पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅजेस्टिक श्रेणीची ब्रिटीश बनावटीची विमानवाहक युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' म्हणजे भारतीय नौदलाच्या अभिमानाचा विषय.
आयएनएस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते.
२२ सप्टेंबर १९४५ रोजी त्याचे जलावतरण करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. ४ मार्च १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डममधील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले.
या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. ३१ जानेवारी १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले.
या जहाजाची बांधणी उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू करण्यात आली. महायुद्ध संपल्यावर बांधणीचे काम स्थगित करण्यात आले व याचा ध्वजक्रमांक R49 बदलून R11 करण्यात आला.
भारताने विकत घेतल्यावर उरलेले बांधकाम हार्लांड अँड वूल्फ या कंपनीने पूर्ण केले. अनेक आधुनिक उपकरणांसह नौकेच्या डेकवर वाफेवर चालणारे विमानफेकी यंत्र (कॅटेपुल्ट) बसवण्यात आले तसेच नियंत्रणकक्षातही आमूळ बदल करण्यात आले.
या नौकेचा प्रथम कमांडिंग ऑफिसर कॅप्टन प्रीतम सिंगच्या नेतृत्त्वाखाली विक्रांत ३ नोव्हेंबर १९६१ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पियर येथे भारतीय आरमारात दाखल झाले.
विक्रांतवर सुरुवातीला युनायटेड किंग्डमकडून विकत घेतलेली हॉकर सी हॉक प्रकारची लढाऊ-बॉम्बफेकी विमाने तसेच फ्रांसकडून विकत घेतलेली ब्रेग्वे अलिझ प्रकारची पाणबुडीविरोधी विमाने होती.
लेफ्टनंट आर.एच. ताहिलियानी यांनी १८ मे १९६१ रोजी पहिले विमान विक्रांतवर उतरवले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांनंतर नौदलाने 'आयएनएस विक्रांत'चे संग्रहालयात रुपांतर केले होते. भारताच्या नौदल सामर्थ्याची झलक दाखवणारे प्रदर्शन 'विक्रांत'वर तयार करण्यात आले होते. दरवर्षी नौदल सप्ताह तसेच शाळांना सुट्या पडल्यावर हे प्रदर्शन खुले केले जात होते.
समुद्रातल्या या प्रदर्शनाचा तसेच 'विक्रांत'ची देखभाल करण्यावर होणारा खर्च वाढू लागला होता. या खर्चाला राज्य सरकारने कायमस्वरुपी मोठा हातभार लावावा, अशी विनंती नौदलामार्फत वारंवार केली जात होती. मात्र आर्थिक अडचणींचे कारण देत सरकारकडून मदत देण्यास टाळाटाळ होऊ लागली. दीर्घकाळ समुद्रात एकाच ठिकाणी असल्यामुळे 'विक्रांत'ची मोठी दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली असताना आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे नौदलापुढील आव्हान आणखी बिकट झाली.
नव्या मोठ्या युद्धनौका समावून घेण्यासाठी मुंबई बंदरात जागेची कमतरता हा आणखी एक चिंतेचा विषय झाला. अशा परिस्थितीतही सरकारने जबाबदारी घेतल्यास 'विक्रांत' गोदीतून बाहेर काढून अन्यत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी नौदलाने दाखवली होती. मात्र तत्कालिन राज्य सरकारने यासंदर्भात ठोस निर्णय घेणे टाळले. अखेर नौदलाने नियमानुसार निवृत्त केलेले जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेतला.
- मराठीसृष्टी व्यवस्थापन
मी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून होतो. एक एक क्षण मला युगासारखा वाटत होता. असं वाटायचं, घड्याळ बंद पडलं की काय. रात्र आहे तिथंच थांबून आहे. मी उठून बॅटरीच्या प्रकाशात प्रेत पहात होतो.
दर वर्षी, २० ऑक्टोबर रोजी, इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस) साजरा केलें जातो.
WACS ही संस्था २० ऑक्टोबर १९२८ मध्ये पॅरिस येथे स्थापना झाली. इंटरनॅशनल शेफ डे हा २००४ सालापासून World Association of Chefs Societies (WACS) या संस्थेतर्फे साजरा केला जातो.
स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे. शेफ बनणं आता प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून, प्रोफेशनल शेफना बरीच मागणी आहे. स्वयंपाकाची आवड असणाऱ्या व्यक्तीला शेफ म्हणून नवनव्या डिशेस बनवण्याची संधी तर मिळतेच. शिवाय त्यातून स्वतःचं करिअरही घडवता येतं. निरनिराळी हॉटेल्स, त्यातून मिळणाऱ्या चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारणं हे आजच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनला आहे. काही हॉटेल्सचे विशिष्ट पदार्थ चाखायला लोक आवर्जून त्या हॉटेलची पायरी चढत असतात. शिवाय फूडचे वेगवेगळे इव्हेंटस टीव्हीवर दिसत असतात. त्यातून वेगवेगळ्या रेसिपीज लोकांसाठी पेश केल्या जातात. एकूणच स्वयंपाक बनवणं ही कला घरापुरती मर्यादित राहिली नाही. कुणालाही खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो हे व्यावसायिकांना पक्कं उमगलं आहे. त्यामुळे चमचमीत खाना खजाना बनवणाऱ्यांना खूप महत्त्व आलं आहे. या व्यवसायाला एक प्रकारचं ग्लॅमरचं स्वरुपही प्राप्त झालं आहे. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायत. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.
व्यावसायिक पद्धतीने जेवण बनवणारी व्यक्ती म्हणजे मुख्य स्वयंपाकी (आचारी; शेफ.) सॅलड्स, सूप, मासे, मटण, भाज्या, पक्वान्नं किंवा इतर पदार्थ बनविण्याची तयारी करून घेण्याचं काम शेफचं असतं. त्याचप्रमाणे मेन्यू आणि त्याच्या किंमती ठरवणे, माल ऑर्डर करणं, रेकॉर्ड्स आणि अकाऊंट्स ठेवणं याही जबाबदाऱ्या त्याच्याच असतात. जेवणाची तयारी करणं आणि ते तयार करणं यात त्याचा प्रमुख सहभाग असतो. ऑर्डरनुसार आलेल्या प्रत्येक मालाची तपासणी करणे, त्याचा दर्जा तपासणं या कामावरही त्याचं लक्ष असलं पाहिजे.
करीयरसाठी चांगली संधी
पात्रता: दहावी किंवा बारावीनंतर सर्टिफिकेट कोर्स करता येतो, किंवा बारावीनंतर बॅचलर ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी अॅण्ड कुलिनरी आर्ट्स किंवा कुलिनरी आर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करता येईल.
नोकरीच्या संधी: हॉटेल/ रेस्टॉरण्ट, एअर केटरिंग, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग, फूड प्रोसेसिंग कंपनी, कन्फेक्शनरी, थीम रेस्टॉरण्ट, मॉल्स, बेस किचन, खासगी हॉस्पिटल्स, क्रूझ लायनर्स, कॉर्पोरेट केटरिंग, इत्यादी. काही वर्षांच्या अनुभवानंतर फूड रायटर किंवा क्रिटीक किंवा शिक्षक म्हणून काम करता येईल. स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करता येईल. जगात भारतीय खाद्यपदार्थांना बाहेरही मोठी मागणी असल्याने बाहेरही नशीब आजमावता येईल. बाहरील देशात भारतीय रेस्टॉरण्ट्सची मोठी संख्या प्रचंड मोठी आहे.
शेफचे प्रकारः- खासगी किंवा वैयक्तिक शेफ, एक्झिक्युटिव्ह शेफ/ मुख्य शेफ, स्यूस शेफ, स्टेशन शेफ (शेफ डे पार्टी, पॅस्ट्री शेफ (पॅटीसीअर), साऊट शेफ (सॉसिअर), फिश शेफ (पॉयजनियर), व्हेजिटेबल शेफ (एण्ट्रेमीटिअर ग्रिल शेफ), ग्रिलार्डीन, क्रूझ शेफ.
काही रंजक माहीती इंटरनॅशनल शेफ डे च्या निमित्ताने.
२१ जानेवारी १९३७ रोजी शेफ Marcel Boulestin यांनी बीबीसी वर पहिला कुकरी शो केला.
राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला,त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मर्ढेकरांची “आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी ;” ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. परंतु कवितेतील हा पाउस वेगळाच आहे. ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात अमेरीकेने जपानवर टाकलेल्या अणुबाँबचा संदर्भ आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी याशहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी असा हा पाऊस आहे.
स्त्री ही अबला व व्यवहारशून्य असते अशी मानसिकता मोडीत काढून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी या मानसिकतेला जबरदस्त तडाखा देत नवऱ्याचे सर्व व्यवहार सांभाळल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
विकासाच्या नावाखाली होत असलेल्या औद्यागिकीकरण आणि शहरीकरणासाठी समुद्र तसेच नद्या हटवून मोठ्या प्रमाणावर जमिनी तयार केल्या जात आहेत. मुंबईलगतच्या समुद्राचा मोठा भाग अशा रितीने बुजवण्यात आला आहे. त्याचे दुष्परिणामही आपण पाहत आहोत. त्यातून धडा न घेता आता समुद्राचा आणखी काही भाग बुजवण्याचा घाट घातला जात आहे. नैसर्गिक रचनेतील असा हस्तक्षेप घातक ठरणार आहे.
साध्या रुपातला मनमोहक, सोज्ज्वळ गणू मला भावतो. तो माझ्यासाठी आशीर्वाद देणारा देव नसून म्हणणं ऐकून घेणारा जीवलग सखा आहे. त्याच्या उदारपणामुळेच आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आजकाल गणेशोत्सवाचं स्वरुप खूप पालटलं आहे. त्याबद्दल खूप दु:ख वाटतं. प्रत्येकाने गणेशोत्सव स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर श्रद्धेने आणि भक्तीभावाने साजरा करावा असं मला वाटतं.
लहानपणापासून कवितांची प्रचंड आवड. वाचलेल्या कवींवर निस्सीम प्रेम. या कवींची नावे सतत आपल्या डोळ्यासमोर आसावीत ही भावना. मात्र, घर पत्र्याचे. त्याला छत नसल्यामुळे नावे टाकण्याची अडचण. ही अडचण पत्र्याच्या घराला पीओपी करून सोडवली.
खाद्या प्रसंग माणसाला बरेच काही शिकवून जातो. पण आठवण मात्र कायम राहते. आणि एक धडा शिकायला मिळतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे. मुलं लहान असताना दरवर्षी पास झाले की पेढे आणून देवापुढे ठेवून मग सगळ्यांना वाटत होते आणि त्यांचे कौतुक करत होते.
Copyright © 2025 | Marathisrushti