प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर इतका असल्याचं शाळेत असताना वाचलं होतं. इतका प्रचंड वेग मोजला कसा गेला? याबद्दल आपल्या मनात कुतुहल असेलच. अशाच विज्ञानविषयक प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला येथे मिळतील. हा उपक्रम `मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.
बांधण हे पेझारीजवळील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि प्रदुषणमुक्त गाव. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्या या अतिशय स्वच्छ गावात अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि उमेद फुलवणारी, त्यांच मुलपण जपता जपता त्यांना पुढील स्पर्धेसाठी शैक्षणिकदृष्टया आणि वैचारिकदृष्टया सजग बनवणारी, इतकेच नव्हे त्यांच्या संपुर्ण शैक्षणिक आणि नोकरी लागेपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतुद करणारी, आणि पुढील भविष्यांत त्यांच्यामधील निती-मुल्य जपणारी एक N.G.O.
या टोलधाडीसाठी देशाचं किती नुकसान करायचं त्याला काही limit आहे की नाही? प्रत्येक टोल नाक्यासमोर ही मोठी लाईन. सगळी वाहने पहिल्या गियरमध्ये चालतायत आणि लिटरवारी पेट्रोल-डिझेल फुकट घालवतायत.
कुठेतरी थाबायलाच पाहिजे हे सगळं... निवडणूका लढताना टोलमुक्य महाराष्ट्राची आश्वासनं दिलीत ती गेली कुठे?
अरे बाबा काय होत तुला एवढे उपचार केले तू बरा का होत नाही रे बाळा
आज मराठी राजभाषा दिन............ मी आज शपथ घेतली; दिवसभर फक्त आणि फक्त मराठीतच बोलेन...
शपथ घेतो तोच बायकोनं आज्ञा केली."अहो! कॉर्नर च्या मेडीकल शॉप मधून बाळाला डायपर आणून द्या.
मी औषधालयात गेलो अन सांगितले:-
शिशू शीसू सुलभ शोषक कटी शुभ्र लंगोट द्या........
ते म्हणले: पतंजलीत तपास करा.
भाग-२. मागील लेखामध्ये १ ते ५ प्रश्न उत्तरे आपण वाचली आहेत. आता ६ ते ११ या अंकामध्ये प्रसिद्ध करीत आहोत.
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं.
लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.
वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?
सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.
सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं
नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?. त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं.
- अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.
कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.
लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना कळत जातं.
तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे' पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडलं नाही बयेनं...
जाब विचारू शकतो आपण?
किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची
आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं - असं स्वप्न आहे!'
पण
प्रत्यक्षात कळतं; कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.
जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं.
प्रवासाची आवड कसली?
- कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब... वर्षभर सांगतेय, माथेरानला जाऊ तर
उत्तर म्हणून फक्त जांभया देतो.
कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते कळले असते तर...
मनापासून सांगतो,
त्या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर लग्न होत असतं आपलं.
तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली... नाही जमलं की विस्कटली.
अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला... पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.
पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना
सांगितलंच जात नाहीये;
नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.
आणि मग करा काय??
आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं हेच खरं वास्तव आहे.
धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुलं फुलणार ?..
एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?-
या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी
देऊन मगच संसार मांडायला हवा.
आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या
व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं हे या वाटेवरच पाहिलं पाऊल...
ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की इतर सहा पावलं सहज पडत जातात..
आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..
हेच संसाराचं खरं मर्म आहे.
"मेड फॉर इच अदर"
आपोआप होत नाहीत.
होत जातात.
बाईपण म्हणजे काय हे बाईला समजले पाहिजे. पुरुषांना आपला पुरुषार्थ गाजवावा लागतो. अगदी तसेच बाईला बाईपण निभावून न्यायला लागते. म्हणजे किमान नम्रता. शालीनता. चारित्र्य. त्याग.संयम.सुगरण.स्वच्छता टापटीप. अशा अनेक गोष्टी असतात. शिवाय माया प्रेम आपुलकी. बांधिलकी निष्ठा यादी खूप मोठी आहे आणि हे सगळे अगदी काटेकोरपणे पाळणे शक्य नसेल तर किमान थोडे बहुत असणे आवश्यक आहे नव्हे गरजेचे आहे...
स्वच्छता टापटीप हे उपजतच असतात तिच्यात पण उगाच पाट्या टाकल्या म्हणून असे होत नाही. साध उदाहरण कपडे धुणे आणि वाळत घालणे. आता हे सगळे मशीन वर आहे पण वाळत घालतांना फटकणे. आणि व्यवस्थित रितीने वाळत घातलेले कपडे सुद्धा बघावेसे असे आणि परत ते घालावेसे वाटले पाहिजेत. नाहीतर नाडी लोंबकळत. बाह्या उलटसुलट. विजारीचे दोन भाग आतबाहेर. आणि किती तरी कपडे यांचे सगळेच उलटसुलट. आणि वरुन घड्या घातल्या गेल्या त्याच प्रमाणे तर काय होते ते सांगायची गरज नाही..आणि हातात करंट असते की काय असे वाटते कारण प्रत्येक वस्तू खाली पडणारच. भाजणे. बोट कापणे. वगैरे नेहमीच.
आता स्वयंपाक करणे म्हणजे जबाबदारी. पार पाडणे एवढेच नसते. साधा स्वयंपाक भाजी भाकरी भात वरण चटणी कोशिंबीर हे सुद्धा चांगले रुचकर असले तरी चालते. भाजी चिरणे निवडणे फोडणीस टाकणे. आता तेल किती घालायला लागते. नतंर मोहरी जिरे हिंग
कडिपत्ता किती कसे घालायचे हे सगळं माहित असायला हवे. नाहीतर फोडी की फोड. तेलात आणि कडिपत्ता यात घालून लगेचच न वाफवता तांब्या भर पाणी घालून शेंगदाण्याचे कूट भाजीत की कुटात भाजी हे समजत नाही. आणि पानात वाढताना भाजी बिचारी जागेवर आणि तिचा रस्सा सोडून पार घरंगळत गेला. भाकरी म्हणजे काय एकच खावा गप्प राव्हा अशी परत मागायचे नाही. एवढी वजनदार. पोळी वरचे ब्युटी स्पॉट्स लहान मोठे पाहून ग्रहगोल आठवतात. आता बाकीचे सगळे कसे असतील हे जाणून घ्या. वाढणे म्हणजे बापरे. आणि इतर कामात तर एकदम भारी घर झाडणे. घरातील चालणे बोलणे एकसारखेच. बाईच चालण असे नखऱ्याच
की घरातील फर्निचर ही लटपट कापतात. आणि यांच्या पायाला हाताला गुडघ्याला धडकतात आणि वरुन त्यांना रागाने लाथ बसते ते वेगळेच हे सगळे जास्त प्रमाणात आहे पैसे घेऊन काम करणाऱ्या गृहसेविकात. भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व
बाई म्हणून लागणारे हे सगळे गुण नसतील तर काय होईल त्या घराची हालात. मग ती घरातील असो की पैसे देऊन लावलेली बाई असो. हे कल्पनेने रंगवलेले नाही तर पाहिले आहे अनुभवले आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हणतात ते बरोबर आहे. तुला दिले रे देवान दोन हात दहा बोटे. थोड्या दिवसांसाठी आपल्या पिला साठी घरटं बांधणारी तिला म्हणतात सुगरण.
सौ कुमुद ढवळेकर
All reactions:
219
जहाज जेव्हा पृथ्वीचे विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात प्रवेश करते त्यावेळी जहाजावर इक्वेटर क्रॉसिंग सेरेमनी साजरी केली जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti