(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आडनावांच्या नवलकथा मराठी आडनावात राम, रावण, वाघ आणि गाय.

    मराठी आडनावात बर्‍याच देवादिकांना आिण प्राण्यांना स्थान मिळाले अाहे. राम, रावण, वाघ आिण गाय हे शब्द असलेल्या आडनावांच्या नवलकथा येथे दिल्या आहेत.

  • कशी असते जमिनीची मोजणी

    आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.

  • तेंव्हा पासून….

    खाद्या प्रसंग माणसाला बरेच काही शिकवून जातो. पण आठवण मात्र कायम राहते. आणि एक धडा शिकायला मिळतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे. मुलं लहान असताना दरवर्षी पास झाले की पेढे आणून देवापुढे ठेवून मग सगळ्यांना वाटत होते आणि त्यांचे कौतुक करत होते.

  • मिटकॉन संस्थेचे सर्टिफिकेट कोर्सेस

    Anagha-Gandhi-Mitcon

  • जीवन

    जीवन हे निर्सगाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. मानवाची निर्मिती हा एक अदभूत चमत्कार आहे. या जगात प्रत्येक मनुष्य हा खास व महत्वपूर्ण आहे व प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

    निसर्गाने मानवाची निर्मिती केली व त्याचा पालनकर्ताही निसर्गच आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिलं व तो निसर्गाचं देणं लागतो. निसर्गाचे ऋण फेडावे ते कमीच. मनुष्य जगात रिकाम्या हाताने येतो व रिकाम्या हाताने जगाला निरोप देतो. पण मागे ठेऊन जातो त्या त्याच्यासोबत जुळलेल्या त्याच्या आठवणी,त्याचे नातेसंबंध,त्याचे कर्तृत्व, त्याने घडवून आणलेला बदल इत्यादी.जीवन अस्तित्वात आहे तर मृत्यू ही अस्तित्वात आहे. जे आज आहे ते उद्या नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित आहे.जीवनातील आनंद हेच एक निरंतर सत्य आहे.

    हे जग फार सुंदर आहे.या सुंदर जगाला बघण्यासाठी मानवाला सुंदर डोळे आणि मन ही निसर्गाने दिले आहे.पण ही सुंदरता बघण्याचा प्रयत्न फक्त त्यालाच करायचा आहे.मानवाने स्वतःवर व इतरांवर प्रेम केलं तर जीवनातील आनंदाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो.शेवटी सुख,शांती व समाधान हेच जीवन जगण्याचे ध्येय असावे.

    -- प्रा. हितेशकुमार एस. पटले

  • शिवीतील मातृभाषा

    दिल्ली विद्यापीठातील प्रख्यात भाषा विद्वान, लेखक डॉ भोलानाथ तिवारी यांनी पीएचडी प्रबंधा करीता रशियातील कजागिस्तान व उझबेकिस्तान येथील स्थानिक हिंदी बोली वर अभ्यास करण्या साठी दौरा केला. तेथील जैन,सिख,उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कामुळे विशिष्ठ हिंदी बोली प्रचलित झाली आहे.

  • कोल्हापूरचा दगडू

    रोज चिकन मटण खायची सवय…
    पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली…जरा सेटल झाल्यावर दगडू
    रोज मांसाहार करू लागला…

  • मंगलाष्टक

  • दशनाम गोसावी समाज वधू-वरांसाठी सुवर्ण संधी

    दशनाम गोसवी समाज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पसरलेला असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते.

  • दख्खनची राणी आणि धावते उपाहारगृह !

    सकाळी पुणे ते मुंबई आणि संध्याकाळी परत पुणे असा प्रवास करणार्‍यांची संख्या फार मोठी आहे. गेली कित्येक वर्षे अनेकजण असा प्रवास करत आहेत. सहाजिकच हा प्रवास होतो रेल्वेने...... हे रेल्वेप्रवासी एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकमेकांशी जिव्हाळ्याचं नातं ठेउन आहेत.

    या नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या मनात दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या गाडीबद्दल प्रचंड आत्मियता आहे. मध्य रेल्वेवरील ही अत्यंत दिमाखदार गाडी. या गाडीचं तिकिट मिळणं ही एके काळी अत्यंत मौल्यवान गोष्ट मानली जायची.

    पांढऱ्या-निळ्या रंगसंगतीत धावणारी आणि मुंबई-पुणे या दोन शहरांना एकमेकांशी जोडणारी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनची राणी ही ऐतिहासिक गाडी १ जून १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू करण्यात आली. त्या वेळेस ती फक्त शनिवारी व रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी रोज या दोन शहरांदरम्यान धावू लागली.

    दख्खनची राणी पुण्याहून दररोज सकाळी सव्वासात वाजता निघते आणि बरोबर सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा वाजता मुंबईच्या छ्त्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस टी) वर पोहोचते. परतीच्या प्रवासात ती सायंकाळी ५:१० वाजता छ्त्रपती शिवाजी टर्मिनसहून निघते आणि रात्री ८:२५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचते. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस वगैरे गाड्या सुरु होण्यापूर्वी डेक्कन क्वीन ही भारतातली सर्वात वेगवान गाडी होती.

    या गाडीने नियमितपणे म्हणजे अक्षरश: दररोज प्रवास करणारे शेकडो प्रवासी आहेत. मुंबई-पुणे प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही अनेकजण डेक्कन क्वीननेच प्रवास करणे पसंत करतात. नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मासिक पासची व्यवस्था आहे आणि त्या प्रवासांसाठी डेक्कन क्वीनमध्ये राखीव डब्बे सुद्धा आहेत हे विशेष. डेक्कन क्वीन म्हणजे त्यांचं जणू काही दुसरं घर. दरवर्षी ते या गाडीचा वाढदिवसही साजरा करतात. अगदी गाडी सजवण्यापासून ते केक कापेपर्यंत सगळं काही करतात. या गाडीचे मोटरमन जेव्हा जेव्हा सेवानिवृत्त होतात तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी समारंभही करतात.

    काळानुसार या पहिल्यावहिल्या डिलक्स गाडीत अनेक बदल झाले. या गाडीतील प्रथम श्रेणीचा डबा स्वातंत्र्यानंतर लगेचच बंद करून त्याजागी द्वितीय श्रेणीचा डबा सुरू करण्यात आला. सुरुवातीला पूर्ण निळ्या रंगाच्या या गाडीला पांढऱ्या-निळ्या अशा नेत्रसुखद रंगसंगतीची जोड देण्यात आली. त्याचप्रमाणे १९५५ मध्ये पहिल्यांदाच या गाडीत तृतीय श्रेणीचा डबाही जोडण्यात आला. त्यानंतर २००३ पासून या गाडीतील पाच वातानुकूलित डब्यांची संख्या चारवर आणण्यात आली. गाडीतील आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे धावते उपाहारगृह!

    "डायनिंग कार‘ असे वैशिष्ट्य असलेली देशातील एकमेव आणि पहिली रेल्वे म्हणून दख्खनच्या राणीचा उल्लेख केला जातो. एक जून १९३० पासून - म्हणजेच तब्बल ८५ वर्षे - या रेल्वेला "डायनिंग कार‘ ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये जाऊन प्रवासी खाद्य पदार्थ खाऊ शकत. तेथे टेबल आणि मऊ गाद्या असलेल्या खुर्च्यांची व्यवस्था होती. या "डायनिंग कार‘ला आयएसओ प्रमाणपत्रही मिळाले होते. या रेल्वेमुळेच पुण्याला जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक मिळण्यास मदत झाली होती. वेगळा थाट असलेल्या या "डायनिंग कार‘ची नोंद "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड‘मध्ये झाली आहे. देशातीलच नाही तर परदेशी प्रवासांनाही डेक्कन क्वीन आणि तीची डायनिंग कार याची भूरळ पडली होती.

    प्रवासी नाष्टा करण्यासाठी डब्यातून "डायनिंग कार‘मध्ये येत असत. तेथे मिळणारे विविध प्रकारचे सॅंडविच, चिकन कटलेट, व्हेज कटलेट, ब्रेट बटर, पापलेट ब्रेड, चीज टोस्ट सॅण्डवीच, चिकन कटलेटसह अन्य पदार्थ तसेच चहा-कॉफीवर प्रवाशांकडून चांगलाच ताव मारला जात होता. लाकडी खुर्च्या, टेबल असा थाट असणाऱ्या डायनिंग कारमध्ये अनेक प्रवासी मुंबई-पुणे मार्गावरील निसर्ग न्याहळत पदार्थांची चव चाखत होते. प्रवाशांनी दिलेल्या "ऑर्डर‘नुसार त्यांना जागेवर खाद्य पदार्थ उपलब्ध करून दिले जात असत. "डायनिंग कार‘मधून दररोज सरासरी ३० हजार रुपये इतका व्यवसाय होत असे.

    डिसेंबर २०१४ मध्ये रेल्वे प्रशासनाने या डायनिंग कारचे आयुष्य संपल्याचे सांगत दुरुस्तीच्या नावाखाली "डायनिंग कार‘ बाजूला केली. त्या जागी "पॅंट्री कार‘ जोडली. प्रवाशांच्या मागणीवरुन ही डायनिंग कार पुन्हा सुरु केली जाईल असे रेल्वे अधिकारी सांगत. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे सोनेरी पान कायमचे पुसले जाणार नाही याची दक्षता प्रवाशांनीच घेतली. सततच्या रेट्यामुळे हे `धावते उपहारगृह अर्थात डायनिंग कार' १ जून २०१५ पासून म्हणजेच `दख्खनच्या राणी'च्या ८५ व्या वाढदिवशी पुन्हा या गाडीला जोडले गेले.

    डेक्कन क्वीनमधून केलेल्या पुणे ते मुंबई या प्रवासाची एक झलक !