हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं.
बर्याच प्रमोशनमुळे व नंतरच्या त्यावरील निरनिराळ्या टीकेमुळे चर्चा झालेला भाई—व्यक्ति आणि वल्ली हा सिनेमा पहाण्यात आला. अनेक नामवंत व्यक्तिंनी या सिनेमातील अनेक प्रसंगांवरून दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्यावर यथेच्छ तोंडसूख घेत टीका केली.सिनेमा पाहिल्यावर व या सगळ्या लेखाचं वाचन केल्यावर माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न उभे राहिले व त्यादृष्टीने काहि लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
दर वर्षी, २० ऑक्टोबर रोजी, इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस) साजरा केलें जातो.
WACS ही संस्था २० ऑक्टोबर १९२८ मध्ये पॅरिस येथे स्थापना झाली. इंटरनॅशनल शेफ डे हा २००४ सालापासून World Association of Chefs Societies (WACS) या संस्थेतर्फे साजरा केला जातो.
स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे. शेफ बनणं आता प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे क्षेत्र वेगाने विस्तारत असून, प्रोफेशनल शेफना बरीच मागणी आहे. स्वयंपाकाची आवड असणाऱ्या व्यक्तीला शेफ म्हणून नवनव्या डिशेस बनवण्याची संधी तर मिळतेच. शिवाय त्यातून स्वतःचं करिअरही घडवता येतं. निरनिराळी हॉटेल्स, त्यातून मिळणाऱ्या चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारणं हे आजच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनला आहे. काही हॉटेल्सचे विशिष्ट पदार्थ चाखायला लोक आवर्जून त्या हॉटेलची पायरी चढत असतात. शिवाय फूडचे वेगवेगळे इव्हेंटस टीव्हीवर दिसत असतात. त्यातून वेगवेगळ्या रेसिपीज लोकांसाठी पेश केल्या जातात. एकूणच स्वयंपाक बनवणं ही कला घरापुरती मर्यादित राहिली नाही. कुणालाही खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो हे व्यावसायिकांना पक्कं उमगलं आहे. त्यामुळे चमचमीत खाना खजाना बनवणाऱ्यांना खूप महत्त्व आलं आहे. या व्यवसायाला एक प्रकारचं ग्लॅमरचं स्वरुपही प्राप्त झालं आहे. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायत. त्यामुळे या क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.
व्यावसायिक पद्धतीने जेवण बनवणारी व्यक्ती म्हणजे मुख्य स्वयंपाकी (आचारी; शेफ.) सॅलड्स, सूप, मासे, मटण, भाज्या, पक्वान्नं किंवा इतर पदार्थ बनविण्याची तयारी करून घेण्याचं काम शेफचं असतं. त्याचप्रमाणे मेन्यू आणि त्याच्या किंमती ठरवणे, माल ऑर्डर करणं, रेकॉर्ड्स आणि अकाऊंट्स ठेवणं याही जबाबदाऱ्या त्याच्याच असतात. जेवणाची तयारी करणं आणि ते तयार करणं यात त्याचा प्रमुख सहभाग असतो. ऑर्डरनुसार आलेल्या प्रत्येक मालाची तपासणी करणे, त्याचा दर्जा तपासणं या कामावरही त्याचं लक्ष असलं पाहिजे.
करीयरसाठी चांगली संधी
पात्रता: दहावी किंवा बारावीनंतर सर्टिफिकेट कोर्स करता येतो, किंवा बारावीनंतर बॅचलर ऑफ केटरिंग टेक्नॉलॉजी अॅण्ड कुलिनरी आर्ट्स किंवा कुलिनरी आर्ट्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करता येईल.
नोकरीच्या संधी: हॉटेल/ रेस्टॉरण्ट, एअर केटरिंग, रेल्वे केटरिंग, आर्मी केटरिंग, फूड प्रोसेसिंग कंपनी, कन्फेक्शनरी, थीम रेस्टॉरण्ट, मॉल्स, बेस किचन, खासगी हॉस्पिटल्स, क्रूझ लायनर्स, कॉर्पोरेट केटरिंग, इत्यादी. काही वर्षांच्या अनुभवानंतर फूड रायटर किंवा क्रिटीक किंवा शिक्षक म्हणून काम करता येईल. स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करता येईल. जगात भारतीय खाद्यपदार्थांना बाहेरही मोठी मागणी असल्याने बाहेरही नशीब आजमावता येईल. बाहरील देशात भारतीय रेस्टॉरण्ट्सची मोठी संख्या प्रचंड मोठी आहे.
शेफचे प्रकारः- खासगी किंवा वैयक्तिक शेफ, एक्झिक्युटिव्ह शेफ/ मुख्य शेफ, स्यूस शेफ, स्टेशन शेफ (शेफ डे पार्टी, पॅस्ट्री शेफ (पॅटीसीअर), साऊट शेफ (सॉसिअर), फिश शेफ (पॉयजनियर), व्हेजिटेबल शेफ (एण्ट्रेमीटिअर ग्रिल शेफ), ग्रिलार्डीन, क्रूझ शेफ.
काही रंजक माहीती इंटरनॅशनल शेफ डे च्या निमित्ताने.
२१ जानेवारी १९३७ रोजी शेफ Marcel Boulestin यांनी बीबीसी वर पहिला कुकरी शो केला.
राजा हेन्री आठवा यांना त्याच्या सूप मध्ये केस सापडला,त्यांनी शाही शेफचा शिरच्छेद करवला होता, नंतर इतर शेफना टोपी परिधान करण्यास आदेश दिले. तेव्हा पासून जगातील सर्व शेफनी जेवण बनवताना टोपी (शेफ कॅप) घालावयास सुरुवात केली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माझ्या कोकणावर काही तरी लिहावं हे बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं ते ह्या लेखाच्या रुपात प्रकट झालं आणि मराठीसृष्टीच्या माध्यमातुन माझ्या वाचक मित्रांसाठी……..
UB group मधील नोकरीचे "बारा" वाजायला लागल्यावर, नवी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. वास्तविक, या नोकरीत स्थिरस्थावर व्हायची इच्छा होती पण प्रारब्ध वेगळेच होते. Standerton हे गाव, म्हणावे अशा अटकर बांध्याचे आहे. आजूबाजूला कुठलेच शहर नजरेच्या टप्प्यात नाही. जुन, जुलै महिन्यात हाडे गारठवणारी थंडी असल्याने, लोकवस्ती तशी विरळ!! सुदैवाने, माझ्याच ओळखीत, जोहान्सबर्ग इथे एका कंपनीत, नोकरी संदर्भात मुलाखत झाली आणि तिथे नोकरी पक्की झाली. तेंव्हा,मनात विचार केला, जर का ही नोकरी स्वीकारली तर आपले भारतात जाणे आणखी एक वर्ष तरी पुढे जाईल. म्हणून मग लगेच मुंबईचे तिकीट काढले आणि मुंबईत महिना काढावा, म्हणून निघालो. नव्या नोकरीला होकार दिला होता पण त्यांना, जानेवारीत join करण्याचा वायदा केला आणि मुंबईच्या विमानात पाउल ठेवले. हातात नोकरी असली म्हणजे, तुमच्या वागण्या,बोलण्यात आत्मविश्वास येतो आणि एकूणच सगळे व्यवस्थित होत आहे, असे वाटत रहाते. एव्हाना, विमान प्रवासात वेळ कसा घालवायचा, याचे पक्के गणित मनाशी केलेले असल्याने, विमानात बसलो आणि वाचायला पुस्तक काढले. अचानक मनात विचार आला, मुंबईत जात आहोत तर महिंद्र कंपनीत, आपला खुंटा हलवून बघायचा!! महिंद्र कंपनीने, साऊथ आफ्रिकेत, नव्यानेच व्यवसाय सुरु केला होता आणि तिथे काही संधी मिळते का? अशी चाचपणी करायचे ठरविले.
ये निद्रे मज बिलगून घे
विपश्यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी त्यांनी आपल्या एस्सेल वर्ल्डमध्ये मुंबईला स्तूपही बांधला. मुलांसाठी किड झी, झी लर्न आणि ब्रेन ट्रस्ट ऑफ इंडिया हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या झी चॅनेलवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात.
एके दिवशी शालू मला काॅलेजच्या काॅरीडाॅरमध्ये भेटली.तिचासारखाच भोळाभाबडा, हसरा चेहरा अावाजही अगदी तिचासारखाच क्षणभर वाटलं तूच तर नाहीस ना.शालू मला बबोलून निघून गेली मी माञ माझ्याच तंद्रीत तिथेच उभा राहून भूतकाळाची पाने चाळत होतो. एखाद्या चलचिञपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून चिञे जावीत तशी काॅलेजच्या अाठवणी भुर्रकन निघून गेल्या अाणि अाठवले काॅलेजचे ते सोनेरी क्षण...............
जीवनरूपी काटेरी वळणावर मार्गक्रमण करत असताना .वळीवाच्या पावसाप्रमाणे तू माझ्या जीवनात अालीस .बरं वाटलं जीवन जगण्याचा खरा अर्थ कळला.प्रेम भावना काय असतात हे तू माझ्या जीवनात अाल्यावर कळले.खरया अर्थाने जीवन जगण्याला अर्थ अाला तूझ्यामुळेच. काॅलेजचे दिवस कसे भूर्रकन निघून जायचे काही कळायचे नाही.काॅलेजच्या पायरया उतरतच तूझी नजर मला धुंडाळायची. काॅलेजमध्ये मी दिसलो नाही तर तूझं मन लागायचं नाही. मी तुझ्याशी अबोला धरलो तर तू माझ्यावर रागावयाचीस. माझ्या हृदयी अाजही रंगतोय तु मांडलेल्या प्रेमाचा खेळ. हातात कुंचला अाणी कॅन्व्हास घेतला की तूच माझ्या डोळ्यासमोर तरळायचीस अन तूच माझी मोनालीसा व्हायचीस अन मी तूझा पिकासो. अापलं नातं लाजाळूच्या पालवीप्रमाणे कधिच कुणाला न समणारं. अापल्या नात्याचा अंत वाईट अाहे हे माहीत असतानाही अापण दोघांनी ते विष प्यायलो. अाणि अाज ते माझ्या जिव्हारी येतय.वाटलं नव्हतं तूझ्यासारखी सखी माझ्या जीवनात येवून कधिच न शमनारं प्रेमाचं वादळ उठवून देईल. प्रेमाच्या राज्यात सर्व काही सुरळीत चालत असताना वाटलं नाही असा डाव अर्ध्यावर सोडून जाशिल. कधि पुसटशी कल्पनाही केली नाही कि अापण एकमेकांपासून ईतके दूर जावू. खरंच वास्तव काती कटू असते पण वास्तव नाकारता येत नाही. तुझ्या लग्नाला पाच सहा वर्षे लोटली असतील कदाचित तू सूखी असशील तूला माझी अाठवणही येत नसेल पण मी माञ तूझ्याच अाठवणीच्या साह्याने कित्येक राञ जागून काढल्या. अाठवतोय का तूला तो निरोपाचा दिवस मी तूझ्या रूमवर अालो होतो.डोक्यात एकाच विचाराने थैमान घातले होते तू मला सोडून जाणार .काय बोलावं काय नाही काही सुचत नव्हतं. हृदय भरून अालं होतं डोळ्यासमोर सगळीकडे काळोख दिसत होता.कुठं जावं नि काय करावं काही सूचत नव्हतं. वाटलं नाही जगू शकत तूझ्याविना पण तूझा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उम्मेद देवून जातो.
जेंव्हा अाठवणीच्या सागराला भरती येते
तेंव्हा कशात मन लागत नाही तुला येवून भेटावेसे वाटते पण उजाडणारा प्रत्येक दिवस मला जीवंत जाळत असतो
तुझी ती अबोल प्रित स्मरताना...........................
आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.
श्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मंत्री पदाची शपथ घेतल्यावर जाहीर केले होते की ते आर टी ओ च्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवतील. मुंबई -पुणे एक्सप्रेस वे केल्यापासून उभा देश त्यांना ओळखू लागला आहे. आठवा ते पूर्वीचे दिवस ज्यामधे पुण्याला जाताना घाटात ५-५ तास आडकून पडावे लागत असे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न ख-या अर्थाने नितीन गडकरी यांनी साकार केले. ते करीत असताना त्यांनी प्रॉजेक्टचा खर्च आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी करून दाखवला. नितीन गडकरी यांच्याकडे त्याच त्यांच्या अनुभवामुळे रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून केंद्रीय कारभार दिला गेला. पण त्यांनी संसदेत मांडलेले या संदर्भातील बिल अडकले आहे. अशा प्रकारे चांगली बिले रोखून धरायची आणि कुठे आहेत चांगले दिवस म्हणून तोंड वर करून विचारायचे हेच पाहण्याचे तुमच्या आमच्या नशिबी आले आहे.
"रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसेस किंवा RTO मधला भ्रष्टाचार इतका प्रचंड आहे की त्यापुढे चंबळचे दरोडेखोर काहीच नाहीत". खुद्द रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचे हे शब्द आहेत. रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बिल गेले आठ महिने मंजुरीच्या प्रतीक्षेत संसदेत अडकून पडले असून RTO च्या अधिका-यांनीच या विधेयकाविरोधात राज्य सरकारांचे कान भरले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे .
RTO अधिका-यांनी आपली दुकानं बंद करावीत असं जाहीर आवाहन यापूर्वीही गडकरींनी केलं होतं. हे विधेयक संमत झालं तर हे संपूर्ण क्षेत्र सुधारेल आणि भ्रष्टाचार निपटला जाईल असा गडकरींचा दावा आहे. ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, तेच या विधेयकाला विरोध करत असल्याचे गडकरींचे म्हणणे आहे. राज्यांच्या अधिकारांवर गदा येईल असे सांगण्यात येत असून ते निखालस असत्य असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.
भारतात जितक्या सहजपणे ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, इतक्या सहजपणे जगात कुठंही मिळत नाही असं सांगताना यातली ३० टक्के बोगस असतात असंही गडकरींनी स्पष्ट केलं आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स देता येऊ शकतात, ऑनलाइन परमिट आणि अन्य सुधारणाही या बिलात प्रस्तावित आहेत.
संपूर्ण वाहतूक व्यवस्था बदलण्याची क्षमता या विधेयकात असून संसदेच्या अधिवेशनात ते मंजूर व्हावं अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली आहे. सदर विधेयकला हाणून पाडणा-या लोकांना उघडे पाडले पाहिजे. देशात आता शिकलेल्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. जी मंडळी या विधेयकला विरोध करीत आहेत त्यांना संसद आणि विधी मंडळाचे दरवाजे कायमचे बंद केले पाहिजेत .देशाच्या बाबतीत फालतू राजकारण नको. आता खूप झाले.
-- चिंतामणी कारखानीस
Copyright © 2025 | Marathisrushti