(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • आश्वासक जयजयवंती

    मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात लगेच आढळत नाही. त्यासाठी, सतत ऐकण्याची सवय ठेवावी लागते. अर्थात, एकदा का या संगीताची गोडी लागली (सुरांची "आस" लागली) की मग, खऱ्याअर्थाने भारतीय संगीताचा आनंद घेता येतो.
    आपण सगळेच दिवसभर सतत, अविश्रांतपणे कामात अडकलेले असतो. सतत धावपळ, डोक्यावर "टेंशन" आणि कसेही करून आयुष्य पुढे रेटायचे किंवा अधिक सुखकर बनवायचे, ह्याच ध्यासाने पछाडलेले असतो. अगदी जेवणासारखी प्राथमिक बाब देखील, आपण "उरकून" टाकतो!! मनाला विश्रांती म्हणून द्यायला तयार नसतो आणि अशा वेळेस, रात्रीची जेवणे आटोपून, मनाला किंचित विसावा मिळावा म्हणून घराच्या एका कोपऱ्यात निवांत बसण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाच वेळी, कानावर "जयजयवंती" रागाचे सूर यावेत आणि मन हलके होऊन, पिसाप्रमाणे तरंगायला लागते. सुरांची ही जादू खरच विलक्षण म्हणायला हवी.
    दोन्ही गंधार(कोमल आणि शुद्ध) तसेच दोन्ही निषाद, यांच्या सहाय्याने सगळ्या सुरांना सामावून घेणारा हा "संपूर्ण/संपूर्ण" जातीचा राग फार विलक्षण गारुड मनावर टाकतो. या रागातील हे जे दोन "कोमल" स्वर आहेत, तेच आपल्या पाठीवर आश्वासकतेचा हात फिरवतात. हा सगळा राग अतिशय मृदू, कोमल स्वरांनीच वेढून टाकलेला आहे. तसे बघितल्यास, या रागात, रागाचे म्हणून जे सगळे "अलंकार" आहेत, त्याचा संपूर्ण आढळ होतो पण, एकूणच प्रकृती ही आश्वासकतेकडे झुकणारी, एखादा मित्राने पाठीवर हात टाकून, विश्रब्ध मैत्रीचा विश्वास दर्शविणारी!!
    मनाला विसावा देण्याच्या मन:स्थितीची ओळख आपल्याला पंडित हरिप्रसाद चौरसिया, यांच्या बासरी वादनातून अनुभवता येते.
    मृदुतेचा परिपूर्ण अनुभव देणारे हे वादन. सुरवातीपासून, नेहमीच्या धाटणीने "ठाय" लयीत सुरु झाले आहे. सुरांच्या पहिल्याच आवर्तनात, आपल्याला "कोमल" गंधाराची ओळख पटवून देते. रिषभ सुरावरून दोन्ही गंधारावर जशी लय झुकते, तिथे आपल्या जयजयवंती रागाची खूण पटते. इथे आपल्याला प्रत्येक सूर आणि त्या सुराच्या चलनाचा आनंद घेता येतो. प्रत्येक सूर कसा "अवतरतो" आणि आपले अवतरणे सिद्ध करताना, आपल्या बरोबर इतर सुरांना कसा सोबतीने घेऊन येतो, हेच ऐकण्यासारखे आहे.
    ही रचना आपल्या ऐकताना, आपल्याला सहज समजून घेता येईल. मी मुद्दामून अतिशय संथ लयीत चालणारी रचना घेतली आहे जेणेकरून, आपल्याला रागातील स्वरांचे स्थान, त्यांचे विहरणे आणि परत पुन्हा घरट्यात परतणे, आपल्याला किती समृद्ध करून जाते, हे सहज समजून घेत येईल. सगळी रचना आलापी आणि शेवटाला द्रुत लयीत गेलेली आहे परंतु जर का आलापी बारकाईने (बारकाईने ऐकणे, ही तर भारतीय संगीताची मुलभूत "अट" आहे!!) ऐकली तर पुढील द्रुत लयीतील रचना ऐकणे आणि त्याचा मन:पूत आनंद घेणे, हा विश्रब्ध आनंदाचा भाग ठरेल. आणखी एक मजा या रचनेत आहे, रचना जरी द्रुत लयीत शिरली असली तरी, केवळ द्रुत लयीत आहे म्हणून तानांचा पाउस नाही तर आलापीमध्ये स्वरांचा जो विस्तार केलेला आहे, तोच "तोंडवळा" कायम ठेऊन, फक्त त्रितालात रचना बांधलेली आहे, त्यामुळे आधीच केलेली आलापी अधिक भरीव आणि परिपूर्ण होते.
