(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • चंद्रावरचं पाऊल…

    नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!

    तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंद्रावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंद्राचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...

    तर...

    ...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.

    नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :

    'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'

    तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..

    'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'

    -- विनोद सुर्वे

  • पाऊलखुणा

    जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता

  • शिवीतील मातृभाषा

    दिल्ली विद्यापीठातील प्रख्यात भाषा विद्वान, लेखक डॉ भोलानाथ तिवारी यांनी पीएचडी प्रबंधा करीता रशियातील कजागिस्तान व उझबेकिस्तान येथील स्थानिक हिंदी बोली वर अभ्यास करण्या साठी दौरा केला. तेथील जैन,सिख,उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कामुळे विशिष्ठ हिंदी बोली प्रचलित झाली आहे.

  • दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी हवी

    महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीमुळे पुण्यात बराच गदारोळ झाला. या पार्टीत अटक झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे परवाना नसतानाही मद्य पुरवणार्‍या मद्य विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यक्तींना शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर देशभर दारूबंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.

  • भाजप वर टाटांच्या तोंडुन शरसंधान …

    त्यांनी शे.. खाल्ले म्हणुन आम्ही खाल्ले

  • मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच

    तिकीट खरेदी खरेदी करून २०६० पर्यंत जिवंत राहण्याची तरतूद केली का?

  • मन कि बात- डिप्रेशनवर मात

    आयुमित्र

    दिनांकट ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम ही वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम फ्करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते.

    ह्यावर्षी डिप्रेशन-लेट्स टॉक” ही थीम आहे.

    मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा शशी थरूर ह्यांनी फारच interesting fact सांगितली. मेडिकलच शिक्षण घेणारे ५०% विद्यार्थी सतत तणावात असतात. जे पुढे जाऊन आरोग्यसेवा पुरविणार आहेत. नुसतेच मेडिकल नाही तर कुठल्याही शाखेचेळ्रौ शिक्षण असो. साध्या १वी व १२वीच्या निकालाडानंतर वर्तमान पत्रात आत्महत्याविषयक बातम्या हमखास असतातच. डिप्रेशनल बऱ्याच आजारांच प्रमुख कारण आहे. WHO नुसार २००५ ते २०१५ च्या दरम्यान तब्बल १८%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. डिप्रेशनमुळे डायबेटीस, हृदयरोग ह्यासारखे असंसर्गन्य रोग तर होतात पण डिप्रेशनमुळे आत्महत्येच प्रमाणही वाढते आहे.

    डिप्रेशन म्हणजे काय?

    अधुनिक शास्त्रानुसार १४ दिवसापर्यंत तुम्ही सतत दु:खी असाल, दैनादिन क्रिया करणेही जड झाल असेल. ज्या दैनंदिन क्रिया तुम्ही आनंदाने करत होता त्या करण्यात अजिबात रस वाटत नसेल तर तुम्हाला डिप्रेशन असू शकते.

    डिप्रेशनची मूळ लक्षणे काय आहेत.....।...

    निरुत्साह, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे, पचनक्रिया बिघडलेली असणे, झोप कमी वा खूप झोपावेसे वाटणे, कुठल्याही कामात मन एकाग्र न होणे, स्वतःबद्दल वाईट वाटत राहणे, माझा काहीच उपयोग नाही, मी काही कामाचा नाही अशी भावना निर्माण होणे, निराशा वाढणे आणि स्वतःला संपविण्याची किवा त्रास पोचविण्याचे विचार मनात येणे अशी लक्षणे डिप्रेशन ह्या प्रकारात येतात.

    डिप्रेशन कोणाला होऊ शकते?

    डिप्रेशन कोणालाही होऊ शकते. तो सार्वभौम आहे. तो भेदभाव करत नाही. गरीब असो श्रीमंत असो. त्याला देश, लिंग, वय ह्याची मर्यादा नाही. परंतु प्रामुख्याने किशोर, तरुण वयातील, प्रसूत माता आणि ६० वर्षाच्या वरील वृध्द लोक ह्यांना डिप्रेशनची शक्यता जास्त असते.

    डिप्रेशन कश्यामुळे येते

    पुरेसा पैसा नसणे, गरिबी असणे, नौकरी, व्यवसाय न मिळणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेम संबंध तुटल्याने म्हणजेच ब्रेकअप,दीर्घकालीन आजारपण किंवा कॅन्सर, एड्स सारखे आजार होणे. दारू आणि DRUGS च्या वापरामुळे डिप्रेशन येऊ शकते.

    डिप्रेशन ला उपाय काय?

    आयुर्वेदात काय उपाय आहेत?

    आयुर्वेदाने शरीर आणि मन दोघांच्या स्वास्थ्याला महत्व दिले आहे. सदवृत्त पालन, धारणीय Nवेग, सत्वावजय असे उपाय सांगितले आहेत. मनाचा सत्वगुण वाढवून मानसिक व्याधी दूर वभभकरण्यासाठी आयुर्वेद काम करतो. विस्तृत कधीतरी लिहीनच.

    WHO टॉकिंग थेरपी-

    सध्या एक चित्र सगळ्यांनी बघितल असेल. घरात सगळे बसलेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात पण घरात एकमेकांशी आपण बोलत नसतो. सगळे सोबत असून आपण एकटे असतो. कारण जो ढतो त्याच्या whatsapp आणि फेसबुक वर online असतो. पूर्वी जेवायला सोबत, संंध्याकाळी रामरक्षा, प्रार्थना असेल ती सोबत होत असे. आता प्रत्येकाच्या घरी येण्याच्या वेळा वेगळ्या जेवणाच्या वेळा वेगळ्या त्यामुळे घरातलाच संवाद कमी झालाय. मित्रांशीहि संवाद हा प्रत्यक्ष जास्त न होता whatsapp आणि फेसबुक च्या माध्यमातूनच जास्त होतो. आजकाल प्रेमही online होत आणि लग्नही त्यामुळे बोलायलाच नको. एकाच flat स्कीम मध्ये शेजारी जन्म झाला, मरण झाले तरी कळत नाही कारण आमच्यात संवादच नाही.

    WHO म्हणतय बोलण वाढवा, संवाद करा डिप्रेशन दूर होईल. आपल्या प्रधानमंत्रिनी सुद्धा हाच संदेश दिला आहे. “Expression of Depression instead of suppression”
    आपले मित्र, आईवडील, भाऊ-बहिण ह्यांना आपले शेयरिंग पार्टनर बनवा. मनातील गोंधळ, भीती, दुखः, निर्णय आपल्या विश्वासू लोकांजवळ नक्की बोलून दाखवा. ह्याउलट जो डिप्रेशन मध्ये आहे त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करा त्यातून त्याला बाहेर निघण्यास मदत नक्कीच होईल.

    आपली “मन कि बात” कराच पण दुसऱ्यांच्या “मन कि बात” पण ऐका म्हणजे डिप्रेशन नक्की कमी होईल.

    चला तर करूया मन कि बात आणि डिप्रेशनवर मात ….

    –वैद्य भूषण मनोहर देव.

  • वैभवशाली भूप

    मराठीत एकूणच बहुतेक सगळ्या भूपाळ्या या भूप रागाच्या सावलीत तरी आहेत किंवा रागावर आधारित आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे सकाळच्या वेळेचा शुचिर्भूत भाव आणि प्रसन्न मनोवस्था, यांचा भूपालीच्या रचनेत अंतर्भाव होत असल्याने, चालीसाठी भूप राग जवळचा वाटणे साहजिक आहे.

  • मनाची शुध्दी

    एकदा गौतम बुध्दांकडे काही व्यापारी लोक जातात आणि त्यांना म्हणतात की हे तथागत आम्ही तिर्थयात्रेस जात आहे आम्हाला आशिर्वाद द्या. त्यावेळी बुध्द त्यांच्याकडे एक एक कडुनिंबाची काडी देतात आणि त्यांना सांगतात की, जिथे जिथे तुम्ही तिर्थस्नान कराल तिथे तिथे या कडुनिंबाच्या काडीलासुध्दा आंघोळ घाला आणि शेवटी माझ्याकडे घेवून या. बुध्दांनी सांगीतल्या प्रमाणे स्वता तिर्थस्नान केल्यानंतर काडीला स्नान घातले आणि शेवटी बुध्दांकडे गेले. बुध्दांनी त्यांना विचारले की कशी झाली तिर्थयात्रा त्यावर सर्वांना आपआपला अनुभव सांगीतला आणि सर्वांना खुप चांगले वाटले सर्वजण प्रसन्न वाटले . सर्वांचा अनुभव ऐकल्यांनंतर बुध्दांनी त्यांना ती काडी चावण्यास सांगीतले. सर्वांनी सांगीतल्याप्रमाणे ती काडी चावली तर सर्वांची चेहरे पाहण्या लायक होते .काडीचा कडुपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसु लागला . सर्वांच्या तिरकस नजरा बुध्दांकडे होत्या. त्यावर बुध्दांनी त्यांना सांगीतले की, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिर्थस्नान केले त्या त्या ठिकाणी या काडीने सुध्दा तिर्थस्नान केले . जसे तुम्ही पापमुक्त झालात तसेच ही काडीसुध्दा पापमुक्त व्हायला पाहीजे होती . तिर्थस्नानचा परिणाम या काडीवर सुध्दा व्हायला पाहीजे होता. त्यामुळे ही काडी गोड व्हायला पाहिजे होती परंतू तसे झाले नाही ती काडी कडुच राहीली . त्याप्रमाणे आपणाला सुध्दा शरीरशुध्दी करायची असेल तर ती आतुन करणे योग्य . बाहेरुन जरी तुम्ही आंघोळ केली तरी आतुन विचारांनी समृध्द होणे गरजेचे. आतुन मनाची शुध्दी करणे गरजेचे आहे. मनाच्या समृध्द विचारांनी केलेली कृती कल्याणकारी असते.

    बोध :- मनाची शुध्दी ही वरवर नसुन आतुन करावी लागते

  • टूर अंबाणी दादांच्या महालाची

    अंबाणी दादांच्या महालाची फार चर्चा होत असते. त्या चर्चेमुळे आग्य्रातील ताजमहल आणि वाशिंग्टन येथील व्हाईट हाऊस हे राजवाडे कम महाल फिके पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या दोन्ही महालांची नव्हाळी कमी झालेलीच आहे. ताजमहलाचं दर्शन बिल क्लिंटन पासून ते बाबूराव कोटलवार  आणि  मिशेलवहिनी ओबामा पासून मंगलाताई ओतारे यांच्यापर्यंत कुणीही,कधीही घेऊ शकतात.