(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुण्याचे अत्याधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय

    पुण्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख केवळ प्रशासकीय इमारत म्हणून राहणार नाही तर पुण्याच्या वैभवात या इमारतीमुळे एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामावर सुमारे ६७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ‘ग्रीन बिल्डिंग’ म्हणून या इमारतीची एक वेगळी ओळख तयार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या देखण्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच झाले. त्या निमित्ताने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी साधलेला संवाद ...


    नवीन इमारतीची मुहुर्तमेढ कशी रोवली ?

    -कार्यालयाची जुनी इमारत ही सुमारे १३५ वर्षे जुनी होती. नागरिकांची गर्दी आणि अभिलेखांची संख्या वाढत असल्याने या कार्यालयाच्या आवारातील इमारती अपुऱ्या पडत होत्या; तसेच त्या इमारती धोकादायक झाल्याने त्या ठिकाणीच नवीन इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यानिमित्ताने सर्व कार्यालये एकाच छताखाली असावीत, या उद्देशाने नवीन इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीचे भूमीपूजन तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.

    नवीन इमारतीची रचना कशी असेल?

    -प्रामुख्याने नवीन मुख्य इमारतीमध्ये तळमजला आणि अन्य पाच माळे आहेत. एकूण १० हजार २१५ चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारत बांधण्यात आली आहे. ८ हजार २२९ चौरस मीटर जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये एकाच वेळी २२७ चारचाकी, १ हजार १३७ दुचाकी, तर ३१० सायकली उभ्या करता येणार आहेत. यात ए, बी आणि सी विंग आहेत.

    पर्यावरणपूरक इमारतीसाठी काय केले?

    -पर्यावरणपूरक इमारत म्हणून या इमारतीची नोंद होणार आहे. त्यासाठी सोलर यंत्रणा उभारण्यात येणार असून अशा प्रकारची इमारत असलेले पुणे जिल्हाधिकारी कार्यालय हे राज्यातील पहिले कार्यालय आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण इमारत अग्निरोधक बनविण्यात आली आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या फर्निचरचा वापर करण्यात आला आहे. विशिष्ट तापमान झाल्यास येथील अग्निशमन यंत्रणा आपोआप कार्यान्वित होऊन पाण्याचे फवारे उडतील, अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच सहा रिश्टर स्केल भूकंपातही ही इमारत सुरक्षित राहील, याची काळजी घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    नागरिकांना काय फायदा होईल?

    - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमुळे नागरिकांची एका छताखाली कामे मार्गी लागतील. शहरातील वाढता पसारा, वाढते प्रशासनातील प्रश्‍न यामुळे एकाच ठिकाणी इमारत असणे आवश्यक होते. जिल्ह्याचे क्षेत्रफळ तब्बल १५,६४२ चौरस किमी एवढे आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याकरिता एक चांगले प्रशस्त प्रशासकीय कार्यालय हवे होते. ते यामुळे मार्गी लागेल. लोकांना विखुरलेल्या ठिकाणी जावे लागणार नाही.

    सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीमध्ये काय करण्यात आले?

    -नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल ९६ सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. एक कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. या रुममध्ये सर्व बिल्डिंगची माहिती उपलब्ध होणार आहे. या रुमला युनिक मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणून संबोधले जाईल.

    आपल्या कार्यकाळात इमारत झाली त्याबद्दल काय सांगाल?

    -माझ्या कार्यकाळात ही इमारत झाली, याचा मोठा आनंद आहे. खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या कार्यकाळात मोठे काम करण्याची संधी मिळणे हे देखील महत्वाचे असते. राज्य सरकारचा देखील मी खूप आभारी आहे. शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला. पहिल्यापासून मी या इमारतीकडे बारकाईने लक्ष दिले. सार्वजनिक शौचालये कशी असावीत, इमारत बांधताना कमीत कमी झाडे तोडली जावीत, या हेतूने काळजी घेतली गेली. परिणामी देखणी इमारत उभी राहिली, असेही श्री. राव यांनी सांगितले.