    गुलाम अली साहेबांची "दोस्त बन कर भी नही साथ निभानेवाला" ही या रागाची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देणारी गझल आहे. गझल गायकीत, ठुमरी रंगाचा अत्यंत यशस्वी वापर करून तशी गायकी रुजवणारा हा गायक.
    "दोस्त बनकर भी नहीं साथ निभानेवाला,
    वोही अंदाज है जालीम का जमाने वाला;
    क्या करे कितने मरासिम थे हमारे इस से
    वो जो एक शख्स है मुंह फेर के जाने वाला".
    गायकाचा गळा जर तयार असेल तर तो रागाची ओळख किती चटकन आणि समर्थपणे करून देतो, हे इथे ऐकण्यासारखे आहे. जयजयवंती रागातील कोमल गंधार स्वराचे महत्व आपण वर बघायला मिळते, त्याचाच अत्यंत सुंदर आविष्कार इथे ऐकायला मिळतो. सुरवातीच्या "आकारा"नंतर लगेच "नि सा रे" या स्वरावलीनंतर ग(कोमल)" किती अप्रतिम लावला आहे. रिषभ स्वरावरून गंधार स्वरावर येताना, स्वरांत जी "उतरंड" घेतली आहे आहे आणि त्या स्वराचा नाजूक स्वभाव दर्शवला आहे, तेच खरे ऐकण्यासारखे आहे. खरे तर त्यांनी संपूर्ण सप्तक घेतले आहे आणि त्यातून रागाचा आवाका दाखवला आहे आणि हे देखील किती सहज, कसलेही आडंबर न घेता दाखवले आहे. तसे बघितले तर गुलाम अलीची गायकी "अवघड" म्हणावी अशी असते. कुठलीही तान, सरळ रेषेत न घेता, वक्रोक्तीने घ्यायची असा अगदी अट्टाहास वाटावा, इतका आग्रह दिसतो परंतु इथे मात्र रागाची प्रकृती ओळखून, रचना मृदू स्वभावात गायली आहे.
    मन्नाडे हा गायकाने अशीच अफलातून चीज "देख कबीरा रोया" या चित्रपटात गायली आहे. मदन मोहन यांची रचना, जयजयवंती राग आणि मन्नाडे यांचे गायन, तेंव्हा गाणे श्रवणीय झाले नसल्यास काय नवल!!
    "बैरन हो गयी रैन,
    रैना रैना बैरन
    हो गयी रैना
    बैरन हो गयी रैना".
    ध्वनीशास्त्राच्या तंत्रानुसार मन्नाडे इतका अप्रतिम आवाज, हिंदी चित्रपट संगीतात झाला नाही, असे विधान सहज करता येईल. सगळ्या सप्तकात अत्यंत मोकळेपणी फिरणारा गळा, तानेला कुठेही अटकाव नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाण्याला योग्य तो आवाज पुरवण्याची असामान्य क्षमता, या गायकाच्या गळ्यात होती. दुदैवाने, शास्त्रीय गीते(च) गाऊ शकणारा गायक, असे "लेबल" नावावर चिकटले आणि तीच ओळख अखेरपर्यंत राहिली!!
    अर्थात प्रस्तुत गाणे, सरळ सरळ जयजयवंती रागावर आधारलेले आहे तरीही चित्रपटातील गाणे आहे, याचे भान राखून रचना बांधलेली आहे. संथ, ठाय लयीत झालेली गाण्याची सुरवात, पुढे सहजपणे द्रुत लयीत शिरते पण तरीही गाण्याची "बंदिश" होऊ न देण्याची काळजी, गायक आणि संगीतकाराने घेतलेली आहे. अगदी पहिलीच ओळ, "बैरन हो गयी रैन" गातानाच आपल्या समोर हा राग स्पष्ट उभा राहतो. पुढे गाण्यात, द्रुत लयीतील ताना आहेत, सरगम आहे पण तरीही गाणे चित्रपटातील आहे. या तानांची "जातकुळी" बघितल्यावर, या गायकाच्या श्रेष्ठत्वाची साक्ष पटू शकते.
    श्रीनिवास खळे आणि आशा भोसले यांनी तशी तुलनेने कमी गाणी गायली आहेत परंतु त्यातील प्रत्येक गाणे म्हणजे भावगीतातील वेचक दृष्टी आहे. इथे आता आपण, असेच एक सुंदर भजन या रागावर आधारित आहे. "अजि मी ब्रह्म पाहिले". हेच ते गाणे.
    "अजि मी ब्रह्म पाहिले"
    अगणित सुगरण वर्णिती ज्यासी,
    कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले."
    एकतर खळेसाहेबांच्या रचना या नेहमीच अवघड असतात - ऐकायला श्रवणीय वाटतात परंतु गायला घेतल्यावर त्यातील "अवघड" जागा दिसायला लागतात. रचना गायकी ढंग दाखवणारी आहे आणि अशी रचना गायला मिळाल्यावर, आशा भोसले यांचा गळा काय अप्रतिम खुलून येतो. इथे एक गंमत आहे. या गाण्याची सुरवात जरा बारकाईने ऐकायला घेतली आणि त्याचबरोबर , मी सांगितलेली पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची रचना ऐकायला घेतली तर लगेच, पंडितजींच्या सुरवातीच्या आलापित, या गाण्याच्या चालीचे "मूळ" सापडेल. अर्थ एकच, एकाच रागातील रचना असल्यावर त्यात अशाप्रकारे साद्धर्म्य सापडते.
    गायकी ढंगाची चाल मिळाल्यावर, ही गायिका गळ्यात किती वेगवेगळी "वळणे घेते बघा. सुरवातीची ओळ - "अजि मी ब्रह्म पाहिले" किती वेगवेगळ्या अंगाने गायली आहे आणि प्रत्येक वेळेस समेवर येताना, स्वरिक वाक्यांश किती विलोभनीय पद्धतीने आला आहे. गाण्यात पारंपारिक भजनी ठेका आहे परंतु खरी गंमत चालीच्या बांधणीत आहे. अचूक शब्दोच्चार, शब्दांना जोडून येणाऱ्या हरकती, क्वचित ताना, आणि त्यामुळे त्याच शब्दांना मिळणारा वेगळा अर्थ, या सगळ्या अलंकारांनी हे गाणे अधिक श्रवणीय झाले आहे.
    "मन मोहना बडे झुठे,
    हार के हार नहीं माने".
    चित्रपट "सीमा" - संगीतकार शंकर/जयकिशन यांच्या कारकिर्दीत अढळ स्थान मिळवणारा हा चित्रपट. गाण्याची एकुणात रचना बघितली तार "जयजयवंती" रागाचे लक्षण गीत म्हणून या गाण्याकडे बघता येईल. गाण्याची बांधणी , जणू काही "बंदिश" तयार करीत आहोत अशा धाटणीने केली आहे पण तरीही एक बाब अवश्यमेव मान्य करायलाच लागेल. चाल गायला अतिशय अवघड आहे पण चित्रपटाच्या प्रसंगाला अनुरूप आहे. लताबाईंची गायकी या गाण्यात खुलून आली आहे. गाण्यात, स्वरांच्या "उठावणी" च्या जागा अतिशय कठीण आहेत.
    "ये दिल कि लगी कम क्या होगी
    ये इश्क भला कम क्या होगा
    जब रात है ऐसी मतवाली
    फिर सुबह का आलम क्या होगा".
    "मुघल-ए-आझम" चित्रपटातील ही रचना कव्वाली सदृश आहे पण एका दृष्टीने विराणी देखील म्हणता येईल. आलिशान चित्रपटातील आलिशान रचना असे या गाण्याचे वर्णन करता येईल. रचना म्हणून तशी फार गुंतागुंतीची नाही, प्रसंगी द्रुत लयीत चालणारी रचना, या रागाशी तशी दुरूनच नाते सांगते.
    -- अनिल गोविलकर

  • प्रकाशाचा वेग – मोजला तरी कसा जातो?

    प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर इतका असल्याचं शाळेत असताना वाचलं होतं. इतका प्रचंड वेग मोजला कसा गेला? याबद्दल आपल्या मनात कुतुहल असेलच. अशाच विज्ञानविषयक प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला येथे मिळतील. हा उपक्रम `मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.

  • संपर्क – सामाजिक संस्था, पेझारी

    बांधण हे पेझारीजवळील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि प्रदुषणमुक्त गाव. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्‍या या अतिशय स्वच्छ गावात अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि उमेद फुलवणारी, त्यांच मुलपण जपता जपता त्यांना पुढील स्पर्धेसाठी शैक्षणिकदृष्टया आणि वैचारिकदृष्टया सजग बनवणारी, इतकेच नव्हे त्यांच्या संपुर्ण शैक्षणिक आणि नोकरी लागेपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतुद करणारी, आणि पुढील भविष्यांत त्यांच्यामधील निती-मुल्य जपणारी एक N.G.O.

  • किती इंधन फुकट घालवायचं ?

    या टोलधाडीसाठी देशाचं किती नुकसान करायचं त्याला काही limit आहे की नाही? प्रत्येक टोल नाक्यासमोर ही मोठी लाईन. सगळी वाहने पहिल्या गियरमध्ये चालतायत आणि लिटरवारी पेट्रोल-डिझेल फुकट घालवतायत.

    कुठेतरी थाबायलाच पाहिजे हे सगळं... निवडणूका लढताना टोलमुक्य महाराष्ट्राची आश्वासनं दिलीत ती गेली कुठे?

  • कर्माचे फळ

    अरे बाबा काय होत तुला एवढे उपचार केले तू बरा का होत नाही रे बाळा

  • मराठी भाषेची मज्जा !!!

    आज मराठी राजभाषा दिन............ मी आज शपथ घेतली; दिवसभर फक्त आणि फक्त मराठीतच बोलेन...

    शपथ घेतो तोच बायकोनं आज्ञा केली."अहो! कॉर्नर च्या मेडीकल शॉप मधून बाळाला डायपर आणून द्या.

    मी औषधालयात गेलो अन सांगितले:-

    शिशू शीसू सुलभ शोषक कटी शुभ्र लंगोट द्या........

    ते म्हणले: पतंजलीत तपास करा.

  • भाडेकरार – संस्था, सदस्य आणि भाडेकरू यांच्या जबाबदाऱ्या

    भाग-२. मागील लेखामध्ये १ ते ५ प्रश्न उत्तरे आपण वाचली आहेत. आता ६ ते ११ या अंकामध्ये प्रसिद्ध करीत आहोत.

  • मेड फॉर इच अदर

    कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं.
    लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.
    वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?
    सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.
    सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
    निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं
    नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?. त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.
    - अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.
    कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.
    लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं.
    तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे' पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं...
    जाब विचारू शकतो आपण?
    किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची
    आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं - असं स्वप्न आहे!'
    पण
    प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.
    जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं.
    प्रवासाची आवड कसली?
    - कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब... वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर
    उत्तर म्हणून फक्त जांभया देतो.
    कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर...
    मनापासून सांगतो,
    त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.
    तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली.
    अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.
    पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना
    सांगितलंच जात नाहीये;
    नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.
    आणि मग करा काय??
    आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.
    धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..
    एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?-
    या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी
    देऊन मगच संसार मांडायला हवा.
    आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या
    व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...
    ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात..
    आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..
    हेच संसाराचं खरं मर्म आहे.
    "मेड फॉर इच अदर"
    आपोआप होत नाहीत.
    होत जातात.

  • बाईपण..

    बाईपण म्हणजे काय हे बाईला समजले पाहिजे. पुरुषांना आपला पुरुषार्थ गाजवावा लागतो. अगदी तसेच बाईला बाईपण निभावून न्यायला लागते. म्हणजे किमान नम्रता. शालीनता. चारित्र्य. त्याग.संयम.सुगरण.स्वच्छता टापटीप. अशा अनेक गोष्टी असतात. शिवाय माया प्रेम आपुलकी. बांधिलकी निष्ठा यादी खूप मोठी आहे आणि हे सगळे अगदी काटेकोरपणे पाळणे शक्य नसेल तर किमान थोडे बहुत असणे आवश्यक आहे नव्हे गरजेचे आहे...

    स्वच्छता टापटीप हे उपजतच असतात तिच्यात पण उगाच पाट्या टाकल्या म्हणून असे होत नाही. साध उदाहरण कपडे धुणे आणि वाळत घालणे. आता हे सगळे मशीन वर आहे पण वाळत घालतांना फटकणे. आणि व्यवस्थित रितीने वाळत घातलेले कपडे सुद्धा बघावेसे असे आणि परत ते घालावेसे वाटले पाहिजेत. नाहीतर नाडी लोंबकळत. बाह्या उलटसुलट. विजारीचे दोन भाग आतबाहेर. आणि किती तरी कपडे यांचे सगळेच उलटसुलट. आणि वरुन घड्या घातल्या गेल्या त्याच प्रमाणे तर काय होते ते सांगायची गरज नाही..आणि हातात करंट असते की काय असे वाटते कारण प्रत्येक वस्तू खाली पडणारच. भाजणे. बोट कापणे. वगैरे नेहमीच.
    आता स्वयंपाक करणे म्हणजे जबाबदारी. पार पाडणे एवढेच नसते. साधा स्वयंपाक भाजी भाकरी भात वरण चटणी कोशिंबीर हे सुद्धा चांगले रुचकर असले तरी चालते. भाजी चिरणे निवडणे फोडणीस टाकणे. आता तेल किती घालायला लागते. नतंर मोहरी जिरे हिंग
    कडिपत्ता किती कसे घालायचे हे सगळं माहित असायला हवे. नाहीतर फोडी की फोड. तेलात आणि कडिपत्ता यात घालून लगेचच न वाफवता तांब्या भर पाणी घालून शेंगदाण्याचे कूट भाजीत की कुटात भाजी हे समजत नाही. आणि पानात वाढताना भाजी बिचारी जागेवर आणि तिचा रस्सा सोडून पार घरंगळत गेला. भाकरी म्हणजे काय एकच खावा गप्प राव्हा अशी परत मागायचे नाही. एवढी वजनदार. पोळी वरचे ब्युटी स्पॉट्स लहान मोठे पाहून ग्रहगोल आठवतात. आता बाकीचे सगळे कसे असतील हे जाणून घ्या. वाढणे म्हणजे बापरे. आणि इतर कामात तर एकदम भारी घर झाडणे. घरातील चालणे बोलणे एकसारखेच. बाईच चालण असे नखऱ्याच
    की घरातील फर्निचर ही लटपट कापतात. आणि यांच्या पायाला हाताला गुडघ्याला धडकतात आणि वरुन त्यांना रागाने लाथ बसते ते वेगळेच हे सगळे जास्त प्रमाणात आहे पैसे घेऊन काम करणाऱ्या गृहसेविकात. भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व
    बाई म्हणून लागणारे हे सगळे गुण नसतील तर काय होईल त्या घराची हालात. मग ती घरातील असो की पैसे देऊन लावलेली बाई असो. हे कल्पनेने रंगवलेले नाही तर पाहिले आहे अनुभवले आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हणतात ते बरोबर आहे. तुला दिले रे देवान दोन हात दहा बोटे. थोड्या दिवसांसाठी आपल्या पिला साठी घरटं बांधणारी तिला म्हणतात सुगरण.

    सौ कुमुद ढवळेकर
    All reactions:
    219

  • इक्वेटर क्रॉसिंग

    जहाज जेव्हा पृथ्वीचे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करते त्यावेळी जहाजावर इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी साजरी केली जाते.