माझ्या संग्रहातील विविध " कातणी " !
नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा ! गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली " अरे, भावाला बहीण नको का ?"... किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे ! लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक
भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीलाहे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच " कातणे" !!
माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे. काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cuter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात. अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !
-मकरंद करंदीकर.
कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते.
कुठलीही कला, ही किती "अमूर्त" स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा "शास्त्राधार" सापडत नाही. बहुतेक वर्णने ही पारंपारिक संकेतावार आधारलेली आढळतात. याचाच वेगळा अर्थ, स्वरांचे सौंदर्य बघताना, स्वरांतून जाणवणारा "आशय" आणि त्याची व्याप्ती, हेच महत्वाचे असते. याच स्वरांतून, पुढे होणाऱ्या रागदारी संगीताबाबत हाच विचार प्रबळ ठरतो.
आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा...... मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं.....
मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा... आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन... जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा... तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा...... मोकळी सोडलेली पुर्ण दिवस....
काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता.... सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा.... 8. ला जनावरे सोडायचं काम... मोकळा वारा प्यायचा... तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे... 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा....
मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे... तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे... ऊद्याला...
एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या... कुणाच्याही...
11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा... मग 2 तास डुबणे नदित.... जनावरांची आंघोऴ... आणि ऱाखण्यांची पण... एकत्रच....
म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी.... अगदी थोड्यांकडेच....
मग घरी अडीजवाजता.... जेवण झालं की काजीनी खेऴायचं... मुकरीचा मांड खासच....
गल.... ढोपो...... जुगी..... सप..... फगाम....
हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत....
परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट... पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही "कटीनी" खेळायचं म्हणजे खासच.. .......
मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत...
काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल.....
"म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता"
मग जनावरं बांधायची....आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा.... असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस... आणि चढणेचे मासे चढा पर्यंत....
बापुर्झा
डॉ. बापू भोगटे
कविता
अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही!”
वर्षं किती भराभर जातात ना?दिवस तर एकामागून एक नुसते पळतच असतात…!आत्ताआत्ता पर्यंत माझे चारही नातू एवढाल्लेसे होते…बघता बघता चौघेही किती मोठ्ठे झाले..पिल्लं घरट्यातून कधी उडून गेली ते कळलंच नाही.
कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू... ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो.
पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे.
ब्रिटीशकालीन असलेले हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.
पुरातत्व दालनात आपल्याला वाकाटककालीन शिल्पे, शिलालेख पाहायला मिळतात. याठिकाणी असलेले मांढळ येथे सापडलेले महासदाशिवाचे शिल्प उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर मोहोंजदडो येथील उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तु, शिल्प तसेच कौण्डीण्यपूर येथे सापडलेली अश्मयुगीन हत्यारे आपणास पाहावयास मिळतात. भेडाघाट येथे सापडलेली यक्ष व यक्षिणीची शिल्पे, कला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.
शस्त्र दालनात मोगल, इंग्रज, मराठा, राजपूत यांची निवडक शस्त्रे, आदिवासींची शस्त्रे तसेच चिलखत, टोप, धातूच्या साखळीच्या सहाय्याने बनवलेला अंगरखा आहे तर, कला व उद्योग विभागात हस्तीदंत, लाकूड, चांदी, संगमवरी यापासून तयार केलेल्या कोरीव वस्तु प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून जातात.
येथील प्राणिशास्त्र विभाग प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करणारा आहे. टॅक्सीडर्मी केलेले (भुसा भरलेले प्राणी) मगर, जंगली पशु,किटक,मासे,मगर असे नानाविध प्रकारचे प्राणी इथे आपल्याला भेटतात. पक्षी दालनात असलेला कावळा हा येथील आकर्षण आहे. प्रेक्षकांची पावले हमखास या पांढऱ्या कावळ्याजवळ थबकतात.
या दालनांसोबत तुम्ही चित्रकला दालनाला नक्की भेट द्या. विदेशातील नामवंत चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली दुर्मिळ चित्रे इथे आहेत. जलरंग, तैलरंग अशा माध्यमातील वस्तुचित्रे, निसर्गचित्रे,व्यक्तीचित्रे नजरेचे पारणे फेडतात. धुरंधर, एस.एम.हळदणकर, एम.आर.आचरेकर, हेब्बर आदी प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या दालनात आहेत. याठिकाणी हळदणकरांचे ‘निरांजनी’ हे गाजलेले चित्र आहे. हे चित्र पाहताना चित्रकाराने साकारलेल्या रंगछटा आणि टिपलेला बारकावा यांचा अनुभव थक्क करणारा आहे. भव्य परीसरात वसलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. अभिरक्षक (क्युरेटर) म्हणून श्री.गठाणे या वस्तुसंग्रहालयाचे काम पाहत असून चित्रकार श्री.मंडपे यांचे त्यांना सहाय्य लाभत आहे. प्रेक्षकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत संग्रहालय खुले असते.
अनेकविध दुर्मिळ वस्तूंचा नजराणा असलेल्या या वस्तुसंग्रहालयास एक वेळ अवश्य भेट द्या.
-- काशीबाई थोरात (संदर्भ - महान्यूज)
Copyright © 2025 | Marathisrushti