(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • नटसम्राट नक्की कुणाचा?

    ‘नटसम्राट’ हा चित्रपट नक्की कुणाचा? तो फक्त विश्वनाथ दिनकर पाटेकर (वि.दि.पाटेकर) म्हणजेच नाना पाटेकर यांचाच? कारण जाहीरातीमध्ये तर त्यांचाच चेहेरा दिसतो? पण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की हा चित्रपट फक्त वि.दि.पा. म्हणजेच नाना पाटेकरांचाच नाही तर अनेकांचा आहे.

    हा चित्रपट विक्रम गोखले यांचा पण आहे. तसे पाहीले तर विक्रम गोखले यांची भूमीका तशी दुय्यम आहे. नानाच्या तुलनेने त्यांना मिळालेले ‘फुटेज’ बरेच कमी आहे. पण एका दुय्यम भूमिकेचे सुद्धा कसे ‘सोने’ करता येते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे. ‘नटसम्राट’ हा खरे म्हणजे नाना पाटेकर व विक्रम गोखले या दोन ‘नटसम्राटां’च्या अभीनयाची जुगलबंदी आहे. यात कमी फूटेज मिळालेले विक्रम गोखले नाना एव्हडाच ‘भाव’ खाऊन जातात. एखाद्या भूमिकेचे सोने करणे हे त्या भूमिकेला मिळालेल्या ‘फूटेज’ वर अवलंबून नसते तर अभिनेत्याच्या अभिनय कौशल्यावर अवलंबून असते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे.

    नटसम्राट हा चित्रपट मेधा मांजरेकर यांचा आहे. यापूर्वी त्यांनी कोणत्या चित्रपटात काम केले आहे किंवा नाही हे माहीत नाही. तसेच नानांच्यापेक्षा त्या तरुण आहेत. नानासारख्या कसलेल्या अभिनेत्यापूढे ठामपणे उभे रहाणे हेच एक आव्हान असते. असे असुनही त्यांनी उभी केलेली ‘नटसम्राटांची पत्नि’ ‘सरकार’ लाजबाब. वरून शांत दिसणारी पण आतून अत्यंत कणखर असणारी ‘सरकार’ त्यांनी अत्यंत ताकतीने उभी केली आहे.

    नटसम्राट हा ‘नटसम्राटांच्या’ सुनेची भूमिका करणार्या नेहा पेंडसे व त्यांच्या मुलीची भूमिका करणार्याा मृण्मयी देशपांडे यांचा पण आहे. सासर्यां च्या उद्योगांना कंटाळून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार्याृ सुनबाई तर वडिलांवर चोरीचा आळ घेऊन त्यांना बदनाम करु पहाणारी मुलगी या भूमिका या दोन अभिनेत्रींनी ज्या दाकदीने उभ्या केल्या आहेत त्याला तोड नाही.

    हा सिनेमा यामध्ये छोट्या छोट्या भूमिका करणार्याा अनेक आर्टिस्टचा आहे. नटसम्राटांना वडापाव खायला घालणारी म्हातारी मुसलमान बाई, त्यांना सावलीसारखी साथ देणारा दाढीवाला एनआरआय, शेवटी शेवटी त्यांना साथ देणारा दारुड्या तरूण, तर लंडन रिटर्न्ड तरुणाच्या छोट्या भूमिकेत वावणारे जेतेन्द्र जोशी, तर नटसम्राटांची नात झालेली छोटी चिमुरडी, या सगळ्यांचीच कामे अप्रतीम. हा त्यांचा पण सिनेमा आहे.

    या सिनेमाचे संवाद हा प्राण आहे. याचे संवाद लेखन किरण यज्ञोपवीत व अभिजीत देशपांडे यांचे आहे. हा सिनेमा खरे म्हणजे त्यांचा तर आहेच पण या चित्रपटाची उत्कृष्ट फोटोग्राफी करणार्याा अजिथ रेड्डी यांचा पण आहे. ‘लास्ट पण नॉट द लिस्ट’ हा चित्रपट या सर्वांची सुरेख गुंफण करणारे याचे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर (म.वा.मां.) यांचा तर आहेच आहे.

    या चित्रपटाची ‘थिम’ तशी काही नवीन नाही. एक बाप निवृत्तीनंतर आपली सर्व संपत्ती मुलाबाळांना वाटून टाकतो व पुढे मुले त्याला कशी बेघर कराता व त्याला ‘कोणी घर देता का घर’ अशी भीक मागत रस्त्यावरून फिरावे लागते अशी एका ओळीत या सिनेमाची स्टोरी सांगात येईल. याच थिमवर पुर्वी अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ हा चित्रपट आला होता व तुफान गाजला होता. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये हमखास डोळ्यातून आश्रु हे येतातच येतात. मग ‘नटसम्राट’ मध्ये वेगळे काय आहे? हा चित्रपट ‘डोळ्यात आंसु आणि ओठांवर हसू’ या कॅटेगरीतला आहे. असे चित्रपट काढणे फार कठीण असते. पूर्वी चार्ली चॅपलिन व राज कपूर यांना ही कला जमली होती. हाच करिष्मा राजा परांजपे यांनी त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात दाखवला होता. राजा परांजपे, ग.दि.माडगूळकर व सुधीर फडके यांच्या मुशितून निर्माण झालेली ही अजरामर कलाकृती आहे. त्यानंतर कुठलाच मराठी चित्रपट याच्या तोडीस पोचु शकला नाही. पण ‘नटसम्राट’ ने मात्र ही पातळी आवश्य गाठली आहे. पण तो ‘जगाच्या पाठीवर’ च्या पूढे मात्र गेलेला नसला तरी ही पातळी गाठणे हे ही नसे थोडके.

    ‘नटसम्राटांच्या’ भाषेत बोलायचे तर हा चित्रपट म्हणजे उत्तम भट्टी जमलेली, डोळ्यात आसू व ओठांवर हसू आणणारी, विलक्षण झींग आणणारी जांभळाची दारू आहे.

    आता ही दारू प्यायची की नाही, म्हणजेच हा चित्रपट बघायचा की नाही जे ज्याचे त्याने ठरवावे.

    (मी नाना पाटेकरांचा उल्लेख वि.दि.पाटेकर असा केला आहे या बद्दल क्षमस्व. जर चित्रपटाचा देग्दर्शक आपले नाव महेश वामन मांजरेकर असे जाहीर करतो मग नाना पाटेकरांचा उल्लेख विश्वनाथ दिनकर पाटेकर किंवा वि.दि.पा. असा करावयास काय हरकत आहे? असो)

    -- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

  • आदर्शांचे चिंतन (वात्रटिका)

    आदर्शांचे चिंतन

    आदर्श शिक्षक पुरस्कार

    ही तर एक मौज आहे.

    शिक्षक दिनालाच कळते

    आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.

    कुणी ओढलेले आहेत,

    कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.

    स्पर्धेत जिंकता जिंकता हरले

    असे कितीतरी दडलेले आहेत.

  • दिवस असा एकही जात नाही

    चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा

    ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.

  • लिव्ह इन रिलेशनशिप

    लिव्ह इन रिलेशनशिप या विश्यावर प्रकशित झलेला माझा लेख मझ्या वाचक मित्रांण्साठी

  • सोबत

    आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं …

    इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष!

    ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’

    ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…

    कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

    प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

    मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”

    खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”

    सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

    लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो.

    मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

    ‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –

    “सोबत…!”

    माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच

    -- सुमंत आचार्य

  • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

    पुणे शहर म्हटलं तर सगळ्यात पहिले डोळ्यांसमोर येते ती “पेशवाई”. तसं पहावयास गेलो तर पुणे ही ‘विद्यानगरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशा वैभवसंपन्न पुणे शहरात आणखीन ही काही वास्तू आहेत ज्या पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. अशीच एक वास्तू म्हणजे “बालगंधर्व रंगमंदिर”. पुण्यातील संभाजी पार्क विभागात ही वास्तू दिमाखाने उभी आहे.

  • प्रेमःएक आठवणींची कविता. (क्रमशः पुढे चालू…..)

    प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू….

  • देवाचा मोबाईल

    देवाचा मोबाईल नंबर मिळाला तर?

  • बेजोड तोडी

    पंडित भीमसेन जोशी आणि राग तोडी याचे नाते फार जवळचे आहे. त्यांच्या गळ्यावर जणू हा राग कोरलेला आहे!! एकतर पंडितजींचा गळा हा मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकतो. याचा परिणाम असा, तोडीसारखा सर्वसमावेशक राग, त्यांच्या कडून ऐकणे ही नेहमीच सुखद संवेदना असते. घुमारेदार आणि आश्वासक सूर ही तर पंडितजींच्या आवाजाची खासियत आहे.

  • जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या

    माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची .

    इंजिन आणि डबे रोज बदलली जायची, पण, एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा...

    आज न राहवून मी थांबून त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले , "बाळ तू रोज गार्ड होतोस ,तुला कधी इंजिन कधी डबा व्हायला आवडत नाही का?"

    त्यावर तो मुलगा उत्तरला , "बाबूजी मला घालावयास सदरा नाही मग माझ्या मागे कोण येणार ?"म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो..

    "हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले.. त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला.

    आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काहि ना काहि कमतरता असणारच .तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.

    त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई बापावर रागावून रुसून रडत बसता आले असते, पण, तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला व जीवनाच्या खेळाचा अंग बनून राहिला.

    मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचा अंग व्हायचे आहे .सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

    *Be positive and be happy*