(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • बेवड्याची डायरी – भाग ९ – भ्रम ..आभास …सत्य !

    मी सहज मनाशी आतापर्यंत दारूत किती पैसे गेले असतील असं विचार केला तेव्हा ती रक्कम किमान २ लाख रुपये इतकी होत होती .. म्हणजे गेल्या १० वर्षात मी दोन लाख रुपयांची दारू प्यायलो होतो तर ..आणि तुलनेत या दहा वर्षात माझा कपड्यांवर ..स्वतच्या जेवणावर ..सिनेमा हॉटेलिंग वगैरे खर्च कमीच झाला होता ..

  • राशी व त्यांचे स्वभाव – सिंह

    राशी :- सिंह
    स्वामी :- सूर्य
    देवता :- भगवान मुकुंद
    जप मंत्र :- ॐ बालमुकुंदाय नमः
    उपास्यदेव :- सूर्य देवता
    रत्न :- माणिक
    जन्माक्षर :- म मृ मा मि मी मू मेमो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टै टौ ट्रा अग्नीतत्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. कुंडली मध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्व, पुरुष राशीराशी आहे.
    राशीचा स्वामी सूर्य (ज्योतिष) आहे. यांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्वनिष्ठता आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिम्मत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते.

  • एजन्ट

    बरेच जणांना प्रश्न पडतो की आम्ही जहाजावर कसे जातो किंवा जहाजावरुन घरी कसे येतो. आम्हाला घ्यायला किंवा सोडायला जहाज मुंबईत किंवा भारतात येते का किंवा कसे. मी असलेले एकही जहाज आजपर्यंत मुंबई काय भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये आलेले नाही. फक्त एकदाच सिंगापूरहुन गल्फ मध्ये जाताना भारतीय सागरी हद्दीतून काही तास गेले आहे. जिथे जहाज असेल तिथे आम्हाला पाठवले जाते. मग ते जहाज परदेशात असो किंवा भारतातील कोणत्याही पोर्ट मध्ये असो. जहाज ज्या देशात असेल तिथला विजा, इमिग्रेशन किंवा ईतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच जहाजावर पाठवले जाते तसेच जहाजावरून घरी पाठवले जाते. जहाजावर जसे कोणाला तरी रिलीव्ह करायला जावे लागते तसेच कोणी रिलिव्हर आल्याशिवाय जहाजावरुन खूप दुर्मिळ वेळा परत यायला मिळते. दुसरा कॅप्टन आल्याशिवाय सध्याचा कॅप्टन जाऊ शकत नाही तसेच पॅम्पमॅन आणि फिटर यांच्यापैकी एखादा खलाशी सुद्धा रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ शकत नाही.

  • पाळणा जयोस्तुचा

  • मैफल

  • आमची बायको

    साधारण माणसाला प्रवासात येणार्‍या अडचणीँचं वर्णन या कवितेत केलं आहे.

  • पानगळ

    पानामागून पाने गळावीत तसे दिवस गळत जातात. मनात पाय रुतवून ..ओल्या खुणा ठेवून. नवी पालवी फुटते पुन्हा, पुन्हा दिवसही येतच राहतात, तशी माणसेही येतात आणि जातात…तीही एक पानगळअसते. कोणी कोणासाठी थांबायचं? कशाशी एकनिष्ठ राहायचं? झाडांनी गळालेल्या पानांशी की नव्या पालवीने झाडाशी? एका ऋतूत किती बदल होतात! तेव्हा नुकत्याच झालेल्या ओळखी आता दृढावलेल्या, तर तेव्हा दृढ आलेले संबंध आता मात्र दुरावलेले. हे सगळे अपरिहार्य आहे का? उजाडलेलं निष्पर्ण झाड नव्या पालवीतून पुन्हा बहरतं, हसत राहतं. माणसाला झाडासारख जमतं का? नाही जमत खरं तर, पण तरी जमल्यासारखं दाखवावं लागतं. निखार्‍यावर फुलं ठेवावी लागतात.. मनातल्या जखमा… प्रतारणेच्या, उपेक्षेच्या, विश्वासघाताच्या मनातच लपवाव्या लागतात. हसावंच लागतं. वर म्हणावंही लागतं,

    ' कित्ती आनंदात आहे मी!'.

    दिवसांप्रमाणे माणसालाही बदलावंच लागतं का? पण मग सर्वांनाच ते सहजतेने का जमत नाही? असं का होतं?
    'असं का?' हा कधीच उत्तर न मिळणारा प्रश्न मनात घोळत घोळत पानगळीकडे बघावंच लागतं. मान फिरवता येत नाही, डोळे मिटता येत नाहीत. 'का?',याला उत्तर नाही. 'का नाही?', यालाही उत्तर नाही.पानगळ.. नुसती पानगळ! अपरिहार्य पानगळ! हातात काहीच नसतं. फक्त नजर असते आणि मन असतं. हसणारं आणि रडणारं. बहुतेकांचं रडणारंच. पानगळ.. अश्रू…पालवी…हसू…. , पुन्हा पानगळ! पुन्हा पुन्हा तेच पण सवय लागत नाही माणसाला, झाडासारखी.नाही स्थितप्रज्ञ होता येत त्याच्यासारखं. नाही राहता येत एकाकी, निरपेक्ष त्याच्यासारखं.
    शिशिरातल्या पानगळीचा नंतर होतो पाचोळा. माणसाचाही तर पाचोळाच होतो. पाचोळा करणाराही कधीतरी तेथेच येणार असतो. सगळेच वेगवेगळे तरीही सारखे.नशीब वेगळे पण परिणती एकच. जवळ जवळ दिसणाऱ्या दोन पर्वत शिखरांमध्ये दूरवरुन न दिसणारी अशी खोल दरी असते. तशीच एक दरी दोन मनांमध्ये असते. हे कळूनही त्या दोन शिखरांना जोडणारा मैत्रीचा, प्रेमाचा पूल भाबडा माणूस बांधू पाहतो, स्वतःवर विश्वास टाकून. हा विश्वास मात्र कधी त्या भोळ्या जीवाला वंचित करून जाईल याचा नेम नाही. या विश्वासावर फार काळ विश्वास टाकता येत नाही.
    पानगळ होतच राहते पानांची, भावनांची, विश्वासाची, नात्यांची आणि जीवांचीही.

    आराधना कुलकर्णी

  • ऐरणीच्या देशा

    प्रत्येक व्यक्ती ही कुटुंब, गाव / शहर व देश यांची घटक असते. आपले दैनंदिन जीवन व्यतित करीत असताना आपण काही नियमांनी या तिन्ही पातळींवर बांधलेले असतो. आयुष्यात संधी तसेच समस्या, अडचणी प्रकट होत राहतात. परिस्थितीचे आकलन करून आपण संधीचा वापर करतो तर अडचणींचे निराकरण करतो. हे करत असताना नियमांच्या चौकटीत राहावे लागते. कुटुंबाचे नियम असतात, शहर व देश यांचे कायदे असतात. स्वतः व कुटुंब या पातळीवर, बाधित घटक व निर्णय घेणारे घटक मर्यादित असतात. पण गाव / शहर आणि देश या पातळीवर जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. उपायांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी लागते.

    समस्यांचे निवारण करताना आपण योग्य तेथून मदत घेतो. उदाहरणार्थ, आजार, दुखणे यासाठी डॉक्टरांची मदत, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञाची मदत आपण घेत असतो. दृष्टीदोष बारा करण्यासाठी आपण हृदयरोगतज्ञाकडे जात नाही, तो डॉक्टर असला तरी. आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही ही समस्या वैयक्तिक पातळीवर ओळखणे सोपे असते. पण शहरापुढील अडचणींचे मूळ कशात आहे हे सहजासहजी समजू शकत नाही. व्यापक विचार करून ते शोधावे लागते. एकदा ही निश्चिती झाली की उपाय ठरविता येतात. आपल्या देशात समस्या अगणित आहेत. त्यामुळे गुंतागुंत जास्त आहे. काही बाबतीत समस्येचं मूळ शोधणं सोपं नाही. जिथे समस्या व तिचे मूळ सुस्पष्ट आहे तिथे तरी उपाय लागू पडल्याचे दिसले पाहिजे. पण पुष्कळ ठिकाणी अंमलबजावणी तोकडी पडते. कारणे काहीही असोत. उत्तरदायीत्व न जुमानणारे हे अशा उपायांना बाधा आणतात.

    जिथे समस्या व तिचे मूळ याविषयी संदेह असतो तिथे, थातुरमातुर उपायांची मलमपट्टी केली जाते. काहीतरी कृती घडते आहे असे भसविले जाते. यामुळे अशी परिस्थिती काही काळाने पुन्हा उद्भवते. मराठी पत्रकारितेत याची, "... प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे" अशी बातमी बनते. ही ऐरण अनेक प्रश्नांना आपल्या पाठीवर वागवीत असते. रंगमंचावर जसा संवाद म्हणणार्‍या कलावंतावर प्रकाशझोत पडतो, तसा वेगवेगळा प्रश्न प्रकाशझोतात येत राहतो. आपली भूमिका झाली की कलाकार मंचावरून 'Exit' घेतो. पण ऐरणीवरच्या प्रश्नांना 'Exit' चा दरवाजा सहसा दिसत नाही.

    'ऐरण' या शब्दाचा जोडीदार आहे 'घण'. हे दोघे एकमेकावाचून निरुपयोगी. ऐरणीवर असलेल्या प्रश्नावर योग्य जागी घण पडला तर उपाय यशस्वी होऊ शकतो. पायाला गँगरीन झाले असताना हात कापणे हा उपाय असु शकत नाही. तसे झाले तर घाव भलत्याच ठिकाणी पडला असे म्हणावे लागेल. 'आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’ हा वाक्प्रचारही पत्रकारितेत खूप प्रसिद्ध आहे. आपल्या देशात या दोन वाक्प्रचारांचा वापर करता येण्यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवते. उदाहरणार्थ, '... घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे', '... बुडून झालेल्या मृत्यूंमुळे जलपर्यटन पुन्हा ऐरणीवर आले आहे', '... पेपरफुटीमुळे बोर्डाच्या क्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे'. अशा असंख्य घटना सर्व क्षेत्रांना स्पर्शून जातात. घण व ऐरण यांची जिथे भेट होते तिथे समस्येचं योग्य कारण असलं तरच उपयोग असतो. समस्या तशीच राहण्याची कारणं पुढीलप्रमाणे असु शकतात.

    १. समस्येचं मूळ समजलेलं नाही, त्यामुळे घावही नाही (अज्ञानात आनंद).

    २. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपाय शोधण्याची इच्छा नाही (वैचारिक दारिद्र्य).

    ३. समस्येचं मूळ समजलेलं आहे, उपाय करण्याची इच्छा आहे, पण घाव वर्मी बसत नाही (सदोष अंमलबजावणी).

    ४. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपायाचं नाटक करायचं आहे. समस्या ऐरणीच्या एका बाजूला व घाव दुसरीकडे पडत आहे (उपायाचा आभास).

    पावसाळ्यात मुंबईत ठराविक ठिकाणी पाणी साचणे, रेल्वे रुळ पाण्याखाली जाणे या गोष्टी दरवर्षी घडाव्याच लागतात. बोअरवेलमधे लहान मूल अडकणे, सेलिब्रिटीजना विशेष सवलती मिळणे यांची बातमी व्हावीच लागते. त्यांना ऐरणीवर यावेच लागते. काही प्रश्न सोडविण्यासाठी नसतात. तसे झाले तर काम काय राहील घण मारणाराला?

    अव्यवस्था दूर केली तर सामान्याचे जीवन सुखी होईल, पण अव्यवस्थेमुळे ज्यांना रोजगार मिळत होता ते बेकार होतील. गुटका खाउन कितीही मेले तरी चालतील, पण गुटक्याचा कारखाना बंद झाला तर जे बेकार होतील त्यांचे काय? रस्ते चांगले झाले तर गॅरेज कशी चालतील? गाडीचे सुटे भाग बनविणारांनी काय करायचं? शाळेतच शिक्षण मिळालं तर क्लासवाले उपाशी राहतील त्याचं काय? अशा प्रकारे एक प्रश्न सोडवताना दुसरा उद्भवेल. म्हणजे प्रश्न आहेच. ‘मग आहे तो प्रश्न तसाच राहिला तर काय बिघडले’ ही वृत्ती बळावते आहे. अशा परिस्थितीत गळ्याशी आल्यावर धावाधाव करणे आले. आपल्या देशापुढील समस्या कोणत्या क्रमाने व कशा सोडवायच्या हा मोठा प्रश्न आहे. सुजाण नागरिकत्व अंगी बाणल्याशिवाय कोणतेही उपाय निरुपयोगी ठरतील, आणि हेच सर्वात कठीण आहे.

    खूप वर्षांपूर्वी ‘साधी माणसं’ या मराठी चित्रपटातील एक गीत प्रसिद्ध झाले, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे ...’. पण आता, ‘ऐरण, घण व समस्या’ यांचा समन्वय साधता आला नाही तर म्हणावे लागेल, ‘ऐरणीच्या देशा तुला प्रश्न प्रश्न पडू दे ...’.

    - रवि गांगल

  • कुरकुर

    रमा सकाळची कामे भरभरा उरकून. मशीन वर शिवायला बसली होती. लग्न सराई. संक्रात आणि इतर अनेक कारणाने शिलाईचे काम भरपूर आहे म्हणून ती लवकरच आवरुन मशीन वर शिवायला बसली होती पण आज मशीनचा मूड वेगळाच. खट खट असा आवाज आला आणि मशीन चालू होत नाही.

  • कौटुंबिक जात प्रमाणपत्र..एक निरर्थक प्रयोग !

    जातीचे प्रमाणपत्र प्रत्येक व्यक्तीला देण्यापेक्षा एका कुटुंबाला एक या पद्धतीने द्या, अशी सुचना राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा मा. नीला सत्यनारायण यांनी शासनास दिली, अशी बातमी वाचली. कौटुंबिक जात प्रमाणपत्र देण्यात गैर काय ? हा प्रयोग निरर्थक कसा ? खरोखरच शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा जात प्रमाणपत्र देण्यात गैरसोईचे व त्रासदायक वाटते का? यावर प्रकाश टाकणारा हा लेखप्रपंच…..या अडचणींवर एक नवीन उपाय.