    या नवीन देखण्या इमारतीमुळे पुण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. सर्वसामान्यांची सेवा या इमारतीमधून सदैव घडो, अशी प्रार्थना करूया.

    -- दिगंबर दराडे
    पत्रकार, पुणे.

    `महान्यूज'च्या सौजन्याने

  • महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मा.पु.लं. चे काही किस्से

    काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.

    गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, 'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.

    त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !

    एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.

    प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?

    एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... 'पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.

    एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • ज्योतिषविषयक टिप्स – भाग १

    ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्‍या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा....

    प्रथम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - मंगळवार उपवास करणे.
    २ - दररोज हनुमान चालिसा वाचणे. मारुती दर्शन घेणे.
    ३ - नेहमी बरोबर लाल रंगाचा रुमाल ठेवणे.
    ४ - बेडरुम मध्ये लाल रंगाचा वापर अधिक करणे.

    व्दितीय स्थानातील मंगळ- ज्यांच्या पत्रिकेत व्दितीय स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - मंगळवारी मारुतीला शेंदुर लावणे.
    २ - पक्षांना गहु खायला घालणे.
    ३ - अशुभ बोलु नये.
    ४ - मंगळवार उपवास करावा.

    तृतिय स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत तृतिय स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - कर्ज काढू नये, कोणाला जामीन राहू नये.
    २ - आईची व गाईची सेवा करावी.
    ३ - खोटे बोलू नये, कामात खोटेपणा करु नये.
    ४ - मुंग्याना साखर खायला घालावी.

    चतुर्थ स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - अपंगांना मदत करा.
    २ - नोकरांना खुश ठेवा.
    ३ - चांदीचा तुकडा जवळ ठेवा.
    ४ - पंचधातुची अंगठी धारण करा.

    पंचम स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत पंचम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - अन्न दान करणे.
    २ - घराजवळ लिंबाचे झाड लावणे.
    ३ - धान्य पक्षांना खाऊ घालणे.
    ४ - गेलेल्या व्यक्तींचे श्राध्द, विधी नियमीत करणे.

    षष्ठ स्थानातील मंगळ - ज्यांच्या पत्रिकेत षष्ठ स्थानात मंगळ आहे. त्यांनी करावयाचे उपाय.

    १ - गणपतीची उपासना करणे.
    २ - आपल्या पेक्षा लहान व्यक्तीना भेट वस्तु देणे.
    ३ - सापाला दुध पाजणे.

    (सातव्या ते बाराव्या स्थानातील मंगळाविषयी पुढच्या भागात.)

    -- सौ. निलीमा प्रधान

  • हे सुर्वे नारायणा…..(श्रद्धांजली)

    तु वारसदार सूर्यकुलाचा

    ज्यांना थांबणे माहित नाही……………

  • सदूकाका

    एक विलक्षण जग आणि त्यांच्यातला तो मी पण….

  • ओबामा बोले मिशेलला (वात्रटिका)

    तुझी माझी अदा बघून

    बघ कसे वेडे झाले होते?

  • शिवशक्ति-भीमशक्ति महायुती –जनतेची फसवणुक

    लक्षात ठेवा ह्या महायुतितिल पराभव हा तुमचा नसून तमाम दलित समाजाचा आहे

  • बेकार ‘अर्थतज्ज्ञांना’ अच्छे दिन

    काय गंमत आहे पहा..

    कॉंग्रेस धार्जिण व बहुदा याच पक्षाकडुन शैक्षणिक पात्रता नसताना देखिल "स्कालरशिप" मिळवुन "अर्थत" झालेल्या याच महान माणसांना टीव्हीवर व वर्तमानपत्रदेखील "नोटबंदी" वर अभ्यासपुर्वक व दुरदृष्टी न ठेवता फक्त मा.पंतप्रधानजींचा हा निर्णय कसा चुकलाय? हे ऐकताना पाहवत नाही हो.....

    हं....

    या बेकार "अर्थतज्ञांना"... अच्छे दिन नक्कीच आलेत अस म्हणायला हरकत नाही..,,,
    असो..... बहुदा.....
    खाल्या मिठाला.... "स्कालरशिप" ला जागत असतील....

    -- विवेक जोशी

  • “आयदान”:अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम!

    उर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.

  • संदुक आणि वळकटी

    बोलता बोलता सहज मी
    दिवाळीचा विषय काढला
    एकदम माझ्या मित्राचा
    चेहरा पांढरा पडला

    तो म्हणाला दिवाळी आली की
    हल्ली धड धड होतं
    जुनं सारं वैभव आठवून
    रडकुंडीला येतं

    चार दिवसाच्या सुट्टीत आता
    कसं होईल माझं
    एवढ्या मोठ्या वेळेचं
    उचलेल का ओझं ?

    मी म्हटलं अरे वेड्या
    असं काय म्हणतोस
    सलग सुट्टी मिळून सुद्धा
    का बरं कण्हतोस ?

    काय सांगू मित्रा आम्ही
    चौघ बहीण भाऊ
    कुणीच कुणाला बोलत नाही
    मी कुठे जाऊ ?

    आता कुणी कुणाकडे
    जात येत नाही
    आम्हालाही दोन दिवस
    कुणीच बोलावीत नाही

    चार दिवस कसे जातील
    मलाच प्रश्न पडतो
    लहानपणीचे फोटो पाहून
    मी एकटाच रडतो

    पूर्वीच्या काळी नातेवाईक
    बरेच गरीब होते
    तरीही ते एकमेकाकडे
    जात येत होते

    कुणाकडे गेल्या नंतर
    आतून स्वागत व्हायचं
    सारं काम साऱ्यानी
    मिळून मिसळून करायचं

    सुबत्ता फार नव्हती
    पण वृत्ती चांगली होती
    गरिबी असून सुद्धा
    खूप मजा होती

    मुरमुऱ्याच्या चिवड्या मधे
    एखादाच शेंगदाणा भेटायचा
    त्याप्रसंगी आनंद मात्र
    आभाळा एवढा असायचा

    लाल,हिरव्या रंगाचे
    वासाचे तेल असायचे
    अर्ध्या वाटी खोबर्याच्या तेलात
    बुडाला जाऊन बसायचे

    उत्साह आणि आनंद मात्र
    काठोकाठ असायचा
    सख्खे असो चुलत असो
    वाडा गच्च दिसायचा

    चपला नव्हत्या बूट नव्हते
    नव्हते कपडे धड
    तरीही जगण्याची
    मोठी धडपड

    सारे झालेत श्रीमंत
    पण वाडे गेले पडून
    नाते गोते प्रेम माया
    विमानात गेले उडून

    घरा घरात दिसतो आता
    सुबत्तेचा पूर
    तरी आहे मना मनात
    चुली सारखा धूर

    पाहुण्यांचे येणे जाणे
    आता संपून गेले
    दसरा आणि दिवाळीतले
    आनंदी क्षण गेले

    श्राद्ध , पक्ष व्हावेत तसे
    मोठे सण असतात
    फ्लॅट आणि बंगल्या मधे
    दोन चार माणसं दिसतात

    प्रवासाची सुटकेस आता
    अडगळीला पडली
    त्या दिवशी माझ्याजवळ
    धाय मोकलून रडली

    हँडल तुटलं होतं तरी
    सुतळी बांधली होती
    लहानपणी तुमची मला
    खूप सोबत होती

    सुटकेस म्हणली सर मला
    पाहुण्याकडे नेत जा
    कमीत कमी दिवाळीत तरी
    माझा वापर करीत जा

    सुटकेसचं बोलणं ऐकूण
    माझं ही काळीज तुटलं
    म्हणलं बाई माणसाचं
    आता नशीब फुटलं

    म्हणून म्हणतो बाबांनो
    अहंकार सोडा
    बहीण भाऊ काका काकू
    पुन्हा नाती जोडा

    ' संदुक ' आणि ' वळकटीचे '
    स्मरण आपण करू
    दिवाळीला जाण्यासाठी
    पुन्हा सुटकेस भरु