हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता.
आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद..! गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो.
अभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट….
अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी.. असा फतवा बिहारमधील एका गावपंचायतीने काढला होता पण त्या विरोधात कोणीही तक्रार केल्याची माहीती नाही याचा अर्थ हा निर्णय गावकर्यांच्या संमतीनेच घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे शहरात राहणार्यां आपल्याला जेंव्हा या फतव्या बद्दल कळ्ते तेंव्हा आपण आपला देश अजूनही किती बुरसटलेल्या विचारसरणीचा आहे असा विचार अगदी सहज करून जातो. आपल्या देशातील गांव आणि शहर यांच्या विचासरणीत आजही कमालीच अंतर आहे हे सत्य नाकारता येणार नाही. आपल्या शहरातील सूख- साधने गावात पोहचली पण शहरातील अधूनिक विचारसरणी अजूनही गावात पोह्चलेली नाही. जी काही पोहचली ती चित्रपटांच्या माध्यमातून अतीरंजीत. भारतातील गावांत आजही पुरूषप्रधान संस्कृतीच गुण्यागोविंदाने नांदतेय हे सत्य आहे त्याचाच एक भाग म्ह्णून या फतव्याकडे पाह्ता येईल.
मुंबईसारख्या शहरात लहानाचे मोठे झालेल्या, अधूनिक विचारसरणीचा बाळकडू प्यायलेल्या उच्चशिक्षीत पुरूषाच्या मनातही स्त्रियांच्या मोबाईल वापरावरच बंदी घालायला हवी हा विचार कित्येकदा डोकावून गेलेला असतो हे सत्य आहे. आता त्याचा मोकळेपणाने कोणी स्विकार करणार नाही हा भाग वेगळा. असो मुंबईसारख्या शहरात मोबाईल फोन हे काही एकमेव संपर्काचे साधन नाही आणि असल तरी त्याच्या वापरावर बंदी घालण पुरूषांनाच परवडणार नाही आणि शहारातील स्त्रिया हा अन्याय सहनच करून घेणार नाही. त्यामुळे शहारातील पुरूष असा विचार फक्त स्वप्नात अथवा मनातच करू शकतात. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट फतव्यात फक्त अविवहित मुलींच्याच मोबाईल वापरावर बंदी का घालण्यात आली त्या मोबाइलफोनचा दुरूपयोग करतात म्ह्णूनच ना ? पण आजच्या काळात सर्वच विवाहित स्त्रियां त्याचा सदुपयोग करतात याची खात्री त्यांना कोणी पटवून दिली ? मुंबईसारख्या शहरात मुलीच्या हातात दहा-वीस हजाराचे मोबाईल असतानाही त्या सार्वजनिक फोन बुथच्या बाहेर गर्दी करून आजही का उभ्या असतात ? हे कोडं आजही कित्येकांना उलगडत नाही.
समाजात अनैतिकता वाढू लागलेय त्याला मोबाईल फोनला जबाबदार धरून आपली जबाबदारी टाळ्ण्याचाच हा प्रकार आहे. त्यापेक्षा समाजाने मुलींवर चांगले संस्कार केल्यास, त्याच्यासोबत सर्वच विषयांवर मनमोकळ्या चर्चा केल्यास, त्यांना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी दिल्यास आणि त्यांच्या मनात उत्सूकतेतून निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू दिल्यास हे असे फतवे काढण्याची आवश्यकताच भासणार नाही. विनोदाने सांगायच तर अविवाहीत मुली मोबाईल फोन वरून फोन कोणाला करणार अविवाहित मुलांनाच ना मग त्यांच्याही मोबाईल फोन वापरावर बंदी का घातली नाही. हा जो काही प्रकार घडलेला आहे तो पुरूषप्रधान विचारसरणीतून आणि पुरषी अहंकारातूनच घडलेला आहे. याच समर्थन होऊच शकत नाही...
-- निलेश बामणे
श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. त्यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे.
मिस्टर इंडिया मधील अनिल कपूर सारखे अदृश्य होणारे ब्रेसलेट प्राप्त झाले तर काय काय कराल हा सरांचा प्रश्न सूचक होता ..सगळ्यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवल्या ..सर्वाची उत्तरे ऐकून सर म्हणाले ..आता जी उत्तरे दिलीत तुम्ही त्यात एकानेही देशसेवा करण्याबद्दल ..गरीब…दिन दुबळे यांचे जीवन सुखी करण्याबद्दल ..किवा सर्व विश्वाचा काही फायदा करून देण्याबद्दल विचार मांडला नाही .
अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या परिक्षेचा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. . . या परिक्षेत देशभरातील ९२० विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यापैकी सुवर्ण महोत्सवी वर्षात, राज्यातील ९० उमेदवारांनी मराठीचा झेंडा फडकावीत व अभिमानाने सांगितले ! . . . मराठी पाऊल पडते पुढे . . .
काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि सर्वांसमोर हाताची मुठ उघडली तर त्यांच्या तळहातावर एक लाल मणी होता तो त्यांनी एका माणसाला समोर बोलावून दिला व त्याला सांगितले मणी सतत शरीराला लागून राहील असा परिधान कर तुझे काम होईल …नंतर मला समजले की तो मणी त्यांनी हातातून जादूने काढला होता ..( ती हातचलाखी होती हे खूप नंतर लक्षात आले माझ्या )
ओमीच लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं... युगेशाने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!! बाहेर काम करुन घरी लवकर आली की कीचनमधे शीरुन काही ना काही बनवण्याची तीला हौस आहे.. पुर्वी मी वीळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तीने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर खीसायचही.... खरच जेवण बनवणं कीती सोप्प झालयं! काही सासवा या सुधारणा स्वीकारत नाहीत... " आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे ." अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात... अरे असुदेत ना.. तुम्हाला नाही मीळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ? उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजोय करायचा प्रयत्न करा .... उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की... आपण जात सोडून पीठाच्या गीरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मीक्सरला आपलसं केलच ना? मग येऊदेत की विचारातही आणखीन बदल... स्वीकारा....त्या यंत्रांशी खेळण्यातपण एक मज्जा आहे.. ती घ्या आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही कीती चवीने खातेय ते...माझी सुन खाते मी केलेल आवडीने ... मीही स्विकारलीय तीच्या हातची वेगळी चव ...
आपल्या मुलासाठी सुन स्वताला बदलवतच असते की मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल... तेच तर हवं असत ना आईला??
माणसाने बदल स्वीकाराले की नाती सुदृढ होतात .!!
- वसुंधरा
Copyright © 2025 | Marathisrushti