(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • करंज्यांचा ” ब्युटिशियन ” !

    माझ्या संग्रहातील विविध " कातणी " !

    नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा ! गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली " अरे, भावाला बहीण नको का ?"... किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे ! लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक
    भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीलाहे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच " कातणे" !!

    माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे. काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cuter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात. अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !

    -मकरंद करंदीकर.

  • कोकणात विमान भरारी

    कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते.

  • शृंगारिक तिलक कामोद

    कुठलीही कला, ही किती "अमूर्त" स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा "शास्त्राधार" सापडत नाही. बहुतेक वर्णने ही पारंपारिक संकेतावार आधारलेली आढळतात. याचाच वेगळा अर्थ, स्वरांचे सौंदर्य बघताना, स्वरांतून जाणवणारा "आशय" आणि त्याची व्याप्ती, हेच महत्वाचे असते. याच स्वरांतून, पुढे होणाऱ्या रागदारी संगीताबाबत हाच विचार प्रबळ ठरतो.

    इथे बरेचवेळा, मी रागांविषयी लिहिताना, अनेक भावछटांचा उपयोग करतो पण, ते केवळ, त्या रागाबाबत एक विशिष्ट चित्र मनासमोर उभे राहावे, इतपतच. अन्यथा, एकाच रागातून, एकापेक्षा अनेक भावनांचा आढळ अशक्य. यामागे नेमके म्हणायचे झाल्यास, आपल्याला परत त्या रागांच्या सुरांकडेच वळावे लागते. त्यामुळेच, रागदारी संगीतात, कुठलाही सूर हा "उगीच" म्हणून किंवा "चूष" म्हणून येत नाही. प्रत्येक सुरांमागे काहीना काहीतरी कार्यकारणभाव नक्की असतो आणि तो भाव जाणून घेणे, म्हणजे रागसंगीताचा अननुभूत आनंद घेणे!!
    "देस" राग आणि "तिलक कामोद" राग याबाबत हेच अतिशय महत्वाचे आहे. दोन्ही रागांत स्वर तेच आहेत पण, तरीही दोन्ही राग वेगवेगळे आहेत. हे नेमके कसे घडते? यामागे मुख्य कारण हेच आहे, दोन्ही रागांतील स्वरांचे "ठेहराव" वेगळे आहेत आणि स्वरांची खरी गंमत इथे दिसून येते. कुठला स्वर कशाप्रकारे घेतला की, त्या रचनेचे सगळे स्वरूप पालटून जाते, याचा प्रत्यक्षानुभव, हे दोन राग आलटून, पालटून ऐकले तर सहज ध्यानात येऊ शकते. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संगीतात का आवश्यक आहे, यासाठी या दोन रागांचे उदाहरण चपखल होऊ शकते.
    आपल्या भारतीय संगीतात, "षडज-पंचम" भावाला निरातिशय महत्व आहे आणि या रागाचे वादी/संवादी स्वर तर "षडज/पंचम" हेच आहेत!!
    पंडिता केसरबाई केरकर हे नाव फार आदराने घेतले जाते. मला काही त्यांची मैफिल प्रत्यक्ष ऐकायचे भाग्य लाभले नाही परंतु त्यांच्या गायनाच्या अनेक रेकॉर्ड्स, सीडी ऐकायला मिळाल्या. अर्थात, प्रत्यक्ष मैफिलीतला आनंद जरी रेकॉर्ड ऐकण्यात तितका येत नसला तरी, आवाजाची जात, गोडवा, शैली इत्यादींचा आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आवाजाची जात थोडी "मर्दानी" भासते पण तरीही गायनाची पट्टी "काळी चार" च्या आसपास आहे. विस्ताराची लय, सप्तकाचा धुंडाळलेला जाणारा अर्थ तसेच निकोप, स्वच्छ आणि ताकदवान असा स्वर अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यात, आ-कार तर खासच म्हणावा लागेल. जयपूर घराण्याची खास वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात म्हणजे गुंतागुंतीची तानक्रिया हे खास ऐकायला मिळते.
    "सूर संगत आज" या बंदिशीत आपल्याला ही सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. तान दुहेरी विणीची करून, तान बांधणे तसेच तानांचे व्यापक आकृतिबंध जाणीवपूर्वक योजणे, हा विचार अगदी स्पष्ट दिसतो. आणखी एक बारकावा इथे नोंदता येईल. ताना अति दीर्घ नसून, त्याचे छोटे छोटे आकृतिबंध त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे बरेचवेळा ताना द्रुतगती असल्याचा भास होतो. दुसरे युक्ती अशी दिसते, ठेक्याची लय फार विलंबित न ठेवता, त्याच्या दुप्पट गतीने ताना घ्यायच्या. याचा परिणाम असा होतो, श्रोत्यांचे चित्त जरादेखील विचलित होत नाही आणि गाण्याचा संपूर्ण आनंद मिळतो.
    आता आपण, रागाच्या ललित स्वरूपाकडे वळूया. १९७७ साली आलेल्या "भूमिका" या चित्रपट या रागावर आधारित एक सुंदर गाणे आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर, यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला, संगीतकार वनराज भाटीया यांनी नितांत रमणीय गाणी दिली आहेत. प्रस्तुत गाणे, प्रीती सागर या गायिकेने गायले आहे. "My heart is beating" सारख्या पाश्चात्य संगीतावर आधारित गाण्याने प्रकाशात आलेली ही गायिका. हे गाणे गाउन, मात्र तिने रसिकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. "तुम्हारे बिना जी ना लगे" हेच ते गाणे इथे ऐकणार आहोत.
    "तुम्हारे बिना जी ना लगे घर में,
    बलम जी तुम से मिलाके अन्खीया".
    काहीशी लाडिक वळणाची चाल, ठुमरीच्या अंगाने गेलेल्या ताना इत्यादी खास बाबी या गाण्यात उठून दिसतात. पारंपारिक पंजाबी ठेक्यावर हे गाणे उचलून धरले आहे. तशी चाल साधी आहे पण गोड आहे. प्रीती सागरने देखील तितक्याच गोडव्याने गायली आहे.
    "ये नीर कहा से बरसे" हे गाणे देखील याच रागावर आधारित आहे, "प्रेमपर्बत" चित्रपटातील अतिशय सुश्राव्य आणि गायकी ढंगाचे गाणे आहे. जयदेव आणि लताबाई, या जोडगोळीने खूपच अप्रतिम गाणी दिली आहेत आणि बहुतेक गाणी, चालीच्या दृष्टीने अवघड आणि लयीला कठीण अशी(च) आहेत. जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत, पाश्चात्य चाली, पाश्चात्य वाद्ये हाच संगीताचा "ढाचा" बनत चालला होता, त्यावेळी जयदेवने मात्र, अपवाद वगळता, आपली बहुतेक गाणी, ही भारतीय संगीतावर आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, कुठलेही गाणे केले तरी त्याला कुठेतरी रागदारी संगीताचा "स्पर्श" द्यायचा, याच हेतूने बनवली आणि तिथे मात्र कसलीही तडजोड केली नाही. याचा परिपाक असा झाला, त्यांची गाणी ही नेहमीच गायनाच्या दृष्टीने आव्हानात्मक झाली.
    "ये नीर कहां से बरसे है,
    ये बदरी कहां से आई है".
    या गाण्यातील पहिल्याच वाद्यमेळ्याच्या रचनेतून, आपल्याला तिलक कामोद रागाची झलक ऐकायला मिळते. पहिल्याच ओळीत, "ये बदरी कहा से आयी रे" ऐकताना, आपल्याला ही ओळख अधिक "घट्ट" झालेली आढळेल. या गाण्यात आणखी एक मजा आहे. पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हाचे शब्द - "गहरे गहरे नाले, गहरा पानी रे" या ओळीत, हा राग बाजूला सारला जातो आणि तिथे "पानी रे" या शब्दावरील हरकत तर, या रागाशी संपूर्ण फारकत घेते. असे होऊन देखील, दुसऱ्या ओळीत चाल, परत "मूळ" रुपाकडे वळवून घेतली आहे. हे जे "वळवून" घेणे आहे, इथे संगीतकाराची दृष्टी समजून घेता येते.
    १९८२ मध्ये मराठीत आलेल्या "उंबरठा" चित्रपटात असेच एक अप्रतिम गाणे आपल्याला ऐकायला मिळते. हृदयनाथ मंगेशकरांच्या रचना देखील अशाच "गायकी" ढंगाच्या असतात, किंबहुना काहीवेळेस तर अति अवघड असतात. कवी वसंत बापटांची सघन शब्दकळा आणि मंगेशकरांची चाल, या गाण्यात अतिशय सुंदरपणे जुळून आली आहे. अर्थात, ही चाल मंगेशकरांनी आपल्याच बाबांच्या "वितरी प्रखर" या गाण्यावरून बेतलेली आहे, हे कबूल केले आहे पण तरीही नाट्यगीताचे स्वरूप लक्षात घेऊन, चित्रपटगीत करताना, आवश्यक ते फेरफार करावेच लागतात आणि त्या दृष्टीने, ही रचना ऐकण्यासारखी आहे.
    " गगन सदन तेजोमय,
    तिमिर हरून करुणाकर,
    दे प्रकाश, देई अभय."
    चालीवर खास मंगेशकरी ठसा तर आहेच पण तरीही बऱ्याच ठिकाणी, शब्दाप्रमाणे चालीला "वळण" दिल्याचे दिसून येईल. वास्तविक तिलक कामोद राग तसा सरळ, गोड, फारशा अति वक्र ताना नाहीत,अशा प्रकारे बरेचवेळा सादर होतो पण तरीही अशा रागात अशा प्रकारचे अति अवघड तर्ज बनविणे, हे केवळ हृदयनाथ मंगेशकर(च) करू जाणे. या गाण्याच्या सुरवातीला, रचना मंद्र सप्तकात सुरु होते पण, एकदम "दे प्रकाश, देई अभय" इथे रचना जे काही अकल्पित वळण घेते, ते केवळ आणि केवळ, लताबाई(च) घेऊ जाणे, इतके अवघड आहे.
    संगीत नाटक "संगीत मानापमान" मध्ये गायलेले "रवि मी चंद्र कसा" हे पद खास तिलक कामोद रागावर आधारलेले आहे. खरे तर मूळ पद, मास्टर दीनानाथांनी गायलेले आहे पण पुढे पंडित वसंतराव देशपांड्यांनी या गाण्याला अपरिमित लोकप्रियता मिळवून दिली. वसंतरावांच्या गायकीवर मास्टर दीनानाथांच्या गायकीचा दाट ठसा दिसून येत असे पण तरीही या गायकाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. चालीचा आराखडा तसाच ठेऊन, त्यात वसंतरावांनी अनेक सौंदर्यस्थळे निर्माण केली आणि रसिकांना स्तिमित करून टाकले.
    "रवी मी चंद्र कसा मग मिरवितसे लावीत पिसे".
    वसंतरावांची गायकी म्हणजे स्वरांवर काबू ठेऊन, लयीच्या अपरिमित बंधांना खेळवीत, गाण्याचा विकास करायचा. तसे करताना, रचनेत अंतर्भूत असलेल्या तानांची इतकी वेगवेगळी रूपे दर्शवायची आणि रचनेचे सौंदर्य अधिक खोल करायचे. बोलताना घेण्यात तर वसंतराव हातखंडा होते. लय एकाच रेषेत चालत असताना, त्याला "वक्र" गती देऊन, रसिकांना आश्चर्यचकित करून टाकणे, त्यांना मनापासून आवडत असे. पंजाबी ढंगाच्या ताना घेऊन, गाण्याला नवीन आयाम द्यायचे, हा त्यांच्या गायनाचा दुसरा विलोभनीय भाग.
    मराठी भावगीतांत, सुधीर फडक्यांचे नाव फार वरच्या श्रेणीत घ्यायला हवे. भावगीत गायनात, शब्दोच्चार कसे करावेत, याबाबत त्यांनी आदिनमुना तयार केला. शब्दोच्चार स्पष्ट असावेत पण त्याच बरोबर शब्दांतील आशय ओळखून, त्याचे प्रकटीकरण करताना, आशयवृद्धी कशी होईल, याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आणि भावगीत गायन समृद्ध केले, प्रसिद्ध कवी, सुधीर मोघ्यांच्या "दिसलीस तू, फुलले ऋतू" या कवितेला संगीतकार राम फाटक यांनी चाल लावली. हे गाणे, आपल्याला तिलक कामोद रागाशी जवळीक दाखवेल.
    "दिसलीस तू, फुलले ऋतू,
    उजळीत आशा, हसलीस तू".
    गाण्याची चाल काहीशी पारंपारिक नाट्यगीतासारखी आहे आणि त्याच अनुरोधाने गाण्यात मोजकाच वाद्यमेळ आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी रंगभूमीवर, नाट्यगीताच्या रचनेचा, चालीचा स्वतंत्र ढाचा तयार केला आणि एक वेगळे मन्वंतर घडवले. त्या पायवाटेवरून या गाण्याची चाल जाते. गाण्यात थोड्याफार हरकती आहेत पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असे आहे आणि त्यामुळे रसिकांचे लक्ष सतत कवितेकडे आणि त्याचबरोबर गाण्याच्या चालीकडे राहील, याची खबरदारी, संगीतकार राम फाटक यांनी घेतली आहे आणि तोच विचार सुधीर फडक्यांनी आपल्या गायनातून दर्शवला आहे.
    हिंदी चित्रपट "गोदान" मध्ये मुकेश यांनी गायलेले "हिया जरत रहत दिन रैन" हे गाणे तिलक कामोद रागावर आधारित आहे. या गाण्याची चाल सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांनी तयार केली आहे आणि शब्दरचना शैलेंद्र यांची आहे.
    "हिया जरत रहत दिन रैन,
    अंबुवा की डाली पे कोयल बोले,
    तनिक ना आवत चैन,
    हिया जरत रहत दिन रैन".
    गाण्याच्या शब्दावरून गाण्याची "संस्कृती" आपल्याला सहज जाणून घेता येईल. लोकसंगीतावर आधारित शब्दरचना आहे आणि त्याच आधाराने चाल निर्माण केली आहे. वास्तविक, गायक म्हणून मुकेश यांच्या गळ्याला खूप मर्यादा होत्या आणि हे लक्षात घेऊन, जरी रागाधारित चाल असली तरी त्यातील "गायकीचा" भाग वगळून, संगीतकाराने "तर्ज" बांधली आहे. मुकेश यांचा आवाज मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात(च) गोड लागतो आणि गाण्याची जडणघडण त्यानुसार केली आहे. त्यामुळे हे गाणे ऐकायला खूपच श्रवणीय होते.
    - अनिल गोविलकर

  • Hair 360 – शुद्ध हर्बल केसांचे तेल

    marathi

  • सुवर्णयुग

    आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा...... मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं.....

    मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा... आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन... जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा... तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा...... मोकळी सोडलेली पुर्ण दिवस....

    काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता.... सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा.... 8. ला जनावरे सोडायचं काम... मोकळा वारा प्यायचा... तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे... 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा....

    मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे... तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे... ऊद्याला...
    एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या... कुणाच्याही...

    11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा... मग 2 तास डुबणे नदित.... जनावरांची आंघोऴ... आणि ऱाखण्यांची पण... एकत्रच....
    म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी.... अगदी थोड्यांकडेच....

    मग घरी अडीजवाजता.... जेवण झालं की काजीनी खेऴायचं... मुकरीचा मांड खासच....
    गल.... ढोपो...... जुगी..... सप..... फगाम....

    हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत....
    परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट... पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही "कटीनी" खेळायचं म्हणजे खासच.. .......

    मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत...
    काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल.....
    "म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता"

    मग जनावरं बांधायची....आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा.... असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस... आणि चढणेचे मासे चढा पर्यंत....

    बापुर्झा
    डॉ. बापू भोगटे

  • धीस अँड़ धीस

    कविता

  • मनाचं आरोग्य

    अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही!”

  • कवितेस कारण की…

  • विठोबा

    वर्षं किती भराभर जातात ना?दिवस तर एकामागून एक नुसते पळतच असतात…!आत्ताआत्ता पर्यंत माझे चारही नातू एवढाल्लेसे होते…बघता बघता चौघेही किती मोठ्ठे झाले..पिल्लं घरट्यातून कधी उडून गेली ते कळलंच नाही.

  • १५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    १५० वर्षाची परंपरा असलेले नागपूरचे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय

    कावळ्याचा रंग कोणता ? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर प्रश्न विचारणाऱ्याकडे आपण नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहू... ‘काळा’ रंग असे उत्तर देऊन मोकळे होवू.. कावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो.

    पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. ब्रिटिशकालीन असलेले नागपूर मध्यवर्ती संग्रहालय तब्बल १५० हून जास्त वर्षांचे आहे.

    ब्रिटीशकालीन असलेले हे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या संग्रहालयांमधील सर्वात मोठे व जुने असे आहे. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्त्य, चित्रकला अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत.

    पुरातत्व दालनात आपल्याला वाकाटककालीन शिल्पे, शिलालेख पाहायला मिळतात. याठिकाणी असलेले मांढळ येथे सापडलेले महासदाशिवाचे शिल्प उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर मोहोंजदडो येथील उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तु, शिल्प तसेच कौण्डीण्यपूर येथे सापडलेली अश्मयुगीन हत्यारे आपणास पाहावयास मिळतात. भेडाघाट येथे सापडलेली यक्ष व यक्षिणीची शिल्पे, कला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.

    शस्त्र दालनात मोगल, इंग्रज, मराठा, राजपूत यांची निवडक शस्त्रे, आदिवासींची शस्त्रे तसेच चिलखत, टोप, धातूच्या साखळीच्या सहाय्याने बनवलेला अंगरखा आहे तर, कला व उद्योग विभागात हस्तीदंत, लाकूड, चांदी, संगमवरी यापासून तयार केलेल्या कोरीव वस्तु प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून जातात.

    येथील प्राणिशास्त्र विभाग प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करणारा आहे. टॅक्सीडर्मी केलेले (भुसा भरलेले प्राणी) मगर, जंगली पशु,किटक,मासे,मगर असे नानाविध प्रकारचे प्राणी इथे आपल्याला भेटतात. पक्षी दालनात असलेला कावळा हा येथील आकर्षण आहे. प्रेक्षकांची पावले हमखास या पांढऱ्या कावळ्याजवळ थबकतात.

    या दालनांसोबत तुम्ही चित्रकला दालनाला नक्की भेट द्या. विदेशातील नामवंत चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेली दुर्मिळ चित्रे इथे आहेत. जलरंग, तैलरंग अशा माध्यमातील वस्तुचित्रे, निसर्गचित्रे,व्यक्तीचित्रे नजरेचे पारणे फेडतात. धुरंधर, एस.एम.हळदणकर, एम.आर.आचरेकर, हेब्बर आदी प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे या दालनात आहेत. याठिकाणी हळदणकरांचे ‘निरांजनी’ हे गाजलेले चित्र आहे. हे चित्र पाहताना चित्रकाराने साकारलेल्या रंगछटा आणि टिपलेला बारकावा यांचा अनुभव थक्क करणारा आहे. भव्य परीसरात वसलेल्या या वस्तुसंग्रहालयाचे सध्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. अभिरक्षक (क्युरेटर) म्हणून श्री.गठाणे या वस्तुसंग्रहालयाचे काम पाहत असून चित्रकार श्री.मंडपे यांचे त्यांना सहाय्य लाभत आहे. प्रेक्षकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत संग्रहालय खुले असते.

    अनेकविध दुर्मिळ वस्तूंचा नजराणा असलेल्या या वस्तुसंग्रहालयास एक वेळ अवश्य भेट द्या.

    -- काशीबाई थोरात (संदर्भ - महान्यूज)