मुळचे स्पॅनिश असलेले परंतु क्युबातच कित्येक पिढ्या गेल्यामुळे वेगळी अस्मिता जोपासणार्या क्युबन जनतेने १८९८ मध्ये क्युबात क्रांति केलि. अमेरिकेने या क्रांतीत मदत करून आपले एक बाहुले सत्तेवर बसविले,या बाहुल्याचे नाव होते जनरल बातिस्टा . या बदल्यात अमेरिकेने क्युबातील टेलिफोन,वीज,साखर आदी महत्वाच्या व्यापारावर आपले नियंत्रण मिळविले. यात क्युबाची जनता भरडली जाऊ लागली. या असंतोषाला वाचा फोडली एका तरुण वकिलाने त्याचे नाव होते फिडेल कास्त्रो . लष्करी राजवट उलथविण्यासाठी फिडेलने देखील शस्त्र उचललि. अनेक घडामोडी घडून सत्तेची सूत्रे कॅस्त्रोच्या हातात आलि. कॅस्त्रोने सर्वप्रथम बहुराष्ट्रीय कंपन्यांची हकालपट्टी सुरु केली,हे पाहून सोवियत रशियाचा क्युबामधील रस जागा झाला.
तत्कालीन सोवियत अध्यक्ष निकिता कृश्चेव यांनी "साम्यवाद स्वीकारल्यास रशिया क्युबाला सर्वतोपरी मदत करेल असा निरोप कॅस्त्रोंना पाठविला ज्याला त्यांनी मान्यता दिली.अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून ९० किमी अंतरावर रशियन कळपातला साम्यवादी क्युबा अमेरिकेच्या डोळ्यात सलू लागला.क्युबन अध्यक्ष फिडेल यांना मारण्यासाठी साठि सी आय ए ने १०/१५ वेळा जीवघेणे हल्ले केले परंतु त्यातून कॅस्त्रो सहीसलामत वाचले.
इकडे रशियाने गुपचूप कारवाइद्वारे क्युबात अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र तळ उभारायचे ठरविले ,त्याकाळात अमेरिका क्युबन समुद्रात जहाजांवरिल विमानांद्वारे गस्त घालत असल्यामुळे इतकी मोठी मोहीम सुरवातीला त्यांच्या नजरेतून निसटली.परंतु ६२ च्या सप्टेंबर मध्ये अमेरिकी विमांनाना सहा रशियन जहाजे मोठ्या कंटेनरसह क्युबाच्या दिशेने जाताना दिसल्याचा रिपोर्ट वर पाठविला गेला.
त्याआधी चार वर्षे रशियाने इल्युजन २८ हि बॉम्बर विमाने मित्र देशांना वाटल्याचे अमेरिकेला माहित होते त्यामुळे १४०० किमी प्रहार मर्यादा असलेली किमान २१ विमाने क्युबाला पाठविण्यात आली असल्याचा निष्कर्ष अमेरिकेने काढला जो खळबळ माजविण्यास पुरेसा होता. आता अंदाजपंचे काम करण्यापेक्षा बंदी घातलेल्या यु-२ या हेरगिरी विमानांना अमेरिकेने मोकळे सोडले. ज्यात उच्च दर्जाचे कॅमेरे बसविलेले होते. या विमानांनी भरारी मारून त्यातल्या फिल्म्स सी आय ए च्या ताब्यात दिल्या. मोठ्या प्रोजेक्टरवर त्याचे निरीक्षण करून तपासणी करण्यात आली, दोन दिवस हे काम चालू होते. एका तज्ञाच्या लक्षात एक क्रेन सारखी लौन्चर्स आली,जी १९०० किमीच्या अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्रा साठी वापरली जात. त्याच फिल्ममध्ये ५०० सैनिक मावतील एवढे तंबू,क्षेपणास्त्र वाहक वाहनं,आठ क्षेपणास्त्र ,इंधनाचे tankars आदी दिसत होते. तिथे सुरु असलेले काम ४००० किमी मारक क्षमता असलेल्या तळाचे सुरु आहे हे लक्षात येताच सर्वांचे धाबे दणाणले .
तज्ञांनी आपले निष्कर्ष सुरक्षा सल्लागारांसमोर मांडले,त्यांनी लगेच अध्यक्ष जोन केनेडी यांची भेट घेऊन स्थिती स्पष्ट केलि. अध्यक्षांनी चेहर्यावर चिंता न दाखविता त्या दिवसाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पाडले. दुसर्या दिवशी महत्वाची बैठक पार पाडली ज्यात सर्व निर्णय केनेडिंवर सोपविण्यात आला. रशियाच्या या हालचालिंकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना प्रतिकार करणे एवढेच पर्याय त्यांच्यासमोर होते. लोटांगण घालायची सवय लागल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरले असते,तर युद्धाला तोंड फोडल्यास अणु युद्धाला प्रारंभ होणार होता. जगाचे भवितव्य धोक्यात आले होते. केनेडिंनि कठोर वृत्तीचे प्रदर्शन करून अमेरिकी सैन्याला डिफ़कोन-३ चा आदेश दिला. हा आदेश म्हणजे युद्ध हालचालिंना सुरवात करायची होति. या आदेशाच्या पाच पायऱ्या असतात.डिफ़कोन -५ म्हणजे शांतता काळ,डिफ़कोन -२ म्हणजे युद्धासाठी तयार राहाणे आणि डिफ़कोन -१ म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला सुरवात.
आंतरखंडिय अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे तयार ठेवण्यात आली,पाणबुड्या जगभरातील आपापल्या नेमलेल्या जागेवर निघाल्या,तीन विमानवाहू जहाजे,पाच विनाशिका,एक गायडेड मिसाईल क्रुजर,आणि ६ युद्ध नौकाना क्युबन समुद्राची नाकेबंदी करायची होती त्यांना डिफ़कोन -२ चा आदेश होता व गरज भासल्यास डिफ़कोन-१ चा आदेश आल्यावर प्रत्यक्ष हल्ला करायचा होता.
२२ ऑक्टोबरला केनेडिंनि अमेरिकन जनतेला उद्देशून भाषण केले त्यात जनतेला परिस्थितीची कल्पना देण्यात आलि. त्यात रशियाला इशारा देण्यात आला. हे भाषण म्हणजे युद्धाला प्रत्यक्ष तोंड फोडण्याची तयारी होति. या भाषणा नंतर अचानकपणे रशियन अध्यक्ष कृश्चेव यांनी एक पाऊल मागे घेऊन,क्युबाची नाकेबंदी दूर केल्यास आणखी क्षेपणास्त्रे क्युबात न पाठविण्याची तयारी दाखविलि.
परंतु यात आधीच पाठविलेल्या अण्वस्त्रांबद्दल उल्लेख न्हवता,अमेरिकेला हा प्रस्ताव मान्यच न्हवता. २४ ऑक्टोबरला क्युबाला निघालेल्या २५ रशियन जहांजापैकि १२ रशियन नौका अमेरिकन युद्ध नौकांच्या समोरासमोर आल्या. त्यात त्यांना सुरक्षा देणारया पाण बुड्याहि होत्या. त्यांना अडविण्यात आले. सुदैवाने रशियन जहाजे पुन्हा माघारी गेली,कुणि चुकून जरी एक बटन दाबले असते तर जगाने न भूतो न भविष्यति असा संहार पाहिला असता. ज्यात संपुर्ण मानवजात नष्ट झाली असति.
परंतु माघार घ्यावी लागलेल्या क्रुश्चेवनि अमेरिकेची हेरगिरी करणारी दोन यु-२ विमाने पाडून आपला राग व्यक्त केला. यावर केनेडिंनि संयम दाखविला कृश्चेवनि केनेडिंपुढे एक प्रस्ताव ठेवला त्यात तुर्कस्तानात असलेली क्षेपणास्त्रे अमेरीकेनी काढुन घ्यायची व त्याबदल्यात रशिया क्युबातील क्षेपणास्त्रे काढुन घेईल असे सांगितले. केनेडिंनि याला नकार देऊन बिनशर्त माघार घेण्याचा इशारा रशियाला दिला. क्रुश्चेवनि याला काहीच उत्तर दिले नाही,नाईलाजाने केनेडिंनि डिफ़कोन-२ चे आदेश सैन्याला दिले. पण डिफ़कोन-१ चा आदेश देण्याची वेळच आली नाहि. २८ ऑक्टोबरला निकिता क्रुश्चेव यांनि क्युबातील अस्त्रे काढुन घेत आहोत असे जाहीर केले.
परंतु यात रशियाच्या बाजूने माघार घेतली गेली असली तरी ३० ऑक्टोबर १९६२ हा दिवस प्रत्यक्ष युद्धाचा दिवस म्हणून अमेरिकन अध्यक्षांनी निश्चित केला होता हे नंतर उघड झालेल्या कागदपत्रांत कळाले. त्या काळात ४/५ हजार अणुबॉम्ब असलेल्या या देशांनी संपूर्ण मानवजातीचे भवितव्य आपल्या साम्राज्यवादाच्या हव्यासापोटी पणाला लावलेले होते.
जय हिंद
तुषार दामगुडे
संदर्भ : एक टी.व्ही. सीरियल
एका प्रसिद्ध टी.व्ही. चॅनलवरील एक सीरियल.( नांवाची ज़रूर आहे कां ?). एका बाजूला कर्मकांडावर विश्वास नसलेलें नास्तिक मुलीकडचें कुटुंब ; आणि दुसर्या बाजूला कर्मकांडावर, पत्रिकेवर, संपूर्णपणें श्रद्धा असलेलें मुलाकडचें कुटुंब. हें सीरियलच काय , अशी अन्य अनेक सीरियल्स आहेत, जी अंधश्रद्धा, पुराणमतवादीपणा, जुनाट कालबाह्य परंपरा, अशा अनेक गोष्टी दाखवत असतात, जस्टिफायसुद्धा करत असतात. त्यांच्या सर्वांबद्दल बोलायचें-लिहायचें म्हटलें तर त्याला अंतच नाहीं. पण या विशिष्ट सीरियलबद्दल मात्र एक महत्वाचा, टाळतां न येण्यासारखा, मुद्दा असल्याकारणानें, त्याचा विचार करणें अत्यावश्यक आहे ; कारण त्याचा संबंध, स्त्रीला सासरी काय काय काँप्रोमायझेंस करावे लागतात, याच्याशी आहे.
मुलीच्या लग्नाला कांहीं लोक भातशेतीची उपमा देतात. भात आधी एका शेतात लावलें जातें, अन् नंतर रोप वाढल्यावर, तें रोप तिथून काढून, त्याचं ट्रान्सप्लांटेशन दुसरीकडे करतात. लोक म्हणतात की, त्या रोपानें जोमानें वाढावें म्हणून हें सगळें असतें. पण, त्या रोपाची, किमान सुरुवातीला तरी, काय स्थिती असते, हें कोणाला माहीत आहे काय ? आणि, लाँग-टर्ममध्ये कदाचित ती क्रिया त्या रोपासाठी फायद्याची असेल-नसेल, पण शॉर्ट-टर्ममध्ये ती क्रिया त्या रोपाला ‘ट्राउमा’ (trauma) देते की काय , व किती देते , हें कोणी पाहतें कां ?
मुलगी तिच्या माहेरी प्रेमाच्या वातावरणात वाढते, तिथें तिला तळहातावरल्या फोडासारखे ज़पलें जातें ; आणि लग्न झाल्यावर, तें घर, ती नाती, ती माणसें , या सर्वांना मागे सोडून, ती एक नव्या घरीं नवी माणसें, नवीन नाती, नवीन चालीरीती यांना तोंड द्यायला, पाऊल टाकते. तिला किती काँप्रोमाइझेस करावे लगतात ! तिला योग्यायोग्य काय वाटतें, तिची मतें काय आहेत, तिला कुठची गोष्ट आवडते कुठची नाहीं, कुठची पटते कुठची नाहीं, याचा विचार किती सासरची मंडळी करतात ? ते सुनेला किती मतस्वातंत्र्य देतात ? तिला सासरीं किती वर्तनस्वातंत्र्य मिळतें ? घर आमचें आहे, आमच्या घरात तूं आलेली आहेस, या घराच्या चालीरीती, परंपरा , आम्ही अशाच चालवणार, आणि तुला त्याच स्वीकाराव्या लागतील; काँप्रोमाइझ आम्ही काय म्हणून करायचा , तो तुलाच करावा लागेल . अशी ही ‘दकियानूसी’ , जुनाट विचारसरणी पुष्कळ ठिकाणीं दिसून येते. कोणी २१ वें शतक म्हणा वा कांहींही म्हणा, पण अजूनही कांहींकाहीं घरांमध्येतरी खचित असेंच आहे. अजूनही ! अशा घरांत, स्त्रीस्वातंत्र्याला, (म्हणजे खास करून सुनेच्या), पुरुषच काय, पण सासरच्या स्त्रियाही सुरुंग लावतात ! हाऊ सॅड् !
आतां परत त्या सीरियलकडे वळूं या. आपल्या मुलाचें व सुनेचें नोंदणी पद्धतीनें झालेलें लग्नच मुळी सासरच्या मंडळींना पटत नाहीं. कायद्यानें झालेलें हें लग्न, ‘लग्नच नाहीं’ , असें जर कोणी खरोखरच्या जीवनात म्हणालें तर ? याचा अर्थ असा नाहीं कां, की कायद्यावर विश्वास नाहीं, म्हणजेच संविधानावर विश्वास नाहीं. तुझें झालेलें लग्न आम्हाला मान्य नाहीं, म्हणजेच, तुम्ही (पति-पत्नी) एकत्र रहाता, हा अनाचार आहे. आणि तुला पटत नसलें तरी, आम्ही सांगूं तसेंच तूं कबूल करायला पाहिजे, आम्ही म्हणूं तसेंच तूं वागायला पाहिजें, आम्ही सांगू, त्याच पद्धतीनें तूं (‘पुन्हां’ नव्हे, तर खरोखरचें, प्रथमच ! ) लग्न करायला पाहिजे. नाहींतर तुला आमच्या या घरात रहातां येणार नाहीं, तुला गांवही वाळीत टाकेल . Wow ! हा तर कॉग्निझेबल् गुन्हा ठरूं शकतो. सासरच्या अशा व्यक्तीचें, आणि गांवातील व्यक्तींही तशा वागल्या तर त्यांचेंही, वर्तन डिप्लोरेबल् तर आहेच; पण घरातल्या अशा व्यक्तीच्या वक्तव्याबद्दल, वर्तनाबद्दल, त्या व्यक्तीवर केसही होऊं शकेल अन् कोर्टाकडून तुरुंगवासही मिळूं शकेल; आणि वाळीत टाकण्याचा गुन्हा केल्याबद्दल गांवातील ‘पंचायती’लाही सज़ा भोगायला लागेल ! ‘खप’ पंचायतींच्या वागण्याला कायद्याची संमती नाहींच , आणि सुनेला ‘सासुरवास’ करणार्यांना, तिचा शारीरिक अथवा मानसिक छळ करणार्यांना कायदा सज़ा देतोच ! ही आजची खरी परिस्थिती आहे, हें आपण विसरतां कामा नये.
अहो, टी.व्ही. सीरियलवाले, चॅनलवाले म्हणणारच की, की आम्ही हें सर्व, सीरियलच्या टी. आर्. पी. साठी दाखवतो आहोत. पण मग, याचा अर्थ असा नव्हे काय की, समाजाला अशा गोष्टी, असें वर्तन अयोग्य वाटत तर नाहींच, पण तें पहायलाही आवडते !! ( तरच टी. आर्. पी. वर असणार ना ! ) तसें जर खरोखरच असेल, तर, ती डेंजरस बाब आहे, चिंता करायला लावणारी गोष्ट आहे.
शेवटीं, कन्क्लूजन काय ? टी.व्हीं. सीरियल काय वाटेल तें दाखवो ; ( आणि पुढेही, काय हवे तें दाखवो) ; पण, तें सीरियल समरसून पाहणार्यांनो, सावधान ! तिथें दाखवत आहेत, तसें वागायचा विचारही कोणी मनांत आणूं नये. नाहींतर, ( मुलीचा बाप काय करेल तें करो, पण, ) संविधान व कायदा त्यांना बडगा दाखवल्याशिवाय, धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाहींत.
समाजातल्या व्यक्तींनी शहाणें असावें, शहाणें व्हावें ; नाहींतर, रामदासांच्या ‘तो / (ती) एक पढतमूर्ख’ ’ मध्ये एका लक्षणाची भर घालावी लागेल
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट....
एक दिवस मला अचानक खोकला सुरू झाला...काहीतरी खाण्यात आले असेल म्ह्णून जुजबी काही उपाय करून जरा दुर्लक्ष केले...पुढे दोन चार दिवस तो सुरूच राहिला म्हणून मग मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो...हे आमचे डॉक्टर म्हणजे एक भारी माणूस...नुसतं त्याच्या समोर जावून बसलं तरी अर्धा आजार बरा होतो...बरं त्याच्याकडे गेलं की इलाज पाच मिनिटांचा आणि इतर अवांतर कौटुंबिक गप्पा अर्धा तास...
मी आपला त्यांनी लिहून दिलेल्या औषध गोळ्या घेऊन घरी आलो...पुढच्या तीन चार दिवस तो डोस सुरू होता...खोकला कमी झाला, पण बंद झाला नाही....मग पुन्हा गेलो ...डॉक्टरांनी पुन्हा नवीन औषध बदलून दिली...पण फरक काही पडेना....खोकला कमी जास्त होतं राहिला...
तशातच मी माझा सह-कुटुंब युरोप दौरा ही आटोपला....तिथली स्थानिक औषधे पण घेऊन झाली...पण फरक काही पडेना....
तिकडून परत आलो....आता खोकला हे प्रकरण चांगलं दीड दोन महिन्याचे झाले होते...पहिल्यांदाच कुठला आजार एवढा लांबला होता...फोनवर बोलताना, कुठे मिटिंगमध्ये किंवा नाटक सिनेमा बघताना त्यामुळे खूप विचित्र वाटायचं...
शेवटी आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला एका स्पेशालिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला...चेस्ट स्पेशालिस्ट....छातीचे डॉक्टर...
मी आपला त्यांची चिठ्ठी घेऊन या स्पेशालिस्ट डॉक्टर कडे गेलो....त्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तपासणी केली....' सिगारेट पिता का?... तंबाकू खाता का?... दारू पिता का?.... ई ई असंख्य प्रश्न त्यांनी विचारले'....सगळ्या गोष्टींना मी नाही म्हंटल्यावर मग ते म्हणाले कदाचित तुम्हाला धुळीची एलर्जी असेल....त्यांनी काही औषधे लिहून दिली...पाच दिवसांची.... पाच दिवसांनी पुन्हा या म्हणाले....
आता मी एवढा जगभर बोंबलत फिरत असतो आणि अचानक कसली धुळीची एलर्जी?.....पण काहीही न बोलता चुपचाप पाच दिवस ती औषधे घेतली....परिस्थिती जैसे थे...खोकला कमी जास्त व्हायचा इतकंच.....बंद काही होतं नव्हता...मी आपला पाच दिवसांनी पुन्हा त्या स्पेशालिस्टकडे गेलो...दरवेळी ही म्हाळशी नाही पण माझी पोरगी मात्र बरोबर यायची... म्हणून मी म्हणतो प्रत्येक बापाला एक पोरगी असलीच पाहिजे....घरी मला औषधांची आठवण करुन द्यायची.....डॉक्टर काय म्हणतात ते समजून घ्यायची...त्यांच्याशी बोलायची...मी लपवलेल्या काही गोष्टी गपचूप डॉक्टरांना सांगायची... कार्टी लै चाभरट... आता कधी मधी येतात आमचे मित्र खंड्या आणि बडी गप्पा मारायला..आता हे काय डॉक्टरांना सांगायची गोष्ट आहे का?.....पण असो..
डॉक्टरांनी मग पुन्हा नवीन औषध लिहून दिली आणि मला काही टेस्ट करायला सांगितल्या... छातीचा एक्सरे काढायला सांगितला....'खुन की तपासणी' करायला सांगितली...
मी मनात म्हंटल च्यामारी आपल्या छातीत असून असून काय असणार तर ही म्हाळसाबाई ठाण मांडून बसलेली असणार...दुसरं काय असणार? ....पण मला एक शंकाही आली....म्हंटल कसं हे ही म्हाळसा आत बसून दसरा दिवाळी आल्यावर कसे घरातले जाळे जळकटे मोठ्या काठीला झाडू बांधून काढते तसं ही आत माझ्या छातीत बसून वर काठीने घसा तर नाही ना साफ करतं बसली असलं....त्यामुळेच कदाचित मला खोकला येतोय, माझ्या मनातील शंका......मनात म्हंटल चला या एक्सरे मूळे समजलं तरी ही बया आत काय गोंधळ घालतेय....
असो...तर एक्सरे झाला....तो एक्सरेवाला बाबा म्हणाला रिपोर्ट थेट डॉक्टरांना मेल करतो ....येथेही पोरगी बरोबरच होती...मग रक्त तपासणीसाठी लॅबमध्ये गेलो....येथे मात्र एक गडबड झाली....
त्या लॅबवाल्याने बचकन बाटलीभर रक्त काढलं रावं... मी कुठंतरी वाचलंय की थेंबभर रक्त तयार होण्यासाठी दोन तीन भाकरी खाव्या लागतात...याने तर बाटली भर काढलं म्हणजे मला आता किती खावे लागणार?...माझ्या मनात आकडेमोड तयार झाली होती...
रक्त काढत असताना पोरगी बरोबर होतीच...त्या लॅबवाल्याने त्याचे सोपस्कार आटोपले...मी आणि पोरगी बाहेर कॅश काऊंटरवर पैसे द्यायला आलो आणि अचानक पोरगी चक्कर येईन धाडकन खाली कोसळली...माझी हवा टाईट...क्षणात मी जबरदस्त घाबरलो....सगळा स्टाफ, आजूबाजूचे लोकं जमा झाले....तिथले डॉक्टर ही पळत आले...पोरीला तिथेच बाकड्यावर झोपवले...डॉक्टरांनी काही प्राथमिक तपासण्या सुरू केल्या....मी चांगलाच तंतरलो होतो....घाबरून मी म्हाळशीला फोन करून झाला प्रकार सांगितला...ती आहे तशी रिक्षा करून लॅबकडे यायला निघाली...डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून मला म्हणाले काळजीचे काही कारण नाही, काही जणांना हे असं रक्त वगैरे बघितलं की भोवळ येते पण काही वेळात सगळं नॉर्मल होतं.... आणि झालंही तसेच...काही वेळात पोरगी नॉर्मल झाली....तिला मग पाणी दिले, थोडी खडीसाखर दिली....ती आता शांत आणि ओके झाली तेवढ्यात म्हाळसाबाई आल्या आणि तिने पोरीला मिठी मारत तिचा ताबा घेतला...
काही वेळाने सगळं आलबेल झाल्यावर आम्ही तिघेही तिथून निघालो....पायी गाडीच्या दिशेने काही अंतर गेलोच असेल की म्हाळसाबाईचा इतका वेळ साचून राहिलेला बांध फुटला आणि तिने रस्त्यातच भोकाड पसरलं....मी पुन्हा टरकलो... आजूबाजूचे लोक माझ्याकडे संशयाने बघतं होते...एकतर माझा गबाळा अवतार, दाढीची खुरट वाढलेली आणि त्यात तिथेच बाजूला एक 'देशी अमृत प्राशन' चे दुकान होते....वेळ संध्याकाळची...लोकांना भलताच संशय येतं असणार...कसंबसं हे प्रकरण गाडीत कोंबलं आणि घरी आलो...हुश्श...
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी सगळे रिपोर्ट घेऊन त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेलो...यावेळी बरोबर म्हाळसाबाई होत्या....सगळे रिपोर्ट नॉर्मल.... कशातच काही सापडले नाही....मग आता काय?
पुढे जे झाले ते खूप गमतीशीर बरं का...
डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट पाहून, सगळं काही आलबेल आहे हे पाहून ते मला म्हणाले...
" मला वाटतं तुम्हाला ऍसिडीटीचा त्रास असावा...तुम्हाला मी काही औषधे लिहून देतो ती पुढचे पाच दिवस घ्या आणि मला पुन्हा दाखवायला या...आणि हो तुम्ही अजून एक काम करा....दर दोन तासांनी काहींना काही खात रहा..."
तुम्हाला सांगतो त्यांनी ते शेवटचं वाक्य उच्चारलं आणि मला कोण आनंद झाला म्हणून सांगू?...त्यांच्या त्या वाक्याने मला पार गदगदून, फदफदून, गहिवरून आलं...असं वाटलं की टुणकन उडी मारून त्या टेबलाच्या पलीकडे जावं...त्या डॉक्टरला एक घट्ट मिठी मारावी आणि त्याचा एक झकास गालगुच्चा घ्यावा ...
आयला दर दोन तासांनी काहीतरी खायचं म्हणजे किती मज्जा रावं.... हा आनंद केवळ मीच समजू शकतो....
मी आनंदाने बाजूला म्हाळशीकडे बघितलं....रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता...डोळे अक्षरशः आग ओकत होते....त्या डॉक्टरकडे खाऊ की गिळू या नजरेने ती बघतं होती....मी पटकन उठलो...सगळे पेपर घेतले आणि पटकन बिल देवून म्हाळसाला घेऊन बाहेर आलो....
मी जरा उशीर केला असता तर या महिषासुरमर्दिनीने त्या डॉक्टरचा तिथेच वध केला असता....
पुढे कसं काय कोण जाणे पण खोकला आपोआप गायब झाला....त्यालाही आता दोन तीन महिने झाले...औषध, गोळ्या, डॉक्टर केंव्हाच बंद झाले... पण अर्थात अजूनही मी दर दोन तासाला खाणे सोडलेलं नाही...न जाणो खोकला परत आला तर?...
कुलकर्ण्यांचा " 'म्हातारा ना इतुका की अवघे चाळीशी वयोमान' असलेला " प्रशांत
फोटो - माझ्या मुलीसाठी मी केलेला स्वयंपाक

मऊमधाळ खमंग भरपूर तूप लावलेली पुरणपोळी...
सणसणीत कटाची आमटी...
चटकदार घोसाळे भजी...
आणि बटाट्याची चमचमीत भाजी...
-- प्रशांत कुलकर्णी
पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध असे किल्ले प्रबळगड व कलावंती सुळका आपल्याला इथे कोणत्याही ऋतूत भेट देता येते. हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारे आहे कारण पावसाळ्यात व हिवाळ्यात इथे दाट धुके असल्यामुळे जणू या परिसरात स्वर्गच निर्माण होते
सरांनी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या दुसऱ्या पायरीत दर्शवलेल्या उच्च्शक्ती बद्दल माहिती देताना सांगितले की..” बहुतांशी वेगवेगळ्या धर्मानी .. पंथांनी ..मानवसमूहांनी ..त्यांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे गोष्टी घडवणारा ..सर्व सृष्टीवर नियंत्रण करणारा ..कणाकणात वसलेला…पाप पुण्याचा हिशोब ठेवून फळ देणारा ..कोणीतरी स्वामी ..आहे हे सांगितले आहे…….
५ नोव्हेंबरच्या रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी १८४३ साली मा.विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीच्या दरबारात केला’ असा चुकीचा उल्लेख आला आहे. वास्तविक, भावे यांनी त्या वर्षी हा प्रयोग कधी केला, याची तारीख संशोधकांनाही उपलब्ध झालेली नाही. रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरच का? केव्हापासून? त्याचे ज्ञात उत्तर असे :
१९४३ मध्ये सांगली येथे मराठी नाटकाचा शतसांवत्सरिक उत्सव व नाटय़संमेलन भरले. त्यावेळी सांगलीचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन (चिंतामणरावांचे नातू, यांचेही नाव हिज हायनेस चिंतामणराव) यांनी ‘नाटय़ विद्यामंदिर’ स्थापन करण्यासाठी गावातील मध्यवर्ती जागा दिली व तेथील इमारतीचा कोनशिला समारंभ पाच नोव्हेंबर १९४३ रोजी झाला. सध्या या जागी ‘विष्णुदास भावे नाटय़गृह’ आणि ‘अखिल भारतीय नाटय़ विद्यामंदिर समिती’चे कार्यालय आहे. नाटय़ महोत्सवातील हा महत्त्वाचा दिवस, त्यामुळे दरवर्षी नटराज पूजन करून ५ नोव्हेंबर हा रंगभूमी दिन पाळला जावा, असा ठराव केला गेला. ५ नोव्हेंबर १९४३ पासूनच हा ‘रंगभूमी दिन’ पाळला जातो. अ. भा. मराठी नाटय़ विद्यामंदिर समितीच्या १९६०च्या अहवालात याचा पुनरुच्चार केला आहे. विष्णुदासांचा पहिला ‘सीतास्वयंवरा’चा नाटय़प्रयोग त्या दिवशी झाल्याचा अस्सल पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही. नाटय़ाभ्यासकांच्या मनात चुकीची नोंद होऊ नये, म्हणून हा खुलासा.
डॉ.तारा भवाळकर, सांगली
मराठी रंगभूमी स्थापनादिन प्रतिवर्षी ठिकठिकाणी साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्यार ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, दिलीप प्रभावळकर,रामदास कामत, शं.ना. नवरे , फय्याज इमाम शेख, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, महेश एलकुंचवार, डॉ.जब्बार पटेल, जयंत सावरकर आदींना मिळाला आहे. पुरस्काराचे यंदाचे हे ५२ वे वर्ष आहे. या वर्षीचा पुरस्कार अनेक नाटके, व मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते मा. मोहन जोशी यांना मिळाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विष्णुदास भावे गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मोहन जोशी यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरी सुरू असतानाच त्यांचा अभिनयाकडे ओढा वाढला. ‘टूनटून नगरी- खणखण राजा’ या बालनाट्यापासून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. पुण्याच्या भरत नाट्य मंदिर संस्थेतर्फे बालनाट्य, एकांकिका, नाटक यामध्ये त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. ‘गार्बो’, ‘एक शून्य बाजीराव’ या प्रायोगिक नाटकांत सहभाग घेत ‘मोरूची मावशी’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यातून मराठी रंगभूमीला एक विनोदी कलाकार मिळाला. त्यांचे ‘नाथ हा माझा’ हे नाटक खूप गाजले. तेथून त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर हमखास यश मिळवून देणारा कलाकार अशी नोंद झाली. ‘प्रेमाच्या गांवा जावे’, ‘आसू आणि हासू’ ही त्यांची गाजलेली नाटके. त्यानंतर ते चित्रपट सृष्टीत गेले. तेथेही त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी १०२ पेक्षा अधिक मराठी चित्रपटात काम केले. ‘भूकंप’ या चित्रपटापासून त्यांनी हिंदी चित्रपटात सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी १७२ पेक्षा अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्या शिवाय बंगाली, भोजपूरी आणि कन्नड भाषांतील चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. मराठी आणि हिंदीमध्ये अनेक मालिकांत त्यांचा सहभाग आहे. अभिनयाबरोबर त्यांचे सामाजीक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. मैत्री ट्रस्टच्या माध्यमातून वृद्ध, अपंग आणि आजारी कलाकारांना मोठी मदत केली आहे. सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्या माध्यमातून विविध योजना ते राबवत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आता दुनियेत| होती खूप हाल|
सुकलेत गाल| शोषितांचे||१||
पाहिले अनेक|दु:खी जीव येथे|
चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२||
करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान|
नाही मला भान|देवा आता||३||
थोडी जनसेवा| हातून घडावी|
साथ रे मिळावी| देवराया||४||
भाव पामराचा| समजून घ्यावा|
आशिष असावा| देवा तुझा||५||
पुसू देत डोळे| भरवू दे घास|
जगण्याची आस| वाढो त्यांची||६||
अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता|
बनुनी त्यांचा पिता| देतो ग्वाही||७||
-- महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले (ऋतुराज)
दि. २२/०९/२०१९
नुकतीच एका ऑफिसमध्ये गेले होते. एरवी दुसऱ्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये जाताना नेहमी जाणवायचं, जिन्यातले कोपरे लोकांनी पान खाऊन थुंकून घाण करून टाकलेत.
“आवाज, अभिनय, लेखन असा एकत्रित योग जेव्हा एखाद्या व्यक्तीत जुळून येतो तेव्हा तो एक उत्तम कलाकार म्हणून चपखल असतो असं म्हणतात. तर असे त्रिवेणी योग जुळलेला हौशी आणि सदैव तरुण असणारा कलाकार म्हणजे नितीन माधव.
Copyright © 2025 | Marathisrushti