शांत सागरी कशास उठविलीस वादळे?........... शांत सागरी कशास उठवतोस वादळे?
गायिले तुवा कशास गीत मन्मनातले?............. भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे?
काय हे तुझ्यामुळे........................... पहा किती तुझ्यामुळे
देहभान हरपले.............................. गृहशांतता हरपते
युगसमान भासतात आज नाचरी पळे.............. युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे
अमृतमधुर बोल एक.......................... खडाजंगी बोल तव
श्रवणि जो न पाडिलास........................ श्रवणि माझ्या पाडतोस
अधिरता भरे जिवात केवढी तयामुळे.............. भयभीती मनी भरे केवढी तयामुळे
स्वर्ग कल्पनेतला............................. स्वर्ग कल्पनेतला
येइल कधि भूतला............................ केव्हाच विरुन पार गेला
दिवसरात्र अंतरात आस ही उचंबळे............... दिवसरात्र अंतरात त्रस्तता उचंबळे
- संजीवनी मराठे............................ - आकाश विहारकर
डिसेंबर महिन्यात शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जसे जमेल तसे हा दिवस साजरा केला जातो. खर तर जमेल तसे नाही तर जमवूनच आणतात. कुणी सिनेमा. कुणी नाटक. कुणी सहलीला. कुणी कुठे कुणी कुठे रमतात. तर काही ठिकाणी सोसायटीचे सगळेच घरातील एकत्र येऊन नाच गाणी खेळ गप्पा आणि नंतर जेवण किंवा अल्पोपाहार.
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी “ग्राहक तक्रार मंच”
सार्वजनिक क्षेत्रात सेवा देणार्या उद्योगांनी गुणवत्तेचे निकष पूर्ण केल्यास संबंधित संस्थेला आयएसओ ९००१/२००० मानांकन मिळत असते. खाजगी संस्थेबरोबर शासकीय संस्थाही आता आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना मिळणारे आयएसओ मानांकन म्हणजे खाजगी सेवा क्षेत्रा इतकेच तोडीस तोड सेवा देऊन नागरिकांच्या सेवेला सदैव हजर असल्याची ती एक पोचपावतीच होय.
अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात,त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेलाजेअसून सातारा शहरापासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्वशी नदीच्या खोर्यात हा दुर्ग उभा आहे.
पाळणा
जहाज रशियाच्या तॉप्से पोर्ट मधून फ्रान्स कडे निघाले होते. ब्लॅक सी मधून इस्तम्बूल मार्गे मेडिटेरेनियन सी मध्ये जाणार होते.
भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये युद्ध पेटले व त्यांत अणु बॉंम्ब वापरले गेले तर त्याचे परिणाम फक्त ह्या दोन देशांच्या अवती भवतालच्या प्रदेशा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगात त्याचे परिणाम दिसतील. ही लढाई ( युद्ध ) जरी आशिया खंडात होत असेल तरी पण जगात याचा परिणाम दिसेल व त्या मुळे जागतिक दुष्काळाची भीती उद्दभवते व हें युद्ध त्यासं कारणीभूत ठरेल.
Copyright © 2025 | Marathisrushti