घावन
मला भावलेले अर्कचित्रकार
परकीय आक्रमकांच्या क्रूरतेला आणि फितुरांच्या कटकारस्थानाला, संघटीत शक्तीनिशी विरोध झाला असता तर आज श्रीविष्णू मंदिराच्या ठिकाणी कुतुबमिनार उभे नसते.
प्राचीन भारतीय हेमाडपंथी शैलीची मंदिरे पाहिल्यास आपल्याला उत्कृष्ट कलेची ओळख होते. कुतुबमिनार पाहतांना मात्र क्रूर आक्रमकांनी केलेल्या दुष्कृत्यांची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही.
परिसरात बारकाईने लक्ष दिल्यास प्राचीन मंदिराचे हेमाडपंथी अवशेष दिसतात. तेथील हेमाडपंथी अवशेष, लोहस्तंभ तसेच शिलालेखावरून असे लक्षात येते की, त्या जागी श्रीविष्णूचे मंदिर होते, जे आक्रमकांनी क्रुरतेने ध्वस्त केले. प्रत्येक श्रीविष्णू मंदिरासमोर एक गरुडस्तंभ असतो, ज्यावर गरुडमूर्ती विराजमान असते. तसेच मंदिराच्या छताला यक्ष आणि गंधर्वांनी आधार दिल्यासारखी स्तंभांची रचना असते.
अशाप्रकारची कितीतरी (१००० वर्षापेक्षा जास्त प्राचीन) मंदिरे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मंदिर पाडले तरी मात्र लोहस्तंभ (गरुडस्तंभ) नष्ट करता आले नाही. लोहस्तंभावरील गरुडमूर्तीमात्र आक्रमकांनी पळवून नेली. लोहस्तंभ हे ७.२ मीटर उंचीचे असल्याने, इर्षेपोटी ७२ मीटर उंचीचे कुतुबमिनार बांधण्यात आले. मंदिर नष्ट केल्या गेले तरी मात्र हेमाडपंथी शैलीचे अवशेष, प्राचीन श्रीविष्णू मंदिराच्या अस्तित्वाची साक्ष देत उभे आहे. शिलालेख,हेमाडपंथी शैलीचे अवशेष आणि लोहस्तंभ (गरुडस्तंभ), निसर्ग आणि काळासोबत आजही अविरत झगडत उभे आहे. त्याच अवशेषांच्या ह्या फोटो आहेत.
प्राचीनवास्तू अभ्यासकांनी जाणीवपूर्वक तुलनात्मक अभ्यास करून सत्य जगासमोर आणावे. त्याच शैलीचे विदर्भात चिमूर येथे बालाजीमंदिर (श्रीविष्णू) अस्तित्वात आहे. अन्यही ठिकाणी अशीच रचना असलेली प्राचीन मंदिरे आहेत.

-- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ' कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे
-- चिंतामणी कारखानीस
काळचक्रामध्ये दैनंदिनीच्या अनेक गोष्टीत बदल होत चाललेले दिसतात. काही बदलांनी तर वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येते. केव्हा …..
आज रात्री मला वर्षा खेरकडे Sendoff Party ला जायचंय. ती म्हणाली मैत्रि 5Gणींमधे कुणाला बोलवायचं ती योजना तूच कर बाई.
भारत देश हा पुरातन सनातन राष्ट्र आहे या देशांनी आजवर अनेक धोके खाले आहेत ह्याची साक्ष आपला इतिहास देतो. आज पर्यंत या देशाला काणत्याही विदेशी ताकतीने पराजित केले नाही.
फोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या कॅमेर्यांचं प्रस्थ नसल्याने दुर्दैवाने फोटो मात्र काढले गेले नाहीत. ती रुखरुख कायमची रहाणार आहे.
सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीही केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या वरचेवर वाढत आहे. परिणामी, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्न आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti