(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • मुक्ता (१९९४)

    समाजात स्त्रीवर होणार्‍या अन्याया विरोधात आवाज उठवणार्‍या विशीतल्या विद्यार्थीनीची कथा. या चित्रपटात मुक्ता या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने..

  • उत्क्रांती

    माणसातल्या मर्यादा संपवण्यासाठी आणि त्याला एक परिपूर्ण बनवण्याचा घाट एक शास्त्रज्ञ सुरु करतात निसर्गाच्या विरुद्ध जावून निसर्गाला आव्हान करण्याचा प्रयोग ते मांडतात त्यात ते यशस्वी होतात का? कृत्रिमरीत्या उत्क्रांती शक्य आहे का आणि तिचे परिणाम काय असतील? माणूस खरच निसर्गाला आव्हान देवू शकेल का? मी प्रेषित कुलकर्णी सादर करत आहे उत्क्रांती !!!!

  • सच्चिदानंद शेवडेंच्या वाणीने मालाड दुमदुमणार

    व्याख्यानाचे विषय :

    २५ डिसेंबर : १८५७ चे स्वातंत्र्यसमर

    २६ डिसेंबर : वासुदेव बळवंत फडके

    २७ डिसेंबर : चापेकर बंधू

    २८ डिसेंबर : मदनलाल धिंग्रा

    २९ डिसेंबर : भगतसिंह, राजगुरु, सुखदेव

    ३० डिसेंबर : नेताजी सुभाषचंद्र बोस

    ३१ डिसेंबर : विनायक दामोदर सावरकर

  • एक आगळीवेगळी विसर्जन मिरवणूक

    visrajan-miravnook-featured

  • विज्ञान आणि अध्यात्म ःः मी कोण आहे? आणि कुठून आलो?

    साडे तीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असे शास्त्रज्ञ सांगतात. ते जीव आपले अन्न मिळवीत असत, हालचाल करीत असत आणि आपली प्रजाती वाढवीत असत. त्यांच्यातील आनुवंशिक तत्वामुळेच हे शक्य होत असे. हे तत्व पुढच्या पिढ्यात संक्रमित होत आणि उत्क्रांत होत सध्याच्या सजीवांपर्यंत पोचले आहे. हे आनुवंशिक तत्व म्हणजेच सजीवांचे आत्मे आहेत.

  • ओबामांचंही क्रेडिट कार्ड रिजेक्ट होतं तेव्हा…

    क्रेडिट कार्डावर पैसे नाहीत किंवा दुसर्‍या कोणत्या कारणाने तुमचं कार्ड एखाद्या दुकानात रिजेक्ट झालंय? काळजी करु नका. वाईटही वाटून घेउ नका. तुमचंच काय… जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अधयक्षांचंही कार्ड रिजेक्ट होऊ शकतं. किंबहूना झालंय.

  • होऊर

    होऊर..... म्हणजेच तुमचो पूर...

    कधी काळी कोकणात घे म्हणान पाऊस ऒतायचो...... अगदी १५-२० ईंच दिवसाक.. मग जा भंगसाऴीक पानी येय तेका होऊर म्हणत...

    २-२ दिवस हायवे बंद... आणि आता पोयचे मुगडे भरले की बोंबाटतत पूर पूर पूर.....

    अरे पानी येवंदे तरी, साताट वर्षापूर्वीच्या अॉक्टोबरच्या पूरानंतर पानीच येऊक नाय.... पानी येऊन २-३ दिवस मळ्यात रवाक व्हया मळकी बसाक व्हयी , तर पोरला मरतला, तर भात पिकतला.......

    तेवा माझ्या भावांनो, निदान म्हापूरूषाकडचो कुडाळवाल्यानी टाकलेलो कचरो सोनवड्याच्या मळ्यात जावक व्हयो....

    म्हणान तरी पूर येवंदे.......

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे....

  • वास्तुशास्त्र पेंटिंग – एक अद्भुत रसायन

    अनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो !

  • पु.ल.देशपांडे यांनी भीमसेन जोशी यांची घेतलेली मुलाखत

    पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?
    भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.

    पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.
    भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.

    पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?
    भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?

    पु.ल. : पुण्याला.
    भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.

    पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?
    भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मंतरलेले दिवस – भाग १

    ग्रामीण जीवन यावर माहिती. आता लोक गुरे पाळत नाहीत. दाढ भाजत नाहीत. काही लोक तर शेतीच करत नाही. एके काळचे वैभव लयाला जात चालले आहे.