शिवथरघळीची वाट धरा आणि तीही पावसाळ्यातच.
साहित्याचा चोर मी
तरि साहित्यिक थोर मी
थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी
पण लढतो घनघोर मी ।।
-सुभाष स.नाईक
मंडाले, ब्रह्मदेश (आजचा म्यानमार) येथे सहा वर्षांची राजद्रोहाची शिक्षा भोगत असताना आयुष्यभर केलेल्या गीता चिंतनातून लोकमान्यांनी लिहिलेल्या ‘गीता रहस्य’ या अपूर्व व अजरामर ग्रंथास आता शंभर वर्षे झाली आहेत.
– ग. ना. कापडी, पर्वरी
भुरळ
तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होत
तिच ते अप्रतिम सौंदर्य फक्त
माझ्या डोळ्यांना भुरळ घालणार …………
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून याच संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न बारी,बाराई, चौरसिया आणि तांबोळी समाज करतो आहे. पानबेली डॉट इन या संकेतस्थळावर देशभरातील व विदेशातील वधू-वरांची माहिती उपलब्ध असून समाजाची जनगणना,परदेशातील बांधवांशी संपर्क साधणे, आपापसातील संबंध दृढ करणे,देशातील समाज बांधवांचा विकास, रोजगारी आणि समाजाची ओळख अंतरराष्ट्रीय पाताळीवर करून देण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणार आहे..
पुराणकालीन रामसेतू आख्यायिकेतील काल्पनिक भाग नसून नैसर्गिक चमत्कार आहे, भूगर्भातील चमत्कारिक संसाधनांचा वापर करून नल व नील या वानरांच्या(वनात राहणारे नर)सहकार्याने प्रभू श्रीरामचंद्राने बांधलेला सेतू होय. समुद्राच्या तळाशी बुडालेल्या रामसेतूच्या अस्तित्वाची साक्ष देणारे कितीतरी पुरावे भारतात आहेत. रामसेतू हा संशोधानाचा भाग आहे. अश्याच काही पुराव्यांचा मागोवा घेणारा हा लेखप्रपंच….
मोरुच्या मम्मीसाठी हे नवलच होतं. ओबामा साहेब एकदाचे चिंताग्रस्त होऊ शकतात पण मोरुचे बाबा चिंताग्रस्त होऊच शकत नाही,अशी त्या माऊलीची ठाम समजूत होती.या समजुतीला असा तडा जात असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर हाय आणि लोच्या अधेमधे हलू लागले.
सरकारने पोस्टाची तार सेवा बंद केली यावर भाष्य करणारी ही वात्रटिका
माझ्या संग्रहातील विविध " कातणी " !
नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा ! गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली " अरे, भावाला बहीण नको का ?"... किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे ! लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक
भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीलाहे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच " कातणे" !!
माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे. काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cuter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात. अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !
-मकरंद करंदीकर.
आजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti