(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • कवी आणि कविता

    कविता कशी करतात माहित नाही. पण कविता वाचताना एक अनोखा आनंद होतो. किमान मला तरी होतो. आणि आणखीन एक विचार मनात चमकून जातो.आपण का नाही करू शकत अश्या कविता? यातला प्रत्येक शब्द परिचित आहे ,त्यांचा अर्थ आपण जाणतो .मग मी का नाही करुशकत कविता? सराव नाही म्हणून? सरावाने जमेल?

  • लपवाछपवी.. (बेवड्याची डायरी – भाग १३)

    प्राणायाम करण्यापूर्वी शरीर एकदा ताजेतवाने करून घेण्यासाठी चाललेले शरीर संचालन करताना … शरीराचे सर्व अवयव सांध्यातून हलवताना ..माझ्या सांध्यामध्ये थोड्या वेदना होत असल्याचे जाणवले ..तसेच सर्व स्नायू आखडून गेल्याने त्यांची हालचाल करताना त्यावर ताण येत होता ..

  • आकाश सारे झाले मोकळे

    आकाश सारे झाले मोकळे

  • द रशियन कनेक्शन : रशिया टुरची नवी ओळख

    जगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन  दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे  केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही.

  • लिंगस्पर्धा

    उत्क्रांतीच्या काळात निसर्गाने प्रजननाच्या बाबतीत पुरुषांच्या- म्हणजे नरांच्या बाजूने थोडे झुकते माप देऊन पुरुषाच्या जबाबदार्‍या कमी केल्या असतील, पण स्त्री-म्हणजे मादीला यादृष्टीने मिळालेली दुय्यम दर्जाची वागणूक भविष्यात तिला तिच्या अस्तित्वासाठी एक मोठे वरदान ठरू शकते.

  • कविता राऊतची सावरपाडा एक्स्प्रेस

    कविता राऊत ज्या स्पर्धेत उतरते त्यात पदक कमावल्याशिवाय थांबत नाही, असा तिचा लौकिक आहे.
    यश म्हणजे जीवतोड मेहनत करावी लागणार, हे इतर सगळ्याच स्पर्धकांना न सांगताही माहीत असतं; पण तिचं आजचं यश हे असं सहजासहजी तिच्या पदरी पडलेलं नाही; तर तिनं शब्दशः घाम, रक्त आणि अश्रू गाळून ते कमावलेलं आहे.

    नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील एक आदिवासी पाडा... पाचशे वस्तीचं लहानसं गाव. रस्ते, वीज आणि पाणी या कशाशीही संबंध नाही. शाळा जेमतेम चौथीपर्यंत. असं जंगलातल्या कुशीतलं सावरपाडा. याच गावावरून कवितालाही नाव पडलं "सावरपाडा एक्‍स्प्रेस'.

    कविताचं सगळं बालपण याच सावरपाडामध्ये गेलं. वडील फॉरेस्टमध्ये नोकरीला होते; पण सावरपाड्यातल्या इतर मुलींप्रमाणेच तिचंही आयुष्य चालू होतं. रोजच 15-20 मैलांची पायपीट. सावरपाडामध्ये चौथीनंतरच्या शिक्षणाची सोय नव्हती; म्हणून मग तिच्या वडिलांनी तिला ठाणापाडा इथल्या आश्रमशाळेत घातलं. सावरपाडापेक्षाही आश्रमशाळेतले दिवस कठीण होते. ठाणापाडातही पाण्याची वानवाच होती. प्रत्येक मुलीला स्वतःच्या पाण्याची सोय स्वतःच करावी लागत असे. त्यामुळे सावरपाडातली पायपीट ठाणापाडामध्यही तशीच सुरू होती. ठाणापाड्याहून मग कविता हरसूलच्या केबीएच शाळेत शिकायला गेली. चौथीत असताना तिने पहिल्यांदा धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर आजतागायत तिने कधीच मागे वळून बघितलेले नाही.
    हरसूलच्या शाळेत असताना कविता विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होती, बक्षीसंही मिळवत होती; पण शास्त्रोक्त पद्धतीने धावणं तिला माहीत नव्हतं. लहानपणापासून केलेल्या कष्टामुळे तिचं शरीर काटक बनलेलं होतं. मैलोन्‌ मैल पाण्यासाठी ये-जा करण्यामुळे तिचा स्टॅमिना तुफान होता आणि त्याच बळावर ती धावत होती. याचदरम्यान, विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते डॉ. पिसोळकर यांनी शालेय राज्य स्पर्धेच्या तीन दिवस आधी "साई'चे (स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडिया) प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्याकडे तिला आणलं. विजेंद्र सिंग यांच्याकडे कविता आली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. धावणं ही फक्त आवड न राहता त्यातच करिअर करता येऊ शकतं, हा विचार कवितामध्ये रुजला.

    कविता सांगते, ""आदिवासी मुलांमध्ये टॅलेंट ठासून भरलेलं आहे. फक्त त्यांना योग्य ती संधी मिळायला हवी. या मुलांमध्ये नैसर्गिकपणे असणाऱ्या अफाट ऊर्जेचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. तसं झालं तर सगळ्याच क्षेत्रांत ही मुलं नक्कीच उत्तम कामगिरी करून दाखवू शकतील.''
    कविता राऊत हे एक उदाहरण आहे, माणसातल्या जिद्दीचं... चिकाटीचं!

  • बॉम्बे टू गोवा – एव्हरग्रीन चित्रपटाची ४५ वर्षे

    ३ मार्च १९७२ हा दिवस.... बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली.
    p-34076-Bombay-to-Goa
    एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे 'बॉम्बे टू गोवा' या चित्रपटातील 'देखा ना हाय रे सोचा ना हाय रे' हे गाणं.

    १९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्यासाठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, महमूद, अनवर आली, नासीर हुसेन, शत्रुघ्न सिन्हा, केष्टो मुकर्जी, ललिता पवार, मनोरमा, मुकरी, सुंदर, किशोर कुमार या सारखे कलाकार होते. या सर्वानी चित्रपटात जो धुमाकुळ घातला आहे तो अप्रतिम, केष्टो यांचे नशेत गाड़ी लोटने, ललिता पवार यांचे अंगात आलेली बाई लाजबाब.

    या चित्रपटातील गाणी ..."देखा ना हाये रे सोचा ना हय रे रख दी ‍निशाने पे जान ल ल ल लला .. कदमो पे तेरे निकले मेरा दम.....है बस यही अरमान ...." किशोर कुमार यांची अप्रतिम गाणी ....एव्हरग्रीन फ्रेश .. ' किशोर कुमार व लताजी यांची दोंन गाणी ..."तुम मेरी ज़िंदगी मे कुच इस तराह से आये ..." 'दिल तेरा है मे भी तेरी हु सनम ..तेरे सर की कसम हो सनम, गीतकर राजेन्द्र कृष्ण, संगीत राहुल देव बर्मन यांची सर्व गाणी लोकप्रिय. आजही हा सिनेमा बघावा ....एकदम ताजे तवाने झाल्या सारखे वाटते.

    मेहमूद यांनी, त्यांच्या अभिनय कौशल्याने शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, पंचम आणि किशोर कुमार यांनी सुपर हिट केलेला "ऑल टाइम ग्रेट" " बॉम्बे टू गोवा"

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट

  • वसंत देसाई- ‘कम्पोजर पार एक्सलन्स’

    वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे.

  • एकत्र कुटुंब

    जर कुटूंबातील प्रत्येकाने थोडी संयमित वागणूक दाखवली तर एकत्र कुटूंब पद्धती समान सुख-सम्रुद्धीचा सागर दुसरा होणे नाही.

  • कृष्णभक्तीअभावीच नैतिक अधःपतन

    देवदत्त नावाच्या घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन पृथ्वीवर फिरणार्‍या राजाच्या वेशातील लाखो डाकूंना ठार करतील. त्यावेळी पुढील सत्ययुगाची लक्षणे प्रकट होतील. सूर्य विवस्वान तसेच चंद्रदेवांचे पवित्र वंश पुन्हा सुरू करतील.