(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • साथ,सोबत संगत…

    ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा

    पोकळी असते.

  • भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य…

    जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो. आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नाने गुंतलेले असते. प्रत्येक जीव कुठल्यातरी विचाराने त्रस्त झालेला असतो. कुणाला संपत्ती कशी सांभाळावी याची काळजी असते तर कुणाला, आजच्या सांजेला तरी पोटभर भाकर मिळावी अशी आशा असते.

  • भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

    १२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली.

  • मुक-बधिर शाळा, अलिबाग

    कुठलीही सुंदर गोष्ट हृदयात साठवून तिचा अनुभव घेण्यासाठी ऐकण्याच्या शक्तीची खुप गरज असते. नुसतं पावसात भिजणं, आणि त्या पावसाचा आणि कडाडणार्‍या विजांचा आवाज शांतपणे ऐकत भिजणं यात खूप फरक असतो. आईची पाठीवर प्रेमाची थाप पडली तर आपल्याला बरं वाटतच, परंतु जोडीला तिचे प्रेमाने ओथंबलेले शब्द कानांवर पडले तर आपला आनंद अजून द्विगुणीत होतो.

  • घास घास घेणे

    लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, …..

  • निवडणुका आणि मतदार…

    पुर्वीचा प्रत्येक राजकारणी आपल्या पक्षाशी, त्या पक्षाच्या विचारांशी आणि तत्वाशी शक्यतो एकनिष्ठ असायचा पण आता तो कपडे बदलावे तसे पक्ष बदलतो आणि नोकरीचा राजिनामा द्यावा तसा पक्षाचा राजिनामा देतो. पुर्वी मतदारांचा एक विशिष्ठ वर्ग कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि तो कोणत्या पक्षाला मतदान करेल याचे अचूक अंदाज बांधता यायचे आता तसे ते बांधणे शक्य न राहिल्यामुळेच राजकीय भविष्य खोटी ठरतात आणि राजकीय गणित मांडणार्यां चाही गोंधळ उडतो. 

  • भारतमातेच्या वीरांगना – ४४ – अम्मू स्वामीनाथन

    गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर फार दिसून आला. कमलादेवी चटोपाध्याय, ऍनी बेसेंट, ह्या सगळ्यांबरोबर त्या मद्रास मध्ये विविध उपक्रम राबवित होत्या. ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने Women’s India Association, मद्रास येथे आकारास आली ज्या अंतर्गत भारतीय महिलांच्या समस्यांवर खूप मोठे काम सुरू झाले, जसे की बाल विवाह रोकणे, स्त्री शिक्षण, देवदासी प्रथा, परदा प्रथा मोडून काढणे इत्यादी. स्वातंत्रता संग्रामात सुद्धा त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. भारत छोडो आंदोलना नंतर त्यांनी १ वर्ष सश्रम कारावास देखील भोगला.

  • फवारे हास्याचे – (4)

    साहित्याचा चोर मी
    तरि साहित्यिक थोर मी
    थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी
    पण लढतो घनघोर मी ।।

    -सुभाष स.नाईक

  • हा सागरी किनारा….. लाचखाऊ राजकारण्याचे गाणे

    हा सागरी किनारा............................... हा सागरी किनारा
    ओला सुगंध वारा............................... ओला सुगंध वारा
    ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा................. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा

    हा सागरी किनारा............................... हा सागरी किनारा
    ओला सुगंध वारा................................ ओला सुगंध वारा
    ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा................... मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा

    मी कालचीच भोळी............................... तू कालचाच भोळा
    मी आज तीच येडी............................... अन् आज तोच येडा
    ही भेट येगळी का............................... ही भेट येगळी बा
    न्यारीच आज गोडी............................... न्यारीच आज गोडी
    का भूल ही पडावी? वळखून घे इशारा................ ना भूल ही जराबी, वळखला मी इशारा
    ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा................... मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा

    होते अजाणता मी................................ होतास अजाणता तू
    ते छेडले तराणे.................................. मी छेडले तराणे
    स्विकारल्या सुरांचे................................ मंजुळ मम सुरांचे
    आले जुळून गाणे................................ आले जुळून गाणे
    हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा.................. हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा
    ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा.................. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा

    बोलू मुकेपणाने.................................. बोलू मुकेपणाने
    होकार ओठ देती................................ होकार ओठ देती
    नाती तनामनांची................................. नाती तुझी नि माझी
    ही एकरूप होती................................. भावाभावांची होती
    एकान्‍त नाचतो हा फुलवूनिया पिसारा................... येथेच नाचतो मी फुलवूनिया पिसारा
    ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा.................... डोळ्यांस मिटल्या दिसे एक उंच मनोरा

    - जगदीश खेबूडकर............................... - आकाश विहारकर

  • सोसायटी मध्ये गटबाजी झाल्यास होणारे परिणाम

    गृहनिर्माण संस्थेच्या कामात गटबाजी असता कामा नये. सदस्यांना आपल्या संस्थेबाबत प्रेम असणे गरजेचे आहे. तरच संस्था चांगल्या प्रकारे चालविण्यास मदत होते. अन्यथा काही वर्षातच संस्था ही त्रयस्थ व्यक्ती म्हणजेच “प्राधिकृत व्यक्ती” यांची नियुक्ती करावी लागते. परंतु कालांतराने सदस्यांना झालेली चूक समजते. तोपर्यत बराच उशीर झालेला असतो आणि त्यात आपल्याला काही कळत नाही, तर योग्य व्यक्तीला विचारून त्याच्या सल्ल्याने काही कराव, हे सुद्धा बहुसंख्य लोकांना सांगायची तीव्र गरज निर्माण झाली आहे. बऱ्याचदा असे निदर्शनास येते की, उपविधीत सुधारणा करताना क्रमांकामध्ये नजरचुकीने चुका राहून जातात. त्यामुळे पुढील सर्व उपविधी क्रमांक हे बदलतात. आजच्या सत्रात अश्याच काही महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणारा लेख आपल्यासाठी.