(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • भोंडले (१)

  • फक्त आजचा दिवस ! ( बेवड्याची डायरी – भाग २८ वा )

    स्वताच्या इच्छेने जीवन व्यतीत करण्याच्या आपल्या अट्टाहासामुळेच आपले प्रचंड नुकसान झालेय हे लक्षात घेतले तरच तिसरी पायरी आचरणात आणण्याची मानसिक तयारी होते असे सांगत सरांनी तिसऱ्या पायरीचे यशस्वीपणे आचरण करण्यासाठी ‘ फक्त आजचा दिवस ‘ हे तत्वज्ञान खूप मदत करू शकते हे सांगितले

  • परिस्थितीशी जुळवून घेणे ( बेवड्याची डायरी – भाग २९ वा )

    खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे .

  • मानवतेचा पुरस्कार करणारा महात्मा

    पांडुरंगशास्त्री आठवलेंनी अवघ्या समाजाला माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म नव्याने दाखवून दिला. त्यांचे सहजसुंदर तत्त्वज्ञान अवघ्या जगात प्रसिद्धी पावले. रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन पुरस्कार, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. आज समाजातील सौहार्द संपत असताना आणि जातकारण वाढत असताना पांडुरंगशास्त्रींच्या तत्त्वज्ञानाचा नव्याने जागर होण्याची गरज आहे. 25 ऑक्टोबर रोजी येणार्‍या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागवलेली आठवण.

  • पांडू हवालदार (१९७५)

    दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला पांडू हवालदार हा चित्रपट १९७५ साली पडद्यावर झळकला. दादा कोंडके यांनी स्वत: या चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच अभिनयही केला होता. अशोक सराफ, उषा चव्हाण या कलाकारांनीही या चित्रपटात भूमिका वठवल्या. चला तर मग पाहूया हा चित्रपट..

  • कृषीप्रधान आणि प्रजासत्ताक (लोकशाही) राष्ट्र

    निवडक लोकांनी-स्वतःसाठी व काही निवडक लोकांसाठी चालविलेले राज्य आणि केलेली सोय लोकशाही होय!

  • आता बस्स झाले..!

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’! पाकच्या बाबतीतही सुरवातीपासून असाच अनुभव आलेला आहे. एक दोनदा नाही तर शेकडो वेळा विविध आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्थानने भारतविरोधी कुरापती थांबविल्या नाहीत. त्यामुळे भारत द्वेषाने वाकडी झालेली पाक ची शेपूट काहीही केलं तरी सरळ होणार नसेल तर ती शेपूट ठेचायलाच हवी..!

  • सये सांज होते अशी रोज आता

    सये सांज होते अशी रोज आता

    उघडून पिसारे घानांचे आकाशी

    ओठातले आर्त विझूनी विसावे

    अंधारभरल्या मनाच्या तळाशी

  • अमेरिकेतील एक – – Dating Center

    Dating ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही.

  • व्हॅलेन्टाईन नावाचं भूत

    प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

    मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं”

    शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.