण्याचे कारण एवढेच की माणसं सगळे सारखेच. रक्त सर्वांचे लालच. पण समाजव्यवस्था का बदलली नाही. गावखेड्यात अजुनही समाज परिवर्तन झालेले नाही. प्रत्येक जातसमूहाची गल्ली वेगळी. प्रत्येक जातसमूहाचा व्यवहार वेगळा.जातीपातीला रूढीपरंपरांना घट्ट चिटकून बसलेला समाज समता कशी प्रस्थापित करू शकेल? गावपातळीवर आजही पाणवठे वेगळे आहेत. तसे मसनवटे सुद्धा वेगळे आहेत. मृतदेह नष्ट करण्याची पद्धती जरी एकच असली तरी त्याची जागा समूहानुसार जातीनुसार बदलते. एकाच धर्मात अनेक जाती आणि प्रत्येक जातीतील माणसाचे मृतदेह वेगवेगळय़ा जागेत विसर्जित करण्याची प्रथा आहे म्हणजे मृत्यूपश्‍चातही जातीव्यवस्था अजुनही किती घट्ट, मुळं रूतून बसलेली आहे याचा प्रत्यय देणारी आहे. हा मुद्दा भावनेशी निगडित असला तरीही वास्तवाचे भान येणे आवश्य़क आहे. एकाच जातीमध्ये वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. एकाच जातीतही उच्चनिच भेदभाव आलाच. गल्ली, वाडे, बेटं, जात, पोटजात, हलके भारी वगैरे. बर्‍याच गावच्या स्मशानभूमी शाळेच्या लगत आहेत काही जनावराच्या दवाखान्याजवळ आहेत काही माणसाच्या दवाखान्याजवळ, काही पाराजवळ, काही गावातच मध्यवर्ती ठिकाणी तर काही बाजार भरतो त्या ठिकाणी. वाढत्या लोकसंख्येबरोबर स्मशानभूमीचे प्रश्न अनेक आहेत. शासनांमार्फत स्मशानभूमीचे शेड , निवारा झाला त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. स्मशानभूमीचे काम तेही निकृष्ट.पत्रे उडालेले. कुणी लोखंड घेऊन पळालेले. तर काही ठिकाणी वेगळाच प्रकार. आतातर स्मशानभूमीवर अतिक्रमणही झालेले आहे. पावसाळय़ात होणारे हाल तर वेगळेच असतात.सरपण, रॉकेल, निवारा यांच्या उपलब्धतेवर काही बाबी अवलंबून असतात...अशा नाना तर्‍हा आहेत. माणूस गेल्यावर म्हणजे मृत झाल्यावर त्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये पण याचवेळी सगळे जागे होतात. जाळण्यावरून पुरण्यावरून भांडणो सुरू होतात.सामाजिक तेढ निर्माण होते. एकतर स्मशानभूमीस पर्यायी जागा नसते किंवा त्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झालेले असते. त्याचा वाद एवढा विकोपाला जातो की बस्स ! विचारूच नका.

