
मदत करण्याची इच्छा तीव्र असेल अन त्यामागील भावना प्रामाणिक असतील...
तर कोणीही, कुणासही कधीही कशीही मदत करू शकतो ...
फक्त इच्छाशक्ती पाहिजे ..
बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. …..
काय तर कृषिप्रधान देश!!!!!!!
वा रे लोकशाही…………..
मी ब-याच दिवसापासुन विवीध प्रकारचे लिखान करतो, आपल्यालाही बरे वाटल्यास प्रसीध्द करावे.
भारतीयांचा 47 टक्के वेळ व्हॅट्स - ऍप स्काइपवर या मथल्या खालील बातम्या वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या आणि माझे विचारचक्र सुरू झाले. पहिल्यांदा त्याबाबतीत स्वतःचाच विचार केला तर माझ्या लक्षात आले माझ्या दिवसातील निम्मा वेळ नाहीपण साधारणतः दोन तास सोशल साइट्सवर खर्च होतात, माझ्याकडे स्मार्टफोन नसतानाही. माझा रविवार तर मला वाटत हल्ली जवळ - जवळ संपूर्ण सोशल नेटवर्क साइट्सवरच जातो. त्यासाठी मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे ही टाळ्तो. रात्री दोन - तीन वाजतानाही लोक सोशल नेटवर्क साइटवरून चाटींग करताना दिसतात. कदाचित ते आपल्यादेशातील नाही तर परदेशातील मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी चॅटींग करत असावेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून आता संपूर्ण जग अचानक जवळ आलंय अगदी एका क्लिकच्या अंतरावर. आता जग स्मार्टफोन नावाच्या हातात मावण्याइतक्या छोट्याश्या पेटीत बंधिस्त झालेलं आहे. आता सार्या जगाचं भविष्य या पुढील काळात कदाचित ही बंधिस्त पेटीच ठरवेल. या पेटीच्या बाहेर आता जगातील काही मोजकीच लोक आहेत. त्यातील काही परिस्थितीमुळे, काही नाईलाजाने आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके स्वच्छेने. स्मार्टफोन आपल्या जवळ असावा म्ह्णून भारतातील सध्याची तरूण पिढी समाजात अनैतिक मानली जाणारी अथवा चुकीची कामे अगदी सहज करून जाताना दिसतात. आपल्या देशात गुन्हगारीचे प्रमाण वाढण्यालाही काही अंशी हे स्मार्टफोन कारणीभूत आहेत. आपल्या देशातील आजकालचे तरूण आपल्या पहिल्या पगारातून काय विकत घेत असतील तर ते स्मार्टफोन! या वरून आपल्या देशातील तरूण पिढी या स्मार्टफोनच्या किती आहारी गेलेली आहे हे अगदी सहज लक्षात येते.
मी आजही माझा जूनाच फोन वापरतो त्यामुळे मला व्हॉट्स- ऍप आणि वाय-फाय चा वापर करता येत नाही आणि इतर कोणत्या ही ऍपचा वापर करता येत नाही. त्यामुळे माझं काही ही आडत नसल्यामुळे आणि मला व्यक्तीशः त्याची तितकीशी गरज नसल्यामुळे मी स्मार्टफोन अजूनही विकत घेतलेला नाही. माझे मित्र आणि माझ्याशी जुजबी ओळख असणारे ही मला स्मार्टफोन घेण्याचा सल्ला देतात. पण माझा मोबाईल व्यवस्थित चालत असताना आणि मला आवश्यकता नसताना मी स्मार्टफोन विकत घ्यावाच का ?मला स्वतःला नाही पण माझ्या सभोवतालच्या लोकांना तो माझा कमीपणा वाटतो याचा अर्थ आपल्या देशात स्मार्टफोन हा स्टेट्स सिम्बोल होऊ पाहतोय. आजची तरूण पिढी खासकरून मध्यमवर्गीय कुटूंबातील हजारो रूपयांचे स्मार्टफोन प्रत्येक दोन - तीन वर्षानंतर विकत घेत राहिली तर त्यांच भविष्य नक्कीच धोक्यात आहे असंच म्ह्णावं लागेल. स्मार्टफोन आजच्या काळची गरज आहे हे जरी मान्य केलं तरी आपण त्या गरजेचे गुलामहोता कामा नये ना ? आजच्या गृहीणी ही स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या आहेत.त्यामुळे त्यांचे आपल्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. या स्मार्टफोन आणित्यात उपलब्ध असणार्या ऍपच्या माध्यमातून माणसे जवळ आली पण त्यांच्यातीलप्रत्यक्ष संवाद जवळ- जवळ संपला. आजकाल तर नवरा - बायको ही एकमेकांशी सोशलनेट्वर्क साईटवरून संवाद साधतात, एकमेकांच्या हालचालींवर आणि ताज्या घडामोडींवरलक्ष ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात बोलण्याची गरजचभासत नाही. सोशलनेटवर्क साइट्स वरचा कोणासोबतचा ही नियमितचा संवाद नंतर कंटाळ्वाणावाटू लागतो मग तो संवाद कोणासोबतचा का असेना अगदी नवरा - बायकोसोबतचा ही. त्यामुळेहा संवाद क्रमशः कमी कमी होत जावून नंतर थांबतो. आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाणवाढत आहे त्याला हा न होणारा संवाद नंतर एक मोठ कारण म्ह्णून समोर येताना दिसतो.
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातीलशेतकरी जर स्मार्टफोनच्या आहारी गेला आणि तो आपला अर्धा वेळ जर त्यावर वाया घालवूलागला तर आपल्या देशाला ते परवडणारे नाही. स्मार्टफोनमुळे आपल्या देशातील तरूणांचीकल्पकता धोक्यात आलेली आहे कारण कित्येकांच्या कल्पकतेला पर्यायी ऍप स्मार्टफोनवरउपलब्ध झालेले आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून समाजात चुकीची माहिती, चुकीच्यागोष्टी, चुकीची छायाचित्रे आणि चलचित्रे ही काही सेकंदात जगभरात पसरविली जातात.आता स्मार्टफोनमुळे कोणाची ही बदनामी ही एक गावा पुरती, शहरापुरती अथवा देशापुरतीमर्यादीत नसते आता ती बदनामी जागतिक होते. पूवी आपल्या आपल्या भावना व्यक्तकरण्यासाठी हक्काची माणसे लागायची पण आता ती हवीच अशी गरज उरलेली नाही कारण सोशलनेटवर्क साईट्च्या माध्यमातून आपल्याला अशी हजारो माणसे रोज भेटतात. आपल्यामुलांच्या आयुष्यात सध्या काय भानगडी सुरू आहेत हे पालकांना ही सोशलनेटवर्कसाईट्सच्या माध्यमातून कळ्ते आणि तेंव्हा ते आपल्या पाल्याशी त्याविषयीचर्चा करतात. त्याहून भयंकर म्ह्णजे वाचनसंस्कृती दिवसेन – दिवस कमी होत चाललेलीआहे. पूर्वी बसमधे, रेल्वेमधे अथवा इतरत्र वर्तमानपत्र अथवा इतर वाचनीय साहित्यवाचणारे तरूण दिसत नाहीत तर त्याउलट सर्वत्र स्मार्टफोनमधे घुसलेले तरूण पाहायलामिळतात. पुस्तकातील शंभर पाने वाचून आपल्या हवी ती माहिती मिळविण्यापेक्षा तीमाहिती आपल्या स्मार्टफोनवरील एका क्लिकवर मिळविण्याची सवय लागलेय आजच्या तरूणपिढीला . आजच्या तरूण पिढीची ही सारे झटपट कामे करण्याची आणि झटपट गोष्टी मिळविण्याचीसवय भविष्यात आपल्या देशाला महागात पडणार आहे यात शंकाच नाही. कालांतराने लोकांनास्मार्टफोन पासून दूर ठेवण्यासाठी सक्ती करण्याची गरज भासणार या बद्दल मला पूर्णखात्री आहे. तशी सुरूवात झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. आज मी स्वतःला यास्मार्टफोन पासून दूर ठेवू पाहतोय पण माझ्या सभोवताळ्चे मला किती दिवस त्यापासूनदूर राहू देतील याबद्दल शंकाच आहे. पण मला वाटतं आपण स्वतः स्मार्टफोनचं गुलामहोऊन आपला मोल्यवान वेळ वाया घालविण्यापेक्षा स्मार्टफोनला आपला गुलाम करून आपलावेळ वाचावा म्ह्णून त्याचा योग्य वापर करायला हवा. तसं झाल तर आणि तरच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित राहील.
लेखक - निलेश बामणे
गोरेगांव(पूर्व) मुंबई - 400 065.
मो.8652065375 / 9029338268
स्त्रीच्या प्रगतीचा विचार करत असताना एकच दिसून येईल की, समाजात जसे-जसे शिक्षण वाढत गेले त्याबरोबरच स्त्री माणूस होण्याचा प्रयत्न करू लागली. स्त्री साहित्यात येऊ लागली ती राणी, पत्नी, बायको म्हणून नव्हे तर नायक म्हणून. यातूनच स्त्रियांना अस्मितेची जाण झाली आणि जीवन जगत असताना सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असावे, त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा ही धारणा समोर आली. त्यातून साहित्यातून स्त्री स्वातंत्र्याच्या छटा उभ्या राहू लागल्या आणि…….
हवा, अन्न, पाणी ,वस्त्र निवारा या आजपर्यंतच्या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत. आता यात आणखी एक महत्वाच्या गरजेची भर पडली आहे.किंबहुना याशिवाय दैनंदिन जीवन विस्कळीत होवून जगणे अशक्य होण्यापर्यत मजल गेली आहे. त्या गरजेचे नाव आहे वीज. ही वीज खर्या अर्थाने आज पावर झाली आहे.
प्रतीयमानं पुनरन्यदेव वस्त्वस्ति वाणीषु महाकवीनाम /
यत्तत्प्रसिध्दावयातिरिक्तं विभाति लावण्यामिवांगनासु //
या संस्कृत श्लोकाचा अर्थ सौभाग्यवती सन्नी लिऑन यांना विचारला गेला तेव्हा,त्यांना ही भाषा मंगळावरची की बुधग्रहावरची हा प्रश्न पडला.या प्रश्नात त्यांना एक उत्तर दिसलं,ते असं की परग्रहावर कुणीतरी नक्किच असायला हवं. म्हणजे,देअर इज ऍ़न ऍ़र्पाच्युनिटी टू लेड फौंडेशन ऑफ पॉर्न इंडस्ट्री.त्या उत्स्फुर्तपणे उद्गारल्या.
यू ऑर ग्रेट,सौ.सन्नीचे मिस्टर त्यांची पाठ थोपटत म्हणाले. तुम्हास संधी कुठेही सापडू शकते हा शोध लागून आमचे ह्रदय भरुन आले आहे.
संधीचं असच असतं यारा,कोलंबस शोधायला गेला इंडिया पण त्यास मिळाली अमेरिका.ही अमेरिका त्यास मोठी संधी वाटली.त्या संधीचं इतरांनी सोनं केलं.मी सुध्दा अमेरिकेत आले.
म्हणून तू सन्नी झालीस. पतिराज बोलले. यारा स से सोनं आणि स से सन्नी..
हौऊ ब्युटिफूल.तुला कसं रे सुचतं,इतकं छान छान..
मी तुझाच यारा ना ! तुला त्या परग्रहावरच्या भाषेत जर पॉर्न इंडन्स्ट्रीची संधी दिसू शकते.तर मला स से सन्नी कां सुचू शकत नाही.
पण यारा ,हा जो श्लोक आहे,तो कशासाठी परग्रहावरुन इकडे आला असेल,आपण अँजिनिलाला विचारु या का?
नको,ती आपल्याला ओळखत नाही.
राखी सावंतलाच विचारलं तर..
त्यांचा पत्ता आपणास कुठे ठाऊक.शिवाय त्यांनी अर्थाचा अनर्थ करुन सांगितला तर पुन्हा पंचाईत.त्या तिखट नाहीत का जराशा.
ते ही खरच म्हणा,त्यांना कळलं की परग्रहावर माणसं राहतात तर त्या तिथं बिग बॉस सुरु करण्यासाठी सलमानभाईच्या पाठिमागे लागतील. तशा त्या फार हुषार. त्यांच्याकडे बिझिनेस माईंड असल्याचं शोभाताई डे यांनी एकदा म्हंटल होतं.
मग मार गोली तिला,आपण आपलं बघावं.हिला विचार,तिला विचार कशाला.प्रियंका चोप्रा काय शिल्पा शेट्टीस विचारत बसली का प्रेमात पडण्यासाठी? शिल्पाच्या बाजुने वेळ होता तेव्हा ती प्रेमारली.प्रियंकाने वेळ साधली आणि ती अक्षय बहरली.
तुला कसं ठाऊक सारं.
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रेमाच्या कथा अशाच लिहिल्या जातात.जेनिफर ब्रॅड पिटवर फिदा होती. ब्रॅड पिट अँजेनिलावर प्रेम करयाचा.अँजेलिना चार जणांवर प्रेमाचा वर्षाव करायची. ब्रॅडने जेनिफरला सोडले.अँजेलिनाचा प्रेम पाऊस आटला.जेनिफर,जस्टिन थेरॉक्समध्ये गुंतली.ब्रॅड,अँजिलिनास आय लव्ह यू म्हणाला.अँज्येलिनाने त्याला त्याच्या घरातून बाहेर काढले.आपलंही घर सोडलं.तिसऱ्याच घरी रहायलं गेले.वगैरे. जेनिफरच्या आधिची ब्रॅडची प्रेयसी ग्वालथेन प्लॉट्रो एकमेंकाना कॉफी पिण्यासाठी भेटल्या.ती तिच्या नव्या प्रेमकथेत गुंतलेली आणि ही हिच्या चौथ्या प्रेमकथेत.
याचा अर्थ प्रेमा तुझा रंग कसा असं या दोघी तिकडे आणि प्रियंका टू कॅटरिना टू दीपिका इकडे यावर चिंतन करतात नाही का रे.
मग या श्लोकाचा अर्थ आपणास कोण बरं सांगणार.कारण महाराष्ट्रप्रांती सध्या दूरान्वयेही एकही महामहोपाध्याय वगैरे दृष्टिक्षेपात येत नाही.
आपण मिसेस निरजा राडियाला याचा शोध घ्यायला ऍम्लॉय करु या का?
सखे,काय पण तुझं डोकं चालतं गं.या राडियाताई ग्रेट कनेक्टर आहेत.त्या कुठे ना कुठे या श्लोकाचं कनेक्शन नक्किच जोडून देतील. कसं गं सुचतं तुला हे.ब्रेन वुईथ ब्युटी म्हणतात ना, ते हेच.ते केवळ ऐश्वर्या रॉय यांच्याकडेच नसून तुझ्याकडेही आहे,हे बघून माझे ह्रदय भरुन आलेय., पतिराज सन्नीचं कौतुक करत असतानाच,आकाशवाणी झाली.
मित्रा,कशाला जातोस कुठे विचारायला,राडिया ताईला.तू जे काही बोललास ना तुझ्या याराला तोच या श्लोकाचा अर्थ.
म्हणजे ? सन्नी आणि त्यांच्या पतिराजांनी आकाशाकडे चमकून बघितलं,
म्हणजे असं की दोस्ता, एखाद्या स्त्रिचं खरं सौंदर्य हे तिची गात्रं किंवा अवयवांपासून वेगळं असतं की रे..
म्हणजे मी बाहेरची वेगळी आणि मी आतली वेगळी असं काही म्हणायचय का तुम्हास.
तसचं काहीसं.
अरे देवा,इट मिन्स तो श्लोक मंगळावरचा किंवा बुधावरच्या मनुष्यप्राण्यांचा नव्हता तर..
यात एवढं,अरे देवा असं म्हणण्यासारख काय झालं.
काय झालं म्हणजे,इट मिन्स नो ऍ़पॉर्च्युनिटी टू लाँच पॉर्न इंडस्ट्री ऍ़ट मंगळ ना..
सन्नीचं हे बोल ऐकून आकाशवाणी करणाऱ्याने कप्पाळावर हात मारुन घेतला.
बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.
लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो.
Copyright © 2025 | Marathisrushti