(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कैलास मानसरोवर यात्रा

    देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये …..

  • हा छंद जीवाला लावी पिसे !

    माणसाला जीवनात आवश्यक असलेले छंद !! .. माझा लेख -आजच्या "नवाकाळ"मध्ये ! माणसाला जीवनात आवश्यक असलेल्या छंदांसंबंधी माझा एक छोटेखानी लेख,आजच्या "नवाकाळ"मध्ये छापून आला आहे. आपल्या सर्वांसाठी हा लेख खाली देत आहे. आपला अभिप्राय जरूर कळवा . तसेच आपलेही काही वेगळे अनुभव आहेत का ?1

    असे म्हणतात की शिक्षणावाचून माणूस म्हणजे अर्धाच .. पण अलीकडे असे दिसते की कसलाही छंद नसलेला निवृत्तीनंतरचा माणूसही असा अर्धाच राहतो. अचानक बी पेरून लावलेले झाड जशी लगेच फळे देत नाही तसाच छंदही निवृत्तीनंतर नव्याने लावून घेता येत नाही.
    आधीपासून त्याचे पिसे लागलेले असेल तर निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप छान जाते. तो निवृत्तीच्या आधीही जपला असेल तर रोजच्या नोकरी व्यवसायात असलेल्याचीही मानसिक स्थिती उत्तम राखतो.

    गरीब माणसाला अपचनाचा त्रास होत नाही. तसा बहुतेक प्रत्येक संग्राहक हा आपल्या संग्रहाबाबत तरी गरीबच असतो. कधीच संतुष्ट नसतो. आपल्या संग्रहात अजून अमुक नाही--तमुक नाही असे म्हणत तो सदैव शोधातच असतो. त्यामुळे विविध प्रकारचे संग्रह करणाऱ्या, माझ्या बरोबरच्या सुमारे १५ /२० विविध वयाच्या मित्रांना रक्तदाब, मधुमेह, कोलॅस्ट्रॉल असले काहीच त्रास नाहीत. खरोखरच्या गरिबांची क्षमा मागून असे म्हणता येईल की जमविलेल्या वस्तूंच्या बाबतीत तरी तो सदैव दारिद्र्य रेषेच्या खालीच असतो. कुणाचा द्वेष, हेवा, मत्सर करायला मन रिकामंच राहत नाही. हे छंदामुळे घडते काय हा प्रश्न मी एका खूप मोठ्या विद्वान डॉक्टरांना विचारला तेव्हा
    त्यांनी होकारात्मक उत्तर दिले.

    माझे एक असेच वयाची ८० वर्षे ओलांडलेले छांदिष्ट मित्र एक दिवस खूप खिन्न होते. त्यांना बरं वाटत नव्हतं हे उघड होतं .मी त्यांना विचारले, काय झाले? ..बरं नाही का ? डॉक्टरांकडे जायचंय का? त्यांनी एक दीर्घ सुस्कारा घेऊन सांगितले की तसे नाही हो. एकाने मला " रशियाचे ३ कोपेकचे दोन्ही बाजूंना छापलेले आणि नाणे म्हणूनही वापरले गेलेले टपाल तिकीट " देतो म्हणून कबूल केले होते आणि दुसऱ्या कुणी तरी ५० रुपये जास्त दिले म्हणून त्याला विकून टाकले. आता बोला. ... म्हणजे " हे " त्यांचे आजारपणाचे कारण होते तर ! ... मी ही "दुःख:द " बातमी आमच्या सर्व छांदिष्टांना सांगितली. त्यामुळे " ते दु:ख " लगेच वाटले गेले. सर्वच जण कामाला लागले. कुणी मित्रांकडे विचारणा सुरू केली, विदेशात मेल गेले. इ- शोध सुरू झाले. आणि आठवड्याच्या आत ते (तसेच) तिकीट या अतिज्येष्ठ छांदिष्टांपर्यंत पोचले. खुश झालेल्या या गृहस्थांनी आम्हा सर्वांनाच आग्रहाने घरी बोलावून चहा पाजला.आता या एकाच घटनेत किती चांगल्या गोष्टी दडल्या आहेत त्याचा हिशेब न मांडलेला बरा.

    छंदांमुळे उच्चनीचतेची भावनाही कमी होते. एका चर्मकाराच्या दुकानातील संत रोहिदासांच्या चित्राशेजारी लावलेल्या एका वेगळ्याच दिव्याची चौकशी मी रस्त्यात त्याच्या शेजारी बसून करत होतो. शेजारून जाणाऱ्या माझ्या ऑफिसातील एका सेवानिवृत्त जनरल मॅनेजरला हे खटकले पण माझ्या ते लक्षातही आले नाही. पितळी ओतकाम, वेल्डिंग, पॉलिशिंग अशा गोष्टींमुळे होणारे कुंभारवाड्यातील प्रचंड प्रदूषण मला जाणवत नाही आणि त्याचा मला कधी त्रासही होत नाही.

    रात्री झोपतांना , उद्या आपल्याला केवढी कामे करायची आहेत याचा केलेला विचार ,मला जगण्याची उमेद, आत्मविश्वास,सकारात्मक दृष्टी अशा गोष्टी देतोच पण हा विचार करता करता झोप कधी लागते ते कळतही नाही. .. मग कसली गोळी घेताय राव .... आणि कशाला ?
    आज १० / १२ वर्षांच्या मुलांनासुद्धा निराशा ग्रासते. या वयाची मुले आत्महत्या करतात. काय भयंकर आहे हे ? पूर्वी दिवसातून एकदा जेवायला मिळणं ही सुद्धा चैन वाटावी अशा परिस्थितीत जगणारी लाखो मुले होती. फाटके कपडे, पडझडीचे घर, घरात वीज-पाणी नाही,
    अभ्यासाला वह्या- पुस्तके नाही, अनवाणी / छत्रीशिवाय कित्येक मैल चालत शाळा गाठायची, अभ्यासाला वेळ आणि जागाच नसायची. तरीही मुले आत्महत्या करीत नव्हती. अशा दयनीय परिस्थितीतही त्यांचे आपले असे एक छोटेसे विश्व असे. अशा मुलांकडेही स्वतः:चे असे काहीतरी "जमवलेले" असे. गावाकडची मुले गुंजा , दगड गोटे, पक्ष्यांची पिसे, रंगीबेरंगी दगड, बिट्टी- पारिंगा अशा कुठल्यातरी बिया,सागरगोटे, पिंपळाची जाळीदार पाने तर शहरात मुले बसची तिकिटे,टपाल तिकिटे, चॉकलेटच्या चांद्या, नाणी, पत्ते , बांगडीच्या
    रंगीबेरंगी काचा, क्रिकेटपटूंचे पेपरात आलेले फोटो,मोरपिसे, पिंपळाची जाळीदार पाने,शंख-कवड्या ,काड्यापेटीवरील चित्रे,सिगारेटची पाकिटे ( त्यावेळी या पाकिटांवर वैधानिक इशारा नव्हता तरीही केवळ पाकिटे जमवतो म्हणून ही मुले धुम्रपानाकडे वळत नसत.) ...... असे काय काय जमवीत असत. अहो तेव्हा त्यांना हा केवढा प्रचंड खजिना वाटत असे. कुठल्याही आर्थिक परिस्थितीतील ही मुले या
    आघाडीवर तरी श्रीमंत असत.

    आज सामान्य आर्थिक परिस्थितीतील पालकांना सुद्धा मुलांना ८-१० हजारांचा मोबाईल घेऊन द्यावा लागतो. नवे युनिफॉर्म्स, पुस्तके, वह्या, अत्यंत आकर्षक अशी दप्तरे, पेन्सिल-पेन-खोड रबर-वॉटर बॅग - रेनकोट- छत्र्या-बूट- चपला , स्कूल बस, पॉकेट मनी, वाढदिवसाचे खर्च, पिकनिकचे खर्च अशा अनेक खर्चिक गोष्टींसाठी, ऐपत असो नसो, पालक प्रचंड पैसा खर्च करतात. तरीही मुले आणि त्यामुळे पालक सुखी नाहीत. प्रचंड पैसा खर्चूनही ही मुले मनाने श्रीमंत होत नाहीत. कार्यानुभव म्हणून अनेक गोष्टी ही मुले आणि पालक सक्तीने करतात --मार्कांसाठी करतात पण आनंदासाठी नाही. या मुलांना पुन्हा छंदांकडे वळविले तर ?

    " हा छंद जीवाला लावी पिसे" असे कुणी म्हटले तरी मी मात्र " घेई छंद मकरंद" असेच म्हणणार !

    --मकरंद करंदीकर. अंधेरी पूर्व, मुंबई.

  • आधुनिक मंगळागौर (१)

  • भारतमातेच्या वीरांगना – 13 – कमलादेवी चटोपाध्याय

    १९३० साली गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला त्यात जे ७ प्रमुख होते त्यातील एक कमलादेवी होत्या आणि दुसऱ्या स्त्री म्हणजे अवंतीकाबाई गोखले. कमलादेवी मुंबईतील हाय कोर्टात पोचल्या की आत्ताच तयार केलं गेलेलं सत्याग्रह मीठ जज साहेब घेतील का? २६जानेवारी १९३० ला झालेल्या गदारोळात आपल्या जीवापेक्षा आपल्या तिरंग्याला जपण्याऱ्या कमलादेवी चटोपाध्याय सगळ्यांच्याच लक्षात राहिल्या.

  • उत्सव आणि इव्हेंट

    गणेशोत्सव जल्लोषात सुरू असताना त्यातून उभे राहणारे मोठे अर्थकारण स्पष्टपणे जाणवत आहे. लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेला हा उत्सव राजकारणात जाणार्‍यांसाठी महामार्ग ठरतो आहे. त्यात अर्थकारण आल्याबद्दल आक्षेप नाही. परंतु, गणेशोत्सवाचे ‘मार्केटिंग’ होत असताना ‘सेल्स’लाच प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सवावर जाणवत असलेला अर्थकारणाचा हा प्रभाव नेमके काय सांगतो ?

  • कड्याच्या टोकावर पत्रकारिता

    बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे.

  • रामकृष्ण मिशन सेवा समिती, अलिबाग

    समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो.

  • मुलाखत : विशाल जाधव (अभिनेता/दिग्दर्शक)

    विशाल जाधवची (अभिनेता/दिग्दर्शक) मी घेतलेली मुलाखात, जी महाराष्ट्र २४ तासमध्ये प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र २४ तास, हे एक गुगल ऍप्स आहे. हे ऍप्स पाहण्यासाठी आपल्या ऍंड्रॉईड मोबाईलवरुन “महाराष्ट्र २४ तास” (इंग्रजी किंवा मराठीतून) टाईप करा किंवा या लिंकवर टिचकी मारा

  • महामार्ग बनलेत मृत्यूचे सापळे

    सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीही केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या वरचेवर वाढत आहे. परिणामी, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्न आहे.

  • आधारची परवड……!!!

    आधार कार्ड मुळे येणार्‍या अडचणी, थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.