    आता गावखेड्यात माणसं रानात घरे करून राहू लागली आहेत. रानातच अंत्यविधी करू लागली आहेत. त्यामुळे तिथे स्मशानभूमीचा वाद होत नाही. पण पुढे रानाच्या वाटण्या झाल्या तर जिथे शव जाळले तिथे दगडही राहत नाही. त्यावरूनही वाद होतोच.मृत व्यक्तीच्या नावे असलेली संपत्ती त्यावरून होणारे वाद तर वेगळेच आहेत. सरकारी सानुग्रह अनुदान जर काही मिळाले असेल तर सरकारीबाबूला त्यात काही वाटा असतो किंवा नातेवाईकाचा वाटणी करण्यावरून वाद होतो . म्हणजे जाणारा जातो जीवानिशी मागचे खेळती वाद! माणसं एकच असली तरी स्मशानभूमी मात्र वेगळी असते. जाणार्‍या माणसाला गेल्यानंतरही सुख लागू न देणारी ही जिवंत समस्त मानव जमात! मृतदेहाचे भांडवल करत वाद निर्माण करणारी माणसंच आहेत ना? शहरी संस्कृतीत अमरधाम, वैकुंठधाम निर्माण झाले आहेत. विद्युतदाहिनी असते.उत्तरक्रियेसाठी जागा असते. पण खेड्यातील स्मशानभूमी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय ठरते. त्याच्या जोडीला स्मशानवैराग्याचे चिंतन असते. उत्तरक्रीयेत दातृत्व उफाळून येते. कालपरवा एका व्यक्तीने नन पायंडा पाडला . दशक्रिया विधी तिसर्‍या दिवशी करण्याचा. तो योग्य की अयोग्य यावरूनही वाद. माणसं शिकली पण सुशिक्षित किती झाली ? अभावानेच आढळतील.गरीब-श्रीमंत यांच्या किंवा जातीव्यवस्थेने निर्माण केलेली व्यवस्था जी स्मशानभूमी, मसनवटा, वैकुंठधाम, अमरधान अशी संबोधने दिलेली आहे त्यामध्ये तरी समता, समानता निर्माण व्हावी. अन्यथा पुढील पिढी प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. विविध सांप्रदायांनी, समुदायाने आणि तरूण पिढीने यावर एकत्रित विचार करावा.

    -विठ्ठल जाधव,
    शिरूरकासार, जि.बीड

      May 25, 2017


  • १५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    १५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू... ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो.

    पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे.

    ब्रिटीशकालीन असलेले हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.

    पुरातत्व दालनात आपल्याला वाकाटककालीन शिल्पे, शिलालेख पाहायला मिळतात. याठिकाणी असलेले मांढळ येथे सापडलेले महासदाशिवाचे शिल्प उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर मोहोंजदडो येथील उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तु, शिल्प तसेच कौण्डीण्यपूर येथे सापडलेली अश्मयुगीन हत्यारे आपणास पाहावयास मिळतात. भेडाघाट येथे सापडलेली यक्ष व यक्षिणीची शिल्पे, कला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.

    शस्त्र दालनात मोगल, इंग्रज, मराठा, राजपूत यांची निवडक शस्त्रे, आदिवासींची शस्त्रे तसेच चिलखत, टोप, धातूच्या साखळीच्या सहाय्याने बनवलेला अंगरखा आहे तर, कला व उद्योग विभागात हस्तीदंत, लाकूड, चांदी, संगमवरी यापासून तयार केलेल्या कोरीव वस्तु प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून जातात.

    येथील प्राणिशास्त्र विभाग प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करणारा आहे. टॅक्सीडर्मी केलेले (भुसा भरलेले प्राणी) मगर, जंगली पशु,किटक,मासे,मगर असे नानाविध प्रकारचे प्राणी इथे आपल्याला भेटतात. पक्षी दालनात असलेला कावळा हा येथील आकर्षण आहे. प्रेक्षकांची पावले हमखास या पांढऱ्या कावळ्याजवळ थबकतात.

    या दालनांसोबत तुम्ही चित्रकला दालनाला नक्की भेट द्या. विदेशातील नामवंत चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली दुर्मिळ चित्रे इथे आहेत. जलरंग, तैलरंग अशा माध्यमातील वस्तुचित्रे, निसर्गचित्रे,व्यक्तीचित्रे नजरेचे पारणे फेडतात. धुरंधर, एस.एम.हळदणकर, एम.आर.आचरेकर, हेब्बर आदी प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या दालनात आहेत. याठिकाणी हळदणकरांचे ‘निरांजनी’ हे गाजलेले चित्र आहे. हे चित्र पाहताना चित्रकाराने साकारलेल्या रंगछटा आणि टिपलेला बारकावा यांचा अनुभव थक्क करणारा आहे. भव्य परीसरात वसलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. अभिरक्षक (क्युरेटर) म्हणून श्री.गठाणे या वस्तुसंग्रहालयाचे काम पाहत असून चित्रकार श्री.मंडपे यांचे त्यांना सहाय्य लाभत आहे. प्रेक्षकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत संग्रहालय खुले असते.

    अनेकविध दुर्मिळ वस्तूंचा नजराणा असलेल्या या वस्तुसंग्रहालयास एक वेळ अवश्य भेट द्या.

    -- काशीबाई थोरात (संदर्भ - महान्यूज)

      April 6, 2016


  • मिल्क एटीएमचे वेधक तंत्र

    एटीएम मशीनमधून हवी तेव्हा आणि हवी तिथे रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली. याच धर्तीवर अनेक ठिकाणी विविध प्रकारची व्हेंडिग मशीन्सही आढळून येतात. अशा परिस्थितीत प्रत्येक घराची मुलभूत गरज असलेले दूध हवे तेव्हा का मिळू नये असा प्रश्न समोर येतो. कॉर्पोरेटजगतातील नवतेचे अनुकरण करत दुग्ध व्यवसायानेही अलीकडेच कूस पालटत एटीएम तंत्राचा अंगीकार केला आहे. या तंत्राचा खास वेध.

      October 29, 2010


  • पर्याय अॅसेट अॅलोकेशन फंड्सचा

    भविष्यात लागणार्‍या निधीची गरज ओळखून त्याप्रमाणे आजच विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याला अॅसेट अॅलोकेशन म्हणतात. पण, अॅसेट अॅलोकेशन करणे तेवढे सोपे नसते. अशा वेळी अॅसेट अॅलोकेशन फंड्स आपल्या मदतीस येतात. यात गुंतवणूकदाराला फारसा विचार करावा लागत नाही. त्यांच्या गुंतवणुकीचे निर्णय तज्ज्ञांद्वारेच घेतले जातात. असे असले तरी काहींचा या फंड्सना विरोध आहे.

      November 19, 2010


  • चंद्रगुप्त मौर्य – एक धगधगती यशोगाथा

    चंद्रगुप्त मौर्य – एक धगधगती यशोगाथा

      March 31, 2012


  • खास धुळवडीनिमित्त…

    p-34373-holi-special-party

      March 13, 2017


  • कन्फेशन.. अपराधांची कबुली (बेवड्याची डायरी – भाग ४४ वा)

    कन्फेशन ' करताना अथवा आपल्या चुकांचा कबुली जवाब देताना पाचव्या पायरीत जो आदरणीय व्यक्तीचा उल्लेख आहे त्या बाबतीत सांगताना सरांनी आजच्या समूह उपचारात... अशी आदरणीय व्यक्ती कोण असावी असे आपल्याला वाटते ? हा प्रश्न सर्वाना विचारला ..एकाने सांगितले की त्याचे आजोबा त्याच्या दृष्टीने आदरणीय आहेत ..एकाने त्याच्या एका यशस्वी मित्राचे नाव सांगितले ..मी माझ्या एका नातलगाचे नाव सांगितले जो अध्यात्मिक विचारांचा होता ..सर्वांची उत्तरे ऐकून समाधानाने स्मित करत सर बोलू लागले ..मित्रानो , आपण योग्य विचार करत आहात ..पाचव्या पायरीत ईश्वराजवळ म्हणजे ईश्वरासामान असलेल्या आपल्या नातलगांपाशी ..स्वताच्या अंतर्मनाशी तसेच अन्य आदरणीय व्यक्तीजवळ आपल्या गतजीवनातील चुकांची तंतोतंत कबुली देण्यास सांगितले आहे ..

    या कबुलीजबाबात एक अडचण अशी येते की आपण गतजीवनात केलेल्या अनेक चुकांची स्पष्ट कबुली आपल्या जवळच्या नातलगांपाशी देणे कठीण असते ..अनेकदा आपण नशेत ..अथवा नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी ..किवा नशेत असताना एखाद्या विकाराच्या आहारी जावून खूप खालच्या पातळीचे अनैतिक वर्तन केले असल्याची शक्यता असते ..जे वर्तन जवळच्या नातेवाईकांना कधीच समजू नये अशी आपली इच्छा असते ..कारण त्यातून त्यांना धक्का बसण्याची शक्यता असते ..किवा त्या गोष्टी सांगितल्याने नातलगांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे संबंध बिघडण्याची शक्यता असते ..उदा . जर नशेच्या भरात मित्रांच्या आग्रहाने एखाद्याने विवाहित असूनही वेश्यागमन केले असेल ..विवाहबाह्य संबंध ठेवले असतील ..तर ते त्याला जवळच्या नातेवाईकांजवळ कबुल करणे कठीण असते ..त्यामुळे त्याच्या नातेसंबंधात बिघाड होण्याची शक्यता वाढते ..किवा पत्नी ..आईवडील ..भावंडे यांच्या दृष्टीने एखादा अक्षम्य गुन्हा केला असेल तर त्याबाबत कबुली त्यांच्याजवळच देणे शक्य नसते ..अशा वेळी मनमोकळे करण्यासाठी म्हणून आदरणीय व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे ..

    ही आदरणीय व्यक्ती बहुधा जवळच्या नात्यामधील नसते ..अथवा जी आपल्या कबुलीजवाबाने विचलित होईल अशी नसावी ..तसेच आपण केलेल्या कबुलीचा गैरफायदा घेईल अशीही नसावी ही दक्षता घ्यावी लागते ..किवा ती व्यक्ती अशा गोष्टी खाजगी ठेवेल याची आपल्याला खात्री असायला हवी,,तसेच आपल्याला आपण केलेल्या चुकीबद्दल दोष न देता ...समजून घेवून पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारी असली पाहिजे ..कबुलीजवाबासाठी अशी आदरणीय व्यक्ती निवडणे हे हुशारीचे काम आहे ..उगाच भावनेच्या भरात कोणाजवळही अशी कबुली देणे नक्कीच हितावह नसते ..

    सरांनी या बाबत स्पष्ट केले की बहुधा अशी आदरणीय व्यक्ती म्हणून आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या जेष्ठ सदस्याची निवड करू शकतो .. ज्याला अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस मध्ये ' स्पाँन्सर ' म्हंटले जाते ..किवा ही व्यक्ती एखादा व्यावसायिक समुपदेशक ..किवा व्यसनमुक्ती केंद्रातील जवाबदार समुपदेशक असली पाहिजे ..अन्यथा आपल्या कबुलीजवाबाने आपली अपराधीपणाची बोच कमी होऊन पुढील योग्य मार्गदर्शन मिळण्याऐवजी एखाद्या नवीन संकटाला सामोरे जावे लागेल ..ही आदरणीय व्यक्ती जर व्यसनमुक्तीच्या बाबत आपल्यालों मदत करणारी असली तर अधिक उत्तम असते ..अशी व्यक्ती निवडताना आपण नीट काळजी घेतली पाहिजे ..आपला कबुलीजवाब आपल्या पुढील मार्गात अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे ..असे सांगत सरांनी पाचव्या पायरीवरील चर्चा संपली असे जाहीर केले ..व्यसनी व्यक्तीचा स्वभाव बहुधा अनैतिकतेकडे झुकणारा असतो त्यामुळे त्याने व्यसनाच्या काळात कौटुंबिक दृष्ट्या , सामाजिक दृष्ट्या , कायद्याच्या दृष्टीने... काही गुन्हे केले असण्याची शक्यता असते ..अशा वेळी कबुलीजवाब जपून द्यावा हे सरांचे म्हणणे आम्हाला तंतोतंत पटले ..

    नंतर सरांनी आमच्यातील पाटील नावाच्या एकाला उभे केले व त्याला विचारले ' तू परवा रविवारी डिस्चार्ज झालेल्या कोणाजवळ आपल्या घराचा पत्ता व पत्नीचा फोन नंबर दिला होतास ते सांग ? सरांच्या या प्रश्नावर पाटील हडबडला ..त्याचा चेहरा गोंधळल्या सारखा झाला ..' नाही सर ..मी कोणालाच पत्ता व नंबर दिलेला नाही ..शपथ " असे म्हणू लागला ..हे नवीन काय ते आम्हाला समजेना ..सरांनी पुन्हा पाटीलला जरा दरडावून विचारले .' खरे सांग तू ..आम्हाला सगळे समजले आहे ..' यावर पाटीलने मान खाली घातली ...आम्हाला समजले की पाटील खोटे बोलतोय म्हणून ..
    सर पुढे सांगू लागले ' व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर लवकरात लवकर पडावे हे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक आहे ..परंतु त्यासाठी आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये ..इथे वेगवेगळ्या स्वभावाचे ..वेगवेगळ्या संस्कृतीचे ..वेगवेगळी नशा करणारे लोक उपचार घेत आहेत ..या पैकी कोण मनापासून उपचार घेतोय हे समजणे कठीण आहे ..

    कारण व्यसनी व्यक्ती हा दुहेरी व्यक्तिमत्वाचा किवा ढोंगी प्रवृत्तीचा असतो ..तेव्हा येथे मैत्री करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे ..इथून बाहेर पडल्यावर येथे मैत्री झालेल्या मित्रांना बाहेर भेटणे धोकादायक असू शकते ..कारण जर त्या मित्राने पिणे सुरु केले तर आपणही त्याच्या सोबत ' रीलॅप्स ' होऊ शकतो ..काही लोक डिस्चार्ज होणाऱ्या व्यक्ती जवळ आपल्या घरचा पत्ता किवा फोन नंबर देतात आणि सांगतात की माझ्या घरी जावून घरच्यांना सांग की मी खूप आजारी आहे ..इथे मला खूप त्रास होतोय ..मला उपाशी ठेवतात ..मारतात ..बांधून ठेवतात ..वगैरे ..म्हणजे घरचे लोक घाबरून लवकर मला डिस्चार्ज देतील ..मित्रानो हा मार्ग अत्यंत चुकीचा आणि खोटेपणाचा आहे ..आपण बाहेर व्यसने करून ..खोटे वागून कुटुंबियांना भरपूर त्रास दिलेला आहे ..आता येथे असताना पण आपण असे खोटे निरोप बाहेर पाठवून घरच्या मंडळीना त्रासात टाकणे योग्य नाही..

    ..या पाटीलने परवा डिस्चार्ज होणाऱ्या एकाजवळ आपल्या पत्नीचा फोन नंबर दिला होता ..तिला लवकर घेवून जा असा निरोप देण्यासाठी ...त्या माणसाने डिस्चार्ज होऊन बाहेर पडल्यावर सरळ याच्या पत्नीला फोन करून ..हा इथे खूप वाईट अवस्थेत आहे असा स्वताचे नाव न सांगता खोटा निरोप दिला ..याची पत्नी घाबरली ..तिने आम्हाला फोन करून खरी माहिती विचारली ..आम्ही सर्व काही ठीक आहे ..या असल्या फोनवर विश्वास ठेवू नका असा तिला धीर दिला ..मात्र नंतर ज्याला नंबर दिला होता तो आता रात्री बेरात्री वारंवार फोन करून याच्या पत्नीला याला लवकर घरी घेवून या असा आग्रह करतोय ..एकदा तर त्याने म्हणे दारू पिवून याच्या पत्नीला फोन केला ..आता हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच सांगा ..हे ऐकून आम्हाला सगळ्यांना त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा रागच आला ..तसेच त्याच्याजवळ पत्नीचा फोन नंबर देवून तिला फोन करायला लावणाऱ्या पाटीलचा देखील राग आला ..शेवटी ती व्यक्ती पत्नीला त्रास देतेय हे ऐकून पाटीलने सरांना त्याचे नाव सांगितले ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

      July 5, 2020


  • प्रेम-स्वभाव

     

      September 25, 2012