बागेतील तारका-
ही महाकवी कालीदासाची कथा मी कवन रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण पावसाळ्याची वाट अक्षरश: चातकासारखी पहात असतो. पावसाळा उशीरा आला तर आपल्याला दुष्काळाला तोंड द्यायला लागते. पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरीही दुष्काळाची भिती असतेच.
आपल्या सरदारांच्या सल्ल्यावरून राणीने किल्ला सोडून जाणे योग्य राहील असे ठरले. ह्या कठीण प्रसंगी झलकारी बाईंने समजदारीचा, स्वामीभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय दिला, राणीच्या वेषात किल्ल्यात लढत राहिल्या, आपल्या सैनिकांचे मनोबल खच्ची नाही होऊ दिले. इंग्रजांना कळलेच नाही की राणी नाहीये. राणी ला मार्गक्रमणासाठी वेळ मिळाला. झलकरीने बाईंनी फक्त राणीचे वस्त्रच परिधान नव्हते केले तर त्यांचा आत्माही राणीचाच होता असा भास होत होता.
विकसित देशांमधील ई-कचर्याचा भारत हा सर्वात मोठा ग्राहक आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि खराब झालेल्या कॉम्प्युटरमुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या संकटापासून दूर रहाण्यासाठी काही ठोस प्रयत्न न झाल्यास येणारा भविष्यकाळ धोकादायक आहे हे निश्चित !!!
न प्रेम मला पत्नीचे पुत्राचा न मोह मला ।
दुर्लक्षिलेच मी सुयश प्रसिद्धी- वैभव मान सन्मानाला ॥
जीवनातल्या आनंदोत्कर्षाचे मला न कसले लोभ कशाचे ।
ध्येय आमुचे, निर्धार आमुचा - देशासाठी बलिदान प्राणांचे ॥
नाव स्मरणाची बातच सोडा, क्षुद्र धूळही जेथे मला विसरते।
प्राणांची बाजी लावेन, मेल्यावर पण याद फिरुन कोणाला येते ॥
इतिहासात अमर होईन, नाही-नाही बलिदान असे हे माझे ।
विश्वातून उठेन जेव्हा मी; विस्मृती घेरील पराक्रम माझे ॥
विसरो ते पामर मला परंतू कर्तव्याशीच माझी जवळीक ।
ज्या मातीचा देह हा बनला, माती नि तो होईल एक ॥
दांभिक जनहो पहाल तुम्ही विजय-वृक्ष हा फुललेला ।
ओळखाल लाल रंग का हो, तो फुलांवर पसरलेला ॥
सार्थक होईल तेव्हाच माझे, मान लाभेल बलिदानाला ।
जेव्हा समजून घ्याल तुम्ही हो रक्ताच्या या थेंबाथेंबाला ॥
-- यतीन सामंत
साधारण माणसाला प्रवासात येणार्या अडचणीँचं वर्णन या कवितेत केलं आहे.
आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा...... मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं.....
मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा... आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन... जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा... तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा...... मोकळी सोडलेली पुर्ण दिवस....
काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता.... सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा.... 8. ला जनावरे सोडायचं काम... मोकळा वारा प्यायचा... तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे... 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा....
मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे... तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे... ऊद्याला...
एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या... कुणाच्याही...
11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा... मग 2 तास डुबणे नदित.... जनावरांची आंघोऴ... आणि ऱाखण्यांची पण... एकत्रच....
म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी.... अगदी थोड्यांकडेच....
मग घरी अडीजवाजता.... जेवण झालं की काजीनी खेऴायचं... मुकरीचा मांड खासच....
गल.... ढोपो...... जुगी..... सप..... फगाम....
हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत....
परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट... पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही "कटीनी" खेळायचं म्हणजे खासच.. .......
मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत...
काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल.....
"म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता"
मग जनावरं बांधायची....आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा.... असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस... आणि चढणेचे मासे चढा पर्यंत....
बापुर्झा
डॉ. बापू भोगटे
ऑगस्ट १९४७! स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक रक्तरंजित तरीही सोनेरी महिना !
Copyright © 2025 | Marathisrushti