लेखांक सातवा
वास्तुशास्त्र पेंटिंग या विषयांतर्गत लेखात आपण पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग आणि कोणत्या दिशेला तोंड करून भिंतीला लावावे याबद्दल माहिती घेऊया.
मी बऱ्याचदा सांगत असतो की, तज्ञाशिवाय किंवा सल्ल्याशिवाय रंग विषयांवरील माहिती स्वतःच्या मनाने न घ्यावी अमलात आणावी. कारण रंगांचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे ॲलोपॅथीच्या औषधां सारखे लगेच जरी दिसले नसले किंवा दिसत नसले तरीही आयुर्वेदाप्रमाणे परंतु मन-इच्छा-भाव-भावना-षड्रिपू- ज्ञानेन्द्रिय आणि विचार यांवरच अपेक्षित, सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवून आणतात.
वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये असेच घटक आणि रंग यांना आकारबद्ध केलेलं असतं की, ज्यांनी त्या पेंटिंगचे मागणी केलीय अन्ज्या वास्तूमध्ये ते लावायचे आहे त्याची जागा इत्यादी सर्व जाणून घेऊन, जन्म नक्षत्राचा अभ्यास करून फक्त चांगले परिणाम देणारे रंगच आणि आकारच विशिष्ठ रचनांमध्ये, नक्षत्र स्वामी चा, नक्षत्राचा जप करून ती कलाकृती साकारली जाते.
या नक्षत्राचा आराध्यवृक्ष राजा आम्रवृक्ष म्हणजे आंबा आहे. भारतातील सर्वच वातावरणात हा वृक्ष आढळतो, का? तरी या वृक्षाला सर्व वातावरणाशी मिळतंजुळतं घेता येतं. किती महत्वाची बाब आहे. आता वाचकांना आश्चर्य वाटू शकेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना देखील कुठल्याही वातावरणात, भारतामध्ये जिथे-जिथे आंबा उगवतो त्या सर्व भूभागावरील नैसर्गिक वातावरणात शारीरिक, प्रकृती मिळतेजुळते घेणारी असते. इतरांच्या तुलनेने या लोकांना बाह्य प्रांतात, भौगोलिक प्रदेशात फारच कमी किंबहुना नाहीच त्रास होत.
म्हणून यांच्यासाठी खास बनवल्या जाणाऱ्या वास्तुशास्त्र पेंटिंगमध्ये, आंबा या वृक्षाचा पंचांगे, कुंभ किंवा मीन यांच्यापैकी चित्रकार, शीतरंग आणि त्यांच्यासोबत थोडासा तपकिरी, पांढरा, किंचित काळा अशा रंगांच्या योजना आणि वरील घटकांचे आकार यांची त्या व्यक्तीला पारखून एक सुयोग्य मांडणी करून वास्तुशास्त्र पेंटिंग बनविले जाते. यातील नक्षत्राचा आणि नक्षत्र स्वामींचा जप तेवढ्या पटीत करून ओम अजैकपादाय नमःही जपाक्षरे देखील त्या पेंटिंगचा चित्रविषय म्हणून आकारबद्ध केली जातात.
व्यक्ती, वास्तुस्थल या तीन बाबींचा विचार, तोही सकारात्मक, यशाची फळे देणारा असा विचार रंग चित्रकार आणि जपाक्षरेयांच्या रंग साजातून सजविला जातो. तोच त्या वास्तूचा जणू आत्माच बनतो. वास्तुशास्त्र पेंटिंगचा रूपाने. मग नकारात्मक ऊर्जा त्या वास्तूतून काढता पाय घेते. तिची जी जागा रिकामी होत जाते ति या पेंटिंग मधील सकारात्मक रंग किरणांचा लहरींमुळे, सकारात्मक उर्जेला खेचून त्या रिकाम्या जागी स्थिर करते. हे सगळे अगदी नकळत परंतु सहजपणे घडत जाते. आणि व्यक्ती अन तिचे कुटुंब आनंदात डुंबायला लागते.
शुभं भवतु
प्रा. गजानन शेपाळ
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे ।
मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।।
खेळांना त्या समजून घ्या- १--- या मित्रांनो सारे या,
हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा ।
स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
एकाच दमात भिडू मारू या -२--- या मित्रांनो सारे या,
खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई ।
उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे ।।
मिळता खो भिडूला पकडू या- ३--- या मित्रांनो सारे या,
लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा ।
राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती ।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – ४--- या मित्रांनो सारे या,
आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात ।
सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती ।।
चपळाईने घरात शिरू या – ५--- या मित्रांनो सारे या,
एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित? ।
उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे ।।
आखल्या रेषेतच खेळू या- ६--- या मित्रांनो सारे या,
एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या ।
निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो ।।
शीण अभ्यासाचा घालवू या – ७ --- मित्रांनो सारे या,
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
टीब्रेक' नंतर गोलंदाजांनी आपला एण्ड बदलावा तसा विषय बदलून मी गाडी हळूच त्यांच्या करीअरकडे वळवतो. गाडी मला हव्या त्या स्टेशनवर ,इंग्लंडच्या १९६३/६४ च्या भारत दौऱ्यावर येऊन थांबते.पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला, १० जानेवारी ते १५ जानेवारी १९६४ दरम्यान खेळला गेलेला, मद्रासच्या नेहरु स्टेडियमवरचा कसोटी सामना. दुसऱ्या दिवसअखेर धावफलक .....
भारत..पहिला डाव....७ बाद ४५७
( डाव घोषित.... बुधी कुंदरन-१९२,विजय मांजरेकर-१०८ )
इंग्लंड... पहिला डाव....२ बाद ६३
१२ जानेवारी..... सामन्याचा तिसरा दिवस. लकाकी गेलेला चेंडू भारताचा तरणाबांड कर्णधार मन्सूर अली खान पतौडी बापूंच्या हातात देतो. पहिल्याच कसोटीत पराभवाचे काळे ढग इंग्लंडच्या डोक्यावर जमा होत असतात.
अंगात ब्रिटिश खडूसपणा पुरेपूर भिनलेली बोलूस आणि केन बँरींग्टन ही जोडी मैदानात असते. आणि त्यादिवशी नकळत, यापुढे कोणाच्या स्वप्नातही मोडला जाण्याची सुतराम शक्यता नसलेला एक जागतिक विक्रम नोंदला जातो. त्या दिवशी बापू सलग २१ षटके ( अगदी नेमके सांगायचे तर १३१ चेंडू ) निर्धाव टाकतात.( आजच्या २०-२० च्या जमान्यात एक डाव १२० चेंडूंचा असतो,म्हणजे विचार करा.) बोलूस ८८ ( ४१५ चेंडू ) आणि बँरींग्टन ८० (३१२ चेंडू ), हे दोघेही आलटूनपालटून बापूंचे षटक सुरु असताना नॉनष्ट्रायकर एण्डला , बॅटवर रेलून हलकीशी डुलकी घ्यायचे अशी सत्याच्या सीमारेषेवर रेंगाळणारी आख्यायिका चेपॉकच्या "मद्रास कॅफे" मधे अगदी आत्ताआत्तापर्यंत सांगितली जात असे.चौथ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ( शेवटी एकदाचा ) संपतो तेव्हा बापूंचे पृथःकरण असते ३२-२७-५-० . आणि दुसऱ्या डावात ६-४-६-२.
"हे दोघे लेकाचे माझ्या बॉलिंगवर बॅटच उचलणार नसतील तर मला विकेट मिळणारच कशी ?"
बापू २५ वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांचे असे काही वर्णन करतात की आत्ताच बत्तीसावे षटक संपवून ते पॅव्हेलियनमधे परतले असावेत. इतिहासाचे बोट धरुन मद्रासच्या नेहरु स्टेडियमवर चक्कर मारुन आल्याचा मला भास होतो. वयाच्या ५७ व्या वर्षीही त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक मला थरारुन टाकते. तो दिवस त्यांचा होता, फक्त त्यांचाच. त्या दिवशी त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून गोलंदाजी केली असती तरी ती अचूक टप्प्यावरच पडली असती. इतिहासाच्या दुर्मिळ पानांतील एक अजरामर सुवर्णपान आपल्या नावानं लिहिलं जाण्याचं भाग्य आयुष्यात किती जणांना लाभतं ?
शायर शकील बदायुनी म्हणतो, सवाल उनका, जवाब उनका, सुकूत उनका, खिताब उनका
हम उनकी अंजुमन में सर न करते ख़म , तो क्या करते ।
"अजून एक चहा घेणार का ?" बापू आस्थेने विचारतात. त्या क्षणी बापूंनी सांगितलं असतं तर मी उकळत्या चहाच्या पातेल्यात उडीदेखिल मारली असती.
'नाही.... नको... मी येतो आता'...
जवळजवळ पाऊणएक तास झालेला असतो. मी जायला निघतो.
"पुन्हा कधी आलात या बाजूला तर नक्की या! आता तुम्हाला अँपॉईंमेंटची गरज नाही"...बापू मला प्रेमाने निरोप देतात.
मी कशासाठी आलो होतो हे बापू पार विसरुन गेलेले असतात.( आणि मी तर ते लक्षात ठेवण्याचा प्रश्नच नसतो. जिथं खुद्द भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून भगवद्गीता ऐकली त्या कुरुक्षेत्रावर घोड्यांना खरारा करण्याचं काम कोण करणार ?)
युनोच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारताविरुद्ध वापरण्यासाठी चीनने आपला 'व्हेटो' जपून ठेवावा तसे बापूंनी दिलेले आमंत्रण मी आठवणींच्या कालकुपीत जपून ठेवलंय.
मला खात्री आहे , स्वर्गातल्या "इंद्रप्रस्थ" स्टेडियममधे , त्या आमंत्रणाच्या जोरावर मला VVIP स्टँडमधे सहज प्रवेश मिळेल. तिथे कर्णधार इंद्राचा 'देवेन्द्र' संघ विरुध्द मन्सूर अली खान पतौडीच्या 'भारतीय' संघातील कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ सुरु असेल. नाणेफेक जिंकून 'ब्रम्हा' आणि 'विष्णू' हे देवेंद्र संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानात उतरले असतील. रमाकांत देसाईच्या अनुपस्थितीमुळे दुबळी झालेली भारतीय वेगवान गोलंदाजी फोडून काढत "ब्रम्हा-विष्णूंनी", आणि खास करुन विष्णूंनी जोरदार सुरुवात केली असेल.( रमाकांत देसाईंचा तर वेगळाच किस्सा असेल. अजून { मेल्यावरही } रमाकांत माझ्या स्वप्नात येतो आणि पहिल्या चेंडूवर माझी विकेट काढतो अशी तक्रार हनिफ मोहम्मदने धन्वंतरी ऋषींकडे केली असेल. त्याचा हा मानसिक आजार कायमचा दूर करण्यासाठी तू स्वतः हनिफला घेऊन माझ्या आश्रमात ये अशी विनंती खुद्द धन्वंतरी ऋषींनी रमाकांतला करुन नेमकी आजचीच वेळ दिली असेल. त्यामुळे सज्जन व पापभिरु रमाकांत , विजय मर्चंटसरांची विशेष परवानगी घेऊन, हनिफला स्कुटरवर मागे बसवून धन्वंतरी ऋषींच्या आश्रमात गेला असेल.)
उपहारापूर्वी शतक करुन व्हिक्टर ट्रम्पर , चार्ल्स मॅकॅर्टनी,डॉन ब्रॅडमन, माजीद खान ,डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवनच्या पंक्तीत बसण्याचे आणि हे शतक लक्ष्मीला तिच्या वाढदिवसाची 'खास भेट' म्हणून अर्पण करण्याचे मांडे विष्णुजी मनातल्या मनात खात असतील.लेगस्पिनरला त्याचा टप्पा मिळून द्यायचा नाही या विक्स ,वॉरेल व वॉलकॉट या वेस्ट इंडियन त्रयीने शिकविलेल्या अलिखित नियमानुसार सुभाष गुप्तेच्या पहिल्याच षटकात त्याने कव्हर ड्राइव्हजच्या दोन खणखणीत चौकारांसह ११ धावा वसूल केल्या असतील. चिंतेत पडलेला भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार (अर्थात महेंद्रसिंग धोनी व सौरभ गांगुलीची क्षमा मागून ) मन्सूर अली खान पतौडी मग भारताच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाशी ( अर्थात फारुख इंजिनीअर व सय्यद किरमाणीची क्षमा मागून ) नरेन ताम्हाणेशी सल्लामसलत करेल.
इतका वेळ थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या, कोणाच्या नजरेत न भरलेल्या एका कृश खेळाडूला हाक मारुन , त्याच्याशी दोन शब्द बोलून कर्णधार निर्धास्तपणे त्याच्या हाती चेंडू सोपवेल. त्याला पहाताच इतका वेळ विव्ह रिचर्डसच्या मिजाशीत वावरणाऱ्या विष्णूंच्या चेहेऱ्याचा रंगच उडेल. उपहारापूर्वी तर सोडाच पण दिवसभरात आपले शतक पूर्ण झाले तरी नशीब असे नासिर हुसेन अधिक मनमोहन कृष्णसारखे रडके भाव त्याच्या चेहेऱ्यावर येतील. आणि आपले ठेवणीतले स्मितहास्य करत , साडेचार पांच पावलांचा स्टार्ट घेत, 'नरक' एंडकडून "बापू" पहिल्या चेंडूपासून, गुडलेंग्थ स्पॉटवर चेंडूंचा चुंबक ठेवल्यागत,अचूक डावखुरी गोलंदाजी सुरु करतील. आता बराच वेळ आपल्याला काही काम नाही या खात्रीने रंभा, मेनका व उर्वशी या चिअरगर्ल्स फ्रेशरुमकडे वळतील. आणि प्रत्यक्ष देवांची सुरु झालेली साडेसाती, शिवाजीपार्कला पुनर्जन्म मिळेपर्यंत , मी अभिमानाने आणि कौतुकभरल्या नजरेने पहात राहीन.
शायर हैदर कुरेशी म्हणतो,
ये चंद घड़िया ही जन्नत नजी़र हो जायें ,
फ़िर अपने अपने जहन्नम मे हमको जलना है !
संदीप सामंत
८ - ३ - २०२०
युवकांना प्रशासकीय सेवेसंदर्भात अचूक मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. प्रशासकीय सेवेमध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही संस्था चालविण्यात येते.
रेल्वे स्टेशनवर द्राक्ष पेट्यांची हमाली करण्याचे काम आता नियमित झाले होते वर्षातून साधारण ५ महिने हे काम असते , रात्रभर रेल्वे स्टेशन वर भटकणे , गाडीची वेळ आली की द्रक्ष्यांचा पेट्या पार्सल विभागातून काढून त्या पेट्या रेल्वे स्टेशन वर असलेल्या सामान वाहून नेण्याच्या चार चाकी लोखंडी गाड्यावर लादणे आणि मग गाडीचा पार्सल चा डबा ज्या ठिकाणी येतो तेथे त्या पेट्या नेऊन ठेवणे व गाडी आली की ५ मिनिटात धावपळ करून त्या पेट्या पार्सल च्या डब्यात चढवणे असे काम असे ,
श्रीकृष्ण जन्मकथा श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो ऐका विनवितो श्री विष्णु अवतार घेतो ह्या सृष्टीवर १ दुष्टांचा होई अनाचार पृथ्वीते होई पापभार त्यांचा करण्या संहार परमेश्र्वर अवतरती २ कंस राजा दुष्ट स्वतःस समजे श्रेष्ठ प्रजेला देई कष्ट स्वार्थापोटी ३ छळ करु लागला जनांचा लुटमार अत्याचार छंद त्याचा खूनही करी साधूसंतांचा दुष्टपणे ४
कवी बा. भ. बोरकर यांची एक सुंदर कविता.
फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर नसताना फोटोशॉपची फाइल, फ्लॅश अँनिमेशन, झीप फाइल, अँपल पेजेसच्या फाइल्स, आऊटलूक मेसेजेस, विविध प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स, पीडीएफ किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस नसताना एम एस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटच्या फाइल्स ओपन करण्यासाठी फ्री ओपनर हे अत्यंत उपयोगी अँप्लिकेशन आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti