रक्ताचे पाणी झाले,
आणि बरसले छाताडावर,
पाणी पिऊन लोक …. ….. करतात,
खुल्या मोकळ्या भिंताडावर………
वाट बघतो तो शेतकरी,
पाणी कधी बरसणार,
चातकासारखे पक्षी सारे,
पाण्यासाठी केवळ तरसणार…….
एवढ्यात येती घन दाटून,
आपल्याच डोक्यावर,
काळोखी ती रात्र सरावी,
सर्वस्व मदार त्या पाण्यावर……
……………………………..मयुर तोंडवळकर
— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर
Author
Post Views: 10