(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लैंगिक शिक्षणातून छेडछाडीला लगाम !

    ……आणि एक ना एक दिवस एका भयंकर भयावह अशा विनाशकाल परिस्थितीला सामोरे जावे लागेल…अशी नुसती कल्पना केलेलीच बरे…नाही का?..तात्पर्य शालेय अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.

  • रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)

    मुंबई ! सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना स्वत:मध्ये समावून घेणारी आई तशीच आर्थिक राजधानी. या नगरीबद्दल कोणाला जर आकर्षण वाटलं नाही तर नवलच. ही नगरी विविधतेने नटलेली असून या नगरीत बर्‍याच वास्तू पहाण्यासारख्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सध्याच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीच्या आवारात उभे असलेले हे “रविंद्र नाट्यमंदिर”.

  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सर जॅक हॉब्ज

    जॅक हॉब्स यांच्या खेळाचा प्रोफाइल पाहिला तर थक्क व्हायला होते. त्यांनी ६१ कसोटी सामन्यामध्ये ५६.९४ या सरासरीने ५,४१० धावा केल्या त्यामध्ये त्यांची १५ शतके आणि २८ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती २११ .

  • मन कि बात- डिप्रेशनवर मात

    आयुमित्र

    दिनांकट ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम ही वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम फ्करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते.

    ह्यावर्षी डिप्रेशन-लेट्स टॉक” ही थीम आहे.

    मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा शशी थरूर ह्यांनी फारच interesting fact सांगितली. मेडिकलच शिक्षण घेणारे ५०% विद्यार्थी सतत तणावात असतात. जे पुढे जाऊन आरोग्यसेवा पुरविणार आहेत. नुसतेच मेडिकल नाही तर कुठल्याही शाखेचेळ्रौ शिक्षण असो. साध्या १वी व १२वीच्या निकालाडानंतर वर्तमान पत्रात आत्महत्याविषयक बातम्या हमखास असतातच. डिप्रेशनल बऱ्याच आजारांच प्रमुख कारण आहे. WHO नुसार २००५ ते २०१५ च्या दरम्यान तब्बल १८%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. डिप्रेशनमुळे डायबेटीस, हृदयरोग ह्यासारखे असंसर्गन्य रोग तर होतात पण डिप्रेशनमुळे आत्महत्येच प्रमाणही वाढते आहे.

    डिप्रेशन म्हणजे काय?

    अधुनिक शास्त्रानुसार १४ दिवसापर्यंत तुम्ही सतत दु:खी असाल, दैनादिन क्रिया करणेही जड झाल असेल. ज्या दैनंदिन क्रिया तुम्ही आनंदाने करत होता त्या करण्यात अजिबात रस वाटत नसेल तर तुम्हाला डिप्रेशन असू शकते.

    डिप्रेशनची मूळ लक्षणे काय आहेत.....।...

    निरुत्साह, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे, पचनक्रिया बिघडलेली असणे, झोप कमी वा खूप झोपावेसे वाटणे, कुठल्याही कामात मन एकाग्र न होणे, स्वतःबद्दल वाईट वाटत राहणे, माझा काहीच उपयोग नाही, मी काही कामाचा नाही अशी भावना निर्माण होणे, निराशा वाढणे आणि स्वतःला संपविण्याची किवा त्रास पोचविण्याचे विचार मनात येणे अशी लक्षणे डिप्रेशन ह्या प्रकारात येतात.

    डिप्रेशन कोणाला होऊ शकते?

    डिप्रेशन कोणालाही होऊ शकते. तो सार्वभौम आहे. तो भेदभाव करत नाही. गरीब असो श्रीमंत असो. त्याला देश, लिंग, वय ह्याची मर्यादा नाही. परंतु प्रामुख्याने किशोर, तरुण वयातील, प्रसूत माता आणि ६० वर्षाच्या वरील वृध्द लोक ह्यांना डिप्रेशनची शक्यता जास्त असते.

    डिप्रेशन कश्यामुळे येते

    पुरेसा पैसा नसणे, गरिबी असणे, नौकरी, व्यवसाय न मिळणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेम संबंध तुटल्याने म्हणजेच ब्रेकअप,दीर्घकालीन आजारपण किंवा कॅन्सर, एड्स सारखे आजार होणे. दारू आणि DRUGS च्या वापरामुळे डिप्रेशन येऊ शकते.

    डिप्रेशन ला उपाय काय?

    आयुर्वेदात काय उपाय आहेत?

    आयुर्वेदाने शरीर आणि मन दोघांच्या स्वास्थ्याला महत्व दिले आहे. सदवृत्त पालन, धारणीय Nवेग, सत्वावजय असे उपाय सांगितले आहेत. मनाचा सत्वगुण वाढवून मानसिक व्याधी दूर वभभकरण्यासाठी आयुर्वेद काम करतो. विस्तृत कधीतरी लिहीनच.

    WHO टॉकिंग थेरपी-

    सध्या एक चित्र सगळ्यांनी बघितल असेल. घरात सगळे बसलेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात पण घरात एकमेकांशी आपण बोलत नसतो. सगळे सोबत असून आपण एकटे असतो. कारण जो ढतो त्याच्या whatsapp आणि फेसबुक वर online असतो. पूर्वी जेवायला सोबत, संंध्याकाळी रामरक्षा, प्रार्थना असेल ती सोबत होत असे. आता प्रत्येकाच्या घरी येण्याच्या वेळा वेगळ्या जेवणाच्या वेळा वेगळ्या त्यामुळे घरातलाच संवाद कमी झालाय. मित्रांशीहि संवाद हा प्रत्यक्ष जास्त न होता whatsapp आणि फेसबुक च्या माध्यमातूनच जास्त होतो. आजकाल प्रेमही online होत आणि लग्नही त्यामुळे बोलायलाच नको. एकाच flat स्कीम मध्ये शेजारी जन्म झाला, मरण झाले तरी कळत नाही कारण आमच्यात संवादच नाही.

    WHO म्हणतय बोलण वाढवा, संवाद करा डिप्रेशन दूर होईल. आपल्या प्रधानमंत्रिनी सुद्धा हाच संदेश दिला आहे. “Expression of Depression instead of suppression”
    आपले मित्र, आईवडील, भाऊ-बहिण ह्यांना आपले शेयरिंग पार्टनर बनवा. मनातील गोंधळ, भीती, दुखः, निर्णय आपल्या विश्वासू लोकांजवळ नक्की बोलून दाखवा. ह्याउलट जो डिप्रेशन मध्ये आहे त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करा त्यातून त्याला बाहेर निघण्यास मदत नक्कीच होईल.

    आपली “मन कि बात” कराच पण दुसऱ्यांच्या “मन कि बात” पण ऐका म्हणजे डिप्रेशन नक्की कमी होईल.

    चला तर करूया मन कि बात आणि डिप्रेशनवर मात ….

    –वैद्य भूषण मनोहर देव.

  • शिक्षणातील टर्निंग पॉइंट

    अनेक मुलां-मुलींना शिक्षण सोडून पोटासाठी बालमजुरी, घरकाम, फुटकळ कामांकडे वळावे लागले. पर्यायाने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले. कडक निर्बंधांमुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने टाळेबंदीच्या काळात शाळकरी मुलींची लग्ने लावण्यात आली. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक दरी अधिकच रुंदावली.

    कोविड-19 महामारी या शतकातील सर्वांत मोठ्या आपत्तीने 2020 मध्ये जगभरातील मानवजातीवर आक्रमण केले. या आकस्मिक व अनपेक्षित संकटापासून बचाव करण्यासाठी एकीकडे त्यावरील उपचाराबद्दल अपुरे ज्ञान, अपुरी वैद्यकीय व्यवस्था आणि उपाययोजनांबद्दलचे अपुरे संशोधन अशी गोंधळाची परिस्थिती होती. मार्च 2020 पासून कोरोनाने जगभरातील लाखो जीवांचा अकाली बळी घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त, निराधार झाली. एकूण जनजीवन अनिश्चित, असुरक्षित झाले. मृत्यूच्या छायेत जीव मुठीत घेऊन दीर्घकाळ चाललेल्या लॉकडाऊनमध्ये कसेबसे एकेक दिवस ढकलण्याशिवाय लोकांना गत्यंतर उरले नाही. रोजच्या बातम्यांतून फक्त कोरोना संक्रमित रुग्णसंख्या आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या... हे सर्व सुन्न करणारे! प्रत्येकाच्याच मनामध्ये आपण कुणीही कुठल्याही क्षणी कोरोना संकटाचे बळी ठरू शकतो, या भीतीने कायम ठाण मांडलेले. अशा या परिस्थितीमध्ये कडक निर्बंध, टाळेबंदी, कर्फ्यू, लसीकरण या मार्गांनी कोरोनाशी मुकाबला करणे एकीकडे सुरू होते आणि दुसरीकडे नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्वच व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले.

    या साथीच्या काळात वरवर न दिसणारा गंभीर परिणाम झाला आहे तो शिक्षणावर. भारत जगातील दुसऱया क्रमांकाचा मोठा देश असून एकट्या भारतात 32 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या कोरोनामुळे परिणाम झालेला आहे. लागोपाठ दोन वर्षे या पिढीतील 25 कोटी विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत.

    मार्च 2020 मध्ये बंद झालेल्या शाळा व महाविद्यालये वगळता एव्हाना अन्य सर्व व्यवहार जवळपास सुरू झालेले आहेत. या दिवाळीनंतर शाळा सुरू होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता 4 ऑक्टोबरपासून अंशत: शाळा सुरू होतील. एकंदर गेले 19 महिने शाळांची दारे बंद आहेत. याच काळात फळा, खडू ऐवजी कॉम्प्युटर क्रीन, मोबाइल हातात धरून शिकणे-शिकवणे सुरू झाले. घरबसल्या ऑनलाइन शिक्षणाची ही व्यवस्था या काळात जरी स्वीकारली गेली तरी मुलांनी शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकण्याला हा सर्वस्वी पर्याय ठरत नाही, हे वास्तव या काळातील अनेक सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. सामाजिक कौशल्यांचा विकास हा मानसिक, बौद्धिक विकासाइतकाच महत्त्वाचा आहे. 24 तास घरातच अडकून पडल्याने मुलांचा सर्वांगीण विकास साध्य करणे अवघड झाले. त्यांच्यात चिडचिड, नैराश्य निर्माण झाले. पालकही पूर्णवेळ घरीच असल्याने त्यांचे सतत मुलांवर लक्ष ठेवणे जाचक ठरू लागले.

    पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता भेडसावते आहे. मुलांपाशी स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब यांसारखी साधने नसणे, नेटवर्क नसणे यामुळे शिक्षण फारच थोड्या मुलांपर्यंत पोहोचू शकले. चाचपडत ऑनलाइन शिक्षण सुरू झाले खरे पण या शिक्षणासाठी ना शिक्षकांकडे पुरेसे तांत्रिक कौशल्य होते आणि ना विद्यार्थ्यांकडे. शाळा बंद झाल्याने 6 टक्के ग्रामीण कुटुंबातील व 25 टक्के शहरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना संगणकाच्या मदतीने शिक्षण घेता आले. ग्रामीण भागात फक्त 17 टक्के तर शहरी भागात 42 टक्केच कुटुंबाकडे इंटरनेट सुविधा होती.

    ‘शाळा बंद’च्या या कालावधीतील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर सतत येणाऱया उलटसुलट सूचना, निर्णय यामुळे अस्थिर व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

    मार्च 2020 मध्ये दहावीच्या भूगोल विषयाच्या एका पेपरचा अपवाद वगळता दहावी, बारावीच्या परीक्षा पार पडल्या. मात्र शाळांतून घ्यावयाच्या वार्षिक परीक्षा न होताच सर्व विद्यार्थी वरच्या इयत्तेमध्ये गेले. त्यानंतर 2020-2021 हे पुढचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले; मात्र शाळा बंद राहिल्या आणि मार्च 2021 च्या दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अन्य शिक्षण मंडळांनी घेतला व त्यानंतर राज्य मंडळानेही घेतला. 11वी चे प्रवेश प्रामुख्याने गुणवत्तेनुसार होत असल्याने सर्व विषयांची एक सामायिक परीक्षा (CET) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि ICSE किंवा CBSE सारख्या इतर शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित CET परीक्षा देणे अडचणीचे वाटल्याने मा. उच्च न्यायालयापुढे आलेल्या जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार CET रद्द ठरविण्यात आली. परीक्षा न घेताच मागील वर्षाच्या इयत्ता 9 वी व 11 वी च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संपादणूक व शाळास्तरावर केलेल्या श्रेणी, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांची 10वी, 12वी परीक्षेतील उत्तीर्णता ठरवण्यात आली. बोर्डाच्या निकालाची टक्केवारी 85 टक्क्यांवरून 98 टक्क्यांवर गेली. मात्र या गुणांची खात्री देता येणार नाही, ही जाणीव विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांनाच होती. एकीकडे कोरोना परिस्थितीमुळे शिकण्याची गुणवत्ता घसरली तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी मात्र वधारली. पुढील टप्प्यावरील शिक्षणासाठी आवश्यक अभ्यास पूर्ण न होताच वरच्या इयत्तेमध्ये गेल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया कच्चा राहिला. आधीच आपल्या देशातील शिक्षणाचे चित्र फारसे चांगले नाही. ‘असर’च्या सर्वेक्षणातून ते वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. इ. 3 री, 4 थी च्या विद्यार्थ्यांची क्षमता लेखन, वाचन, गणित यामध्ये इ. 1 ली च्या स्तरावर आहे.

    आता कोरोना भयाने शाळा बंद राहिल्याने होणाऱया शैक्षणिक नुकसानामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली. आधीच वंचित असलेल्या मुलांसाठी हा फटका खूप मोठा आहे. मध्यान्ह भोजनाची सोय सरकारी शाळांमध्ये असल्याने मुलांची उपस्थिती नियमित होत असे. आता मात्र शाळा नसल्याने त्यांची एक वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. कामधंदा नसल्याने आईवडिलांसोबत अनेक मुले-मुली शाळा सोडून आपापल्या गावाकडे स्थलांतरित झाले. अनेक मुला-मुलींना शिक्षण सोडून पोटासाठी बालमजुरी, घरकाम, फुटकळ कामांकडे वळावे लागले. पर्यायाने ग्रामीण व शहरी भागांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले. कडक निर्बंधांमुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने टाळेबंदीच्या काळात शाळकरी मुलींची लग्ने लावण्यात आली. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक दरी अधिकच रुंदावली. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क नसणे, साहित्य साधने नसणे यातून शहरी व ग्रामीण ही दरीसुद्धा रुंदावली.

    या काळात कौटुंबिक ताणतणाव, प्रियजनांचा मृत्यू, आर्थिक ओढाताण, शिकण्यासाठी साधनसुविधांचा अभाव यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध मानसिक समस्यांचे प्रमाण वाढले. त्यातून येणाऱया नैराश्यातून आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटना घडणे हे खरोखरीच दुःखदायक आहे. या परिस्थितीमध्ये मुलांना शिकण्यास मदत होण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या मालिकेद्वारे ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘दीक्षा अॅप’ मधील निवडक पाठांचे प्रसारण केले. ‘टिली मिली’सारखा कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारित केला. मात्र हे दोन्ही उपक्रम घाईघाईने केलेल्या निर्मितीमुळे असेल कदाचित पण फारसे दर्जेदार नसल्याने अपेक्षित परिणामकारक ठरले नाहीत. याउलट अन्य राज्यांमध्ये कोरोनापूर्व काळात सातत्याने दूरदर्शनच्या शैक्षणिक वाहिन्या पूर्णवेळ शालेय अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम देत होत्या. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात दूरदर्शनवरील अशा कार्यक्रमांमुळे त्या राज्यांतील मुलांना खूपच फायदा झाला. महाराष्ट्रात दुर्दैवाची गोष्ट ही की शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करणारी बालचित्रवाणी संस्था काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली.

    दहा वर्षांपूर्वी 2012 मध्ये माहिती व तंत्रज्ञान राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले त्यानुसार शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड देणे व शिकवताना विविध दृश्राव्य माध्यमांची जोड देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणी करण्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी अपेक्षेनुसार तंत्रसाक्षर झाले नाहीत आणि आवश्यक तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यात मागे राहिले. कोरोना महामारी संकटकाळात गरजेपोटी नाइलाजाने या माहिती-तंत्रज्ञानाला शरण जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिल्यानुसार आगामी काळातील शालेय शिक्षण हे तंत्रज्ञान आधारित असणार आहे यापुढे वर्ग अध्यापनात खडू-फळा याच्या जोडीने डिजिटल शिक्षणाची जोड दिली जाणार आहे आणि पुस्तकाबाहेरील माहिती, उदाहरणे, संदर्भ, चित्रफिती, सहजपणे पडद्यावर पाहून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे आकलन अधिक प्रभावी व परिणामकारक ठरेल ऑनलाइन व दूरस्थ शिक्षण पद्धतीचा उपयोग उच्च शिक्षण या प्रमाणे शालेय शिक्षणामध्ये केला जाईल संकट काळात या निमित्ताने ऑनलाइन शिक्षण स्वीकारले गेले ही एक जमेची बाजू म्हणायला हवी.

    आकस्मिकपणे उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये विद्यार्थी-शिक्षक यांना ऑनलाइनवर शिकणे-शिकवणे यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. याचे मुख्य कारण तांत्रिक कौशल्यांचा अभाव. मात्र चाचपडत अन्य सहकाऱयांची मदत घेत का होईना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ऑनलाइन वर्ग घेऊ लागले. ऑनलाइन शिक्षण बऱयाचदा नीरस, कंटाळवाणे ठरले. कारण शिक्षक नेहमीच्या पद्धतीने पाठाचे वाचन करून गृहपाठ देत राहिले. ऑनलाइन शिक्षणाचे प्रश्न फारच वेगळे. वर्गात मुलं समोर... ज्यांच्यात हसत खेळत शिकणं, संवाद होई. ऑनलाइन बहुतेक वेळा एकतर्फी. शिकणाऱया मुलांची ऑनलाईन वर्गातील हजेरी अलीकडे वीस-पंचवीस टक्क्यांवर येऊन ठेपलेली. याशिवाय शहरी किंवा ग्रामीण भागातील वंचित घटकातील तळागाळातील मुलांकडे लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल, टॅब ही साधने नाहीत. नेटवर्क आणि खंडित वीज पुरवठा या समस्या वेगळ्याच. एकंदर या दीड वर्षात मुलं किती शिकली, मागच्या इयत्तेतील कितीसं स्मरणात राहिलं, या प्रश्नांची उत्तरे सर्वेक्षणातून समोर आली.

    25 ते 30% मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचले. याशिवाय या ऑनलाइन शिक्षणामध्ये इतरही अनेक अडचणींतून मार्ग शोधावे लागत होते. 24 तास मुलं घरी पालकांबरोबर असल्याने सतत पालकांकडून प्रत्येक बाबतीत शिस्त लावणं, रागावणं, तसंच बाहेर जायला खेळायला बंदी असल्याने शाळा व शाळेनंतर शिकवणी वर्ग ऑनलाइन यामुळे तासन्तास क्रीनसमोर बसून राहिल्याने कंटाळलेली. त्यातून नैराश्य, चंचलता, चिडचिड यांसारख्या वरवर न दिसणाऱया मानसिक, भावनिक समस्या. बऱयाच शिक्षकांच्या दृष्टीने हा काळ खूप कठीण आणि आव्हानात्मक ठरला. ऑनलाइन पाठ घेण्यासाठी भरपूर पूर्वतयारी करावी लागली. पीपीटी बनवणे, लिंक शोधणे, तांत्रिक बाबींची जुळणी करणे, मोबाइलवरून गृहपाठ देणे, तो तपासून देणे यासाठी नवीन तंत्रांशी/पद्धतींशी जुळवून घेणे तसेच शाळेच्या ऑनलाइन सभा, प्रशिक्षणे, इतरांकडून नवनवीन पद्धतींची माहिती घेणे, कौशल्ये शिकून घेणे, यातून शिक्षकांची दमछाक होत राहिली. महिला शिक्षिकांना प्रापंचिक जबाबदाऱयांच्या जोडीने हे सारे करावे लागत असल्याने त्यांच्यावरील ताण अधिकच वाढला. पालकांसाठी हा कोरोना काळ अधिक तणावपूर्ण ठरला. एकीकडे ऑफिसचे काम घरून करीत असताना मुले ऑनलाइन वर्गात नीटपणे शिकत आहेत किंवा कसे यावर लक्ष ठेवणे, त्यासाठी योग्य वातावरण राखणे, मुलांना मदत करणे, त्याच जोडीला धुणीभांडी, केरवारा करणाऱया कामवाल्यांशिवाय घरातील ही अधिकची कामे करावी लागणे, हे सारे विशेष करून महिलावर्गाला दमविणारे ठरले. मात्र बहुतेक कुटुंबांतील सदस्यांनी जबाबदारीने शक्य तितका आपला सहभाग या कामामध्ये उचलला, हेसुद्धा दिलासा देणारे.

    तथापि या काळामध्ये अनेक उपक्रमशील शिक्षकांनी मुलांनी शिकत राहावं यासाठी उत्साहाने प्रयोग केले. स्वयंस्फूर्तीने विविध विषयांच्या घटकांवर स्वत:चे पाठ तयार केले. इतर शिक्षकांना त्याचा उपयोग करता आला. अनेक वॉट्सअॅप ग्रुपवरून सातत्याने विविध माहिती, महत्त्वाच्या संकल्पना, संबोध यांचे परस्परांशी शेअरिंग सुरू झाले. एरवी आपापल्या शाळेच्या चौकटीत राहून शिकवणाऱया शिक्षकांचे क्षितिज एकाएकी विस्तारले. शेकडो शिक्षक एकमेकांच्या संपर्कात आले. तांत्रिक बाबी, संदर्भ साहित्य निवड करणे इत्यादी एकमेकांकडून अप्रत्यक्षपणे शिकणं सुरू झालं.

    शहरातीलच नाही तर अतिशय दुर्गम भागातील शिक्षकांनीही ज्ञानदानाचे व्रत अविरत ठेवण्यासाठी जी धडपड केली ती कौतुकास्पद आहेच. मेधा कुळकर्णी यांनी लेखात दिलेली ही काही उदाहरणे पाहिली की याची प्रचिती येते.

    कोविडच्या स्थितीतही विद्यार्थ्यांनी शिकत राहावं, यासाठी शिक्षकांनी नवनव्या पद्धती शोधल्या, अडचणींतून वाट काढली, शक्य तिथे तंत्रज्ञानाची मदत घेतली, ते शक्य नव्हतं तिथेही डिजिटल विषमतेवर मात करण्यासाठी कल्पना लढवल्या, धोके पत्करले, कधी स्वखर्चाने, कधी लोकांकडून मदत गोळा करून विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या. अशा किमान दोन-तीन हजार शिक्षकांनी विषयमित्र, शिक्षकमित्र अशी नावे देऊन गावातल्या जाणत्या व्यक्ती, विद्यार्थ्यांची मोठी भावंडे, नोकरीधंदा गमावल्याने शहरांतून गावांत परतलेले तरूण यांना मुलांचं मित्रत्व स्वीकारायला लावलं, शिकवण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात, मुलांवर लक्ष ठेवण्यात गुंतवलं. शाळा बंद झाल्या तेव्हा सर्वाधिक भीती होती मुलं शाळाबाह्य होण्याची. विशेषत गरीब मुलंमुली शाळेपासून तुटतील आणि त्यांची शाळा सुटेल. जिल्हा परिषदच्या अनेक शिक्षकांनी हेच रोखण्यासाठी जिवाचे रान केले, हे पुढील काही उदाहरणांवरून दिसून येईल.

    तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. सातपुड्याच्या कुशीत पावरा समाजाची वस्ती असलेली गावं. ना इंटरनेट, ना स्मार्टफोन, ना साध्या मोबाइल फोनवरून बोलायला गावात रेंज. एकमेव पर्याय, अभ्यासक्रमाचे कागद मुलांच्या हाती देणं. रूपेशकुमार नागलगावे सरांनी झेरॉक्स प्रती किराणा दुकानात ठेवणं. सामानासाठी गेल्यावर पालकांनी त्या उचलणं. आठवड्यातून एकदा सरांनी मार्गदर्शनासाठी जाणं. झेरॉक्सच्या देवाणघेवाणीचे निरोप देण्यासाठी फोन करायचा तरी डोंगरावर चढून रेंज शोधायची. उमराणीखुर्द, उमराणीबुद्रुक, काल्लेखेत शाळांत चार-पाच किलोमीटरवरील गावातूनही मुलं येतात. पटसंख्या 168. शारीरिक अंतर राखून घरांच्या ओट्यावर बसून गटागटाने मुलं अभ्यास करतात. शिक्षकांची अभ्यासओट्यावर फेरी असतेच. ‘उलगुलान ओटलू’- म्हणजे (शिक्षणाच्या) क्रांतीचा ओटा हा मंत्र आहे. मे महिन्यात आढळलं की, सात-आठ मुलं कुठल्याही गटात नाहीत. लॉकडाऊनमध्ये गुराखी नसल्याने ही मुलं गुरं चारायला डोंगरात जात होती. मग चार शिक्षकांनी गुंडाळी फळे, खडू, पुस्तक घेऊन डोंगर गाठला. सातपुड्यातील चौथी रांग. टेकडीवर पोचताच शिक्षकांनी शिट्टी वाजवायची. आवाज डोंगरादऱयांत घुमायचा. मुलगा त्या झाडाखाली आल्यावर फळा लटकवून वर्ग सुरू.

    कोविडकाळ सुरू झाला तेव्हा, धुळे जिह्यातल्या अंचाडेतांडा शाळेतली लेकरं गावात आणि तो ऊसतोडणीचा मोसम असल्याने त्यासाठी गेलेले त्यांचे आई-बाप गुजरातेत अडकलेले. मुख्याध्यापिका अरूणा पवार यांनी घरोघर जाऊन अन्नधान्य, तेल-मीठ-मसाला, औषधं हे सारं मुलांना आणि आजी-आजोबांना पुरवलं. कोविडचा धोका पत्करून त्या संपूर्ण तांड्यावर हिंडल्या. गुजरातेत अडकलेले पालक आणि मुलं- आजी-आजोबा यांचे बोलणं फोन/व्हिडिओ कॉलवर करून दिलं. चार-चार विद्यार्थी गटागटाने अंतरा-अंतरावर घरांच्या ओट्यावर बसवत शाळा सुरू केली. शिक्षकांची ही धडपड पूर्ण गावाने पाहिली. त्याचाच परिणाम असा की, यावर्षी एकाही पालकाने दिवाळीनंतर मुलांना ऊसतोडणीला सोबत नेलं नाही. मुलं गावातच घरी थांबून अभ्यास करत आहेत. पालकांनी इतका विश्वास शिक्षकांवर टाकून शिक्षकांच्या कामाची पावतीच दिली.

    तुलनेने, कराड हे सुस्थितीतल्या पालकांचं गाव. 12 जूनला कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 (अर्जुन कोळी हे मुख्याध्यापक) टिव्हीवर सुरू झाली. केबल चॅनल-फीचा पहिल्या दोन महिन्यांचा खर्च शाळाव्यवस्थापन समितीसदस्यांनी आणि त्यानंतरचा पालक उचलत आहेत. शाळेच्या इमारतीत थाटलेल्या तात्पुरत्या स्टुडिओत केबलवाल्यांच्या मदतीने चित्रीकरण केलं जातं. शाळेच्या 2,561 विद्यार्थ्यांसाठी हा खटाटोप. पण हे केबल नेटवर्क कराड आणि पाटण तालुक्यात जिथे जिथे पोचलंय, तिथल्या सगळ्याच मुलांना, ते शाळा क्र 3 चे विद्यार्थी नसूनही, या वर्गांचा लाभ मिळतोय. असे सुमारे 50 हजार विद्यार्थी आहेत. खरंच, शिक्षणाने शाळेच्या भिंती ओलांडल्या, असं शब्दश घडलंय इथे.

    याच काळात गणिताचे शिक्षक शमशुद्दीन आत्तार (शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) यांची गणित अध्यापनाची ऑनलाइन सत्रं इतकी विद्यार्थीप्रिय झाली की, दिवसभर ते झूमद्वारे वेगवेगळ्या वर्गांचे तास घेण्यात गुंतलेले आहेत. त्यांच्या शाळेतल्या आठवी-नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतातच. पुणे, सांगली, सावंतवाडी इथले विद्यार्थीही सरांच्या ऑनलाईन वर्गात हजेरी लावतात. ‘सोप्पं गणित’ही त्यांनी सुरू केलेली चळवळ आधीचीच आहे. पण कोविडकाळात चळवळ आणखी बहरली. इंटरनेट आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञानाची भुरळ पडल्याने त्याचा वापर करून गणित सोप्या पद्धतीने, खडू-फळ्याशिवाय शिकवण्याचे, मुलांना गणितात रमवण्याचे प्रयोग करत त्यांनी एक क्रांतीच घडवली आहे. आत्तार सर दररोज 10 प्रश्नांचा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांना पाठवतात. त्याची उत्तरं मुलांनी सोडवली की त्यांना किती गुण पडले ते कळवतात. ते सांगतात, “गाव दुर्गम. पालकांची स्थिती बेतासबात. पण मुलांची शिकण्याची जिद्द वाखाणण्याजोगी. गावात नेटवर्क नाही तर, इंटरनेटच्या रेंजसाठी आमचे विद्यार्थी डोंगरावर तात्पुरत्या झोपड्या बांधून अभ्यासासाठी तिथं येत आहेत. हे पाहिलं की, माझी जिद्द आणखी वाढते. तंत्रज्ञान आणि चांगल्यात-चांगलं शिक्षण आमच्या खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंतदेखील पोचवायलाच हवं, म्हणून मी आणखी जोमाने कामाला लागतो.”

    सरकारी म्हणजे काहीतरी हिणकस असं समजणाऱयांनी कोविडकडून जरूर धडा शिकावा. सरकारी काम फक्त मंत्रालयातल्या आदेशाबरहुकूम चालतं, हा ग्रह बरोबर नाही. इथेही मोकळीक मिळते. अन्यथा, ही शिक्षकमंडळी इतके प्रयोग करूच शकली नसती. शाळेच्या तालुका-जिह्यातल्या स्थानिक स्थितीला, भिन्नतेला अनुरूप असे निर्णय शिक्षक-मुख्याध्यापकांनी कोविडकाळात क्षणोक्षणी घेतले. चेंबूरपेक्षा जालन्यातल्या तांड्यावर वेगळी रीत, तांड्यापेक्षा आदिवासी मुलांसाठी निराळी, त्याहून अलग कोकणात असं घडलं. बजेट, फाइल इकडून तिकडे पोचण्यातला वेळ, मंजुरी वगैरे काहीच आड आलं नाही. जिल्हा परिषद शाळा आणि तिथले शिक्षक यांच्याबद्दल, त्यांच्या दिसण्या-बोलण्यापासून पेहरावापर्यंतची दूषित मतं संबंधितांनी त्वरेने दुरुस्त करून घ्यावीत. त्यांच्या त्याच दिसण्या-बोलण्यातून त्यांनी मुलांशी गहिरं नातं जोडलंय. या काळातल्या कित्येक प्रयोगांना राज्य, देश आणि जगाच्या पातळीवर वाखाणलं गेलंय. याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांत अधिक मुलं येण्यात होत आहे. प्रथम फाउंडेशनचा 2020 सालाचा असर (ASER - Annual status of education report 2020) अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यातही याला दुजोरा देणारी निरीक्षणं मांडलीयेत.

    इंटरनेट-स्मार्टफोन-ऑनलाइनच्या जमान्यात शहरवासीयांना जुनी वाटली तरी ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, फिल्म्स, प्रोजेक्टर अशी साधनंही किती उपयोगाची आहेत, हे कोविडकाळाने अधोरेखित केलं. अनेक गावांनी देवळातला ध्वनिक्षेपक, भोंगा गावातल्या मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध केलाय. भोंगाशाळा असंच नाव पडलंय या शिकण्याला. प्रथम संस्थेची निर्मिती असलेल्या ‘शाळाबाहेरची शाळा’ हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरवरून प्रसारित होतोय. 40 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचणारा हा कार्यक्रम अनेक गावांत भोंग्यावरून ऐकवला जातोय.

    अहमदनगर जिह्यातील हिरवेबाजार येथील पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. स्थानिकांच्या सहकार्यामुळे यशवंत माध्यमिक विद्यालय ही जिल्हा परिषदेची शाळा 15 जूनला सुरू करण्यात आली. त्या आधी गावात करोनाचे सावट होते. कित्येक रुग्ण अत्यवस्थ होते. पण गावकऱयांनी एकजुटीने प्रयत्न करून गाव कोरोनामुक्त केले आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करून शाळा सुरू करण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू राहिले.

    ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असल्या तरी त्यामुळे काही सकारात्मक बदल नक्कीच झाले आहेत. शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. पालकांचा मुलांच्या शिक्षणातील सहभाग वाढला आहे. मोबाइल, लॅपटॉप यांच्या मदतीने गेमव्यतिरिक्त शालेय शिक्षण, तसेच अमर्याद ज्ञान विद्यार्थ्यांसमोर खुले झाले आहे. त्याचा सकारात्मक वापर करून विद्यार्थ्यांना क्षमता विकास साधता येईल.

    देशातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींबाबत बरीच उलटसुलट चर्चा झाली, त्यात सुधारणा झाल्या. हे आक्षेपार्ह नाहीच; परंतु देशाचे भवितव्य उज्ज्वल करणारी सक्षम पिढी घडविणारी शिक्षण व्यवस्था मात्र या काळात दुर्लक्षित राहिली, हे खरे.

    आता शाळा सुरू होताना अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे जवळजवळ दोन वर्षांच्या अभ्यासाची तूट कशी भरून काढता येईल याचे नियोजन जसे आवश्यक तसेच ठळक संबोध संकल्पनांची उजळणी करून घेणे हे महत्त्वाचे ठरेल कारण आधीच्या इयत्तांच्या अभ्यासाचा पाया कच्चा राहिला असेल तर पुढचे समजणे विद्यार्थ्यांना नक्कीच अवघड जाईल चाचण्या वार्षिक परीक्षा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा यासाठी अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीचे स्वरूप याबाबत तत्परतेने निर्णय घ्यावे लागणार आहेत जेणेकरून ऐनवेळी गोंधळाची परिस्थिती उद्भवणार नाही. खेरीज शिक्षण विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळांनी प्रतिबंधात्मक व सुरक्षिततेच्या उपाय योजनांची योग्य अंमलबजावणी करणे याला प्राधान्य द्यायला हवे.

    मोठ्या गॅपनंतर शाळा सुरू होताना मुलांना काही दिवस तरी शाळेत येण्याचा, सवंगड्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आनंद व मोकळीक मिळायला हवी. त्यांनाही नवीन वातावरणात रुळण्यासाठी थोडा अवधी द्यायला हवा. लगोलग अभ्यास, चाचण्या, परीक्षांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावणे उचित होणार नाही. कोरोनाच्या भयसंकटातून मुक्त व्हायला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तोवर कोरोनाच्या बातम्या माध्यमातून येतच राहतील. पण त्यामुळे न डगमगता शाळा सुरू राहतील यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटेल अशी ठाम भूमिका शिक्षकांनी, शाळांनी व प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

    -- डॉ. बसंती रॉय

  • भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे

    भरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध नाट्यगृह आहे. भरत नाट्यमंदिर हे पुण्यातील जुन्या नाट्यगृहांपैकी एक अतिशय नाट्यगृह आहे. पुणेकरांसाठी ही वास्तू म्हणजे त्यांचा अभिमान आहे.

  • अहंकाराची लुडबुड ! (बेवड्याची डायरी – भाग ३९ वा)

    अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..

    तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..

    एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..
    अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले .

    जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..

    रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण !

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • कलियुगातील कंस

    त्यांच्या सातच नव्हे तर अनेक पिढ्या बरबाद होतील, असा सत्यचवनी, प्रामाणिक ईश्‍वरभक्त गरीब समाजबांधवांचा या नराधम लोकांना शाप आहे.

  • एक unique Space

    तो डबा घेऊन ऑफिसला गेला. मुलं आधीच school vanनी शाळेत पोहोचलेली. आता तिचा ‘personal time’ सुरु झाला.

    Coffeeचा मग एका हातात, नी तिचा favorite Android partner सोबत, अशी थोडी निवांत टेकली, तेवढ्यात दारावरची bell वाजली. थोड्या नाराजीनेच तिनेदार उघडलं; पण चेहेऱ्यावर लगेच आनंदाची लकेर झळकली!

    “अगं प्रिया! ये ना!” प्रियासुद्धा तिने दार उघडायची वाटच बघत होती.

    “अगं काय सांगू? आज मी कित्ती कित्ती आनंदात आहे माहितीये!?” प्रिया balconyतल्या hanging झोपाळ्यामध्ये जाऊन बसली सुद्धा!

    “अगं, झालं तरी काय?”

    “का~ही विचारु नकोस. अस्संच झुल~त राहूदे मला.” प्रियाचे डोळे बंद होते.

    “ठीक आहे, बस मग तू. मी कॉफी आणते तुझ्यासाठी”

    “ए नको गं, तुझी कॉफी घेऊन इथेच बस तूही. किंवा ऐक ना! तू तुझं चालू ठेव. मला काही लागलं तर घेईन मी. मला इथे थोडावेळ बसू देत. शां~~त..

    ती पुन्हा कॉफी sip करू लागली, एका वेगळ्या समाधानात, आनंदात.. हातात android होता, पण डोळे काही वेगळंच वाचत होते.. आपल्याला आपलं घर तर असतंच. पण त्याही सोबत आपल्या मैत्रिणीचं, जवळच्या शेजारणीचं, किंवा आईचं, असं एक घर, घराचा कोपरा असतो, पेक्षा असावाच! तिथे आपल्याला कुणीही काहीही विचारत नाही. आपल्याला हवा असलेला, हक्काचा pleasure break, दुःखात, संकटात, एकांतात रडायला, किंवा कोणत्याही प्रसंगी जाऊन शांत बसता यावं, अशी जागा! आपापल्या घरी तर अशी आपली खास जागा असतेच, पण ती जेव्हा आपल्या आवडत्या, विश्वासाच्या व्यक्तीसोबत न सांगता share करता येते, ती space, अगदी uniqueच ना!

  • धिक्कार …..धिक्कार ……जन लोकपाल बिल विधेयक मोडीत काढण्याचा केविलवाणा प्रयत्न………!!!!!!!!

    आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण ” भ्रष्टाचार निर्मुलन ” साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत ” ड्राफ्ट कमेटी ” ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले .