(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • केव्हा उघडेल कुंभकर्णी झोप…?

    जर ‘ आम्ही सुधारणारच नाही ‘ असे भारतीयांनी ठरविले असेल तर मग काही उपयोग नाही. आम्हाला वाईट सवय पडत चालली आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे,” घोरपडीच्या मागून फरकड .” आम्ही तसेच वागायला लागलो.समस्या उरावर येऊन पडल्यावर जागतो.

  • लोकसाहित्यातील अभ्यासकांना नवा आहेर

    बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांच्या निमित्ताने अहिराणी या खानदेशी बोलीभाषेशी परिचित झालो; परंतु ती खरी अहिराणी नसून खानदेशी वऱहाडी भाषा असल्याचे प्रा. डॉ. उषाताई सावंत यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या शोधनिबंधपर पुस्तकातून आपणास ज्ञात होते. एखादी खरी व नवीन माहिती देण्याचे ध्येय या एकाच उदाहरणावरून कसे या पुस्तकास साध्य झाले आहे, ते लक्षात येते.

  • सायकल – तेव्हाची व आत्ताची

    १९६०-६५ चा काळ या काळी स्वतःची सायकल असणे म्हणजे आताच्या काळातील मर्सिडीसची एसयूव्ही कारमालकाशीच बरोबरी होण्याचा काळ.आश्या काळी एके दिवशी वडील नवी कोरी सायकल हाताने ढकलत घेऊन घरी आले.ती सायकल पहाताच आईचा पाराच चढला.” स्वतःला सायकल चालवता येत नाही आसला जाहागीरदारी डोहाळ कसे काय लागले तुम्हाला.

  • खान्देशातील कानुबाईचा उत्सव…

    खान्देशात श्रावण महिन्यात विविध सण-उत्सव साजरे केले जात असतात. त्यातील प्रमुख उत्सव खान्देशवासीयांची कुलस्वामिनी कानुबाईचा उत्सव होय. श्रावणातील पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी दुसर्‍या किंवा चौथ्या रविवारीही कानुबाईची स्थापना केली जाते. संपूर्ण खान्देशात कानुबाईची स्थापना करण्याची पारंपरिक पद्धत आहे. कानुबाईचा उत्सव हा तसा दोन दिवसांचा असतो, मात्र, पाच दिवसांत कानुबाईचे रोट (प्रसाद) खावा लागत असतो.

  • भारतमातेच्या वीरांगना – २७ – अहिल्याबाई रांगणेकर

    १९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली.

  • सायकल – एक आठवण

    रविवारचा दिवस होता. मुलाची सायकल रिपेअरिंग ला घेऊन गेलो. दुकानामध्ये खूपच गर्दी होती. सर्वच्या सर्व सायकल लहान मुलांच्याच रिपेअरिंगला आलेल्या. मोठी सायकल रिपेअरिंगला दिसलीच नाही. लहान्यांच्याच सायकलींची गर्दी होती. वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता.

  • अमीट कलावती

    "जें मत्त फुलांच्या कोषातुन पाझरले,
    निळ्या लाघवी दंवांत उलगडले,
    जें मोरपिसांवर सांवरले,
    तें --त्याहुनही --आज कुठेंसे
    पुन्हा एकदां
    तशाच एका लजवंतीच्या
    डोळ्यांमध्ये -- डोळ्यांपाशी --
    झनन -झांझरे मी पाहिले…
    पाहिलें न पाहिलें."
    पु.शि. रेग्यांच्या या ओळी वाचताना, आणि पुढील सगळी कविता वाचताना,मला नेहमी "झनन -झांझरे किंवा "ठिबक-ठाकडे" असे शब्द वाचायला मिळतात. वास्तविक, हे शब्द म्हणजे नादवाचक शब्द आहेत पण कवितेच्या आशयात अगदी नेमके बसले आहेत, इतके की त्यातून फार मोठा गहिरा आशय व्यक्त होतो. भावकवितेची बंदिश बांधताना, असे शब्द फारच चपखल बसतात. कलावती रागाचा विचार करताना, या ओळी माझ्या मनात बरेचवेळा येतात.
    संस्कृत ग्रंथांच्या आधाराने लिहायचे झाल्यास, या रागाचा समय "मध्यरात्र" दिलेला आहे आणि एका दृष्टीने बोलायचे झाल्यास, सगळीकडे शांतता पसरल्यावर, काळ्या अंगवस्त्रानिशी,प्रियकराला भेटण्यासाठी, गुपचूप निघालेली अभिसारिका आणि त्यांचे मिलन संकेत स्थान, याची आठवण होते.
    "रिषभ","मध्यम" वर्ज्य असलेल्या या रागात, कोमल निषाद वगळता, सगळे सूर शुद्ध स्वरूपात लागतात. "औडव-औडव" जातीचा हा राग "खमाज" थाटात याचे वर्गीकरण केले आहे. रागातील प्रमुख स्वरसंहती बघायला गेल्यास, "सा ग प ध","प ध नि(कोमल)ध","ग प ध सा नि(कोमल)" या संगती ऐकायला मिळतात. या बाबत आणखी सांगता येईल, या रागातील "कोमल" निषाद" स्वराचे स्थान आणि त्या स्वरावरील ठेहराव, हा नेहमीच अवलोकनाचा आनंददायी भाग आहे.
    उस्ताद अमीर खान साहेबांनी सादर केलेला कलावती राग "सब बन थन आयो" ही ठाय लयीतील तर द्रुत लयीत "अनुमनी प्रिया सो राहत है" केवळ अवर्णनीय आहे. "इंदोर" घराण्याचे अध्वर्यू म्हणून, यांच्या गायनाचे वर्णन करता येईल. अत्यंत ठाय लय, शक्यतो मंद्र सप्तकात गायचे, अशी काही वैशिष्ट्ये, गायनाबाबत सांगता येतील.बरेचवेळा गायनातील लय इतकी धीमी असायची की, साथीला तबला असायची जरुरी आहे का? असाच प्रश्न पडायचा!! "धृपद" गायकीचा थोडा प्रभाव पडलेला जाणवतो, विशेषत: "तराणा" सादर करताना, बरेचवेळा "नोम-तोंम" पद्धतीचा अवलंब केलेला आढळतो. तसे बघायला गेले तर, यांच्या गायकीचा असर, भीमसेन जोशींपासून ते हल्लीच्या रशीद खान पर्यंत, बहुतेक गायकांवर पडलेला दिसून येतो. "ख्याल" गायकी कशी सादर करायची, याचा एक असामान्य मानदंड निर्माण केला. गायनात "अति विलंबित" लय तसेच "बोल-आलाप" आणि या आलापीतून सरगमचे सादरीकरण, यातून, त्यांनी आपली गायकी सजवली आणि रागदारी संगीताला संपूर्ण वेगळे वळण दिले,
    जरी तिन्ही सप्तकात गायन करण्याचा आवाका असला तरी देखील मंद्र सप्तक आणि शुद्ध स्वरी सप्तकाकडे ओढा अधिक. राग सादर करताना, त्याची "बढत" कशी करायची, टप्प्याटप्प्याने लय वाढवीत जायची आणि त्यातून आपल्या गायकीचा "खयाल" प्रदर्शित करायचा, हे त्यांच्या "ख्याल" गायनाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येते. प्रस्तुत रचनेत, बंदिश सादर करताना, प्रत्येक स्वर आपल्याला अक्षरश: "अवलोकिता" येतो. मघाशी, मी म्हटल्याप्रमाणे, इथे लय किती "विलंबित" आहे, याचा प्रत्यय घेता येतो. विशेषत: खर्जातील स्वर ऐकताना, तर अधिकच. समेवर येण्यासाठी कुठेही आटापिटा नाही. एखाद्या केशर सांजसमयी, विक्लांत पक्ष्याने निरवपणे फांदीवर यावे त्याप्रमाणे, इथे समेवर लय "विसर्जित" होते!! रागाचा "राग" म्हणून आणि त्याच्या "मूळ" प्रकृतीनुसार रागाचे सादरीकरण करायचे, हा विचार त्यांच्या गायनात प्रामुख्याने दिसून येतो.
    या रागाच्या बाबतीत आणखी एक सुंदर सादरीकरण आठवले. पंडिता प्रभा अत्रे यांनी सादर केलेले कलावती रागाचे मोहक रूप/ प्रत्येक कलाकाराचे स्व:ताचे असी खास आवडीचे राग असतात आणि त्या रागाच्या बाबतीत, तो कलाकार अतिशय चोखंदळ तसेच सतत प्रयोगशील असतो आणि याचे मुख्य कारण, त्या रागाच्या स्वभावाची झालेली संपूर्ण ओळख. असह वेळेस, आपल्याला एक बाब नक्की कळून चुकते, रागदारी संगीत म्हणजे केवळ स्वरांची बेरीज-वजाबाकी नव्हे!! कलावती राग जणू काही पंडिता प्रभा अत्र्यांना "आंदण" मिळाला असावा, इतके या रागाशी त्यांचे नाते जुळलेले आहे.
    "तन मन धन तोपे वारुं" ही द्रुत लयीतील बंदिश म्हणजे कलावती रागाचा अविस्मरणीय अलंकार आहे. ही बंदिश ऐकताना, त्यातील तान, हरकती आणि स्वरांचे थांबे इत्यादी "ठेहराव" इतके अचूक आणि सुरेल आहेत की ही बंदिश ऐकून झाल्यावर आपण आपले डोळे मिटून शांतपणे त्या स्वरमहालात रममाण व्हावे, इतकी भूल आपल्या मनावर पडते.
    असे ऐकायला मिळाले आहे की, रोशन यांना, "दिलरुबा" वाद्य अतिशय प्रिय होते आणि त्या वाद्यावर, त्यांनी प्राविण्य मिळवले होते. त्यांच्या अनेक रचनांत, त्यांनी या वाद्याचा सढळ हस्ते उपयोग केल्याचे दिसून येते. एकूणच भारतीय वाद्यांवर त्यांचे नितांत प्रेम होते, असे निश्चित विधान करता येईल. वाद्यांच्या वापराबाबत, दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. एक तर रचनाकारांचा एकंदर कल बघता, तो बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा यासाठी त्यांनी, खालचे किंवा मध्यसप्तकातील स्वर व संबंधित स्वर-मर्यादा यांतच वावर ठेवण्यात कसलीच कसूर केली नाही. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत म्हणजे विशिष्ट वाद्ये, यांच्याकडे रोशन यांचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधाचा सर्जक उपयोग, कधीही दुर्लक्षित केला नाही. किंबहुना एका गीतांत एकाधिक ताल किंवा लयबंध वापरणे, हे त्यांच्या प्रयोगशीलतेचे उदाहरण म्हणता येईल. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होतात. रोशन यांच्या रचनांच्या बाबतीत हा विशेष, विशेषत्वाने जाणवतो.
    "काहे तरसाये जियरा,
    यौवन रुत सजन जाके न आये".
    "काहे तरसाये जियरा" हे "चित्रलेखा" चित्रपटातील, आशा भोसले आणि उषा मंगेशकर, या जोडीने गायलेले गाणे इथे ऐकुया. ज्यांना या गाण्यात, रागाची "मुळावृत्ती" पडताळायची असेल तर हे उदाहरण, तसे गोंधळाचे ठरू शकते. गाण्याची सुरवात, रागाधारित आहे पण, पुढील रचनेत,राग बाजूला सारला जातो आणि चाल "स्वतंत्र" होते. पण अशा प्रकारचे स्वातंत्र्य, बहुतेक रचनाकार, नेहमीच घेत असतात. चित्रपट गीतात बरेचवेळा वापरला जाणारा त्रिताल आणि केरवा ताल इथे वापरलेला दिसेल. द्रुत गतीत चालणारे गाणे असल्याने, गाण्यातील हरकती इतक्या विलोभनीय आहेत की आपण या गाण्यात कधी गुंगून जातो, तेच समजत नाही.
    आता आपण, रोशन यांचीच एक अजरामर कव्वाली ऐकायला घेऊ. कव्वाली, या गायनाला, चित्रपट संगीतात, खऱ्याअर्थाने, प्रतिष्ठा मिळवून दिली असेल तर ती, रोशन यांनी, असे म्हटले तर वावगे ठरू नये. इथे आणखी एक विशेष नोंदवावासा वाटतो. रोशन यांना एकूणच द्वंद्वगीते किंवा युगुलगीते, याचे अतिशय आकर्षण असल्याचे, सहज ध्यानात येऊ शकते. सांगीतदृष्ट्या बघायला गेल्यास, दोन्ही किंवा अधिक कलाकारांच्या वाट्याला त्यांच्या आवाजानुसार गायन करायला देणे, किंवा तसा नेमका वाव देणे, हे एक रचनाकार म्हणून नेहमीच आव्हानात्मक ठरते. आणखी एक विशेष मांडायचा झाल्यास, रोशन यांना, ज्याला "आम" राग म्हणतात, अशाच रागांमध्ये रचना करायला आवडत होते, असे दिसते. आणखी एक बाब निर्देशनास आणावीशी वाटते. त्यांच्या रचनेत, काव्याला फार महत्व दिल्याचे जाणवते.
    "ना तो कारवां की तलाश" या दीर्घ कव्वाली रचनेत, या विचारांचे प्रतिबिंब पडल्याचे, आपल्याला समजून घेत येईल. एका बाजूला हार्मोनियम, ढोलक, तबला आणि टाळ्या, यांची कुशल उपाययोजना आणि दुसरीकडे, कवीच्या शब्दातील नेमके भाव जाणवून देण्यासाठी, केलेले गायन!!
    एक तर ही रचना कालमापनाच्या दृष्टीने अतिशय दीर्घकाळ चालणारी आहे, त्यामुळे त्यात, अनेक गायक आहेत, जसे रफी, मन्नाडे, आशा भोसले, सुधा मल्होत्रा इत्यादी. आता इतके गाते आवाज एकत्र आणायचे म्हणजे रचना विस्तारित असणार, हे ओघानेच आले. कव्वालीची सुरवात अगदी नेमक्या कलावती रागानेच होते पण नंतर हळूहळू, कलावती रागात नसलेले सूर देखील इथे आणले गेले आहेत, जसे "शुद्ध निषाद" ऐकायला मिळतो तर काही ठिकाणी चक्क "खमाज" राग देखील जाणवतो. तरी देखील, गाण्यावर दाट छाया आहे ती, कलावती रागाचीच असे म्हणता येईल. जवळपास १० मिनिटांची रचना आहे आणि इतके गायक आहेत, पण प्रत्येक आवाजाला, आपले अस्तित्व ठळकपणे दाखवता येईल, अशा प्रकारे रचना बांधली आहे. सुरवातीच्या ठाय लयीतून, हळूहळू, द्रुत लयीत जो प्रवास होतो, तो खास करून ऐकण्यासारखा आहे. नेहमीप्रमाणे, या गाण्यात देखील सतार, सारंगी या वाद्यांचा अतिशय सुरेख वापर केलेला आढळेल.
    मराठी चित्रपट "मुंबईचा जावई" मध्ये अतिशय रसाळ आणि गोड गाणे आहे - प्रथम तुज पाहताना!! गायक रामदास कामत यांनी लोकप्रिय केलेले गाणे. या गाण्यात "कलावती" रागाची सुरेख झलक बघायला मिळते. माडगूळकरांची गेयताबद्ध रचना आणि त्याला सुधीर फडक्यांनी चढवलेला साज!! गाण्याची धाटणी बरीचशी पारंपारिक नाट्यगीताच्या धर्तीवर बांधलेली आहे पण तरीही केवळ रचनेचा साचा तसा आहे म्हणून गाण्यात तानांची भेंडोळी सोडलेली नसून, चालीतील अश्रूत गोडवा ओळखून, त्याच्या सहाय्याने गाणे सजवलेले आहे.
    "प्रथम तुज पाहता जीव वेडावला,
    उचलुनी घेतले नीज रथी मी तुला".
    माडगूळकरांच्या रचनेत बऱ्याचवेळा संस्कृत साहित्याची झलक दिसते पण तसा आधार घेताना, कवींचे कौशल्य असे, मराठी मातीशी त्या शब्दांचे नाते बेमालूमपणे जोडलेले असते आणि काव्यातील आशय अधिक गहिरा होतो. त्याच शब्दांचे औचित्य ओळखून सुधीर फडक्यांनी चालीची निर्मिती केली आहे.
    "प्रिया आज माझी नसे साथ द्याया,
    नको धुंद वारे, नको चांदण्या या".
    मराठी भावगीताच्या इतिहासात एक अढळ स्थान प्राप्त करणारी ही सुंदर रचना. या गाण्याची गंमत अशी आहे, या गाण्याचे शब्द, संगीतकार यशवंत देवांनी लिहिलेले आहेत. एखादा कलाकार बहुश्रुत कसा असावा हे बघायचे झाल्यास तर आपल्याला यशवंत देवांचे नाव निश्चित घ्यावेच लागेल. संगीतकार प्रभाकर जोग यांनी या कवितेला खरोखरच अप्रतिम न्याय दिलेला आहे. गाण्याच्या सुरवातीलाच, तालवाद्य म्हणून तबला येण्याआधी गिटारचे सूर आहेत आणि तिथे आपल्याला चालीच्या सुरांसोबत कलावती ऐकायला मिळतो.
    भावगीत काय किंवा चित्रपट गीत काय, गायनातून "अर्थपूर्ण" शब्दोच्चार करणे अत्यावश्यक असते आणि गाण्यातील प्रत्येक, केवळ शब्दच नव्हे तर अक्षराला, देखील "अर्थ" असतो, अशी जाणीव ठेवणारे फार थोडे गायक असतात आणि त्या गायकांत, सुधीर फडके यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. हे गाणे ऐकताना, याची तंतोतंत प्रचीती येते.
    -- अनिल गोविलकर

  • व्यक्तिबोधक शालेय शिक्षण

    आज एक व्हाट्स अँप मेल आला, छान होता. “एक दगड काच फोडू शकतो, एक शब्द हृदय दुखावू शकतो, एक क्षणात प्रेम होऊ शकते, मग एका धड्यात परीक्षेचा पेपर का संपू शकत नाही?” थोडा विनोदी होता. लिहिणारा गमतीत लिहून गेला होता. त्याने ‘एक’ ह्या शब्दावर श्लेष साधला होता.

  • अमुल्य वेळेची किंमत

    कसय....
    आपण ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीनी सांगितलेल्या वेळापेक्षा पाचच मिनिटे ऊशिरा पोहचलोना.....
    लगेचच बरळतील.,,
    "आपल्या भारतीयांना अमुल्य वेळेची खरच किंमत नाही....
    नाहीतर भारत केव्हाच पुढे गेला असता....."
    आणि जर आपण वेळेपुर्वीच पाच मिनिटे पोहचुन सुध्दा जर या महाशयांना ऊशिर झाला ना...
    मग हळुच निर्लज्जपणे म्हणतात......
    "चालतय हो..... दहा-पंधरा मिनिटे ऊशिर होणारच...
    आपण घाई केल्यास देश पुढे जाणार आहे का?"..
    असतात अशीही लोक.....
    घ्या सांभाळुन ......

    विवेक जोशी...

  • महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मा.पु.लं. चे काही किस्से

    काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.

    गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, 'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.

    त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !

    एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.

    प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?

    एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... 'पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल.

    एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट