(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “जोखीम”

    आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता.

  • फोर्टमध्ये फिरताना – भाग ४

    भारतातील रेल्वेची मुहुर्तमेढ जिथे रोवली गेली ते बोरीबंदर स्थानक म्हणजे नगर चौकातले एक महत्त्वाचे आकर्षण. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेले हे स्थानक आता “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” या नावाने ओळखले जात असले तरी अजूनही अनेकांच्या तोंडत व्ही.टी. स्टेशन (व्हिक्टोरिया टर्मिनस) हेच नाव बसलेले आहे.

  • अपघाताच्या गंभीर प्रसंगातही उदासीनता

    मागच्या शनिवारी साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्याचे ठरवले. सकाळी 10.30 वाजेच्या पॅसेंजर रेल्वेने अकोल्याहून शेगावला पोहोचलो. मंदिरात गेल्यानंतर अगदी पाच मिनिटांतच ‘श्रीं’चे दर्शन झाले. लवकर दर्शन झाल्याचा आनंद होताच. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेत परतीसाठी पुन्हा शेगाव रेल्वेस्टेशन गाठले. सायंकाळी 4.30 वाजेच्या पॅसेंजर गाडीसाठी अकोला, अमरावतीकडे जाणा-या प्रवाशांची गर्दी होतीच. हिवाळ्याचे दिवस असल्याने दिवसही लवकर मावळतो. त्यामुळे सर्वांना घराकडे जाण्याची घाई. रेल्वेगाडी अर्धा तास उशिराने शेगाव स्टेशनवरील प्लॉटफॉर्म क्रमांक 2 वर येऊन उभी राहिली. गाडीत चढण्यासाठी, जागा पकडण्यासाठी गर्दी झाली. काहींनी विरुद्ध दिशेच्या दरवाजातून प्रवेश केला. पाच मिनिटांतच गाडी सुरू झाली. काही प्रवासी खालीच होते. त्यांची गाडीत चढण्यासाठी धडपड सुरू होती. गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी सुरू झाली.
    हळुवार वेग घेत नाही तोच एक वयोवृद्ध प्रवासी धावत्या रेल्वेत चढला. त्याच्यापाठोपाठ दुसराही प्रवासी चढत असतानाच त्याचा पाय पायरीवरून पाय घसरला. ‘खडाक्’ असा जोरदार आवाज आला. डब्यातील मुली जोरात ओरडल्या. सगळे भयभीत झाले. एकच धावपळ उडाली. ‘गाडी थांबवा’ म्हणत सगळेच ओरडले. पण चेन ओढायला कुणी तयार नव्हते. तेवढ्यात मी चेन ओढल्याने गाडी तेथेच थांबली. प्रवासी खाली उतरले. गाडीच्या चाकाखाली एक वयस्कर प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या ओळखीचेही कोणी नव्हते. गाडीतील प्रवाशांनी त्या प्रवाशास जखमी अवस्थेत बाहेर काढले. नंतर स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्याची तयारी चालवली. त्याची अवस्था गंभीर होती. त्या वृद्धाचा चेहरा माझ्या नजरेसमोरून हलत नव्हता.
    -- जनार्दन गव्हाळे, औरंगाबाद

  • ट्विटर’ आणि सरकार

    ‘ट्विटर’ हे अमेरिकी संकेतस्थळ आहे आणि त्याचे भारतात कार्यालयही नाही. सरकारने बंदी घालायचे ठरवले तरी त्यांनी मनात आणले तर अनेक प्रकारे ही बंदी झुगारून ‘ट्विटर’ सुरू राहू शकते. जेथे ‘विकीलिक्स’ ला अमेरिका नमवू शकली नाही, तेथे भारताची काय पाड? त्यामुळे सरकारने उगाच स्वतःचे हसे करून घेऊ नये.

    श्री. परेश प्रभू

    संपादक, नवप्रभा

  • झुळझुळणारा छायानट

    झुळझुळणारा छायानट

    "ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
    आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
    कोणती पुण्ये अशी येती फळाला
    जोंधळ्याला चांदणे लखडून जावे"
    ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग "छायानट" रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, "षाडव/संपूर्ण" अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात "निषाद" स्वराला स्थान नाही. "पंचम/रिषभ" हे या रागाचे वादी/संवादी स्वर असून, "षडज" आणि "मध्यम" स्वरांना या रागात भावदर्शनासाठी महत्वाचे स्थान आहे. "जोंधळ्याला चांदणे लखडून जावे" अशी असामान्य ओळ वाचताना, नजरेसमोर रात्रीच्या शांत समयी, शेतातील डुलणारी जोंधळ्याची रोपे येतात आणि या रागाच्या समयाला भाविक स्वरूप देतात.
    खालील रचना, ही छायानट रागातील अप्रतिम बंदिश आहे. पंडित ओंकारनाथ ठाकुरांच्या असामान्य गायकीने नटलेला, छायानट. पंडितजींच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये यथार्थपणे दाखवणारी, ही रचना आहे. सुरवातीची मंद्र सप्तकातील घुमारेदार गायकी आणि त्या आलापीतून, पुढे विस्तारीत होणारी ही रचना म्हणजे या रागाचा "अर्क" आहे.
    ओंकारनाथ ठाकुरांच्या आवाजाची काही वैशिष्ट्ये बघायला गेल्यास, आवाजाचा केलेला आवाहक उपयोग. तसे बघितले तर ग्वाल्हेर घराण्यातील गायकांच्या आवाजात एक प्रकारे एकाच स्वन डोकावत राहतो. मग, स्वरमर्यादा, गायनप्रकार, विस्तारासाठी कुठलाही राग निवडलेला असो. कारणे अनेक देता येतील पण आवाजात स्वनभेद फार क्वचित अनुभवायला मिळतो. ओंकारनाथ ठाकूर इथे स्वत:चे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवून देतात. मग, तो कधीतरी हळुवार, आर्त असेल किंवा काहीवेळा विलक्षण बोचरा वाटणारा पण प्रचंड ताकदवान आवाज जोरदार तानांनी भारून टाकतो. आपण नेमके काय करीत आहोत, याची यथार्थ जाणीव गायनातून आढळते. आपल्या मांडणीत विविधता यावी म्हणून त्यांनी किराणा सारख्या वेगळ्या घराण्याच्या गायकीचा अवलंब आपल्या गायनात केल्याचे आढळते. तसेच शब्दांच्या उच्चारांवर अधिक भर दिसतो. वास्तविक, रागदारी गायनात, शब्दोच्चाराला फारसे महत्व दिले जात नाही, ओंकारनाथ अपवाद. गायनातील कारागिरी, हा भाग फार महत्वाचा आहे. सुरवातीला, गायनात, क्षमता तसेच कौशल्य, याचा आढळ दिसतो पण पुढे त्याला मात्र दुर्दैवाने, त्याला प्रदर्शनाचे स्वरूप आले. विशेषत: द्रुत लयीत, गुंतागुंतीच्या ताना घेणे तसेच तार ते खालचे स्वर व उलट अशी झेप घेणे, अवाक करणारे होते. गायनात, "नाट्यात्म" आणणे आणि रसिकांना भारून टाकणे, हा विशेष खास म्हणावा लागेल.
    हिंदी चित्रपट गीतांत, शास्त्रीय नृत्य आणि त्यावर आधारित गीते, याना अपरिमित लोकप्रियता मिळाली आहे. एकात नृत्यावर आधारित गाणे म्हणजे रचना बहुतांशी द्रुत लयीत आणि अधिक आवाहक असल्याने, रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम, ही गाणी यथास्थित पार पाडतात. वास्तविक, शास्त्रीय नृत्यावर आधारित अशी गाणी असतात, त्यामुळे नृत्यातील जरी संपूर्ण शास्त्र जरी मांडता येत नसले तरी नृत्याबद्दल रुची निर्माण होण्यास नि:संशय मदत होते, हे निश्चित. "तलाश" चित्रपटातील "तेरे नैना तलाश कर जिसे" हे गाणे या पठडीतले आहे. या गाण्यात, "छायानट" राग जरी अस्पष्ट दिसत असला तरी जेंव्हा रचना त्या रागातील स्वरांवर "ठेहराव" घेते, ती जागा विलक्षणरीत्या झगमगून उठते. मन्नाडे यांचे गायन, अतिशय वेधक आहे. सतारीच्या द्रुत लयीतील गत आहेत आणि त्या लयीशी, गायन अप्रतिमरीत्या जुळून आलेले आहे.
    "खोयी खोयी आंख हैं झुकी पलक है;
    जहां जहां देखेगा तू, वही झलक है खोयी, खोयी;
    तेरे नैना तलाश कर जिसे वो है तुझी में कही दिवाने".
    मन्नाडे यांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचा पल्ला चांगला, अतिशय विस्तृत आहे. याचा परिणाम असा होतो, गाण्यात सर्वत्र, खुलेपणा आणि ताकद राखणे, त्यांना जमू शकत होते. त्यांचा आवाज हलका (सुगम संगीताला अतिशय पूरक) असल्याने, सर्व प्रकारच्या ताना, सहजतेने घेता येतात. भारतीय शास्त्रीय गायनात स्वच्छ "आ"करणे गायन करण्यावर भर असतो आणि हे देखील मन्नाडे, सहज करू शकतात. (खरे सांगायचे तर अनेकदा व्यावसायिक शास्त्रीय गायकांना देखील हे जमत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक) आकाराने शक्य होणारा विशेष गुण म्हणजे सहकंपन वा गुंजन हा परिणामत: त्यांच्या गायनात ओतप्रोत भरला आहे. दुसरा भाग असा, प्रत्येक रचनेनुरूप जी एक भावस्थिती ढोबळमानाने निश्चित झालेली असते, ती दाखवणारा आवाजाचा लगाव, ते देऊ शकतात. वास्तविक चित्रपट गीतास, सांगीत कल्पनांची बढत करायची नसून, एक संबंधित मूड निर्माण करून, बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणून, सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार या बाबी अत्यावश्यक ठरतात आणि हे करताना, आवाजातून, चित्रपटीय व्यक्तिमत्व मिळावे लागते. मुख्य बाब, म्हणजे हे सगळे करताना, त्यांचा आवाज कुठेही नाटकी होत नाही भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करते, हे वैशिष्ट्य, त्यांनी सतत कायम राखले.
    आता आपण, लताबाईंच्या सुरवातीच्या काळातील एक अतिशय सुश्राव्य गाणे ऐकुया. गाण्याची चाल खरोखरच अतिशय गोड, ओघवती आहे. प्रसंगी रचना द्रुत लयीत जाते परंतु शब्दकळेच्या आस्वादाला कुठेही बाधा पोहोचत नाही. गाण्याच्या सुरवातीपासून, रागाची ओळख होते, म्हणजे बघा,"चंदा रे जा रे" ही ओळ गाताना, स्वरांच्या हेलाकाव्यातून, आपल्याला छायानट भेटतो आणि पुढे, अंतरा आणि मधले संगीत ऐकताना, याच रागाचे सूर ऐकायला मिळतात पण तरीही, हे गाणे म्हणजे या रागाचे लक्षणगीत नव्हे!! या गाण्यात, बहुतेक हिंदी गाण्यात सहजपणे वावरणारा केरवा ताल आहे. प्रेमाची कबुली देणारे गाणे आहे पण, तेंव्हाच्या संस्कृती नुसार गाण्याची हाताळणी अतिशय संयत रीतीने झाली आहे. आता, गाण्यात कुठे छायानट बाजूला पडतो? हे बघायला गेल्यास, गाण्याचा पहिल्या अंतरा सुरु होताना, स्वरांची जी "उठावण" आहे, ती बारकाईने ऐकायला हवी. तिथे, रचनेने, हलक्या हाताने, रागाला बाजूला सारले आहे. अर्थात, ही कारागिरी, संगीतकार म्हणून नि:संशय, खेमचंद प्रकाश यांची.
    "चंदा रे जा रे जारे, पिया का संदेसा मोरा कहियो जा;
    मोरा तुम बिन जियरा लागे रे पिया, मोहे इक पल चैन ना आये".
    एकूण कारकीर्द ध्यानात घेत, या संगीतकाराला, "पियानो","सेक्साफोन" ,"क्लेरीनेट " इत्यादी पाश्चात्य वाद्यांची आवड लक्षात येते. एक तांत्रिक विशेष इथे मांडणे जरुरीचे ठरते. तसे बघितले तर ही तिन्ही वाद्ये एका वेधक सीमारेषेवर उभी आहेत. एक तर अखंड व सलग ध्वनी पुरवायचा किंवा सुटेसुटे, तुटक पण ठोस ध्वनी पुरवायचे, या दोन टोकांच्या दरम्यानची जागा या वाद्यांनी व्यापली आहे. "सतार","जलतरंग" इत्यादी वाद्ये वापरली नाहीत, असे नाही (वरील गाणे या संदर्भात ऐकावे) पण त्यांची वाद्ययोजना आधी उल्लेखलेल्या अभारतीय वाद्यांनी निर्माण केलेल्या ध्वनीप्रतिमांशी अंतरंग नाते जोडून आहे. आणखी एक बाब बघता येते. खेमचंद प्रकाश, यांना नाट्यात्म क्षण उभा करण्यासाठी ताल व ठेका आणि वाद्ये न वापरण्याचे तंत्र मनपसंत आहे, असे ठामपणे म्हणावे लागते. अशा वेळेस, गाता आवाज जेंव्हा सुरावट रेखायला लागतो, तेंव्हा ही वाद्ये, त्या सुरावटीला पाठींबा देतात, पण ध्यानात येईल इतक्या नरमाईने. गाणारा आवाज तार स्वरांत जाईल किंवा खालच्या पट्टीवर पोहोचेल पण, त्याचे परिणामकारक कार्य अतिशय नियंत्रित गतीने होत राहील. वरील गाण्याचाच आधार घ्यायचा झाल्यास, सुरवातीचे शब्द किंवा "मुखडा" कानावर पडेपर्यंत सुरावट खालच्या स्वरांवर रुंजी घालत असते आणि जेंव्हा ठाशीव किंवा वरच्या स्वरावर झेप घेणारा मुखडा येतो, तेंव्हा गीताचा रोख(च) बदलतो. आणि हे सगळे करताना, गाण्याची लय देखील, मंद्र सप्तकात वावरत असते.
    "पापा कहते है" या चित्रपटात, संगीतकार राजेश-रोशन या जोडीने असेच सुंदर गाणे दिले आहे - मुझ से नाराज हो तो हो जाओ. सोनू निगम यांनी हे गाणे गायले आहे. सत्कृत्दर्शनी ऐकायला घेतले तर, काही वर्षापूर्वी "जहांआरा" म्हणून आलेल्या चित्रपटात याच चालीच्या धर्तीवर - "बाद ए मुद्दत तो ये घडी आई" या गाण्यावर आधारित या गाण्याची चाल वाटते आणि याचे कारण, दोन्ही गाणी ही "छायानट" रागावर आधारित आहेत!!
    "मुझ से नाराज हो तो हो जाओ,
    खुद से लेकिन खफा खफा ना रहो."
    अर्थात जरी गाण्यांच्या चालीत साद्धर्म्य दिसत असले तरी गाणे म्हणून ही चाल अतिशय श्रवणीय आहे. चाल काहीशी संवादात्मक असल्याने बहुतेक सगळी रचना सलग, एक statement केल्यासारखी विस्तारत जाते. या गाण्यातील प्रत्येक "वळणावर" आपल्याला छायानट राग भेटतो आणि याचा परिणाम, या रागाची केवळ ओळखच नव्हे तर सगळे सौंदर्य आपल्या नजरेत सामावले जाते. अर्थात, सुगम संगीताचे हे एक खास वैशिष्ट्य मानायलाच हवे.
    असेच एक अप्रतिम गोडवा लाभलेले गाणे,"जहांआरा" या चित्रपटात, संगीतकार मदन मोहन यांनी दिलेले आहे. "बाद ए मुद्दत तो ये घडी आई" हे गाणे म्हणजे युगुलगीत कसे गावे, याचे सुंदर उदाहरण आहे. प्रणयी थाटाचे गीत आहे पण हळुवार, संयत चालीने त्या गीताचा गोडवा अधिक वाढला आहे. खरेतर कविता म्हणून देखील ही रचना आगळा आनंद देते आणि याचे श्रेय निश्चितपणे, राजेंद्र कृष्ण यांच्याकडे जाते. शायरीत काही उर्दू शब्द आहेत पण त्याचे प्रमाण तसे अल्प असल्याने, ज्यांना उर्दू समजत नाही, त्यांच्या वाचनात देखील किंचितही विक्षेप येत नाही.
    "बाद ए मुद्दत तो ये घडी आई,
    आप आये तो जिंदगी आई;
    इश्क मर मरके कामयाब हुआ
    आज एक जर्रा आफताब हुआ".
    गाण्यात कुठेही अनावश्यक वाद्यमेळ नसल्याने, गाणे ऐकताना देखील आपण काव्यास्वाद घेऊ शकतो. रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायन केलेले आहे. लताबाईंच्या सार्वभौमत्वाला जर त्याच शैलीत कुणी आव्हान देऊ शकले असते तर ते केवळ सुमन कल्याणपूर, या गायिकेने!! आवाजाची जात बरीचशी मिळती जुळती असल्याने आणि आवाज निमुळता होत, शेवटी आवाजाला लोचदार टोक येत असल्याने, लताबाईंची गायकी आत्मसात करणे, या गायिकेला जराही अवघड गेले नाही (असे म्हणतात, हीच त्यांच्या गायनाबाबत मर्यादा ठरली!!) दाट बासुंदीत हळूहळू केशर विरघळत जावे त्याप्रमाणे ही चाल आपल्या मनात उतरत जाते. चाल तशी सहजपणे मनाची पकड घेणारी नाही पण जरा बारकाईने वेध घेतला तर गाण्याची सगळी सौंदर्यस्थळे जाणवतात आणि हे गाणे परिचयाचे होऊन बसते. राग छायानट तसा इथे काही ठिकाणी स्पष्टपणे आढळतो पण हा संगीतकार, नेहमीच रागाच्या सावलीत "तर्ज"बांधून पुढे रागाला बाजूला सारतो आणि चालीला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करतो. या गाण्याच्या बाबतीत तीच शैली वापरली आहे आणि त्या दृष्टीने, गाणे फारच बहारीचे होते.
    - अनिल गोविलकर

  • सारसबाग गणपती

    पुण्याच्या सारसबागेत पेशव्यांनी बाग वसवली. तलाव खोदून त्यात पाणी सोडले, मधोमध एक बेटवजा जागा ठेवून त्यात बाग फुलवली.

  • देशभक्तीपर १० चारोळ्या

    १)
    देशप्रेम
    देशावर
    करावेच
    जन्मभर

    २)
    सैनिक हे
    लढतात
    प्राणत्याग
    करतात

    ३)
    देशसेवा
    व्रतमाझे
    नित्य करी
    कार्य माझे

    ४)
    देशास्तव
    प्राण देऊ
    शुत्रुचाच
    प्राण घेऊ

    ५)
    राष्ट्रगीताचा
    ठेवूया मान
    करू सदाच
    त्याचा सन्मान

    ६)
    देशा साठी
    जे लढले
    ते सारेच
    हुतात्मे झाले

    ७)
    अमरत्व
    मला मिळो
    लढण्यास
    स्फुर्ती मिळो

    ८)
    क्रांती सुर्य
    उजळती
    दशदिशा
    गाजवती

    ९)
    प्राणपणाने
    तो झगडला
    शिरिषकुमार
    हुतात्मा झाला

    १०)
    सागरातली उडी
    सावरकरांची
    जगात गाजली
    प्रचिती दिव्यत्वाची

    -- सौ.माणिक शुरजोशी

  • ताना तोराजा

    सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता.

  • मराठी माणूस आणि योगविद्या

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ नोव्हेंबर, १९५४ साली हैद्राबादयेथील ’मराठवाडा साहित्यपरिषदेत‘ भाषण करताना म्हणाले होते की, ”भारतातील सर्वभाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत कुठला असेल, तर तो ’महाराष्ट्र‘ होय! इतर परप्रंातीयांकडून संपूर्णपणे नागवला गेलेला, हा भोळाभाबडया माणसांचा प्रदेश आहे. भारतीय नागरिक सर्व एक, हे जरी खरे असले, तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळयाभाबडयांचा घात होतो!“ आधुनिककाळाच्या रेटयात या ’नागवल्या गेलेल्या व म्हणूनच मागे पडलेल्या‘ भोळयाभाबडया मराठीजनांना, पुन्हा एकवार ’अटकेपार झेंडा‘ लावण्यासाठी व शिवछत्रपतींप्रमाणेच जाज्वल्य राष्ट्रधर्म निर्मिण्यासाठी गरज आहे, ती एका तेजस्वी व निरोगी-निर्व्यसनी तरूणपिढीची… आणि ही अशी ’पिढी‘, फक्त अविरत योगाभ्यासाच्या मजबूत ’शिडी‘वरच चढून गगनाला गवसणी घालू शकेल!!!“

  • मर्ढेकरांची कविता – पिंपात मेले ओल्या उंदिर

    मर्ढेकरांची पिंपात मेले ओल्या उंदिर कविता – दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