संगीतकार अजय-अतुल यांनी नवा प्रयोग करून ” सजवून साज जशी …” हें गीत ” a ‘ccappella ” पद्धतीत स्वरबद्ध केले आहे.
बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्यामार्फत तयार करण्यात येतो. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, त्यांचे मृत्युपुर्वी ४ महीने अगोदर, बॉम्बे हॉस्पीटल मध्ये कॅन्सरने आजारी असतांना दि.२७/०७/१९६८ रोजी दिलेला महत्वपुर्ण संदेश –
राष्ट्रसंतांच्या विचारांतील एक हजारांश वा भाग जरी, आमच्या देशातील राष्ट्रधुरीनांच्या डोक्यात घुसला तरी आमच्या देशाचे कल्याण झाल्याशिवाय रहणार नाही.
इथे आख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरं पाण्यावाचून तडफडतायत. मुंबई-ठाण्यासारख्या पाण्याची ददात न भासणार्या भागातही दिवस-दिवस पाणी गायब होतेय. दुष्काळग्रस्त भागातील जनता एकेक थेंब पाण्यासाठी तहानलेली आहे. गावंच्या गावं स्थलांतर करतायत. आपण ही परिस्थिती रोजच विविध वाहिन्यावर पहातच आहोत.
या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेजारच्या राज्यातून एक “बापू” येतो आणि आपल्या करणीने त्याच राज्यात जन्म घेतलेल्या दुसर्या महात्मा बनलेल्या“बापूं”चं नाव धुळीला मिळवतो. स्वयंघोषित “संत आसाराम बापू” यांचे हे कर्तृत्व. दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना आसाराम बापू यांनी अध्यात्माची गोळी दाढेखाली ठेवून होळीच्या नावाखाली लाखो लिटर्स पाण्याची नासाडी केली. केवळ एकदाच नाही तर दोनदा.
कोकणस्थांची साफसफाई गेल्या रविवारी संपली आणि आज फराळ सुरू झाला....
कर्हाड्यांकडे आज साफसफाई सुरू झाली, फराळ पुढच्या रविवारी.....
देशस्थ अजून कॅलेंडरवर या वर्षीची दिवाळी कधी आहे, ते शोधत आहेत.........
(मेसेज गंमत म्हणूनच घ्यावा.)
-- विनय
माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते . तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची . दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची .
इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण,
एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा...
आज न राहवून मी थांबून त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले ,
"बाळ तू रोज गार्ड होतोस ,तुला कधी इंजिन कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला ,
"बाबूजी मला घालावयास सदरा नाही मग माझ्या मागे कोण येणार ?"म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो..
".हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले..
त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला.
आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते .त्यात काहि ना काहि कमतरता असणारच .तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.
त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई बापावर रागावून रुसून रडत बसता आले असते,
पण, तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला व जीवनाच्या खेळाचाअंग बनून राहिला .
मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचाअंग व्हायचे आहे .सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...
*Be positive and be happy*
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.लोकशाहीत लोकांच्या मताला महत्व आहे,पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मुल्यांचा लोप होत आहे.लोकशाहीला बळकट व प्रभावशाली करण्यासाठी काही महत्वपूर्ण बदलांची गरज आहे.भारतातील आजची परीस्थीती पाहता सर्वप्रथम निवडणूक प्रकियेत तसेच लोकांच्या मतदान अधिकारात काही क्रांतिकारी बदल करणे आवश्यक आहे.
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।
विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,
छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।
अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,
मनाचे स्वभाव, सारखेच असती ।
फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,
अगणीत मनें, कोठे नसे फरक ।
अनेक बनली, जनक तिचा एक....४,
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
राशी :- मिथुन
स्वामी :- बुध
देवता :- केशव
जप मंत्र :- ॐ क्रीं केशवाय नमः
उपास्यदेव :- श्री कुबेर
रत्न :- पाचू
जन्माक्षर :- क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह हा ह् मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासु वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गूण या राशीत आढळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti